Wednesday, December 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Gerenal

बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे वाढते महत्त्व

रोगाचे निदान करण्यासाठी आणि उपचारासाठी जैववैद्यकीय अभियांत्रिकी (बायोमेडिकल इंजिनिअरिंग)चे तंत्र महत्त्वाचे मानले जाते. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, आपत्कालीन विभाग, शस्त्रक्रिया विभाग, वैद्यकीय प्रयोगशाळा यासारख्या ठिकाणी वापरण्यात येणार्‍या वैद्यकीय उपकरण हाताळण्यासाठी बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतो. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात औषध आणि शास्त्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा एक चांगला पर्याय म्हणून उभा राहत आहे. विशेष म्हणजे कृत्रिम अवयवाची निर्मिती करताना बायोमेडिकलचे तंत्र आणि शास्त्राचा आधार घेतला जातो. कृत्रिम अवयव हे गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत असून बायोमेडिकलशिवाय शक्य नाही.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजबायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिरिंग क्षेत्रातील तंत्र आणि रचनेचा उपयोग हा वैद्यकीय उपचारासाठी आणि साधनासाठी करणे होय...
Gerenal

गरम की थंड; कोणत्या पाण्याने करावे स्नान..?

काही जणांना अंघोळीसाठी गरम पाणी लागतं, तर काही जणांना थंड पाण्याने अंघोळ करायला आवडतं. थंड की गरम कोणत्या पाण्याने अंघोळ करावी हे प्रत्येकाची आवड आणि सवयीवर अवलंबून तर आहेच. मात्र पाण्याचं तापमान आणि आरोग्याचा विचार करता गरम किंवा थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे वेगवेगळे फायदे आहेत.गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे थंड पाण्यामुळे झोप उडते, ताजंतवानं वाटतं, एक वेगळीच ऊर्जा मिळते. रक्तप्रवाहावर परिणाम होतो, शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं. यामुळे तुमची झोप उडते. व्यायाम केल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतो, थकवा दूर होतो. त्वचेला खाज येत असेल तर थंड पाण्याने अंघोळ केल्याने या खाजेपासून मुक्ती मिळते.गरम पाण्याने अंघोळकरण्याचे फायदे वाहतं नाक, डोकं जड होणं अशी फ्लूसारखी लक्षणं असल्यास त्यापासून आराम मिळतो.गरम पाण्यामुळे त्वचेवरील रंध्र...
Gerenal

दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम निवडताना..!

जर आपल्याला एखाद्या कारणावरून कॉलेजमध्ये जाता येत नसेल तर डिस्टन्स एज्युकेशन (दूरस्थ शिक्षण) हा एक उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो. देशात आजघडीला ५0 लाखाहून अधिक विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून अभ्यास करत आहेत. देशभरात ८00 हून सरकारी आणि अभिमत विद्यापीठ आहेत. यावरून दूरस्थ शिक्षणाचे महत्त्व आणि व्याप्ती लक्षात येते. दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मिळवलेली पदवी नियमित पदवीप्रमाणेच असते. या पदवीचा उपयोग करिअरचा ग्राफ उंचावण्यासाठी करू शकतो. भारतातील अनेक भागात आजही जिलच्या ठिकाणी कॉलेज किंवा विद्यापीठ नाहीत. तेथे दूरस्थ शिक्षण उपयुक्त ठरत आहे. हे एक शिक्षणाचे लवचिक माध्यम मानले जाते. हा अभ्यासक्रम करताना विद्यार्थी आपले छंदही जोपासू शकतो किंवा जबाबदार्‍या व्यवस्थित पार पडू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूरस्थ शिक्षण हे नोकरदार आणि व्यापार करणार्‍या मंडळींना, युवकांना उच्च शिक्षणाची ...
Gerenal

म्हातारपणाला दूर सारण्यासाठी..

धकाधकीच्या आयुष्यात लोक वेळेआधीच थकलेले फिल करू लागले आहेत. अशी तर याचे अनेक कारणे असू शकतात पण खरं कारण आहे ते म्हणजे तुमची जीवनशैली व सवयी. विज्ञानाच्या अनुसार रोजच्या जीवनातील काही सवयी आहेत ज्यामुळे तुमचे वय वेळेआधीच वाढते आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अशा बर्‍याच सवयी असतात ज्या आपल्या त्वचेवर सर्वात प्रथम परिणाम करतात. आपण अनुवांशिकदृष्ट्या आपल्यात असलेल्या गोष्टी बदलू शकत नाही पण तरूण आणि एनर्जेटिक दिसण्यात मदत करणार्‍या घटकांना नियंत्रित नक्कीच करू शकता.आठ वर्षांपूर्वी केलेल्या एका अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की सिगारेट ओढल्यामुळे आपले वय जास्त दिसून येते. र्जनल ऑफ प्लॅस्टिक अँड रिकंस्ट्रक्टिव सर्जरीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात, हे सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी ७२ जुळ्या मुलांना समाविष्ट केले. धूम्रपान करणार्‍या मुलांच्या चेहर्‍यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागली. धूम्रपान करणा...
Gerenal

