Monday, October 27

Tag: Article

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरआपल्या भारत देशाचा इतिहास महान आहे. ह्या पवित्र भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशातील बांधवांसाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्या महान कार्याचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा त्या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व आई भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी इंदूर जिल्ह्यातील महू या गावात झाला. रामजी वडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले होते. त्यांना स्वतःला वाचनाची आवड असल्याने घरात ग्रंथसंग्रह होते. त्याच बरोबर मुलांना ही चांगली पुस्तके ते आणून द्यायचे. त्या कारणाने बाबासाहेबांना वाचनाची, अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय लागली असावी.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य ...
एकच साहेब बाबासाहेब
Article

एकच साहेब बाबासाहेब

एकच साहेब बाबासाहेब           ३१ जुलै १९५६ ची सायंकाळ. नानकचंद टपाल घेऊन बाबसाहेबांकडे आलेले. बाबासाहेब ओसरीत बसून स्टूलवरच्या उशीवर पाय ठेवून नानकचंद यांना डिक्टेशन देत होते. मधातच त्यांनी डोळे, डोके खुर्चीच्या पाठीवर टेकवले आणि त्यांना झोप लागली. थोड्या वेळाने त्यांना पुन्हा जाग आली. रत्तु यांनी वाचून दाखविलेल्या पत्रांची उत्तरे त्यांनी भराभर डिक्टेट केली. नंतर नानकचंद यांच्या खांद्यावर हात ठेवून ते झोपायच्या खोलीत गेले आणि अंथरुणावर त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या दुसऱ्या हातातील पुस्तक गळून पडले. काही वेळ ते काहीच बोलले नाही. नानकचंद घाबरले. त्यांनी डोक्याला, पायांना मसाज केले. त्यामुळे बाबासाहेब थोडे शांत वाटत होते.गेल्या काही दिवसांपासून हे घडत होतं. शेवटी मोठया धाडसाने नानकचंद यांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला, "सर, अलीकडे आपण एवढे दुःखी आणि खिन्न का दिसता ? अधूनमधून डोळ्...
महानायकाच्या महापरिनिर्वाणापूर्वीचे पाच दिवस..
Article

महानायकाच्या महापरिनिर्वाणापूर्वीचे पाच दिवस..

महानायकाच्या महापरिनिर्वाणापूर्वीचे पाच दिवस..६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रचंड वादळ शांत झाले. भारतीय राजकारणातील आयुष्यभर उन्हात उभे राहून तमाम दलितांना मायेची सावली देणारी कोट्यवधी दलितांची माऊली पोरके करून निघून गेली. पण जाताना भारताला राज्यघटना आणि अशोकचक्राची देणगी देऊन गेली. धर्म नसलेल्या माणसाला धम्म देऊनगेली. आयुष्यभर संघर्ष करून मिळवून दिलेल्या अधिकाराचे जतन करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची मांडणी करून गेली. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ऐतिहासिक ग्रंथाला पूर्णत्व देऊनच आपल्या ऐहिक जीवनाची समाप्ती केली. गुरुवार, दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळी सहा वाजता एक पाय उशीवर, डोक्याजवळ हस्तलिखित कागद काही महत्त्वपूर्ण ग्रंथ,चष्मा एक इंजेक्शन सिरिज, एक औषधाची बाटली या अवस्थेत माईसाहेबांनी बाबासाहेबांना पाहिले.निद्रावस्थेत बाबांचे देहावसान झाले होते. हे कळल्यावर सात कोटी दलि...
म्हातारपण लवकर नको ?
Article

म्हातारपण लवकर नको ?

