Wednesday, March 11

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
अनिलभाऊ लोहार : जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी
Article

अनिलभाऊ लोहार : जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी

अनिलभाऊ लोहार : जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणीधरणगावच्या एका साध्या, परंतु अत्यंत मेहनती कुटुंबात जन्मलेले अनिलभाऊ लोहार, हे एक असं व्यक्तिमत्त्व आहे ज्यांच्या जीवनाची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. साधेपणातही मोठं स्वप्न पाहण्याचं धाडस असलेल्या अनिलभाऊंची जिद्द आणि कष्ट यांच्यामुळे त्यांनी आपलं भविष्य स्वतः घडवलं.अनिलभाऊंच्या घरात आर्थिक चणचण होती. त्यांचे वडील बैलांना पत्र्या मारण्याचे काम करत, मात्र हे काम तितकं समाधानकारक नव्हतं. कुटुंबाला आधार देण्यासाठी अनिलभाऊंनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि आपल्या घरच्या परिस्थितीचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण थांबल्यामुळे भविष्यात काय करायचं याचं मंथन त्यांचं मन सतत करत होतं, पण त्यांच्या डोळ्यांतून कधीच स्वप्नं हरपली नाहीत. त्यांनी कधीच परिस्थितीसमोर नांगी टाकली नाही, कारण त्यांचं मन नेहमी मोठं काहीतरी करण्यासाठी आसुसल...
शेराचे झाड
Article

शेराचे झाड

शेराचे झाडEuphorbia tirucalli. अत्यंत दुर्लक्षित झालेले झाड! पूर्वी शेतबांधावर आपले पुर्वज आवर्जून हे झाड लावायचे,किंवा अख्ख्या शेताला ह्याचे कुंपण असायचे. कारण पिकांवर पडणारे अनेक रोग हे झाड अडवून धरायचे!तसं बघीतले तर अत्यंत जहाल झाड, पण विनाकारण डिवचले तर! आमचे अख्खे बालपण शेराखाली खेळण्यात गेले, आमची आई फक्त शेराच्या झाडाला हात लावू देत नव्हती. याचा चिक डोळ्यात वगैरे गेला तर अत्यंत घातक म्हणून. पण शेराची सावली अत्यंत आरोग्यदायी असते हे आता कळतंय, कारण शेर नामशेष होऊ लागलेत. शेराचे झाड पिकावरील किडींचा प्रादुर्भाव रोखते हे वाचून मी ह्यावर्षी आमच्या मक्यावर एक प्रयोग केला. मक्यावर पडणाऱ्या लष्करी आळीसाठी मी शेराच्या पाचसहा नांग्या खलबत्त्यात चेचून दोन दिवस एक लिटर पाण्यात भिजत ठेवल्या आणि तिसऱ्या दिवशी दोनशे मिली पंधरा लिटर पाण्यातून फवारल्या!रिझल्ट म्हणाल तर मी दुकानातून आणलेले औषध परत...
सुपरफास्ट..!
Article

सुपरफास्ट..!

सुपरफास्ट..!भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर मधु केव्हाचा उभा होता. सारख्या इकडून तिकडं रेल्वे गाड्या सुटायच्या त्याला तिथून जळगावला जायचं होतं. आज तो काहीतरी वेगळ्याच तंद्रीत होता. एक्सप्रेस गाडीनं गेलं म्हणजे वेळ वाचेल असं त्याच्या डोक्यात होतं. असंच मागच्या आठवड्यात तो इथूनच पॅसेंजरने बसला होता पण अर्ध्या तासाचा प्रवास त्याला एक सव्वा तास गेला. मागून येणारी एक्सप्रेस किंवा सुपरफास्टगाडी पुढं जाऊन द्यायची तोपर्यंत पॅसेंजरला असंच साईट पटरीवर ताटकळत थांबावं लागायचं! मागची गाडी जेव्हा पुढे निघून जायची तेव्हा गाडीतला प्रत्येक जण मनात स्वतःशीच खिन्न होऊन गाडीच्या खिडकीतून बघत बसायचा. आज म्हणूनच मधुनं एक्सप्रेसमध्ये बसायचं निर्णय घेतला होता.सुट्टीचा दिवस असल्यानं स्टेशनवर येणारा जाणाऱ्यांची आज खूपच गर्दी होती. गाडी आली म्हणजे लगेच उतरणाऱ्या प्रवाशांचा लोंढाच्या लोंढा दादरवरून खाली यायचा. तिथून प...
आमचाही एक जमाना होता.!
Article

आमचाही एक जमाना होता.!