व्यायाम करा घरच्या घरी

व्यायामाचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यात सातत्य असावं लागतं. अनेकांना जीममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा कंटाळा असतो. असं असेल तर घरच्या घरी करता येण्याजोग्या व्यायामावर भर द्यायला हवा. याविषयी.. स्ट्रेचिंग- घरी वर्क आउट करत असाल तर स्ट्रेचिंग हा सर्वोत्तम प्रकार आहे. व्यायामाची सुरुवात स्ट्रेचिंगने करावी. यामुळे शरीर लवचिक बनून वर्क आउटसाठी तयार होते. पुश अप्स- पोटावर झोपा. दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवा. हात आणि पंजे यांच्या सहाय्याने शरीर वर उचला आणि खाली आणा. पुश अप्समुळे खांद्यांना मजबुती मिळते. फ्री स्क्वेट्स- सरळ उभं राहून दोन्ही हात समोर ठेवावेत.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजगुडघ्यांवर थोडासा भार देऊन शरीराला खुर्चीवर बसतानाच्या स्थितीत आणा. कंबर सरळ ठेवा. काही काळ या स्थितीत राहून पूर्वपदावर या. हँड स्टँड- याला अधोमुख वक्रासन म्हणतात. रक्तदाबाचा त्रास असणार्‍या व्यक्तींनी हा प्र...
Article

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक.…

०६जून १६७४ रोजीचा दिन हा हिंदवी स्वराज्यासाठी सुवर्ण दिन म्हणून ओळखल्या जातो कारण याच दिवशी आपल्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करून "शिवराज्याभिषेक सोहळा" आयोजित केला होता.शिवराय हे परमपराक्रमी तर होतेच शिवाय त्यांची दूरदृष्टी सुद्धा अतिशय तिक्ष्ण होती.त्यांना माहीत होते की,आपण आपल्या स्वराज्यनिष्ठ असणाऱ्या मावळ्यांच्या मोलाच्या योगदानामुळे आपले हिंदवी स्वराज्य जरी निर्माण केले असले तरीपण आपण आजही मोघलांचे मांडलिक म्हणूनच राहणार आहोत.आपल्याला स्वतःचे चलन,राज्यकारभार,न्यायव्यवस्था,करप्रणाली ई.धोरणे ठरविण्याचा स्वतंत्र अधिकार प्राप्त होणार नाही स्वराज्य असून सुद्धा जर आपण प्रजाहित धोरण ठरवू शकत नसलो तर आपल्या हिंदवी स्वराज्याचा काहीच उपयोग होणार नाही.म्हणूनच त्यांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून आपल्या हिंदवी स्वराज्याची स्वतःची एक ओळख निर्माण होईल आणि आपल्या प्रजेला...
Article

निसर्गाच्या परोपकाराची परतफेड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करूया.!

निसर्गाने मानवाला भरभरून खूप दिले. एवढेच नाही तर हे सर्व पवित्र व गुणवत्तापूर्वक सुद्धा होते. ह्यामध्ये मानवाला आवश्यक असलेला प्राणवायू, सूर्यप्रकाश, पाणी, खनिज संपत्ती, पक्षी, प्राणी  व वनस्पती आहे. ते सुद्धा विनामूल्य व कुठलेही अपेक्षा न ठेवता जणू मानवावर निसर्गाने परोपकाराचं केले. जणू काही निसर्गाचा जन्मो जन्मीचा  दृढसंबंध असलेले नाते होते. जणू काही निसर्ग मानवावर अतोनात प्रेम करतो. जसे काही निसर्गाने मानवाचे पालकत्व घेतले व त्याप्रमाणे तो मानवाचे पालन पोषण करतो आहे.मानवाची निसर्गही हा खूप काळजी घेतो. त्याची तहान भागली पाहिजे, त्याला प्राणवायू मिळाला पाहिजे. त्याला सूर्यप्रकाशातुन डी जीवनसत्व मिळाले पाहिजे. वनस्पती पासून औषधी मिळाल्या पाहिजे. खाणींमधून खनिजे व समुद्रातून नैसर्गिक साठा मिळाला पाहिजे.मानवाने निसर्गा पासून आता पर्यंत घेण्याचेच काम केले आहे व ही प्रक्रिया अजूनही सुरूच...
Article

बुद्ध लेणींचे नामकरण…!

