स्वच्छतेच्या नावाखाली एसटी प्रवाशांवर आर्थिक भार; सुविधा मात्र अद्याप अपुऱ्याच.!

बंडूकुमार धवणे
On: May 9, 2026 7:17 PM
आम्हाला फॉलो करा
दारव्हा बसस्थानकावर अस्वच्छता आणि एसटी स्वच्छता कराविरोधात प्रवाशांची नाराजी दर्शविणारे दृश्य
दारव्हा बसस्थानकावर अस्वच्छता आणि एसटी स्वच्छता कराविरोधात प्रवाशांची नाराजी दर्शविणारे दृश्य

दारव्हा तालुका | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नुकतीच प्रत्येक तिकीटामागे दोन रुपयांची वाढ करून “स्वच्छता कर” आकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या अतिरिक्त वसुलीनंतरही बसस्थानकांवरील स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

दररोज राज्यभरातून लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात. ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून प्रत्येकी चार रुपये अतिरिक्त आकारले जात असून, या माध्यमातून महामंडळाला दरमहा कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अनेक बसस्थानकांवर अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अपुरी स्वच्छतागृहे यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, स्वच्छतेच्या नावाखाली कर आकारला जात असतानाही अनेक ठिकाणी शौचालय वापरण्यासाठी पाच ते दहा रुपये आकारले जातात. काही ठिकाणी पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने प्रवाशांना महागड्या पाण्याच्या बाटल्या खरेदी कराव्या लागत असल्याची तक्रार आहे.

याशिवाय, एसटीकडून प्रत्येक प्रवाशामागे विमा शुल्कही आकारले जाते. मात्र, अपघातग्रस्त किंवा मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना किती मदत दिली जाते, याबाबत स्पष्ट माहिती सार्वजनिक होत नसल्याने प्रवाशांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागातील बससेवाही अद्याप अपुरी असल्याचे चित्र आहे. अनेक गावांमध्ये बसथांबे असूनही बस थांबत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच, बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि पत्रकारांसाठी राखीव जागांचा नियम प्रत्यक्षात प्रभावीपणे पाळला जात नसल्याचीही खंत व्यक्त होत आहे.

दरम्यान, एसटी महामंडळ नफ्यात असल्याचे सांगितले जात असले तरी ग्रामीण भागात धावणाऱ्या बसांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे दिसून येते. चालक-वाहक यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या असतानाही त्यांना समाधानकारक वेतन मिळत नसल्याचे कर्मचारी सांगतात.

प्रवाशांकडून आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्काच्या बदल्यात बसस्थानकांवर स्वच्छता, मोफत शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, ग्रामीण भागात अधिक बससेवा आणि प्रवाशांसाठी सुरक्षित व सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

व्हाट्सएप से जुड़ें

अभी जुड़ें

टेलीग्राम से जुड़ें

अभी जुड़ें

इंस्टाग्राम से जुड़ें

अभी जुड़ें

हे वाचा

परिवर्तन, धम्म आणि मानवतेचा संदेश देणारा ‘काव्यमुदिता’ काव्यसंग्रह प्रकाशित

निपेऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळा सिन्नर वारकरी भवन येथे वृक्षमित्र विष्णू वाघ व मान्यवर उपस्थित

ग्रामीण मातीचा गंध जपणाऱ्या ‘निपेऱ्या’चे दिमाखदार प्रकाशन; वृक्षप्रेमाचा संदेश देणारी साहित्यकृती ठरतेय चर्चेचा विषय

NEET परीक्षा केंद्राबाहेर मुलीला प्रवेश मिळावा म्हणून सुरक्षा रक्षकांच्या पाया पडून विनवणी करणारी आई – Viral Video

NEET गेट बंद, आईची हंबरडा फोडणारी धडपड! मुलीच्या भवितव्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या पाया पडली; व्हिडिओने देशाला हेलावले.!

पनवेल साहित्य महोत्सवात पुस्तक प्रकाशन आणि साहित्यिकांचा सत्कार सोहळा

पनवेलमध्ये रंगला भव्य साहित्य महोत्सव | लेखक-कवींच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन व सत्कार सोहळा

कै. लक्ष्मीबाई नामदेव पवार यांच्या निधनानंतर गटेवाडी परिसरात शोककळा

पवार कुटुंबाच्या आधारवड कै. लक्ष्मीबाई नामदेव पवार यांचे निधन; गटेवाडीत शोककळा

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने श्रीलंका अ विरुद्ध अवघ्या 11 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत लिस्ट ए क्रिकेटमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केला

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा क्रिकेट विश्वाला धक्का ! अवघ्या 11 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकत रचला जागतिक विक्रम