Monday, March 9

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जग
Article

लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जग

लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जगप्रिये,"जागतिक महिला दिनाच्या तुला खूप खूप आणि मनापासून हार्दिक शुभेच्छा. बस. आराम कर. दमली असशील." चेहऱ्यावर हसू आणत त्याने तिला बाजूच्या खुर्चीवर बसण्यासाठी खुणावले आणि पुढे बोलू लागला. "मागच्या वर्षी याच दिवशी तुला मी आश्वासन दिले होते. बघ ते पूर्ण केले कि नाही?" तो बोलत होता. त्याच्याकडे कान देत, त्रासिक आणि थकलेल्या भावनेने ती बाजूच्या खुर्चीवर बसली. त्याच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? हे न कळल्याने ती, तो नाराज होऊ नये म्हणून चेहऱ्यावर उसने हसू आणत त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागली. खरेतर काही ऐकून घेण्याच्या मानसिकतेत ती नव्हती. तो पुढे बोलू लागला, "मी तुला बोललो होतो. तुझ्या मनात जे काही आहे, ती इच्छा तू पूर्ण करू शकते. तुला शिकायचे असेल, कुठे फिरायला जायचे असेल, काही खायचे असेल, जे काय ल्यायचे असेल, ते तू करू शकत...
मोबाईलने फोटो घेतल्यास थेट निलंबन! वाहतूक पोलिसांसाठी मोठा आदेश
News

मोबाईलने फोटो घेतल्यास थेट निलंबन! वाहतूक पोलिसांसाठी मोठा आदेश

मोबाईलने फोटो घेतल्यास थेट निलंबन! वाहतूक पोलिसांसाठी मोठा आदेशTraffic Police News मुंबई : वाहतूक पोलिसांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ई-चलान कारवाई करताना पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आता स्वतःचा खाजगी मोबाईल वापरून फोटो किंवा व्हिडिओ काढणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, खाजगी मोबाईलने गाड्यांचे फोटो काढताना आढळल्यास थेट निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.वाहतूक संघटनांच्या तक्रारीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही पोलिसांच्या या मनमानीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अनेक अधिकारी खाजगी मोबाईलने फोटो काढून नंतर “सोयीनुसार” ई-चलान प्रणालीमध्ये अपलोड करतात आणि निष्पाप नागरिकांवर चुकीचे चलान लावतात, अशी तक्रार संघटनांनी केली होती.या पार्...
११ हजार वोल्ट पडला,  पण प्रेमाचा ‘करंट’ भारी निघाला! ३ वर्षांच्या चिमुकल्याने वाचवले आईचे प्राण
News

११ हजार वोल्ट पडला, पण प्रेमाचा ‘करंट’ भारी निघाला! ३ वर्षांच्या चिमुकल्याने वाचवले आईचे प्राण

११ हजार वोल्ट पडला, पण प्रेमाचा ‘करंट’ भारी निघाला! ३ वर्षांच्या चिमुकल्याने वाचवले आईचे प्राणहिरो बनण्यासाठी ना सिक्सपॅक लागतं, ना चित्रपटात अॅक्शन सीन! बिहारच्या किशनगंजमध्ये केवळ ३ वर्षांच्या चिमुकल्याने आपल्या आईसाठी असं धाडस दाखवलं की, देशभरातील नेटकरी थक्क झाले आहेत. एका महिलेला रस्त्याच्या कडेला उभं असताना तब्बल ११ हजार वोल्टेज विजेची तार अंगावर पडली. क्षणभरातच तिचं आयुष्य संपणार असताना तिचा छोटा मुलगा देवदूतासारखा धावला आणि आईला विजेपासून दूर खेचलं. त्या एका क्षणात आईचे प्राण वाचले आणि सगळे अवाक् झाले!हा हृदयस्पर्शी व्हिडिओ @Mahamud313 या एक्स (X.com) अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, कॅप्शननुसार ही घटना किशनगंज, बिहार येथे घडली आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, महिला रस्त्याच्या कडेला उभी असते आणि अचानक विजेची तार तिच्यावर कोसळते. ती तार ११ हजार वोल्टेजची असल्याचं सांगितलं ज...
‘मार्शल’
Poem

‘मार्शल’