महाराष्ट्रातील जवळपास 400 बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले आहे.! काहींचे "नामकरण" ही झाले आहे..! भारतीय लोककथेमध्ये 'पांडव' व त्यांच्याशी जोडलेल्या अनेक लोकप्रिय कथा आहेत.! अनेक बुद्ध लेणींचे नामकरण ही याच नावाने झालेले आहे याचा आढावा घेणारा अतुल मुरलीधर भोसेकर यांचा लेख खास वाचकांकरीता देत आहोत.....इतिहासाचा शोध आणि त्याचे पुनर्लेखन का गरजेचे आहे हे लक्षात येईल..!- संपादकज्ञान हे प्रवाही असले पाहिजे, नव्हे तसे ते असतेच. तसेच ते परिवर्तनीय देखील असते. नवनवे संशोधन जसे पुढे येत जाते, तसे जुने ज्ञान किंवा विचार बदलणे अपेक्षित असते. प्रत्येक ज्ञानशाखेत असे प्रवाह निर्माण होत असतात. इतिहास किंवा पुरातत्त्वशास्त्र या शाखेत अविरत संशोधन चालू आहे. मात्र तरीही काही इतिहासप्रेमी, तज्ञ अथवा पुरातत्वविद हे जुन्या शब्दांना किंवा कंसेप्ट्स यांना बदलायला तयार नसतात. मग भले तुमचे संशोधन कितीही ताकदीचे, ...
Gerenal

बाबासाहेब लिहितात….✍️

"पैश्यांची फार कमतरता आहे त्यामुळे नवीन पुस्तके विकत घेण्याइतकी क्षमता नाही. -पण ज्ञानाची भूक एवढी तीव्र आहे. सध्या मुरंबा लावलेला पाव _त्या पावाचे दोन चार तुकडे करून उदरनिर्वाह करतो. ग्रंथालयात खाण्यावर बंदी आहे. -पण वेळ मिळताच मी कोणाच लक्ष नसताना ते खातोय. सकाळ झाली की "ग्रंथालयात केव्हा संध्याकाळ उलटते कळत नाही. काही पुस्तकांची पाने वाचायची राहिले की ती रुखरुख जीवाला लागते. मी पान क्र लक्षात घेऊन पुनश्च उद्या सकाळी ते पुस्तक वाचायला घेतो. -खूप जबाबदारी आहे. माझा शैक्षणिक उद्देश हा एकमात्र आहे. तो म्हणजे प्रचंड ज्ञानसाधना. पुस्तकात रमल्यानंतर कशाचं भान उरत नाही. पुस्तकांची पाने चाळताना मला कसलाच बाहेरचा गोंगाट ऐकू येत नाही. भूक सतावत नाही. तहान ही फारशी लागत नाही. संध्याकाळी एकवेळच जेवण घेतो. "जेवण फार मोजक असत. अगदी जगण्यासाठी लागेल इतकंच. "भाकरीची फार आठवण येते. -पावाचा तुकडा खाताना ग...
Article

महात्मा बसवेश्वर दलित व शोषितांचे मसीहा

संत हरळ्याच्या एकाकीपणामुळे त्यांचे मन गावात रमत नव्हते.त्याचे वडील ज्यांच्याकडे काम करीत असत,त्यांच्याकडून त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन मिळत असे. माहीत नसतांनाही वडीलांच्या कामाकडे लक्ष दिल्यामुळे पादत्राणे बनविण्याचा धंदा हरळ्या करु लागला. एक दया म्हणून लोकं हरळ्याची पादत्राणे घेत असत. अशाच अनुभवातून हरळ्याची  पादत्राणे कलाकुसर पद्धतीने तयार होवू लागली. आज त्यांच्यात कौशल्य निर्माण झाले होते. एकटेपणामुळे लवकरच लवकरच त्यानं आपला विवाह कल्याणी नावाच्या मुलींशी केला होता. लहानाचा हरळ्या संसार सांभाळता सांभाळता मोठा होवू लागला. कल्याणीपासून त्याला एक मुलगा झाला. त्याचं नाव शिलवंत ठेवण्यात आलं होतं.          बसवेश्वराने याच काळात जन्म घेतला होता. आपल्या लहानपणापासूनच बसवेश्वराने दलित आणि स्रियांवरील अत्याचार अगदी जवळून पाहिले होते. जन्माच्या वेळीच या बसवेश्वराने मुंज नाकारुन प्रथेला सुरुंग ...