Friday, June 19

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
अकोल्यात तरुणाचा साडी नेसून गांधीगिरी आंदोलन : रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
News

अकोल्यात तरुणाचा साडी नेसून गांधीगिरी आंदोलन : रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील टाकळी निमखर्दा गावात रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न चांगलाच गंभीर झाला आहे. गावातील नागरिकांना मागील दोन वर्षांपासून उखडलेल्या रस्त्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अक्षय साबळे या तरुणाने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. त्यांनी थेट साडी नेसून गांधीगिरी आंदोलन करत अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात पोहोचून ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या.दोन वर्षांपासून अपूर्ण पाइपलाइनचे कामगावामध्ये ईगल इन्फ्रा कंपनी पाणीपुरवठा योजनेसाठी पाइपलाइन टाकण्याचे काम करत आहे. हे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असले तरी आजतागायत पूर्ण झालेले नाही. पाइपलाइन घालण्यासाठी खोदलेले रस्ते मात्र दुरुस्त करण्यात आले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात गावकऱ्यांना चिखल, घसरगुंडी आणि वाहतुकीची अडचण भोगावी लागत आहे.ग्रामस्थांची दैन्यावस्...
धक्कादायक! नवरा दुबईत असताना बायकोचा सासऱ्यासोबतच संसार, व्हिडिओ व्हायरल
Article

धक्कादायक! नवरा दुबईत असताना बायकोचा सासऱ्यासोबतच संसार, व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! नवरा दुबईत असताना बायकोचा सासऱ्यासोबतच संसार, व्हिडिओ व्हायरलसध्याच्या काळात सोशल मीडियावर कुठलीही गोष्ट काही क्षणात व्हायरल होते. नात्यागोत्याचा मान, आदर आणि संस्कार बाजूला ठेवून अनेक धक्कादायक घटना सतत समोर येत आहेत. विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक सुखी संसार उध्वस्त होताना दिसतात. नुकताच असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवरा कामासाठी दुबईला गेल्यानंतर बायकोने स्वतःच्या सासऱ्यासोबतच संसार थाटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.🔴 व्हिडिओत काय आहे?व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती महिला धाडसाने कबुली देते की, "नवरा दुबईला गेल्यानंतर मी माझ्या सासऱ्यासोबत राहू लागले. त्याच्यासोबत मला आधार मिळाला आणि आम्ही एकत्र राहायचं ठरवलं." हा खुलासा ऐकून लोक थक्क झाले आहेत.महिलेचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नात्याला काळीमा फा...
कैद्याने केला कारागृहातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न
News

कैद्याने केला कारागृहातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न

कैद्याने केला कारागृहातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्नअमरावती (प्रतिनिधी) : कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 18 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कैदी कैलास (वय 40) विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कारागृहात कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी ती ड्युटीवर असताना शौचालयात गेली होती. त्याचवेळी आरोपी कैद्याने शौचालयाचा दरवाजा ढकलून जबरदस्ती आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्याने चुकीच्या नजरेने पाहत कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरो...
भारतीयांमध्ये एकता राखणारा उत्सव : नवरात्र | विविधतेतून एकतेचा संदेश
Article

भारतीयांमध्ये एकता राखणारा उत्सव : नवरात्र | विविधतेतून एकतेचा संदेश

भारतीयांमध्ये एकता राखणारा उत्सव : नवरात्र | विविधतेतून एकतेचा संदेशभारतीय संस्कृतीमध्ये नवरात्र हा शक्तिची देवता दुर्गा आणि तिच्या विविध रूपांची आराधना करण्याचा एक प्रमुख सण आहे, जो 'नौ रात्रींचा काळ' म्हणून ओळखला जातो. हा सण देशभरात विविध रूपांत साजरा केला जातो, भारतीयांमध्ये एकता राखणारा हा उत्सव आहे की ज्यात उपवास, प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम, गरबा आणि दांडिया यांचा समावेश असतो. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि यात अध्यात्म, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा संगम होतो. या सणाला केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक महत्त्व देखील आहे.नवरात्रीच्या काळात, लोक शक्ती, धैर्य आणि बुद्धीचे प्रतीक असलेल्या देवी दुर्गाच्या विविध रूपांची पूजा करतात. हा सण भक्ती आणि अध्यात्माचा काळ आहे, जो लोकांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित करतो.नवरात्र हा केव...
आई कधीच नसते मरत – राजेंद्र उगले यांचा हृदयस्पर्शी काव्यसंग्रह
Article