मार्शल.!एकमेकांची उणीदुणी काढत वेळ घालवण्यापेक्षाआपण आपले काम पूढे रेटत राहूबुध्दगयेच्या बोधिवृक्षाखालीसारेच एकत्र भेटत राहू ……….मार्शल ……गल्लीबोळातून धोक्याचे सायरनसर्रास आदळत आहेत कर्णपटलावरआता आपण अलर्ट झालो पाहीजेआपल्या छावण्यांमध्येहीरेड अलर्ट घोषित केला पाहीजेशत्रु हल्ल्याची तयारी करत आहेआपल्या छावण्या उध्वस्त करण्यासाठीरणगाड्यात धर्माची बारूद भरत आहे ……….मार्शल ……कुठली वेळ कशी येईल सांगता येत नाहीरात्र वै-याची नसूनदिवसही वै-याचा आहे आपल्यासाठीआरपारचे युध्द लढणे गरजेचे आहेसंविधानाच्या संवर्धनासाठीआता आपण आपल्याच दिशेनेबंदुकीच्या फैरी झाडण्यात अर्थ नाहीशत्रुसैनिक सिमापार करत असतांनाआपण एकमेकांचे कपडे फाडण्यात अर्थ नाही ………मार्शल …….वेळ अजूनही गेली नाहीसुर्य अस्तास जायचा आहे अजूननिरंजनेच्या निर्मळ पाण्यानेसारेच जाऊ भिजूनतुम्ही तिकडून या….आम्ही इकडून येऊश्रावस्तीच्या जेतवनातएकमेकांची गळ...
ई-केवायसीचं संकट! लाडक्या बहिणींचा हप्ता थांबणार? दिवाळीऐवजी चिंता आली ओवाळायला!
News

ई-केवायसीचं संकट! लाडक्या बहिणींचा हप्ता थांबणार? दिवाळीऐवजी चिंता आली ओवाळायला!

ई-केवायसीचं संकट! लाडक्या बहिणींचा हप्ता थांबणार? दिवाळीऐवजी चिंता आली ओवाळायला!मुंबई :‘लाडकी बहिण योजना’च्या लाभार्थींना पुन्हा एकदा थोडीशी चिंता लागली आहे. कारण योजनेत मोठं अपडेट आलंय — आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की नोव्हेंबरपूर्वी सर्व लाभार्थींनी ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. पण यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे * सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता ई-केवायसी नसेल तर थांबणार का?यावरून राज्यभरात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचा हप्ता दिवाळीपूर्वी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र त्याआधीच ई-केवायसीचं ‘भूत’ लाडक्या बहिणींच्या डोक्यावर आलं आहे.अधिकृतरीत्या सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी पुढील महिन्यांपासून विशेषतः नोव्हेंबरचा हप्ता ई-केवायसी पूर्ण न झाल...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे धर्मचिंतन: सर्वधर्म समभाव आणि मानवहित
Article

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे धर्मचिंतन: सर्वधर्म समभाव आणि मानवहित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे धर्मचिंतन: सर्वधर्म समभाव आणि मानवहितमित्रांनो जगाच्या पाठीवर अनेक धर्म व त्या -त्या धर्माचे संस्थापक होऊन गेले. प्रत्येक धर्माचं आपलं एक वेगळं तत्वज्ञान आहे.आणी त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की कोणत्याही धर्मानं वा धर्मग्रंथानं आपलं मत मांडतांना एक दुसऱ्याला दोष दिला नाही. किंवा आपलाच धर्म श्रेष्ठ की इतरांचा कनिष्ठ यावरही भाष्यही केले नाही. प्रत्येकानं एक चांगलाच विचार समाजापुढे मांडलेला दिसून येतो.कोणताही धर्म वाईट विचारानं वागा असं जनमाणसास शिकवत नाही. विदर्भ पंढरीत जन्मलेल्या वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा हेच सर्वसमावेशक धर्म विषयक तत्वज्ञान सांगितले आहे. राष्ट्रसंतांनी जी परिस्थिती भजन, किर्तनाच्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या गावांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सर्व बारकाईने अवलोकन केली होती. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध बनले होते. ज्या ज्या ध...
सर्वोच्च न्यायालयात शूज फेकण्याची धक्कादायक घटना; सरन्यायाधीश बी. आर. गवई ठाम
News

