Friday, June 19

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
14 तास झाडावर बसून पुराशी झुंज – केवड येथील ज्येष्ठाची मध्यरात्री थरारक सुटका
News

14 तास झाडावर बसून पुराशी झुंज – केवड येथील ज्येष्ठाची मध्यरात्री थरारक सुटका

माढा (प्रतिनिधी) : माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे केवड गावात एक थरारक प्रसंग उभा राहिला. येथील ज्येष्ठ नागरिक कुबेर नामदेव धर्मे हे तब्बल १४ तास झाडावर बसून जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत राहिले. शेवटी मंगळवारी मध्यरात्री ११:५० वाजता रेस्क्यू टीमने ७५ किलोमीटरचा प्रवास करून त्यांची सुखरूप सुटका केली.सकाळपासून अडकलेले संकटातमंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून कुबेर धर्मे हे पूरग्रस्त भागात अडकून पडले. वाढत्या पाण्यामुळे त्यांनी जवळच्या झाडावर आश्रय घेतला. नदीच्या पाण्याचा जोर एवढा प्रचंड होता की गावकऱ्यांना त्यांना मदत करणे शक्यच झाले नाही.मोबाईल आणि ड्रोनच्या मदतीने शोधधर्मे यांनी स्वतःच्या मोबाईलवरून काही लोकांशी संपर्क साधला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने ड्रोन कॅमेराचा वापर करून त्यांचा शोध घेतला. झाडावर अडकलेले असल्याचे स्पष्ट झाल्यावर लगेच रेस्क्यू टीमला खबर देण्या...
अमरावतीत ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण; शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
Article

अमरावतीत ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण; शासन निर्णय रद्द करण्याची मागणी

अमरावतीत ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण; शासन निर्णय रद्द करण्याची मागणीअमरावती : ओबीसी आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत दोन ओबीसी बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ओबीसी आरक्षण संघर्ष समितीचे चंद्रशेखर देशमुख व तुषार वाढवणकर हे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असून त्यांनी शासनाविरोधात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.प्रमुख मागण्या२ सप्टेंबर २०२५ चा शासन निर्णय रद्द करावा – मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करणारा निर्णय मागे घ्यावा.शिंदे समितीच्या ५८ लाख कुणबी नोंदणीची पडताळणी करण्यासाठी उच्चस्तरीय उपसमिती नेमावी.ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सध्याच्या ५० टक्क्यांवरून १०० टक्के करावी.जातीनिहाय जनगणना तात्काळ सुरू करावी.महा-युती सरकारने भरपाई निधी ओबीसी समाजाला उपलब्ध करून द्यावा.संघर्ष समितीचा इशाराराज्य सरकारने या ...
बुलढाण्यात पालकमंत्री गायब? राष्ट्रवादीची पोलिसांत आगळीवेगळी तक्रार
News

बुलढाण्यात पालकमंत्री गायब? राष्ट्रवादीची पोलिसांत आगळीवेगळी तक्रार

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून प्रचंड पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी कोणतीही ठोस दखल घेतली नाही, असा आरोप करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांत आगळीवेगळी तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांना शोधून देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत आणि शेतकऱ्यांच्या दुःखाला कोणी न्याय देणार, असा प्रश्न या तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजतक्रारीनंतर सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले :"शासनाचा वेळ आल्यावर दुसऱ्याच दिवशी मी बुलढाण्यात होतो...
श्रद्धा आणि अंधश्रद्धा : लिंबाच्या माळीमागील रहस्य जाणून घ्या
Article

