Friday, November 14

Article

पावसाळ्यात पायांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून ६ सोपे घरगुती उपाय.!
Article

पावसाळ्यात पायांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून ६ सोपे घरगुती उपाय.!

पावसाळ्यात घाण पाण्यामुळे पायांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून ६ सोपे घरगुती उपाय.. उन्हाळ्याच्या ऋतूनंतर येणारा पावसाळा हा आपल्याला अतिशय आनंद देऊन जातो. परंतु पावसाळ्यात त्वचेवर होणाऱ्या फंगल इन्फेक्शन्सचे प्रमाण हे अधिक असते. पावसाळ्यात पायांची सर्वांत वाईट परिस्थिती होते, त्यामुळे मुख्यत्वे करून पायांची निगा राखणे खूप गरजेचे असते. जर पावसाळ्यात पायांची योग्य निगा राखली नाही तर पायांना अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात वातावरणात अधिकची आर्द्रता आणि दमटपणा असतो. यामुळेच  फंगल इन्फेक्शन्स सारख्या समस्या उद्भवतात. अशा दिवसांत सकाळी अंघोळ करताना पायांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे.इतर कोणत्याही ऋतूच्या तुलनेत पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण या दिवसांत शरीरात, वातावरणाचा, पर्यावरणात खूप बदल होत असतात. पावसाळयात आपले पाय व पावसाचे पाणी यांचा स...
मुठभर शेंगदाणे अन गुळाचा खडा खाण्याचे फायदे.!
Article

मुठभर शेंगदाणे अन गुळाचा खडा खाण्याचे फायदे.!

मुठभर शेंगदाणे अन गुळाचा खडा खाण्याचे फायदे.!आयर्न कमी-थकवा फार तर हा उपाय नक्की करा'भागदौड़ वाली जिंदगी रुकना मना है' हे वाक्य आपण ऐकलच असेल. धावपळीच्या जीवनात जो थांबतो तो मागे राहतो. परंतु, यशाच्या मागे धावत असताना आपण, स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. पौष्टीक पदार्थांऐवजी आपण फास्ट फूड खाण्यास सुरुवात करतो. ज्यामुळे शरीरात गंभीर आजार निर्माण होतात. परंतु, फास्ट फूड ऐवजी असे अनेक पदार्थ आहे. जे हेल्दी पण आहेत, व आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात.आपण गावाकडच्या लोकांना गुळ आणि शेंगदाणे खाताना पाहिलं असेल. मुठभर शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी बिस्किटे आणि कुकीजच्या जागी गुळ शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला आहे. गुळ शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात? याबाबतीत त्यांनी माहिती दिली आहेगुळ - श...
इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ…
Article, Gerenal

इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ…

इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ...इंग्रजांचं ‘हिलस्टेशन’ आणि यवतमाळ महाराष्ट्राच्या ‘कॉटन सिटी’ बद्दल जाणून घ्या.यवतमाळ हा “महाराष्ट्रातच असणाऱ्या सदैव दुर्लक्षित आणि मागास समजल्या जाणाऱ्या विदर्भातील” एक जिल्हा आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरपासून यवतमाळ १५० किमीच्या अंतरावर आहे.यवतमाळ म्हणजे डोंगरांची माळ.. जुन्या रेकॉर्डप्रमाणे यवतमाळ हे जगातलं सर्वात सुरक्षित गाव होते. पूर्वी यवती म्हणून ओळखले जाणारे हे शहर बेरार सल्तनतेचे प्रमुख शहर होते. १३४७ मध्ये ह्या भागावर अलाउद्दीन हसन बहमन शाह ह्याची राजवट होती आणि त्याने ह्या प्रदेशात बहमनी सल्तनतीची स्थापना केली.त्यानंतर १५७२ मध्ये अहमदनगर सल्तनतीच्या मुर्तझा शाहने यवतमाळ आपल्या ताब्यात घेतले. १५९६ साली अहमदनगरच्या चांद बीबीने यवतमाळ मुघल साम्राज्यात आणले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर म्हणजे १७०७ साली यवत...
भारतातील एकमेव न्यायाधीश ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली ?
Article

भारतातील एकमेव न्यायाधीश ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली ?

