Wednesday, May 6

Article

श्रमविभागणी-जातीप्रथा आणि डॉ.आंबेडकर
Article

श्रमविभागणी-जातीप्रथा आणि डॉ.आंबेडकर

श्रमविभागणी-जातीप्रथा आणि डॉ.आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचे अनेकविध पैलू आहेत.विषमतावादी भारतीय समाजरचनेत डॉ.आंबेडकर सामाजिक व राजकीय परिवर्तनासाठी अखेरच्या क्षणापर्यंत निकराने लढलेत.भारतीय समाज त्यांच्या राजकीय,सामाजिक आणि धार्मिक विचाराबाबतीत जितका अवगत आहे तितका आर्थिक विचाराबाबत अवगत नाही. डॉ.आंबेडकरांचे आर्थिक क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण अनं अतुलनीय आहे. डॉ.आंबेडकरांनी कृषी विकास,औद्योगीकरण, रोजगार निर्धारण, मजूर संघ, लोकसंख्या समस्या, आंतरराष्ट्रीय व्यापार, बँकिंग, विमाक्षेत्र, वित्तीय आणि मौद्रिक धोरण, केंद्र-राज्य वित्तीय संबंध इत्यादी बाबतीत सखोल असा अभ्यास व त्या अनुषंगाने वेळोवेळी अभ्यासपूर्ण केलेली मांडणी त्यांना जागतिक अर्थशास्त्रज्ञाच्या यादीत समाविष्ट करणारे आहेत.विकसनशील भारतीय अर्थव्यवस्था आणि विषमतावादी समाजरचनेत ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: काल आज, आणि उद्या…
Article

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: काल आज, आणि उद्या…

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: काल आज, आणि उद्या...बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज,काल ,आणि ऊद्या कसे तारणारे आहेत..या विषयी सांगायचे झाल्यास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ एका विशिष्ट काळापुरते मर्यादित नसून आणि त्यांचे कार्य एका विशिष्ट समुदायापुरते किंवा वर्गापुरते नसून वैश्विक पातळीवर वाखाणण्यासारखे आहेत आहेत. अखिल विश्वाला तारणारे आहेत ..काल विषमतेच्या अंधारातून बाहेर काढणारा प्रकाश भूतकाळात, जेव्हा भारतीय समाज जातिव्यवस्थेच्या आणि विषमतेच्या बेड्यांत अडकला होता, तेव्हा बाबासाहेबांचे विचार हे मुक्तीचे साधन ठरले.चवदार तळ्याचा सत्याग्रह असो वा काळाराम मंदिर प्रवेश, त्यांनी माणसाला त्याच्या अस्तित्वाची आणि हक्कांची जाणीव करून दिली. त्यांनी दलित आणि बहुजन समाजाला हे पटवून दिले की, शिक्षण हे वाघिणीचे 'दूध' आहे आणि ते प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार ...
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले: समाजसुधारक आणि शिक्षणाचे जनक 
Article

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले: समाजसुधारक आणि शिक्षणाचे जनक 

क्रांतिसूर्य-महात्मा ज्योतिबा फुलेभारतात इंग्रजांची सत्ता दृढ झाली आणि इंग्रजी शिक्षणाच्या प्रवाहाबरोबर नवे विचार, नवीन कल्पना ,नवीन तत्वज्ञानाचा प्रसार झाला. पाश्चिमात्य विचार, आचार, संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली‌. बुध्दिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा,मानवता, राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली.भारताबाहेरील जगाची जाणीव सुशिक्षित तरुणांना झाली होती. फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेल्या स्वातंत्र्य ,समता, बंधुता या मूल्यांचे महत्त्व त्यांना पटले होते. त्यामुळे भारतीय समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक क्षेत्रात बदल होत होते.भारतीय समाजातील मागासलेपण वैचारिक दारिद्र्य, अंधश्रद्धा, जातीभेद, उच्चनीचतेच्या भ्रामक कल्पना दूर करण्यासाठी शिक्षण घेतलेले सुशिक्षित तरूणांनी आपल्या लेखनातून, प्रत्यक्ष कृतीतून ,संघटनांच्या माध्यमातून तत्कालीन भारतीय समाजात जनजागृती करण्यास सुरुवात केली. या अ...
 ‘हिंद की चादर’ – धर्मस्वातंत्र्य व मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम
Article