श्रद्धा आणि अंधश्रद्धा : लिंबाच्या माळीमागील रहस्य जाणून घ्या

श्रद्धा आणि अंधश्रद्धा : लिंबाच्या माळीमागील रहस्य जाणून घ्यामागील आठवड्यामध्ये नेहमीप्रमाणे तुळजाभवानीच्या मंदिरात गेले असता एका महिलेने पुजाऱ्यास विचारले की,"गुरुजी ही लिंबाची माळ देवीला का बरे घातली आहे देवीच्या गळ्यात? अशी माळ याआधी तर कधी पाहिली नव्हती. तेव्हा गुरुजी म्हणाले," कुणी काही नवस केला असेल तर घालतात ते अशी लिंबाची माळ. त्यावर ती उत्तरली दक्षिणात्य मंदिरांमध्ये देवीला लिंबाची माळ घातल्याचं बघितले आहे, ऐकलं आहे परंतु तुळजाभवानीला लिंबाची माळ प्रथमच मी बघते आहे. त्यावर ते म्हणाले, "क्रोधित झाल्यानंतर शरीर तापते. लिंबू थंडावा आणि तरतरी देणारे गुणकारी फळ असल्याने भगवतीचा क्रोध शांत व्हावा तिला थंडावा मिळावा म्हणूनही लिंबाची माळ घातली जाते असे म्हटले जाते".गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!तसं बघितलं तर लिंबू हे गुणकारी असते. ते थंड आणि तरतरी देणारे फळ. शरीराला थंडावा मिळ...
विलासराव माहुरे : गोरगरिबासाठी आशेचा किरण आणि निष्ठावंत शिवसैनिक
Article

विलासराव माहुरे : गोरगरिबासाठी आशेचा किरण आणि निष्ठावंत शिवसैनिक

विलासराव माहुरे : गोरगरिबासाठी आशेचा किरण आणि निष्ठावंत शिवसैनिकएक उत्तुंग अनं कृतिशील व्यक्तिमत्व म्हणून विलासराव माहुरे यांच्या कार्यकर्तुत्वाच्या बाबतीत महाविद्यालयीन जीवनापासून अनुभवले अनं कालांतराने त्यांच्यातील अनेकविध कार्यकर्तुत्वाचे पैलू उलगडत गेले.ग्रामीण भागातील एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती आणि एक खंदा अनं समाजाचे दुःख वेचणारा शिवसैनिक म्हणून त्यांच्या जीवन प्रवासाची अनुभूती यायला लागली.शिक्षकी पेशातील शिस्तप्रिय वडिलांच्या तालमीत तयार झालेल्या संस्कारक्षम विलासरावांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाला शिरोधार्य मानून ना मागचा विचार केला ना पुढचा विचार,ना कुटुंबाचा ना वैयक्तिक आयुष्याचा विचार केला.शिवसेनेची भगवी पताका हाती घेऊन राजकीय सामाजिक व विविधांगी कार्यासाठी शिवधनुष्य खांद्यावर घेतले. सामाजिक, राजकीय परिवर्तन आणि बाळासाहेबांच्या विचाराने पछाडलेल्य...
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींचा प्रेरणादायी निर्णय : जुळ्या मुलांना दिला अंगणवाडीत प्रवेश
Article

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींचा प्रेरणादायी निर्णय : जुळ्या मुलांना दिला अंगणवाडीत प्रवेश

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींचा प्रेरणादायी निर्णय : जुळ्या मुलांना दिला अंगणवाडीत प्रवेशजिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये व अंगणवाडी मध्ये प्रवेश कोण घेतात ?तर याचे उत्तर गोरगरिबांची मुले व ग्रामीण भागातील मुले जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये व अंगणवाडी मध्ये प्रवेश घेतात. हे वास्तव सत्य आहे.एवढेच कशाला जिल्हा परिषदांमध्ये शिकविणारे शिक्षक देखील आपल्या मुलांचा प्रवेश इंग्रजी माध्यमामध्ये केजी वन व केजी टू मध्ये करतात मात्र अंगणवाडीमध्ये करत नाहीत. किंवा सरकारी शाळांमध्ये करत नाही हे कटू सत्य आहे.मात्र नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या जुळ्या मुलांना अंगणवाडी मध्ये दाखल करून लोकशिक्षण आणि समानतेला प्राधान्य दिला.यातून मिताली सेठी यांनी फार मोठा आदर्श व प्रेरणादायी संदेश दिला आहे.मिताली सेठी या तरुण आयएएस अधिकाऱ्यांपै...
मोठा दिलासा! पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबणार, शेतीकर्ज पुनर्गठनाची शक्यता
News

मोठा दिलासा! पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबणार, शेतीकर्ज पुनर्गठनाची शक्यता

