📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: काल आज, आणि उद्या…

On: April 12, 2026 1:28 PM
आम्हाला फॉलो करा:
"काल-आज-उद्या: एकच नाव – बाबासाहेब!"
"काल-आज-उद्या: एकच नाव – बाबासाहेब!"

बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज,काल ,आणि ऊद्या कसे तारणारे आहेत..या विषयी सांगायचे झाल्यास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ एका विशिष्ट काळापुरते मर्यादित नसून आणि त्यांचे कार्य एका विशिष्ट समुदायापुरते किंवा वर्गापुरते नसून वैश्विक पातळीवर वाखाणण्यासारखे आहेत आहेत. अखिल विश्वाला तारणारे आहेत ..

काल विषमतेच्या अंधारातून बाहेर काढणारा प्रकाश भूतकाळात, जेव्हा भारतीय समाज जातिव्यवस्थेच्या आणि विषमतेच्या बेड्यांत अडकला होता, तेव्हा बाबासाहेबांचे विचार हे मुक्तीचे साधन ठरले.चवदार तळ्याचा सत्याग्रह असो वा काळाराम मंदिर प्रवेश, त्यांनी माणसाला त्याच्या अस्तित्वाची आणि हक्कांची जाणीव करून दिली. त्यांनी दलित आणि बहुजन समाजाला हे पटवून दिले की, शिक्षण हे वाघिणीचे ‘दूध’ आहे आणि ते प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी ‘एक माणूस, एक मत आणि एक मूल्य’ हे तत्व रुजवून शतकानुशतकांची गुलामगिरी संपवली.

आजच्या काळात, जेव्हा जगात विविध स्तरांवर वैचारिक संघर्ष सुरू आहेत, तेव्हा बाबासाहेबांचे विचार मार्गदर्शक ठरतात.बाबासाहेबांनी ‘रुपयाचा प्रश्न’ या प्रबंधात मांडलेले आर्थिक विचार आजही भारतीय अर्थव्यवस्थेच्या नियोजनात (विशेषतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत) महत्त्वाचे मानले जातात.हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना जे अधिकार दिले, त्याचे फळ आज आपल्याला प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या प्रगतीतून दिसते.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा


आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अंधश्रद्धा आणि कर्मकांडाच्या विरोधात त्यांचा ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ मधील वैज्ञानिक आणि तर्कनिष्ठ विचार समाजाला दिशा देतो.
उद्या भविष्यातील आव्हानांना सामोरे जाताना बाबासाहेबांचे विचार तारणारे ठरतील कारण त्यांचे तत्वज्ञान वैश्विक आहे. भविष्यात जेव्हा युद्धे किंवा सामाजिक द्वेष वाढण्याची भीती असेल, तेव्हा त्यांनी दिलेली ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव’ ही मूल्येच जगाला वाचवू शकतील.

लोकशाही केवळ संविधानात असून चालत नाही, ती लोकांच्या जगण्यात असावी लागते. भविष्यातील तरुण पिढीला लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या ‘घटनात्मक मार्गांचा’ (Constitutional Methods) वापर करावा लागेल. प्रगती म्हणजे केवळ आर्थिक विकास नव्हे, तर मानवी प्रतिष्ठा होय. जोपर्यंत जगात एकही माणूस शोषित आहे, तोपर्यंत बाबासाहेबांचा ‘संघर्षाचा विचार’ ऊर्जा देत राहील., बाबासाहेबांचे विचार हे ‘वर्तमानातील समस्यांवरचे उत्तर’ आणि ‘भविष्यातील समृद्धीचा नकाशा’ आहेत. त्यांनी दिलेले संविधान हे केवळ कायदेपुस्तक नसून, ते भारतीयांच्या जगण्याचे तत्त्वज्ञान आहे. म्हणूनच त्यांचे विचार काल ‘क्रांतिकारक’ होते, आज ‘अनिवार्य’ आहेत आणि उद्या ‘तारणहार’ असतील. बाबासाहेबांची विद्वता एका अथांग महासागर सारखी आहे..


डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाच्या एका अथांग महासागराचे नाव. महासागराचा तळ शोधणे जसे कठीण असते, तसेच बाबासाहेबांच्या विद्वत्तेची खोली मोजणे अशक्य आहे. बाबासाहेबांच्या विद्वत्तेचे पहिले सांगायचे म्हणजे ते केवळ कायदेतज्ज्ञ नव्हते, तर अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी मिळवलेल्या पदव्या त्यांच्या बौद्धिक क्षमतेची साक्ष देतात. त्यांचे वाचन आणि लेखन इतके अफाट होते की, आजही त्यांचे साहित्य जगाला मार्गदर्शक ठरते.

ज्याप्रमाणे महासागराच्या लाटा सातत्याने किनाऱ्यावर आदळतात, त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी विषमतेच्या भिंतीवर सातत्याने प्रहार केले. महाडचा चवदार तळे सत्याग्रह असो किंवा काळाराम मंदिर प्रवेश, त्यांनी अस्पृश्यता आणि जातीवादाच्या विरोधात दिलेला लढा हा मानवी प्रतिष्ठेसाठी दिलेला एक अभूतपूर्व संघर्ष होता. त्यांनी पददलितांना केवळ हक्क दिले नाहीत, तर त्यांना ‘आत्मभान’ मिळवून दिले.

भारताचे संविधान ही बाबासाहेबांच्या विचारांची फार मोठी उपलब्धी आहे, जी आजही भारतीय लोकशाहीला जिवंत ठेवत आहे. महासागराप्रमाणेच संविधानातही सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची पेरणी करून त्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला. स्त्रियांना दिलेले कायदेशीर हक्क (हिंदू कोड बिल) हे त्यांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे.


महासागरात ज्याप्रमाणे अनेक नद्या येऊन मिळतात, तसेच बाबासाहेबांच्या विचारात विविध वैश्विक विचारधारांचा संगम होता. त्यांनी बुद्धांच्या धम्माचा स्वीकार करून जगाला शांतता आणि प्रज्ञेचा मार्ग दाखवला. त्यांचे विचार कोणत्याही एका जातीपुरते किंवा धर्मापुरते मर्यादित नसून, ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे..


थोडक्यात सांगायचे तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘ज्ञानाचे महासागर’ आहेत, ज्यांच्या विचारांच्या लाटा आजही समाजातील अंधकार दूर करून चैतन्य निर्माण करत आहेत. महासागराचा विस्तार जसा संपत नाही, तसाच बाबासाहेबांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा कधीही न संपणारा आणि सदैव प्रेरणादायी असाच आहे.


म्हणून माझ्या कवितेमध्ये बाबासाहेबाला म्हटले आहे–

‘ बोधीवृक्षाच्या रोपट्याला फळे धम्माची लागली गोड…
उभ्या जगात नाही कुठे माझ्या भीमाच्या कार्याला जोड…!”
बाबासाहेबांचे कार्य याची तुलना जगातल्या कुठल्याही तत्त्ववेत्याशी होऊ शकत नाही किंवा समाज सुधारकांची होऊ शकत नाही. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” — हा त्यांचा संदेश आजही प्रत्येक पिढीला दिशा देणारा दीपस्तंभ आहे.

मुंगळा.. जिल्हा वाशिम–
9423650468

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now