Sunday, March 8

Article

Article

अराजकता…

अराजकता...              तीन दिवसांपूर्वी समाजमाध्यमात पसरलेला मणिपूरचा 'तो' व्हिडियो समाजमाध्यमात बघितला आणि सुन्न होऊन जागेवरच मटकन  बसले, काहीच सुचेना...! एवढे अमानवीय, विकृत कसे वागू शकतात माणसं? बरं 'माणूस' तरी कसे म्हणावे त्यांना? हिंस्त्रं श्वापदासारखी दिसत, भासत, वागत होती ती झुंड त्या विशीतल्या मुलीबरोबर. कोणत्या काळात जगतोय आपण नक्की? मोठ्ठं प्रश्नचिन्ह!! एकवीस वर्षाच्या त्या तरुण मुलीला विवस्त्र करून तिच्या अवयव, गुप्तांगाशी भयंकर पद्धतीने चाललेली छेडछाड, ती हजार पुरुषांची बेभान उन्मादित झुंड आणि त्या विकृत झुंडीत जिवाच्या आकांताने रडणारी-याचना करणारी भेदरलेली ‘ती’ असहाय एकटी. पुढे एका घोळक्यात पुन्हा एक स्त्री तशाच अगतिक अवस्थेत विवस्त्र तो घोळका दोघींची नग्न धिंड काढत त्यांच्या शरीराचे वाट्टेल तसे लचके तोडत चाललाय. जराशीही संवेदनशीलता वा माणूसपण शिल्लक असणाऱ्या सुसंस्कृत व्यक...
Article

सूर…

सूर..माझ्या ताईचं दोन वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. लग्नानंतर सासरी कसं फटकून वागायचं याबाबत तिच्याकडून मोलाच्या टिप्स मिळत होत्या. लग्नाने फक्त नवरा आपला झालेला असतो, त्यामुळे सासू-सासरे आणि इतर नातेवाईक यांना अजिबात भाव द्यायची गरज नाही. सुरवाती पासूनच त्यांना निग्लेक्ट करत त्यांच्याशी रोखठोक  वागायचं, म्हणजे भविष्यात ते डोक्यावर बसू शकत नाहीत हे मी मनावर पक्क  बिंबऊन घेतलं होतं.आई सांगत असे. ताईचं लग्न झालं. नवलाईचे नऊ दिवस संपले. संसार सुरु झाला. ज्या सासू-सासरे नामक व्यक्तींना आता पर्यंत कधी पाहिलेही नव्हते त्यांना एकाएकी आई-बाबा म्हणणे तिला खूप जड जात असे. संसाराला दोन वर्ष झालेयत ताईच्या. सासरी अजून पाहिजे तसे सूर जुळले नाहीत तिचे इतरांशी. आता मलाही त्या दिव्यातून जायचे होते.ठरल्या दिवशी मुहूर्तावर अक्षता पडल्या. आमची एवढी सगळी तयारी असूनही ऐन वेळेवर थोडासा गोंधळ उडालाच! पण आईच...
Article

भूस्खलनाच्या वाढत्या घटना चिंताजनक

भूस्खलनाच्या वाढत्या घटना चिंताजनकअलीकडे दरड  कोसळण्याच्या प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.. रायगड येथील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. एनडीआरएफ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरे दबली गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. यापूर्वी उत्तराखंडमधील जोशीमठाला भूस्खलना मुळे घरांना तडे जावून दरड कोसळल्या या भागातील ७२३ घरांना तडे गेल्याने अनेक कुटुंबे उधास्वस्त झालीत.दरड कोसळण्याच्या घटनांना भूस्खलन म्हणतात. दरडी कोसळण्यास नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही घटक कारणीभूत ठरतात.भूस्खलन ही उतारावर जमीन वेगाने सरकण्याची स्थिती आहे, ज्यामध्ये खडक, ढिगारा आणि माती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली एकत्र घसरतात. भौतिकशास्त्रातील त्याचे स्पष्टीकरण थोडे क्लिष्ट आहे. यानुसार, पर्वत आणि डोंगर उतारा...
Article

