Saturday, May 2

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

साखरे ऐवजी गुळ का वापरावा…?

उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन- B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात. याठिकाणी गुळ खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे.* गुळ खाण्याचे हे आहेत फायदे :* हिमोग्लोबिन वाढवते-ऍनिमिया दूर करण्यासाठी गुळ खाणे फायदेशीर असते. 100 ग्रॅम गुळामध्ये 11 mg लोहाचे प्रमाण असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास गूळ फार उपयुक्त असते.* रक्तदाब नियंत्रित ठेवतो-गूळ खाण्यामुळे ब्लडप्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते. कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.* पचनशक्ती सुधारते- ...
Article

प्रिय बाबासाहेब,

प्रिय बाबासाहेब, तुमच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या जगभरातील लोकांसाठी आजचा दिवस तसा दुःखाचा आहे. परंतु तुमच्या विचारांमुळे,संघर्षामुळे व बलिदानामुळेच आज कोट्यावधी लोक मानवी अवस्थेमध्ये आले आहेत.स्वतः दुःख सोसून तुम्ही असंख्य लोकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.हातात शस्त्र न घेता व रक्ताचा एक थेंबही न सांडवता एक व्यक्ती किती मोठी क्रांती करू शकतो याचे तुम्ही जगातील मोठे उदाहरण आहात. दुर्दैवाची बाब म्हणजे आम्ही अजूनही तुम्हाला समजून घेऊ शकलो नाही.अजूनही आम्ही तुम्हाला जातीच्या बाहेर काढू शकलो नाही. अजूनही आम्ही तुमचे उपकार,तुमचे कार्य,तुमचे देशप्रेम समजून घ्यायला तयार नाही.या देशातील वर्चस्ववादी,विषमतावादी व्यवस्थेने आमच्या मनात आणि डोक्यात तुमच्याविषयी विष पेरून ठेवले आहे व आजही ते पेरण्याचे काम ताकदीने सुरू आहे.त्यामुळे तुमचा जीवघेणा संघर्ष अजूनही या देशातल्या लोकांना समजलेला नाही.ज...
Article

बदलते लग्न सोहळे..!

असं म्हणतात कि लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. पृथ्वीवर फक्त काडीमोड होतो.गमतीचा भाग सोडून देऊ. भटक्या अवस्थेतील माणूस जेव्हा पाण्याचे साठे पाहून स्थिर झाला त्या वेळी लग्न हा प्रकार अस्तित्वातच नव्हता. एखादी सुंदर दिसणारी स्री असेल तर टोळीचा म्होरक्या तिच्यावर आपला हक्क सांगायचा.कोणीही कोणाबरोबर राहू शकत होते. पण मग यातून होणाऱ्या संततीचे काय ? तिची जबाबदारी नेमकी कोणी घ्यायची हा प्रश्न पडला. मग पुढे जाऊन गाळपेरात पीक घेण्याची म्हणजेच शेतीची पद्धत सुरू झाली. गावे वसली आणि त्यानंतर एक हक्काचा जोडीदार असावा, कुटुंब असावं यासाठी लग्न पद्धतीची सुरुवात झाली. हा झाला खूप प्राचीन इतिहास. त्या काळी लग्न म्हणून स्थानिक देवतेपुढे हार घालणे वगैरे खूप मर्यादित विधी होते.त्या नंतर आपल्या आजी आजोबांच्या काळात तर बैलगाडीने वऱ्हाड निघायचं नवरीच्या गावी.मजल दर मजल करीत हा काफिला चालायचा आणि वाट...
Article

