New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल

On: October 1, 2025 4:46 PM
आम्हाला फॉलो करा:
प्रकाश आंबेडकर अकोला येथील पत्रकार परिषदेत ओल्या दुष्काळावर सरकारवर टीका करताना
प्रकाश आंबेडकर अकोला येथील पत्रकार परिषदेत ओल्या दुष्काळावर सरकारवर टीका करताना

अकोला : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जिल्ह्यांतील पिके वाहून गेली आहेत. उभ्या पिकांवर पाणी साचल्याने शेतकऱ्यांची दिवाळं जवळ आलं आहे. अशा संकटाच्या काळात सरकारकडून तातडीची मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु अजूनही “ओला दुष्काळ” जाहीर करण्यात राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत सरकारवर जोरदार टीका केली.

आंबेडकर म्हणाले, “ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही मदतीला परवानगी देऊ शकत नाही. पण नियम असा आहे की, पूर ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. म्हणजेच शेतकऱ्यांना मदत मिळावी की नाही, यावर सरकारच्या निर्णयाचा खेळ सुरू आहे. सर्वेक्षणही झालेले नाही, आकडेवारी गोळा झालेली नाही, मग शेतकऱ्यांना दिलासा नेमका कधी मिळणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.त्यांच्या या विधानातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारची असंवेदनशीलता अधोरेखित झाली.

फक्त सरकारवरच नव्हे तर इतर राजकीय पक्षांवरही प्रकाश आंबेडकरांनी घणाघाती टीका केली. सातबारा कोरा करण्याची आणि कर्जमाफीची मागणी पुन्हा जोर धरत असताना, आंबेडकरांनी पक्षपाती राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आज कर्जमाफीची मागणी करणारे, ते मुख्यमंत्री असताना काय करत होते?” असा सवाल उपस्थित करून त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबतही स्पष्ट संकेत दिले. आंबेडकर म्हणाले, “भाजपला सोडून इतर कोणासोबतही स्थानिक पातळीवर युती करण्यासाठी आमच्या पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला मुभा दिली आहे. महायुतीतील शिंदे गटाची शिवसेना असो वा अजित पवारांचा राष्ट्रवादी गट, त्यांच्यासोबतही आम्हाला हरकत नाही.” या वक्तव्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पुढील राजकीय धोरणाबाबत उत्सुकता वाढली आहे.

आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वेदना आणि असंतोष बाहेर पडला आहे. नुकसान झालेला शेतकरी दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. पिकं गेली, कर्जाचा डोंगर वाढला, आणि आता मदतीसाठी सरकारकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना “ओला दुष्काळ” जाहीर होण्याचीच वाट बघावी लागत आहे.

सरकारने यावर तातडीने निर्णय घेऊन मदत जाहीर करावी, अन्यथा ग्रामीण भागातून सरकारविरोधात रोष उसळण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

आमिर खानचा PK चित्रपट 85 कोटींच्या बजेटवर 792 कोटींची कमाई करत ठरला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर

12 वर्षांपूर्वी आमिर खानने रचला बॉक्स ऑफिसवर इतिहास! 85 कोटींच्या ‘PK’ ने कमावले तब्बल 792 कोटी रुपये

सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्नाच्या चर्चांना मामाचा दुजोरा

रजनीकांत यांच्या घरात वाजणार शहनाई? ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण काव्या मारन आणि अनिरुद्धच्या लग्नाला मामाचा दुजोरा

झारखंडच्या पाकुरमध्ये विवाहित महिला आणि तरुणाला अर्धनग्न करून गावभर फिरवल्याचा व्हायरल व्हिडिओ

‘इज्जती’च्या नावाखाली अमानुष कृत्य! विवाहित महिला-तरुणाला अर्धनग्न करून गावभर फिरवलं; व्हिडिओ व्हायरल, पोलिसांची मोठी कारवाई

LPG Cylinder Price Update July 2026 – 19 Kg Commercial Gas Cylinder Price Reduced by Rs 183.50

LPG Price Update: मोठा दिलासा! १९ किलोचा गॅस सिलिंडर १८३.५० रुपयांनी स्वस्त; घरगुती सिलिंडरच्या दराबाबतही मोठी अपडेट

महाराष्ट्रात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट आणि मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट.

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; अनेक जिल्ह्यांना IMD चा ऑरेंज-यलो अलर्ट

नाशिकच्या बागलाण तालुक्यातील चिकन प्रकरणानंतर वृद्ध दाम्पत्याची प्रकृती बिघडल्याची प्रतिनिधिक प्रतिमा

नाशिक हादरलं! चिकनच्या जेवणानंतर महिलेचा मृत्यू, पती ICU मध्ये; नेमकं कारण काय?