मोठा दिलासा! पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबणार, शेतीकर्ज पुनर्गठनाची शक्यतासोलापूर :ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात खरीप हंगाम पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पावणेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ४६ महसूल मंडलांमधील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवर असलेली कर्जवसुली थांबवून शेतीकर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. उद्या (बुधवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर येत असून, या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राज्यातील तब्बल १६ लाख शेतकऱ्यांकडे ३४ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी फक्त सोलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांकडेच २,७०० कोटींची थकबाकी असल्याचे अधिकृत आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.पू...
UPI युजर्ससाठी धक्का! 1 ऑक्टोबरपासून ‘ही’ लोकप्रिय सुविधा होणार बंद; NPCI चा मोठा निर्णय
News

UPI युजर्ससाठी धक्का! 1 ऑक्टोबरपासून ‘ही’ लोकप्रिय सुविधा होणार बंद; NPCI चा मोठा निर्णय

UPI युजर्ससाठी धक्का! 1 ऑक्टोबरपासून ‘ही’ लोकप्रिय सुविधा होणार बंद; NPCI चा मोठा निर्णयनवी दिल्ली : भारतातील कोट्यवधी लोक दैनंदिन व्यवहारांसाठी यूपीआय (UPI) चा वापर करतात. किराणा सामान घेणे असो वा ऑनलाईन शॉपिंग करणे, मोबाईलमधून फक्त काही सेकंदांत व्यवहार पूर्ण होतात. मात्र, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे आता ग्राहकांना बदल अनुभवावा लागणार आहे.1 ऑक्टोबर 2025 पासून UPI वरील P2P (पिअर-टू-पिअर) ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ सुविधा पूर्णपणे बंद केली जाणार आहे.काय आहे कलेक्ट रिक्वेस्ट सुविधा?UPI अॅप्स (PhonePe, Google Pay, Paytm इ.) द्वारे एखाद्या व्यक्तीकडून थेट पैसे मागण्यासाठी ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ पाठवता येत होती.उदाहरणार्थ, ₹500 मागायचे असल्यास रिक्वेस्ट पाठवली जात असे आणि समोरच्या व्यक्तीने UPI पिन टाकून ती मंजूर केली की पैसे खात्यात जमा ...
यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकाचा अमानवी अत्याचार : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, आरोपी अटकेत
News

यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकाचा अमानवी अत्याचार : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, आरोपी अटकेत

यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकाचा अमानवी अत्याचार : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, आरोपी अटकेतयवतमाळ, ढाणकी: यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी गावात धक्कादायक घटना घडली आहे. गुंडेकर कोचिंग क्लासेसचा शिक्षक संदेश गुंडेकर (वय 27) याने आपल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीवर गेल्या तीन वर्षांपासून अनैतिक संबंध ठेवले होते, असे पोलिसांनी सांगितले. या अत्याचारामुळे पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली.अत्याचार आणि गर्भधारणा लपवण्यासाठी आरोपी शिक्षकाने पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, मात्र गोळ्यांचा डोस जास्त असल्यामुळे मुलीला प्रचंड रक्तस्त्राव झाला. गंभीर अवस्थेत तिला नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर बिटरगाव पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली. आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला ...
अकोल्यात तरुणाचा साडी नेसून गांधीगिरी आंदोलन : रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
News

अकोल्यात तरुणाचा साडी नेसून गांधीगिरी आंदोलन : रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील टाकळी निमखर्दा गावात रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न चांगलाच गंभीर झाला आहे. गावातील नागरिकांना मागील दोन वर्षांपासून उखडलेल्या रस्त्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अक्षय साबळे या तरुणाने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. त्यांनी थेट साडी नेसून गांधीगिरी आंदोलन करत अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात पोहोचून ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या.दोन वर्षांपासून अपूर्ण पाइपलाइनचे कामगावामध्ये ईगल इन्फ्रा कंपनी पाणीपुरवठा योजनेसाठी पाइपलाइन टाकण्याचे काम करत आहे. हे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असले तरी आजतागायत पूर्ण झालेले नाही. पाइपलाइन घालण्यासाठी खोदलेले रस्ते मात्र दुरुस्त करण्यात आले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात गावकऱ्यांना चिखल, घसरगुंडी आणि वाहतुकीची अडचण भोगावी लागत आहे.ग्रामस्थांची दैन्यावस्...