म्हातारपण लवकर नको ? तारुण्य टिकवण्यासाठी ‘हे’ करा 5 आयुर्वेदिक उपाय.....तरुणांनाच काय, तर वयोवृद्धांनाही आपण चिरतरुण राहावे, असे वाटत असते. यासाठी म्हातारपण लवकर येऊ नये, यासाठी काय करायला हवे, अँण्टीएजिंग प्रोसेस कशी करावी, याविषयी आयुर्वेदात माहिती देण्यात आली आहे. म्हातारपण येऊ नये किंवा आलेलं दिसू नये, यासाठी काय करायला हवं, याविषयी आयुर्वेदात 5 उपाय सांगण्यात आले आहेत. जाणून घेऊया...* भरपूर ऑक्सिजन शरीराला मिळेल, हे पाहा... शरीराला जेवढा ऑक्सिजन मिळेल तेवढी प्रत्येक पेशीला नवीन ऊर्जा मिळेल. झाडाला पाणी मिळालं की, ते तरारून वर येतं. त्याचप्रमाणे शरीरालाही ऑक्सिजनची आवश्यकता असते. प्रत्येक पेशीला ऑक्सिजनची आवश्यकता असते. लिवर, किडनी, फुफ्फुस, मेंदू अशा सगळ्या अवयवांना ऑक्सिजन मिळाला की, हे सगळे अवयव चिरतरुण राहण्याकरिता मदत करतात. यासाठी दीर्घ श्वसन करा. जाणीवपूर्वक श्वास घेऊन श्वा...
वाळवंटातच तेलांचे साठे का मिळतात ?
Article

वाळवंटातच तेलांचे साठे का मिळतात ?

वाळवंटातच तेलांचे साठे का मिळतात ?हा प्रश्न तितकासा बरोबर नाही कारण तेल केवळ वाळवंटातच मिळतं नाही असं नाही. ते अंटार्क्टिक प्रदेशातही मिळतं तसंच सागरी आखातात किंवा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशातही मिळतं. आपल्या बॉम्बे हाय आणि कृष्णा, गोदावरी खोऱ्यातील तेलांचे साठे याची प्रचिती देतात. तरीही वाळवंटात तेल मिळण्याच्या शक्यता जास्त आहेत, यात शंका नाही या काही भौगोलिक प्रदेशात ते का मिळतं हा प्रश्न उरतोच.याची दोन कारणं आहेत तेलाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि ते तयार झाल्या नंतर त्याचे साठे हलवले जाण्याची प्रक्रिया. पहिल्या प्रक्रियेसाठी सूक्ष्मजीव झटपट आणि ऑक्सिजन विरहित वातावरणात गाडले जाण्याची आवश्यकता असते. कारण अशा वातावरणातच त्यांच्यामधले हायड्रोजन आणि कार्बन यांच्यामधले बंध शाबूत राहू शकतात, त्यांच्या पासून हायड्रोकार्बन रूपातल्या खनिज इंधनांची निर्मिती होऊ शकते असं वातावरण नद्यांच्या त्रि...
रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी टर्मिनल का लिहिले असावे ?
Article

रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी टर्मिनल का लिहिले असावे ?

रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी टर्मिनल का लिहिले असावे ?जर कुठल्या रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी टर्मिनल लिहिले असेल तर त्याचा अर्थ तिथून पुढे ट्रॅक नाही. म्हणजे रेल्वे ज्या दिशेने आली त्याच दिशेने परत जाणार. टर्मिनसला टर्मिनल पण म्हटले जाते. म्हणजे असे स्टेशन जिथून रेल्वे पुढे न जाता आली त्याच दिशेने परत जाते, आपल्या माहितीसाठी देशात सध्या 27 स्टेशनवर टर्मिनल लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस हे देशातील सगळ्यात मोठे टर्मिनल आहेत.हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र  * रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी का लिहिले असते सेंट्रल?स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेले असले तर त्या शहरात एक पेक्षा अधिक स्टेशन आहेत, ज्या रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेले असते ते त्या शहरातील सगळ्य...
समाजक्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतीबा फुले यांचे लेखन कार्य 
Article

समाजक्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतीबा फुले यांचे लेखन कार्य 

समाजक्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतीबा फुले यांचे लेखन कार्य समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेत ज्यांचे ज्यांचे योगदान लाभले आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, राजे सयाजीराव गायकवाड, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे आणि एकूणच आपण जेव्हा समाजअग्रणीचा बिचार करतो तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव घेणे व त्यांच्याविषयी जाणून घेणे हे क्रमप्राप्तच ठरते.भारत देश हा वर्णव्यवस्था, चातुर्वर्ण समाजधिष्ठीत व्यवस्थेचा गुलाम झाला होता आणि त्यामध्ये असणारी जातीयतेची उतरंड यामध्ये खालच्या जातीतून वरच्या जातीत जाण्याची कोणतीच सोय नव्हती. हा देश संपूर्णत: वर्णवादाच्या, वर्णभेदाच्या चौकटीत विलीन झाला होता. या वर्णवादी उतरंडेत अस्पृश्य, स्पृश्य यांच्यात वर्तणूक, चालीरिती, अपमानित करणारी, पदोपदी छळणारी ही अमानवीय वागणूक दिल्या जात...
स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक  महात्मा ज्योतिबा फुले
Article