आमचाही एक जमाना होताबालवाडी हा प्रकार नव्हता, पुढे 6 वर्षा नंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे , सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती, मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही.पास / नापास हेच आम्हाला कळत होतं... टक्केचा आणि आमचा संबंध कधीच नव्हता.शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची.... कारण  "ढ" असं हीणवलं जायचं...पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा दृढ विश्वास होता...कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं.दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा...वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे. आई ...
आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं.?
Article

आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं.?

आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं.?आई-वडीलांना ‘तुम्ही आमच्यासाठी काय केलं ?असा प्रश्न विचारण्याच्या आधी थोडा या गोष्टींचा विचार करा 'आई-वडील' हे दोन शब्द ऐकले की मनात एक वेगळाच भाव उमटतो. आपण कोणत्याही वयाचे असू, कितीही मोठे झालो तरी, आई-वडीलांसाठी आपली जागा कधीही बदलत नाही. परंतु कधीकधी, परिस्थितीच्या रेट्यामुळे किंवा आपल्या धकाधकीच्या जीवनामुळे, आपल्याला असे वाटू शकते की आपल्या आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं? हे विचारताना त्यांच्या कष्टांचा आणि त्यागाचा आपल्याला विसर पडतो.त्यामुळे हा लेख लिहिण्याचं मुख्य कारण म्हणजे, आपण त्या क्षणांची आठवण ठेवावी आणि त्याचं मोल समजावं. आईच्या पोटातून जन्म घेताना आपल्या आईला किती यातना सोसाव्या लागल्या असतील, आपण तिला काय काय दुःख दिलं, ते आपल्याला कधीच आठवत नाही. पण ती आई, जिचं शरीर, मन, आत्मा आपल्यासाठी पूर्णपणे बदलतं, तिने केलेला तो पहिला त्याग आपण...
तुला नाही जमणार हे गाणं.!
Article

तुला नाही जमणार हे गाणं.!

तुला नाही जमणार हे गाणं.!   तुला नाही जमणार हे गाणं. पंचवीस-तीस चाली झाल्या. आजच्या कोयना एक्सप्रेसने जा तू मुंबईला. मी बघतो या गाण्याचं काय करायचं ते." असा सणसणीत अपमान झेलून त्यांनी कोल्हापूरातला गाशा गुंडाळला आणि मुंबैला जायला निघाले...मनात प्रचंड कल्लोळ-घुसमट-कालवाकालव आणि गाण्याचे बोल... मुंबैला पोहोचेपर्यन्त एक लै भन्नाट चाल सुचली... आल्यापावली परत फिरला हा कलंदर ! परत कोल्हापूर गाठलं आनि दिग्दर्शक शांतारामबापूंना ती चाल ऐकवली...  "दे रे कान्हा S दे रे चोळी अन् लुगडी.." !!! शांतारामबापूंनी खूश होऊन पाठीवर शाबासकीची थाप दिली ! तो महान संगीतकार होता 'राम कदम'. चित्रपट , अर्थातच 'पिंजरा' !   आज मी सिनेमा-नाट्यक्षेत्रात काम करतो. आजच्या पिढीतल्या एका सहकलाकारानं मला "किरण माने सर, हे 'राम कदम' कोण?" असं विचारलं होतं, तेव्हा खुप वाईट वाटलं होतं... त्यांच्या एकेका गाण्यात मायणीमधल्या माझ्य...
दुनिया फक्त विश्वासावर चालते.!
Article

दुनिया फक्त विश्वासावर चालते.!

