Tuesday, March 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
सीमोल्लंघन : परंपरेच्या बंधनातून संविधानाच्या उजेडातले पाऊल
Poem

सीमोल्लंघन : परंपरेच्या बंधनातून संविधानाच्या उजेडातले पाऊल

सीमोल्लंघन : परंपरेच्या बंधनातून संविधानाच्या उजेडातले पाऊलहोय आम्ही सिमोल्लंघन केलंयकैक पिढ्याचं वेशीबाहेरचंजगत असलेलं जीणं…आज वेशीच्या आत आलंय ..ओंजळीला ओठ लावूनतहान ओठांची भागवली होतीभेदभावाच्या चढून भिंतीआमचा पुर्वज लढला होतात्याच भिंती भेदून आजहोय आम्ही सिमोल्लंघन केलंय.परंपरेचे फेकून जोखडगळ्यातलं टाकून मडकेकमरेचा फेकून झाडूहाती कासरा घेऊन आलोयसंविधानानं जग जवळ केलयहोय आम्ही सिमोल्लंघन केलंय.-प्रशांत वाघयेवलासंपर्क ७७७३९२५०००हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजhttps://youtu.be/pYW3sHdm0dY?si=6P0c8if1AiI95ivE...
‘धम्मचक्र प्रवर्तन’ चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?
Article, Story

‘धम्मचक्र प्रवर्तन’ चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?

'धम्मचक्र प्रवर्तन' चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?          मुळात 'बौद्ध' या संज्ञेत विद्वत्ता, चिकित्सा, आणि शिलसंपन्नता अंतर्भूत आहे; पण दुःखद म्हणजे पारंपरिक अथवा धर्मांतरित बौद्धांमध्ये या तिन्ही बाबींचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसतो. बौद्ध समाजात क्वचित लोक या तिन्ही साच्यात बसणारे आढळतील. पारंपारिक बौद्ध म्हणजे उत्तर-पूर्व (ईशान्य) भारतातील समूहात वज्रयान, तंत्रयान व काही अंशी महायान सिद्धांतांचा प्रभाव असल्याने त्यांच्याकडून आंबेडकरप्रणित धम्म अपेक्षितही नाही, मात्र बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध हा १००% विद्वत्ता, चिकित्सा, व शिलसंपन्नतेचा आग्रह धरत असल्यामुळे बाबासाहेबांसमवेत धर्मांतरित झालेल्या बौद्धांची ही स्वाभाविक जबाबदारी आहे, की आपण आपला सांस्कृतिक इतिहास शुद्ध स्वरूपात रुजवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ...
नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जल्लोष; विक्रमी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
News

नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जल्लोष; विक्रमी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नागपूर : नागपूरची ऐतिहासिक दीक्षाभूमी पुन्हा एकदा लाखो अनुयायांच्या उपस्थितीने गजबजून गेली आहे. यंदा ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा होत आहे. दरवर्षी साधारण पाच ते सहा लाख अनुयायी दाखल होतात; मात्र यंदा विक्रमी गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने या पार्श्वभूमीवर व्यापक तयारी केली आहे.विक्रमी गर्दीची शक्यताडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून बौद्ध अनुयायांचा ओघ सुरू झाला असून, यंदा १२ ते १५ लाख अनुयायी नागपूरात दाखल होण्याची शक्यता आहे.पोलिसांचा चोख बंदोबस्तगर्दी नियंत्रणासाठी नागपूर पोलिसांनी विशेष योजना आखली आहे. १२०० पोलीस कर्मचारी व अधिकारी, एसआरपीच्या दोन तुकड्या, २ डीसीपी, ४ एसीपी आणि १०० अधिकारी या ठिकाणी...
मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख
Article

मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख

मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेखसध्या मी मिक्स कॉलनीत राहतो. मिक्स कॉलनी ह्यासाठी म्हणालो की, मोठया शहरातून सुद्धा जात- धर्म निदर्शक वसाहती आहेत. माझ्या कॉलनीचे नावही हरिओम नगर आहे. माझा पत्ता मात्र पुष्पगंधा कॉलनी असा आहे कारण माझे घर हरीओम नगरातले शेवटचे आहे आणि माझ्या शेजारच्या  घरापासून पुष्पगंधा कॉलनी सुरु होते. मला हरीओम पेक्षा पुष्पगंधा नाव सोयीचे वाटले. म्हणून माझा पत्ता ‘अशोक थोरात. पुष्पगंधा कॉलनी ’ असा झाला. एकतर मी देव धर्म इत्यादी काही मानत नाही म्हणून हरीओम  नावाची अॅलर्जी, आणि कवी वगैरे असल्यामुळे पुष्पगंधा नावाचे आकर्षण. मला अनेक पत्र ‘ अशोक थोरात. वि.म.वि.  अमरावती ’ एवढयाच पत्यावर येतात. ह्याचा अर्थ मी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे असा नाही तर टपाल भरपूर येत असल्यामुळे पोस्टमन ओळखीचे होऊन जातात आणि वि.म.वि.ला टपाल का...
हे दीक्षाभूमी
Poem