आज बँक ऑफ बडोदा स्थापना दिवस

आज बँक ऑफ बडोदा स्थापना दिवस स्थापना : २० जुलै १९०८बँक ऑफ बडोदाची स्थापना बडोद्याचे महाराज तिसरे सयाजीराव गायकवाड महाराजांनी २० जुलै १९०८ मध्ये केली. बडोदा मधील बाजारपेठेतल्या एका छोट्याशा दुकानगाळ्या मध्ये बडोद्या मधली पहिली बँक सुरु झाली. सयाजी गायकवाड महाराजांनी बँक ऑफ बडोदाची पहिली डिपॉजीट करून बँकेची अधिकृत सुरवात केली होती. कोणताही राजा त्याकाळी बँक वगेरे काढत नसे, पण सयाजीराव यांची दूरदृष्टी होती की, त्यांनी अर्थकारणाला चालना देण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून शाश्वत दिशेनी पावलं टाकली. महाराजांच्या डोक्यात बँकेचा विचार येताच त्यांनी गुजरात मधील बड्या व्यावसाईकाना विश्वासात घेतले. त्यात संपतराव गायकवाड, राल्फ व्हाईटन्याक, विठलदास ठाकरसी, तुलसीदास कालीचंद आणि एन.एम. चोक्सी ही सर्व मंडळी होती. त्यावेळी तत्कालीन गुजरातचे अर्थकारण याच लोकांभोवती फिरत होते त्यामुळे चाणाक्ष महाराजां...
चकवा…
Article

चकवा…

चकवा...उन्हाळ्याचे दिवस.सकाळपासूनच ऊन रगेल बनायचा. सकाळी सकाळी पक्षांच्या किलबिलाट ऐकू यायचा ;पण उन्हाचा पारा चढाय लागला की पक्षी एखाद्या दाट झाडामध्ये फांदीवर बसुन आराम करायाचे.विशेष करून बाभळीच्या खोडावर बसलेले विशिष्ट किडे मात्र किर्र किर्र असा आवाज करुन रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याराला भंडावून सोडायचे.आमच्या घरची अतिशय गरीब परिस्थिती.दोन दोन तीन तीन दिवस जेवायला मिळू नये .माझ्या दादाला त्या काळी किती रुपये दिले होते हे मला माहित नाही ;पण आमचे बा वर्षभरासाठी बोली करुन बाबशेटवाडी या गावात एका सावकाराकडे गायी म्हशी राखण्यासाठी माझ्यापेक्षा मोठया भावाला नोकर म्हणून ठेवला होता. त्यावेळी माझ्या दादाच वय असेल जेमतेम आठ नऊ वर्षाचं.मी दादापेक्षा तीन वर्षानी लहान. दादा गावात रहात असल्यामुळे त्याला मराठी भाषा बोलता यायची ;पण मला मराठी भाषा समजत नव्हती व बोलताही येत नव्हती.एकदा दादा त्याच्या ...
पावसाळ्यात पायांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून ६ सोपे घरगुती उपाय.!
Article

पावसाळ्यात पायांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून ६ सोपे घरगुती उपाय.!

पावसाळ्यात घाण पाण्यामुळे पायांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून ६ सोपे घरगुती उपाय.. उन्हाळ्याच्या ऋतूनंतर येणारा पावसाळा हा आपल्याला अतिशय आनंद देऊन जातो. परंतु पावसाळ्यात त्वचेवर होणाऱ्या फंगल इन्फेक्शन्सचे प्रमाण हे अधिक असते. पावसाळ्यात पायांची सर्वांत वाईट परिस्थिती होते, त्यामुळे मुख्यत्वे करून पायांची निगा राखणे खूप गरजेचे असते. जर पावसाळ्यात पायांची योग्य निगा राखली नाही तर पायांना अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात वातावरणात अधिकची आर्द्रता आणि दमटपणा असतो. यामुळेच  फंगल इन्फेक्शन्स सारख्या समस्या उद्भवतात. अशा दिवसांत सकाळी अंघोळ करताना पायांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे.इतर कोणत्याही ऋतूच्या तुलनेत पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण या दिवसांत शरीरात, वातावरणाचा, पर्यावरणात खूप बदल होत असतात. पावसाळयात आपले पाय व पावसाचे पाणी यांचा स...
मुठभर शेंगदाणे अन गुळाचा खडा खाण्याचे फायदे.!
Article

मुठभर शेंगदाणे अन गुळाचा खडा खाण्याचे फायदे.!