सर्वोच्च न्यायालयात शूज फेकण्याची धक्कादायक घटना; सरन्यायाधीश बी. आर. गवई ठाम

सर्वोच्च न्यायालयात शूज फेकण्याची धक्कादायक घटना; सरन्यायाधीश बी. आर. गवई ठामसोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीने देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने शूज फेकले. सुदैवाने तो शूज सरन्यायाधीशांच्या बेंचपर्यंत पोहोचला नाही. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.घटनेनंतर सरन्यायाधीश गवई म्हणाले, “अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणार नाही. कृपया सुनावणी पुढे चालू ठेवा.” प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शूज फेकणारा वृद्ध व्यक्ती “हिंदुस्तान सनातनचा अपमान सहन करणार नाही” असे घोषणा देत न्यायाधीशांच्या बेंचकडे शूज फेकत होता. न्यायालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले.माहिती नुसार, त्या व्यक्तीकडे सर्वोच्च न्यायालयातील वकील व क्लार्क यांना दिले जाणारे प्रॉक्सिमिटी कार्ड होते. त्यावर किशोर राकेश असे नाव नोंदलेले आह...
भुलाबाईची गाणी: महाराष्ट्रातील पारंपरिक सण आणि आठवणी
Article

भुलाबाईची गाणी: महाराष्ट्रातील पारंपरिक सण आणि आठवणी

भुलाबाईची गाणी: महाराष्ट्रातील पारंपरिक सण आणि आठवणीआमच्या लहानपणी भुलाबाईच्या सणाची व गाण्यांची वेगळीच मजा असायची. हल्ली आता ही मजा पहायला भेटत नाही.सारं टिपीकल व बेगडी वाटते.असं वाटते या लोकसंस्कृतीचे वाहक असलेल्या सणाला हल्ली बेगडीपणाच रूप शिल्लक राहिलं की काय?असं वाटायला लागतं.आज पुन्हा भुलाबाईच्या निमित्तानं लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. भाद्रपद महिन्याच्या सरत्या शेवटी गणपती,दसरा व नवरात्र सणाच्या समाप्ती नंतर भाद्रपद पौर्णिमा दिवशी अशा भूलाबाई महाराष्ट्रात घरोघरी बघायला मिळतात.पूर्वी अशा तयार रंगरंगोटी केलेल्या मुर्त्या आमच्या खेडेगावात नसायच्या. नदीकाठावरील कुंभाराच्या पजायावरची लूसलूसीत माती घेऊन व मस्त त्यात घोड्याची लीद मिसळून पाणी टाकून एकजीव केल्यानंतर छान भुलाबाई बनवायचो. हातानं भुलाबाई तयार करून ज्वारीचे टपोरे दाणे डोळे म्हणून लावायचो.व दुकानातून आठान्याचा गे...
‘टीईटी’शिवाय पदोन्नती नाही! सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने थांबल्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या पदोन्नती
News

‘टीईटी’शिवाय पदोन्नती नाही! सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने थांबल्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या पदोन्नती

‘टीईटी’शिवाय पदोन्नती नाही! सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने थांबल्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीसोलापूर : शिक्षकांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता ‘टीईटी’ (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्ताराधिकारी या पदांवर पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे टीईटी न उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची पदोन्नती सध्या थांबविण्यात आली आहे.न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानंतर राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षण विभागांनी पदोन्नतीची कार्यवाही थांबविली आहे. यामुळे अनेक वरिष्ठ शिक्षकांची पदोन्नती प्रक्रियाच ठप्प झाली आहे.केंद्रप्रमुखांची ५० टक्के पदे सरळसेवा आणि उर्वरित ५० टक्के पदे पदोन्नतीद्वारे भरली जातात. विस्ताराधिकाऱ्यांचीही अशीच पद्धत आहे. मात्र, आता या दोन्ही प्रकारांमध...
राजश्री टंडन मुक्त विद्यापीठात अभ्यासक्रमात RSSचा इतिहास
News

राजश्री टंडन मुक्त विद्यापीठात अभ्यासक्रमात RSSचा इतिहास

राजश्री टंडन मुक्त विद्यापीठात अभ्यासक्रमात RSSचा इतिहासप्रयागराज (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील राजश्री टंडन मुक्त विद्यापीठाने (UPRTOU) आपल्या पदवी (UG) आणि पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) इतिहास समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारतीय ज्ञान परंपरेचे जतन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सत्यकाम यांनी सांगितले.त्यांच्या मते, आरएसएस आणि भारतीय ज्ञान परंपरा यांच्यात अतिशय घनिष्ठ संबंध आहे. संघ केवळ धार्मिक संस्था नसून सामाजिक, राजकीय आणि नैतिक मूल्यांचा संवाहक आहे. “वसुधैव कुटुंबकम्”, सहिष्णुता, विविधता, आत्मनिर्भरता आणि स्वदेशी या भारतीय तत्त्वांवर संघ कार्य करतो.कुलगुरू सत्यकाम यांनी म्हटले की, या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, सामाजिक सलोखा आणि ...