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संविधानाचे निर्माते ते एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संविधानाचे निर्माते ते एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. आंबेडकर हे केवळ संविधानाचे निर्मातेच नव्हे तर ते एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञही होते.डॉ.भीमराव आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना बनवण्यात तर महत्त्वाची भूमिका बजावली. शिवाय त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून देशाच्या उभारणीतही मोलाचे योगदान दिले.डॉ. भीमराव आंबेडकर यांचे नाव येताच भारतीय संविधानाचा उल्लेख आपोआप येतो. संपूर्ण जग त्यांना एकतर भारतीय राज्यघटनेचे निर्माते म्हणून किंवा भेदभाव करणाऱ्या जातिव्यवस्थेवर कठोर टीका करणारे आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवणारे योद्धा म्हणून स्मरण करतात .या दोन्ही प्रकारात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अद्वितीय भूमिकेला कमी लेखता येणार नाही. पण एक दिग्गज अर्थतज्ञ म्हणूनही डॉ.आंबेडकरांनी देशाच्या आणि जगाच्या पटलावर अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे.डॉ.आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाणारे देशा...
Article

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली अभ्यासाने व अंगिकारणानेच.!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ज्ञ, समाजशात्रज्ञ, मानववंश, तत्वज्ञान, बुद्धिझम यांचे ही गाढे अभ्यासक होते. परंतु त्यांची या विषयाची अवतरणे दिली जात नाहीत. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे अवतरण, " या देशाच्या संस्कृतीची मुख्य समस्या ही बौद्धिक अप्रामाणिकता आहे. ही खरोखर आपल्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपणास ६ डिसेंबर १९५६ ला सोडून गेले. आज ६६ वर्ष झालीत परंतु अजूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांपर्यंत पोहचू शकले नाहीत.आपण कुठल्याही महापुरुषाची जयंती व पुण्यतिथी साजरी करतो ही फक्त त्या दिवसा पुरतीच असते. साधारणतः ह्या दिवशी हार, तुरे, पुष्प व त्या महापुरुषांबद्दल गौरवोद्गार काढले जातात. ह्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याचा उद्देश हा या महापुरुषांना स्मरण करणे, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचविणे हाच असतो. परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला डॉ. बाबासाह...
Article

तूच आमचा भाग्यविधाता

संविधानासारखी अनमोल ठेव समस्त भारतीयांसाठी ठेवून सर्वांना सन्मानाने जगण्याची नवी उमेद निर्माण करून देणाऱ्या महान सूर्याचा अस्त 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. आणि भारताला नवी दिशा देणारा तेजस्वी युगपुरुष काळाच्या पडद्याआड गेला. 5 डिसेंबरच्या रात्री 'बुद्ध आणि त्याचा धम्म' या ग्रंथाच्या दोन प्रकरणाच्या प्रती सोबत घेऊन त्याची तपासणी केली व दुसऱ्याच दिवशी डॉ आंबेडकरांचे निधन झाले. म्हणजेच मरणाच्या शेवटच्या दारात असताना सुद्धा ज्या मानवाने आपले लक्ष हे विचलित न होऊ देता फक्त आणि फक्त जनकल्याणासाठी आपले आयुष्य खर्च केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो पण त्यांची ओळख नुसती संविधानाचे शिल्पकार नसून, एक महान समाज सुधारक, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ,राजनीतिज्ञ, महान तत्वज्ञ, अशी सुद्धा आहे. न्याय मंत्री म्हणून त्यांनी आयुष्यभर मागासलेल्याचा, दलितांच्या अन्यायाविरुद...
Article

बाबासाहेब तुम्ही होतात म्हणून..

हक्क कर्तव्याचे भान बाबासाहेब, तुम्ही आम्हाला दिलं. खरं सांगू बाबासाहेब, तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने माणूसपण दिलं.आजवरच्या इतिहासात आत्तापर्यंत कित्येक महात्मे जन्माला आले आणि आपल्या अनमोल कार्याने अजरामर झाले. एका कनिष्ठ जातीत जन्माला येऊनही खऱ्या अर्थाने विश्वरत्न म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन. असं एकमेव व्यक्तिमव कि ज्यांचे पूर्ण विश्वात पुतळे उभारले गेले आहेत. माणसाला कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे ठरवण्याचा अधिकार नसला तरी मिळालेल्या जन्माचे आपल्या कार्याने सोने करणे महत्त्वाचे असते. सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून आजही पूर्ण जगात भारताची राज्यघटना आदराने संबोधिली दिली जाते. आत्ता दीप भव या बुद्धांच्या शिकवणी प्रमाणे बाबासाहेब स्वतःच स्वतःचा प्रकाश झाले आणि आपल्या अनुयायांनाही त्यांनी अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर निघण्याचा ...
Article