आई कधीच नसते मरत – राजेंद्र उगले यांचा हृदयस्पर्शी काव्यसंग्रह

आई कधीच नसते मरत – राजेंद्र उगले यांचा हृदयस्पर्शी काव्यसंग्रहनाशिकचे अष्टपैलू साहित्यिक राजेंद्र उगले यांच्या आई कधीच नसते मरत या काव्यसंग्रहाचे नुकतेच नाशिक येथील शं मु औरंगाबादकर सभागृहात प्रकाशन झाले. जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी लक्ष्मण महाडिक, कवी प्रकाश होळकर , प्राचार्य दिलीप धोंडगे, अष्टगंध प्रकाशनचे संजय शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यानंतर आई कधीच नसते मरत ही साहित्य कलाकृती वाचनात आली. या कलाकृतीचे सहज निरीक्षण केले असता असे लक्षात आले की, आई या व्यक्तिमत्वाला कवी राजेंद्र उगले यांनी मुखपृष्ठावर स्थान देवून जगातील समस्त आईंचा सन्मान केला आहे, आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे असे मला वाटते.आई कधीच नसते मरत या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर कवीने आपल्या आईचे छायाचित्र घेतले असून आईच्या भाळावर ठसठसीत कुंकु आहे, डोक्यावर पदर घेतलेला आहे, शे...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन
News

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन

मुंबई : राज्यातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, मका, भात, भाजीपाला आणि फळबागांसह अनेक पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले श्रम वाया गेले आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, सरकारकडून तातडीने मदतीची अपेक्षा आहे.कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच याबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल. राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व हालचाली सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या निकषांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसध्या राज्यभरातून १०० टक्के ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी होत आहे. अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचे नुकसान झालेले नाही, तर शेतकऱ...
गोष्ट मोक्षाची
Poem

गोष्ट मोक्षाची

गोष्ट मोक्षाचीनको मले खीर पूरीनको देऊ भजा वळागोष्ट मोक्षाचिच सांगेदारी एकाक्ष कावळा !!दारी एकाक्ष कावळाकसा काव काव बोलेमानवाचे कटू सत्यपट अंतरीचे खोले !!पट अंतरीचे खोलेएकाक्ष बहुजनांततुमचाच बाप कैसायेतो पित्तरपाठात !!येतो पित्तरपाठातआत्मा हा स्वर्गातूनीआत्म्याचा प्रवास सांगापाहिला काय रे कुणी ?पाहिला काय रे कुणी ?रस्ता स्वर्ग नरकाचासारा कल्पना विलासधंदा धनाचा पोटाचा !!धंदा धनाचा पोटाचाभट शास्त्री पंडिताचाकधी कळेल रे तुलाखेळ डोळस श्रद्धेचा !!खेळं डोळस श्रद्धेचाखेळ होऊन माणूसमायबापाच्या मुखातघाल जित्तेपणी घासं !!घाल जित्तेपणी घासंनको वृद्धाश्रम गळानको करू रे साजराअंधश्रद्धेचा सोहळा !!अंधश्रद्धेचा सोहळाभीती धर्माची ग्रहाचीआत्म मोक्षासाठी फक्तभीती असावी कर्माची !!भीती असावी कर्माचीकर्म सोडीना कुणालासांगे मोक्षाचिच गोठदारी एकाक्ष कावळा !!-वासुदेव महादेवर...
दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार
News

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणारमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर तीन टप्प्यांत घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने अंतिम टप्प्यात नेला आहे. यामध्ये मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.दिवाळीनंतर लगेच नोव्हेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात निवडणुकीचा बिगुल वाजणार असून, त्यामुळे राज्यात राजकीय फटाक्यांची आतषबाजी सुरू होणार आहे. मात्र या निवडणुकीमुळे आचारसंहितेचा कालावधी मोठ्या प्रमाणात लांबणार असून, विकासकामांना फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.सर्वोच्च न्यायालयाचा आदेशमहापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दीर्घकाळ रखडलेल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ३१ ज...
आकांत
Poem

आकांत

आकांतकोण ति-हाईतजणू ऋणाईतबैसला दारात…कुणास सांगावेउपेक्षित गावेदुख-या स्वरात…क्षीण छताखालीअश्रुंच्या पखालीधडकी ऊरात…कष्टतो सर्वदाभोगतो आपदाभोळा अंधारात…ऊन रखरखदावते ओळखजीव अंकुरात…कल्लोळ गणांचापूर भावनांचाढुसे दिनरात…प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त'५२-ब, साईनगर, गणेश अपार्टमेन्टजवळ,दिघोरी नाका, नागपूर- 440034(मो. 9421803498)हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!आकांत !…https://youtu.be/PRon0zORAkY?si=vYcXXOjhzldNhUDK...
नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारा
News

नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारा

नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारामुंबई : नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच आकाशही रंगतदार होणार आहे. २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. घटस्थापनेच्या दिवशी मुंबईत हलक्या सरींची शक्यता असली तरी त्यानंतर मेघगर्जनेसह पावसाळी वातावरण राहणार आहे.हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि विदर्भ-मराठवाड्यासह अनेक भागात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार सरींची शक्यता आहे.महामुंबई परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही भागात हलक्या सरींची नोंद झाली.ढगाळ वातावरण आणि उकाडानवरात्र व दुर्गापूजा दरम्यान ढगाळ वातावरणामुळे उकाड...