भारतातील एकमेव न्यायाधीश ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली ?उपेंद्र नाथ राजखोवा असे फाशीची शिक्षा ठोठावलेल्या भारताच्या एकमेव न्यायाधीशाचे नाव आहे. उपेंद्र नाथ राजखोवा हे आसामच्या दुबरी जिल्ह्याच्या कोर्टात जिल्हा व सत्र न्यायाधीश पदावर होते. त्याने पत्नी व मुलींचा खून केला. या प्रकरणाने संपूर्ण आसाम हादरला.या खळबळजनक खून प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आणि अखेर राजखोवाला या गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आले आणि मे 1973 मध्ये त्याला मृत्यूदंड ठोठावण्यात आला. गुवाहाटी उच्च न्यायालयाने एक वर्षानंतर त्याच्या फाशीची शिक्षा पुष्टी केली. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांची दया याचिका नाकारल्यानंतर अखेर 14 फेब्रुवारी 1976 रोजी जोरहाट तुरूंगात त्याला फाशी देण्यात आली.उपेंद्र नाथ राजखोवा यांना हत्येप्रकरणी फाशी देण्यात आली होती, त्यात पत्नी व मुलींची हत्या करण्या...
चाळिसी…..!
Article

चाळिसी…..!

चाळिसी.....! धड तरुणपण ही नाही आणि म्हातारपण देखिल नाही अश्या वयाचा टप्पा म्हणजे चाळीशी. खर तर म्हणतात महिलांना वय विचारू नये ! परंतु पुरुषांना तरी कुठे वय सांगायची इच्छा असते म्हणा ! जस फोटो काढताना वाढलेली ढेरी लपवण्याचा प्रयत्न पुरुष मंडळी करत असतात तसच वय लपवण्याचा ही प्रयत्न करत असतात बर का..!  आहो तरुण दिसन  कुणाला आवडत नाही सांगा! मी चौथीत असताना सलमान खानचा सिनेमा आला होता ,मैने प्यार किया! त्यात तो हिरो ,आता मी प्रेम करून अर्धा संसार देखील झाला, मोठी मुलगी BE करतेय तरी सलमान अजून ही हिरो....!म्हणजे बघा  वय किती लपवतात नाही , वास्तवात त्याने आजोबा चे रोल करायला हवेत नाही का? जाऊ द्या भारतीय लोकांना हे असले थोराड" झालेलेच हिरो आवडतात त्याला आपण तरी काय करणार नाही का?        पण खरं सांगू आपण म्हतारे झालो हे आपण कधी मान्यच करत नाही .उगाच आरशात समोर उभे राहून ओठावरील मिशी मध्ये प...
पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का?
Article

पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का?

वास्तविक पाहता पंढरपूरचा विठ्ठल, विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ, विठाई इत्यादि नांव असणारा हा पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का? कारण विठ्ठल जर देव असता तर विठ्ठलाचा उल्लेख वैदिक ब्राम्हणाच्या धर्मसूत्रात म्हणजे रुग्वेद - यजुर्वेद - सामवेद व अथर्ववेदात असता पंरतु यात उल्लेख नाही. स्मृती - श्रृती, वेद पुराण, - उपनिषद - अरण्यक- मनूस्मृती या तमाम ब्राम्हणी वैदिक धर्म ग्रंथात विठ्ठलाचे नाव नाही. तसेच विठ्ठल हे नांव रामायणात नाही. विठ्ठल महाभारतात नाही. विठ्ठल साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या गीतेत ही नाही म्हणजे वैदिक धर्माचे स्वरूप जानणाऱ्या वेदांच्या सर्वश्रेष्ठ ब्राम्हणी ग्रंथात जर विठ्ठलाचे कोठे ही नांव नाही. तर ह्या सर्व पुराव्या वरुन हेच सिद्ध होते की पंढरपूरचा विठ्ठल हा देव नसून तो एक महामानव आहे.विठ्ठलाच्या मूर्तीकडे नीट पाहिलेत तर काही गोष्टी लक्षात येतात कि, विठ्ठलाचे डोळे, त्याचे खांद्यावर रुळण...
Article

सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ – शाहू महाराज

शैक्षणिक, सांस्कृतिक, अर्थिक सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन २६ जुन हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. राजर्षी शाहू महाराज यांचा २ एप्रिल १८९४ रोजी राज्याभिषेक झाला. व छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले. दिनदुबळ्या समाजाचे लोकराजा झाले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे शिक्षण राजकोट व धारवाड येथे झाले.सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे त्यांना मार्गदर्शक मिळाले.त्यांनी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अधिक भर दिला आहे.त्यासाठी त्यांनी कोल्हापुर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. व समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळावे.यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रसार केला. त्यांनी शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले.विविध जाती ध...
बहुजनांचे राजे राजर्षी  छत्रपती शाहू महाराज
Article

बहुजनांचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र वंदन .राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दि.26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यामध्ये झाला.त्यांचे मूळ नाव यशवंत होते.त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब ) तर आईचे नाव राधाबाई होते.छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.       कोल्हापूर संस्थानाचे चौथे राजे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी दि.17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व त्यांचे " शाहू " हे नाव ठेवण्यात आले.सन1889 ते 1893 या चार वर्षाच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला.शिक्षण सुरू असतानाच दि.1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू महाराजांचा विवाह झाला. त्यावेळी त्यांचे वय 17 वर्षाचे होते  आणि ...
Article

पंढरीची वारी ऐक्याचे प्रतीक…

पंढरीची वारी ऐक्याचे प्रतीक पाऊले चालती पंढरीची वाट | सुखी संसाराची तोडुनिया गाठ| पाऊले चालती पंढरीची वाट ||असं म्हणत वारकरी आषाढी एकादशीच्या वारीला निघतात. विठ्ठल रुक्माई ,विठोबा रुक्माईचा गजर आसमंतात दुमदुमतो. लाखोंच्या संख्येने येणारा वारकरीमेळा देशाच्या अनेकविध प्रांतातून एकत्र येत असतो. ना कुठले आमंत्रण, ना रुसवा फुगवा, ना मोठेपणाचा डौल, ना जातीपातीचा भेदभाव, ना गरिबीची लाज, ना लहान थोरांचा मानपान, ना जेवणाचा शाही थाट, एवढेच नव्हे तर श्रीमंतातील श्रीमंत देखील दिंडीत असताना स्वतःचे वैभव विसरून जाईल, तरीही पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललेले प्रत्येक पाऊल श्रद्धेने, भक्तीने पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेले असते. मजल दर मजल करत एकमेकांना सोबत घेऊन भजनात तल्लीन होऊन हा मेळा वाऱ्याच्या वेगाने पंढरपूरकडे झेपावतो. वाटेत येणाऱ्या छोट्या मोठ्या गावांना आपल्या पदस्पर्शाने पुनीत करित वारकरी संप्र...
ग्रेट मिलेट – ज्वारी – ग्रेट फूड
Article

ग्रेट मिलेट – ज्वारी – ग्रेट फूड

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३   ज्वारी हे भारतीय अन्न म्हणून ओळखले जाते. ज्वारीच्या उत्पादनात आपला देश जगात सहाव्या क्रमांकावर आहे. जागतिक पातळीवर ज्वारी उत्पादनात नायजेरियाचा प्रथम क्रमांक असून दुसऱ्या स्थानी अमेरिका आहे.   सर्वांच्या आवडीत समाविष्ट असणारे राज्यातील अव्वल भरडधान्य म्हणजे ज्वारी. महाराष्ट्रात ज्वारी न खाणारे खूपच कमी असतील. ज्वारी हे मध्य महाराष्ट्राचे आणि मराठवाड्याचे मुख्य अन्न म्हटले जाते. हल्ली कॅशक्रॉप अर्थात नगदी पीक म्हणून साखर कारखानदारी वाढविणाऱ्यांनी ऊस शेतीस प्रोत्साहन दिले आणि शेतकरी देखील तिकडे वळला असला तरी ज्वारीचे महत्व कमी झालेले नाही.   मराठवाड्यात तर केवळ सणाला आणि पाहुणे आल्यास गव्हाची पोळी असा प्रकार जवळपास सर्वच घरात होता. आता गव्हाची उपलब्धता वाढल्याने फरक पडला असला तरी युवा पिढी वगळता सर्वांना आवडणारे भरडधान्य म्हणून ज्वारीची ओळख आहे. इंग्रजीत या...