स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक महात्मा ज्योतिबा फुले

स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक  महात्मा ज्योतिबा फुलेविद्येविना मति गेली | मतिविना निती गेली|| नितीविना गति गेली | गतिविना वित्त गेले|| वित्तविना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले ||समाजातील माणसाजवळ जर ,शिक्षण नसेल.तर, त्या माणसाची काय अवस्था होत असते.याचं मार्मिक सत्य ज्योतिबांनी समाजास सांगितलं आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिकलं पाहिजे.हा महात्मा फुलेंचा ध्यास होता. आणि यासाठीच महात्मा फुलेंनी शिक्षणाची चळवळ उभी केली.१९ व्या शतकातील महात्मा ज्योतिबा फुलेंचा परिवर्तनवादी विचार समाजाला शिकण्याची प्रेरणा देत आहे.हे वाचा - बौद्ध संस्कृती आणि संस्कारभारतीय स्त्रीशिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना संबोधले जाते. त्याकाळामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीकरिता चालवलेल्या शाळा त्या काळात अस्तित्वात होत्या. पण, बहुजन ...
समाजाचे दीपस्तंभ महात्मा ज्योतिबा फुले
Article

समाजाचे दीपस्तंभ महात्मा ज्योतिबा फुले

समाजाचे दीपस्तंभ महात्मा ज्योतिबा फुलेमहात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाला त्यावेळी तत्कालीन ब्रिटिश राजवटीचा काळ होता. ब्रिटिश भारतात येण्याआधी पेशवाई राजवट होती.पेशवाई राजवट म्हणजे समाजातील  लोकांच्या सर्वांगीण विकासाचा पाया पूर्णपणे मोडून त्यांना गुलाम बनविणे. मानवाचे हनन करणारा असा हा कर्दनकाळ होता.. वैदिक संस्कृतीचा पगडा असलेला तो काळ रूढी, परंपरा,  वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, धर्मवाद, कर्मकांड, याने ग्रासलेला होता. चुकीच्या परपरंना बळी पाडून, दैववादाच्या नावावर पाप- पुण्य, स्वर्ग, नरकाची भीती दाखवून सामान्य लोकांना गुलाम बनविल्या जायचे.माणूस म्हणून जगण्याचे अधिकार त्यांच्याकडून हिरावून घेतल्या गेले.. ईश्वरी थोतांड रचून देवाच्या नावावरच अन्याय अत्याचार केले जायचे.. प्रचंड अज्ञान समाजात असल्यामुळे आपण माणूस आहे.. याचा लोकांना विसर पडला. त्यांच्या व...
सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले
Article

सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले

सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले हे सत्यशोधक समाजाचे व बालहत्या प्रतिबंधक गृहाचे संस्थापक,स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, जनतेकडून ‘महात्मा' ही पदवी प्राप्त झालेले सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. त्यांच्या 'ब्राह्मणांचे कसब', 'गुलामगिरी',  ‘शेतकऱ्यांचा आसूड', सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक व अखंड काव्यरचना  या ग्रंथांनी बहुजन समाजात क्रांती घडवून आणली. महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केला असता ते शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते.एक थोर कृतिशील समाजसुधारक युगपुरुष होते, हे स्पष्ट होते.ज्या काळात स्त्री व शुद्रांना परंपरेने शिक्षणाचा अधिकार नाकारला होता त्या काळात महात्मा फुलेंनी सन १८४८ ते १८५१ या चार वर्षात स्त्रीशुद्रांसाठी १८ शाळा काढल्या व योग्य असा अभ्यासक्रमही तयार केला  कारण शिक्षण नसल्यामुळे समाजाचे खूप नुकसान झाले आहे हे सांगताना...