 ‘हिंद की चादर’ – धर्मस्वातंत्र्य व मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम

‘हिंद की चादर’ – धर्मस्वातंत्र्य व मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रमधर्म, सत्य आणि मानवतेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर सिंह जी यांचे बलिदान भारतीय इतिहासात अजरामर आहे. “हिंद की चादर” म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर जी हे केवळ शीख समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण भारतवर्षातील धर्मस्वातंत्र्याचे महान रक्षक होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शीख समाज, सिंधी समाज, बंजारा समाज आणि लुबाणा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथे भव्य “हिंद की चादर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.दि. 23 नोव्हेंबर रोजी अमरावतीतील राजकमल चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात श्लोक मेहला नववाच्या पठणाने झाली. त्यानंतर भावपूर्ण श...
गवळी सर: एका दीपस्तंभाचा प्रवास संपला.!
Article

गवळी सर: एका दीपस्तंभाचा प्रवास संपला.!

गवळी सर: एका दीपस्तंभाचा प्रवास संपला.!१९९२ ते १९९५ या काळात भैरवनाथ विद्यालय पुणेवाडी मध्ये शिक्षण घेत असताना श्री. गवळी सर मुख्याध्यापक म्हणून लाभले. एकाचवेळी कर्तव्यकठोर मुख्याध्यापक, शाळेतील सर्वांसाठी प्रेमळ पालक, भूमिती आणि विज्ञान यांसारखे अवघड विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे अशी विविध रूपे सरांमधे बघायला मिळाली.आम्हां ९५ च्या दहावीच्या बॅचवर सरांची विशेष नजर होती. आमच्यावर सरांनी खूप भरभरून प्रेम केले. शारदा उदावंत, सविता रेपाळे आणि विष्णू औटी यांची बॅच म्हणून आम्ही सरांच्या सतत लक्षात राहिलो. या विद्यालयात मला जवळपास अडीच वर्षे शिक्षक म्हणून काम करता आले. यावेळी सुद्धा अध्यापनासंदर्भात सरांचं सतत मोलाचं मार्गदर्शन मिळत गेले. नंतर जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना सर आवर्जून चौकशी करत असत.एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर सरांचं शेड्य...
बिहार विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ
Article

बिहार विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ

बिहार विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थबिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित एन डी ए ला घवघवीत यश मिळाले.. फिर से एक बार बिहार मे एन डी ए सरकार हा नारा अखेर खरा ठरला..सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप ने सर्वोत्तम कामगिरी केली.नितीश कुमार यांच्या जेडीयूला दुसरे स्थान मिळाले.बिहारचे निकाल केवळ सत्ता परिवर्तनाची कहाणी दडलेली नाही नाहीत, तर या जनादेशामुळे विरोधी पक्ष आणखी तुटला, तर एनडीए राज्यापासून केंद्र सरकारपर्यंत अधिक मजबूत होऊन उदयास आला. केंद्रात एन डी ए आता अजून मजबूत झाला असून केंद्र सरकारला आता निर्णय घेणे शक्य होणार असून राज्यसभेत देखील स्थिती मजबूत झाली आहे.या निकालाने पुन्हा एकदा एन डी ए ची स्थिती मजबूत झाली असून या निकालांमुळे महाआघाडीची मोठी पिछेहाट झाली आहे. विरोधकांचा पुढचा मार्ग गुंतागुंतीचा झाला आहे. महाआघाडी कशी प्रगती करेल यावर त्यांचा थेट परिणाम होईल. महाआघाडीला एकजूट ठेव...
टॉयलेटमध्ये मोबाईल? लगेच थांबा !
Article

टॉयलेटमध्ये मोबाईल? लगेच थांबा !