हे दीक्षाभूमी

हे दीक्षाभूमी !हे क्रांती भूमीतू आमच्यासाठी उजेडाचं झाड झालीसविज्ञानवादी विचारांचीप्रज्ञा सावली झालीसतुझ्या कुशीत विसावतांनामाणुसकीची ऊब मिळतेघरी परततांना सोबतप्रज्ञेची शिदोरी मिळतेतुझी प्रेरणा डोक्यात आहेदीक्षाभूमी...सदैव परिवर्तन पेरत राहूसमता,बंधुता,न्यायाच्यामार्गावर आम्ही चालत राहूआता तुच आमची प्रेरणातुच जगण्याची ऊर्जातुच अमुची युद्ध शाळाआणि तुच अमुची क्रांतीज्वाळातुच मुक्तदाती अमुची…..धम्मचक्र असेच गतीमान होत राहोभारत बौद्धमयच्या दिशेने जात राहो !अरूण ह.विघ्नेरोहणा,आर्वी,वर्धाहे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजनागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीचा इतिहास...
पैठणच्या शेतकऱ्याचा KBC मधील पराक्रम : ५० लाखांची कमाई
News

पैठणच्या शेतकऱ्याचा KBC मधील पराक्रम : ५० लाखांची कमाई

पैठणच्या शेतकऱ्याचा KBC मधील पराक्रम : ५० लाखांची कमाईमुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शेतकरी कैलास कुंटेवाड यांनी कौन बनेगा करोडपती (KBC) या कार्यक्रमात मोठा पराक्रम केला आहे. कैलास यांनी एकही लाईफलाईन न वापरता तब्बल ५० लाख रुपये जिंकले.सोमवारी प्रसारित झालेल्या भागात कैलास यांनी सलग १४ प्रश्नांची बरोबर उत्तरे देत सर्वांना थक्क केले. शेवटी १ कोटी रुपयांसाठी १५ वा प्रश्न समोर आला. त्यांनी लाईफलाईन वापरूनही खात्री न पटल्याने ५० लाखांच्या रकमेसह गेम क्विट केला.कैलास हे व्यवसायाने शेतकरी असून महिन्याला फक्त ३-४ हजार रुपयांचीच कमाई होते. मात्र, त्यांच्या डोळ्यात क्रिकेटचं स्वप्न आहे. स्वतःला क्रिकेटपटू होण्याची संधी न मिळाल्याने आता आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण देऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.अमिताभ बच्...
ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल
News

ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल

मुंबई : राज्यभर पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून अद्याप 'ओला दुष्काळ' जाहीर करण्यात आलेला नाही. या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.“विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दु:ख पाहून वेदना होत आहेत, असं फडणवीस म्हणाले होते. पण विरोधी पक्षनेते असताना वेदना होतात आणि मुख्यमंत्री असताना त्या वेदना होत नाहीत का? मी सत्तेत असताना शेतकऱ्यांचे दु:ख पाहून कर्जमाफी दिली होती. मग आता मात्र शब्दांचा खेळ करून मदत नाकारली जातेय का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.ठाकरेंनी यावेळी 16 ऑक्टोबर 2020 रोजीचे पत्र दाखवत फडणवीसांना चिमटा काढला. “तेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यांनीच मला 'ओला दुष्काळ जाहीर करा' असं पत्र पाठवलं होतं. आज मात्र मुख्यमंत्री झाल्यावर तेच फडणवीस वेगळं बोलतायत. एखादा श...
ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल
News

ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल

अकोला : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जिल्ह्यांतील पिके वाहून गेली आहेत. उभ्या पिकांवर पाणी साचल्याने शेतकऱ्यांची दिवाळं जवळ आलं आहे. अशा संकटाच्या काळात सरकारकडून तातडीची मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु अजूनही "ओला दुष्काळ" जाहीर करण्यात राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत सरकारवर जोरदार टीका केली.सरकारचा नियम आणि शेतकऱ्यांचे प्रश्नआंबेडकर म्हणाले, "ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही मदतीला परवानगी देऊ शकत नाही. पण नियम असा आहे की, पूर ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. म्हणजेच शेतकऱ्यांना मदत मिळावी...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांसाठी नवी सक्तीची अट
News

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांसाठी नवी सक्तीची अट

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांसाठी नवी सक्तीची अटमुंबई : राज्यातील महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना गेल्या वर्षी जुलै 2024 मध्ये सुरु झाली आणि अल्पावधीतच राज्यातील २ कोटींपेक्षा अधिक महिलांनी तिचा लाभ घेतला. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपयांची थेट आर्थिक मदत जमा केली जाते. गरजू महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात हा योजनेचा मुख्य हेतू आहे.मात्र, गेल्या काही दिवसांत या योजनेत अनेक गैरप्रकार उघड झाले. नुकत्याच झालेल्या ऑडिटमध्ये तब्बल २६.३४ लाख अपात्र लाभार्थी या योजनेत असल्याचे आढळले. त्यात अनेक पुरुषांचाही समावेश आहे. महिलांसाठी असलेल्या या योजनेत काहींनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याने शासनाने आता कठोर पावले उचलली आहेत.नवी अपडेट : e-KYC अनिवार्यसरकारने सर्व पात्र महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) बंधनका...
चंद्रपूरचे कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५
News

चंद्रपूरचे कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५

चंद्रपूरचे कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५जळगाव : दिनांक २८ सप्टेंबर २०२५, रविवार रोजी जळगाव येथील अल्पबचत भवन, कलेक्टर ऑफिस येथे सकाळी ११ वाजता पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रपूरचे ज्येष्ठ कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. हा सोहळा राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, प्रशासकीय व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सन्मानित करते. या पार्श्वभूमीवर, कवी एम. ए. रहीम बंदी यांच्या साहित्य क्षेत्रातील उपक्रमशील आणि बहुआयामी कार्याची दखल घेत, त्यांना यंदाचा साहित्यभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.यापूर्वीही बंदी यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले असून, नुकताच दिनांक २७ जुलै २०२५ रोजी म...