मुठभर शेंगदाणे अन गुळाचा खडा खाण्याचे फायदे.!आयर्न कमी-थकवा फार तर हा उपाय नक्की करा'भागदौड़ वाली जिंदगी रुकना मना है' हे वाक्य आपण ऐकलच असेल. धावपळीच्या जीवनात जो थांबतो तो मागे राहतो. परंतु, यशाच्या मागे धावत असताना आपण, स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. पौष्टीक पदार्थांऐवजी आपण फास्ट फूड खाण्यास सुरुवात करतो. ज्यामुळे शरीरात गंभीर आजार निर्माण होतात. परंतु, फास्ट फूड ऐवजी असे अनेक पदार्थ आहे. जे हेल्दी पण आहेत, व आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात.आपण गावाकडच्या लोकांना गुळ आणि शेंगदाणे खाताना पाहिलं असेल. मुठभर शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी बिस्किटे आणि कुकीजच्या जागी गुळ शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला आहे. गुळ शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात? याबाबतीत त्यांनी माहिती दिली आहेगुळ - श...
इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ…
Article, Gerenal

इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ…

इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ...इंग्रजांचं ‘हिलस्टेशन’ आणि यवतमाळ महाराष्ट्राच्या ‘कॉटन सिटी’ बद्दल जाणून घ्या.यवतमाळ हा “महाराष्ट्रातच असणाऱ्या सदैव दुर्लक्षित आणि मागास समजल्या जाणाऱ्या विदर्भातील” एक जिल्हा आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरपासून यवतमाळ १५० किमीच्या अंतरावर आहे.यवतमाळ म्हणजे डोंगरांची माळ.. जुन्या रेकॉर्डप्रमाणे यवतमाळ हे जगातलं सर्वात सुरक्षित गाव होते. पूर्वी यवती म्हणून ओळखले जाणारे हे शहर बेरार सल्तनतेचे प्रमुख शहर होते. १३४७ मध्ये ह्या भागावर अलाउद्दीन हसन बहमन शाह ह्याची राजवट होती आणि त्याने ह्या प्रदेशात बहमनी सल्तनतीची स्थापना केली.त्यानंतर १५७२ मध्ये अहमदनगर सल्तनतीच्या मुर्तझा शाहने यवतमाळ आपल्या ताब्यात घेतले. १५९६ साली अहमदनगरच्या चांद बीबीने यवतमाळ मुघल साम्राज्यात आणले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर म्हणजे १७०७ साली यवत...
भारतातील एकमेव न्यायाधीश ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली ?
Article

भारतातील एकमेव न्यायाधीश ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली ?

भारतातील एकमेव न्यायाधीश ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली ?उपेंद्र नाथ राजखोवा असे फाशीची शिक्षा ठोठावलेल्या भारताच्या एकमेव न्यायाधीशाचे नाव आहे. उपेंद्र नाथ राजखोवा हे आसामच्या दुबरी जिल्ह्याच्या कोर्टात जिल्हा व सत्र न्यायाधीश पदावर होते. त्याने पत्नी व मुलींचा खून केला. या प्रकरणाने संपूर्ण आसाम हादरला.या खळबळजनक खून प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आणि अखेर राजखोवाला या गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आले आणि मे 1973 मध्ये त्याला मृत्यूदंड ठोठावण्यात आला. गुवाहाटी उच्च न्यायालयाने एक वर्षानंतर त्याच्या फाशीची शिक्षा पुष्टी केली. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांची दया याचिका नाकारल्यानंतर अखेर 14 फेब्रुवारी 1976 रोजी जोरहाट तुरूंगात त्याला फाशी देण्यात आली.उपेंद्र नाथ राजखोवा यांना हत्येप्रकरणी फाशी देण्यात आली होती, त्यात पत्नी व मुलींची हत्या करण्या...
चाळिसी…..!
Article

चाळिसी…..!

चाळिसी.....! धड तरुणपण ही नाही आणि म्हातारपण देखिल नाही अश्या वयाचा टप्पा म्हणजे चाळीशी. खर तर म्हणतात महिलांना वय विचारू नये ! परंतु पुरुषांना तरी कुठे वय सांगायची इच्छा असते म्हणा ! जस फोटो काढताना वाढलेली ढेरी लपवण्याचा प्रयत्न पुरुष मंडळी करत असतात तसच वय लपवण्याचा ही प्रयत्न करत असतात बर का..!  आहो तरुण दिसन  कुणाला आवडत नाही सांगा! मी चौथीत असताना सलमान खानचा सिनेमा आला होता ,मैने प्यार किया! त्यात तो हिरो ,आता मी प्रेम करून अर्धा संसार देखील झाला, मोठी मुलगी BE करतेय तरी सलमान अजून ही हिरो....!म्हणजे बघा  वय किती लपवतात नाही , वास्तवात त्याने आजोबा चे रोल करायला हवेत नाही का? जाऊ द्या भारतीय लोकांना हे असले थोराड" झालेलेच हिरो आवडतात त्याला आपण तरी काय करणार नाही का?        पण खरं सांगू आपण म्हतारे झालो हे आपण कधी मान्यच करत नाही .उगाच आरशात समोर उभे राहून ओठावरील मिशी मध्ये प...