शिक्षणाचे महत्त्व

दलित समाजातील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकारांना परमपूज्य मानतात. त्या समाजाला डॉ भिमराव यांनी वाचा दिली. स्वाभिमान दिला, देवाचे असे वर्णन करतात की परमेश्वर मुक्या माणसाला वाचा देतो बोलायला शिकवतो व पंगु माणसाला ओलांडण्याची शक्ति देतो. शतकानुशतके भारतीयांना क्षुद्र समाजाला वाचा नव्हती, अन्याय सहन करावे लागत, चीड़ व्यक्त करता येत नव्हती, लाखोच्या या मूक समाजाला बोलके केले ते मूकनायक ठरले. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मधे महू येथे झाला. त्यांना आधुनिक मनु म्हणून ओळखले जाते कनिष्ठ जातीचे प्रतिनिधी म्हणून त्यांची प्रभावी ओळख प्रख्यात कायदेपंडीत, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जातात. त्यानी विद्यापीठाची पदवी घेतल्यानंतर अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी आपल्या विचारप्रणालीत लोकशाही विचाराला स्थान दिले त्यांच्या कार्याचा गौरव आजही संपूर्ण जगाला एक प्रकारची च...
Article

जगातील पहिला ऐतिहासिक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ

--------------------------------- विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.६ डिसेंबर २०२२ ला असलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कवी-लेखक-समीक्षक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा "जगातील पहिला ऐतिहासिक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ" हा लेख प्रकाशित करीत आहोत. -संपादक गौरव प्रकाशन ---------------------------------महाकाव्य ग्रंथाची ठळक वैशिष्ट्ये :१) जगातील पहिला ऐतिहासिक महाकाव्यग्रंथ २) महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील २०२१ कवींच्या २०२१ कविता ३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर या एकाच महामानवाच्या जीवन कार्यावरील २०२१ कविता ४) ११ कुलगुरू व २५ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ३६ जिल्ह्यात एकाच वेळी प्रकाशन ५) महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील ५२ विचारवंतांचे या महाकाव्यग्रंथावरील अभिप्राय ६) महाकाव्यग्रंथाची पृष्ठसंख्या-२१८४न्यायपंडित सर्व शास्त्रात दिग्विजयी ठरलेले,सर्वविद्...
Article

एक ध्येयवेडा समाजसुधारक- महात्मा फुले

विद्ये विना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना रुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केलेअशी आपल्या काव्यातून बहुजन समाजाची विदारक परिस्थिती मांडणारे, एक उत्कृष्ट लेखक विचारवंत महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन. ज्या व्यक्तीने शेतकरी, शेतमजूर, बहुजन समाज, स्त्री शिक्षणासाठी आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली त्या व्यक्तीला आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. 'सत्यशोधक समाज' नावाची संस्था स्थापन करून समाजाला नवी दिशा देण्याचे काम महात्मा फुलेंनी गेले. आपल्या मुलाचा महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह फुलेंनी आपल्या पत्नीच्या सहकार्याने लावला. कारण दत्तक पुत्र यशवंत हा विधवेचा मुलगा असल्याने समाज त्या मुलाला डावलून मुलगी देत नव्हता, पण फुले दांपत्याने दत्तक मुलाला न्याय मिळवून दिला. व समाजापुढे सर्वधर्मसमानतेचा आदर्श निर्माण केला.ज...