टॉयलेटमध्ये मोबाईल? लगेच थांबा !आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा माणसाचा सततचा साथीदार झाला आहे. जेवताना, झोपताना, प्रवासात आणि अगदी टॉयलेटमध्येही लोक मोबाईल घेऊन जातात. काहींसाठी टॉयलेट हे “स्क्रॉलिंग रूम” बनलं आहे. आरामात बसून व्हिडिओ पाहणे, रील्स बघणे किंवा चॅटिंग करणे—हे आता अनेकांचं दैनंदिन काम झालंय.पण ही सवय निरुपद्रवी नाही. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाणे ही अत्यंत धोकादायक सवय आहे, ज्यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात.टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्यानं शरीरावर काय परिणाम होतो?मोबाईलमुळे आपण नकळत टॉयलेट सीटवर 15–25 मिनिटे बसून राहतो. एवढा वेळ बसल्यामुळे शरीरात खालील बदल होतात:1) गुदद्वाराच्या नसांवर तीव्र दबावदीर्घकाळ एका स्थितीत बसल्याने गुदद्वाराभोवतीच्या नसांवर दाब येतो.हा दाब वाढला की सूज, वेदना आणि जळजळ होऊ शकते.2) पाईल्स (मूळव्याध) ह...
भारत आणि चाबहार बंदर.!
Article

भारत आणि चाबहार बंदर.!

भारत आणि चाबहार बंदरचाबहार बंदर भारतासाठी खूप महत्वाचे आहे. ते एक धोरणात्मक व्यापार मार्ग प्रदान करते जे भारताला पाकिस्तानमधून न जाता अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांमध्ये प्रवेश करण्यास मदत करते. हे बंदर भारतासाठी पर्यायी व्यापार मार्ग तयार करते आणि मध्य आशिया आणि युरोपला आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) चा भाग म्हणून काम करते. शिवाय, ते भारताला इराणमध्ये महत्त्वपूर्ण उपस्थिती देते आणि प्रादेशिक भू-राजकारणात चीनच्या प्रभावाचे संतुलन साधण्यास मदत करू शकते.चाबहार बंदराचे धोरणात्मक महत्त्व:इराणमधील चाबहार बंदर भारतासाठी धोरणात्मक महत्त्वाचे आहे कारण ते भारताला पाकिस्तानला मागे टाकून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग प्रदान करते.हे बंदर अफगाणिस्तानमधून माल वाहतूक सुलभ करते, ज्यामुळे या प्रदेशाशी व्यापार आणि आर्थिक संबंध वाढतात.चा...
काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सव
Article

काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सव

काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सवकाकड आरतीचं स्वरूप खुप प्राचिन आहे.या काकड आरतीला नुसते आध्यात्मिक महत्त्व नसून त्याचा थेट संबंध तुमच्या आमच्या आरोग्याशी आहे. पहाटेच्या गार वाऱ्यात प्राणवायू ओझोन भरपूर प्रमाणात असतो. म्हणून आपले ऋषीमुनी एवढंच नाही तर सम्पूर्ण प्राणीमात्र भल्या पहाटे उठतात.काकडा आरती म्हणजे देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली विनवणी होय.या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात. भल्या पहाटे आंघोळ संडासंमार्जन, रांगोळया काढून सम्पूर्ण गावातून नामाचा गजर करत प्रदक्षिणा घालण्यात येते ग्रामीण व शहरी भागातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते.ही अनेक वर्षांपासूनची ही प्रथा, पंरपरा आजही जोपासली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष...
डॉ बाबासाहेबांचा शाळप्रवेश: शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराचा दिवस
Article

डॉ बाबासाहेबांचा शाळप्रवेश: शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराचा दिवस

डॉ बाबासाहेबांचा शाळप्रवेश: शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराचा दिवसभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला  जातो.डॉ. lबाबासाहेब आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिवस एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. त्यांच्या शाळाप्रवेशाने ते स्वतः प्रज्ञावंत झालेच आणि कोट्यवधीदलितांचे-वंचितांचे व  समस्त भारतीयांचे उद्धारकर्तेही झाले.बाबासाहेबांनी लिहिलेल्या  संविधानामुळे भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये रूजू शकली. त्यामुळेच त्यांच्या शाळा प्रवेशाचा दिवस ही महत्त्वाची घटना आहे.७ नोव्हेंबर १९०० या दिवशी बाबासाहेबांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, सातारा येथील शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा होते. या शाळेच्...