दुनिया फक्त विश्वासावर चालते.!आळेफाटा ते करमाळा प्रवास करत असताना माझ्या बाजूला एक मॅडम बसल्या होत्या.चार तासांचा प्रवास होता. लेडीज बाजूला असल्यानंतर जरा अवघडल्यागत होतंच.दोन तास होऊन गेले.छोट्या छोट्या स्टँडवर गाडी थांबत होती.प्रवासी उतरत होते,चढत होते.आणि मला तहान लागली होती.गाडी मिरजगाव स्टँडला थांबली.एक वडापाव विकणारा माणूस खिडकीजवळ येऊन ओरडायला लागला..”गरमा गरम वडापाव.” मला पाणी हवं होतं पण त्याच्याकडे फक्त वडापाव होते.मी त्याला म्हणलं “पाण्याची बाटली नाहीय का दादा?” त्यावर तो बोलला “नाहीय भाऊ.पैसे द्या मी आणून देतो लगेच.” मी पटकन त्याला वीस रुपये दिले.आणि तो वीस रुपये घेऊन गर्दीतून वाट काढत बाटली आणायला निघून गेला.माझ्या बाजूला बसलेल्या त्या मॅडम मोठ्याने हसल्या आणि म्हणाल्या, “गेले तुमचे वीस रुपये.” आणि त्या पुन्हा हसायला लागल्या.मी म्हणलं, “तो पाणी घेऊन येईल.” त्या पुन्हा हसत ...
Article

अनाथांची नाथ बोहणी.!

अनाथांची नाथ बोहणीउत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असा पूर्वीचा काळ होता, काळ बदलत गेला तसं उत्तम नोकरी व कनिष्ठ शेती असा बदल झाला, पण व्यापार तेव्हाही मध्यम होता आणि आजही मध्यमच आहे मग व्यापारी तो कोणताही असो अगदी छोट्या पासून ते मोठ्या पर्यंत चहाच्या टपरी पासून ते मोठ्या दुकानदारापर्यंत, रस्त्यावरील भाजीवाल्यापासून ते मोठमोठ्या मार्केटमधील व्यापाऱ्यापर्यंत हा मध्यम दर्जातच येतो. याच प्रत्येक व्यापाऱ्याची दुकानदाराची रोजची कमाई असते त्यांना मासिक पगार नसतो. रोजच्या रोज होणारी कमाई त्यालाच काही लोक ताजा पैसा बोलतात, त्याच ताज्या पैशातून ते त्यांचा उदरनिर्वाह करतात रोज सकाळी दुकान उघडलं की देवपूजा करतात अगरबत्ती लावतात देवाला दिवा लावतात, मनोभावे दर्शन घेतात त्यानंतर वाट बघतात ते गिऱ्हाईकाची, पहिले गिऱ्हाईक आले की वस्तू किंवा जो काही माल देतात आणि पैसे घेतात, ते पैसे हातात घेऊन दु...
पिक्चर रस्त्यावरचा…
Article

पिक्चर रस्त्यावरचा…

पिक्चर रस्त्यावरचा...आमच्या मित्राने पडद्यावरच्या पिक्चर संदर्भातील फोटो टाकला आणि मन जवळ जवळ 40 वर्ष मागे भूतकाळात गेले.असंख्य आठवणींचा कल्लोळ झाला.साले काय दिवस होते. . माझे जे अनुभव आहेत तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील त्यांच्यासाठी खास हा लेख आमच्या लहानपणी तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणपती उत्सव व नवरात्रो हा रस्त्यावर पांढऱ्या पडद्यावर बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो ते. त्याकाळी रात्री रस्त्यावर किंवा मैदानात बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत. .मुख्य म्हणजे फुकट असायचे मंडळातर्फे खर्च करायचे. दिवसा सायकलवर फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे.आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या.मग तारीख लक्षात ठेऊन जायचो आणि विसरलो की हळहळ वाटायची. एका द...
आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !
Article

आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !

आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो जो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याची कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत जो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं ! आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ? मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ? पाठीवरून हात कुणी फिरवायचा ? निश्चितपणे ही जवाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची .... थोडक्यात काय तर दोघांपैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे ! लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतातहे वाचा – पिक्चर रस्त्य...