Tuesday, March 17

Article

घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!
Article

घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!

घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!          आज सर्वांनाच आधाराची गरज आहे. साधी तिरडी न्यायची असेल तरी आधार हे लागतोच. निदान प्रेत उचलून नेण्यासाठी तरी आधार हवा असतो. यासाठीच कालची मंडळी खुर सारी मुलं जन्माला घालत होती. त्याचं कारणही तसंच होतं.         पुर्वीच्या काळात जास्त लेकरं जन्माला घालण्याची बरीच कारणं होती. पहिलं कारण होतं रोगराई व त्या रोगराईवर पाहिजे त्या प्रमाणात नसलेली उपाययोजना. पुर्वी गावात साथीचे रोग यायचे. ज्यात समुहानं घरची मंडळी मरण पावत असत. तद्नंतर काळ बदलला व बदलत्या काळानुसार औषधांचा शोध लागला व मरणयोग कमी झाला. दुसरं कारण होतं, एखाद्यावेळेस माणूस मरण पावलाच तर त्याच्या मरणाला माणसं मिळणं. कारण नातेवाईक हे दूर अशा ठिकाणी राहायचे. शिवाय अशा नातेवाईकांना पायी येण्याशिवाय मार्ग नसायचा व असा नातेवाईक पोहोचेपर्यंत मयत आटोपवून टाकावी...
कर्जमाफी: तात्पुरता दिलासा, कायमस्वरूपी नव्हे!
Article

कर्जमाफी: तात्पुरता दिलासा, कायमस्वरूपी नव्हे!

कर्जमाफी: तात्पुरता दिलासा, कायमस्वरूपी नव्हे!शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्या घेऊन प्रहारचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू  यांनी नागपुरमध्ये शेतकऱ्यांचं मोठं चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. काहीही झालं तरी कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही,असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. त्यांच्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विदर्भ तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी  नागपुरात दाखल झाले आहेत. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता कडू यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी नागपुरात ठाण मांडले आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी बच्चू कडू आंदोलन करत असले तरी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ही एक तात्पुरती व्यवस्था आहे. कारण ती शेतकऱ्यांना त्वरितदिलासादेते,कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील,ही बाब मान्य केली तरी  कर्जमाफी त्यांच्या मूलभूत समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढत नाही. शेत...
नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रह
Article

नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रह

नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रहव्यक्तीच्या अवतीभवती बऱ्याच बरेवाईट घटना घडत असतात. त्यातून त्याची जडणघडण होते. परिणामी एक विशिष्ट व्यक्तिमत्व घडत जाते. संवेदनशील व्यक्तीच्या मनावर अशा घटना परिणाम करतात. आलेले अनुभव अशा संवेदनशील व्यक्तीला शांत बसू देत नाही. परिणामी आपल्या अनुभवांचा उपयोग होऊन समाजाला दिशा मिळावी, पुढील पिढ्याना आपल्या अनुभवाचा उपयोग व्हावा, यासाठी धडपड सुरु होते. यातूनच लेखक संदीप राक्षे यांच्या ‘नि मि त्त मा त्र’ कथासंग्रहाचा जन्म झाला असावा. असे मला वाटते.बुधवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव येथे आयोजित संत ज्ञानोबाराय द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला चाकूरकर, हास्यकवी संजय कावरे यांचे शुभहस्...
आयुष्याची फाईल, भावनांचे व्हायरस आणि जगण्याचा ‘रिस्टार्ट’.!
Article

आयुष्याची फाईल, भावनांचे व्हायरस आणि जगण्याचा ‘रिस्टार्ट’.!

डिजिटल माणसाचं भावनिक हँग होणं ,आजचा माणूस डिजिटल जगात सर्वाधिक ‘कनेक्टेड’ आहे, पण भावनिकदृष्ट्या सर्वाधिक ‘डिस्कनेक्टेड’.स्मार्टफोन हातात असला तरी, मनाचं नेटवर्क वारंवार ‘नो सिग्नल’ दाखवतं. बाहेरून तो स्मार्ट, स्टायलिश आणि ‘अपडेटेड’ दिसतो, पण आतून त्याचं मन मंदावलेलं, थकलंलेलं, हँग झालेलं असतं.असं का?कारण आयुष्याच्या फोल्डरमध्ये नकोशा फाईल्स साचल्या आहेत. तक्रारी, कटुता, ईर्षा, अपयशाच्या आठवणी, तुटलेल्या नात्यांचे स्क्रीनशॉट्स.या सगळ्या फाईल्सचा भार मनाच्या रॅमवर पडतो आणि आत्म्याची सिस्टीम संथ होते.माणूस स्वतःचा यूजर राहिलेला नाही, तर स्वतःच्या विचारांचा बळी झालेला आहे.अशा वेळी आवश्यक असतं  “मनाचा क्लीनअप आणि जीवनाचा रिस्टार्ट!” कर्म नियतीच्या सर्व्हरवरील खरी ओळख“कुणी बघत नाही म्हणून मनाप्रमाणे वागावं”  हा विचार मोहक आहे, पण त्यात विनाश लपलेला आहे.कारण नियतीचा सर्व्हर नेहमी ऑ...
संवाद हरवलेला आहे!
Article

संवाद हरवलेला आहे!

आज आपल्याला दिसतंय की सर्वच लोकं मोबाईलवर व्यस्त दिसतात. घरादारात हीच परिस्थिती आहे व लोकांचा घरादारातील हा व्यवहार पाहून असं वाटायला लागलं आहे की आज संवाद घराघरातून हरवत चालला की काय? यावर बरेच लोकं चिंताही व्यक्त करीत आहेत व वर्तमानपत्रातून त्यास्वरुपाच्या बातम्याही छापून येत आहेत.           संवाद...... संवाद हरवला आहे. तो घरातून कुठे निघून गेला ते कळत नाही. शेजारी जावून बसला असेल असं वाटल्यानं तिथंही दिसला नाही. वस्तीत शोधलं संवादाला. तिथंही सापडला नाही. मग गेलो गावात. तिथंही नव्हताच. त्यानंतर तालुक्यात, शहरात, राज्यात, देशात व जगात संवादाला शोधलं. तरीही संवाद आढळलेलाच नाही. मग टिव्हीवर एक बातमी रुपानं त्याचा एक अवयव दिसला. व्हाट्सअपवर एक अवयव दिसला. फेसबुकवर व इंन्ट्राग्रामवर एक अवयव दिसला. यु ट्यूबवर एक अवयव दिसला. तेव्हा जाणवलं की...
तुळशी विवाह का केला जातो?
Article

तुळशी विवाह का केला जातो?

तुळशी विवाह हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शुभ सण आहे, जो दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच देवुथनी एकादशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू (शालिग्राम) आणि आई तुळशी यांचा विवाह होतो. असे मानले जाते की या दिवशी तुळशीशी लग्न केल्याने आनंद, समृद्धी, सौभाग्य आणि वैवाहिक स्थिरता येते. या प्रसंगी तुळशी मातेला वधूप्रमाणे सजवले जाते, नवीन स्कार्फ, फुले, दागिने आणि पारंपारिक मेकअपने सजवले जाते. हे अलंकार केवळ भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक नाही तर देवी लक्ष्मीचे स्वागत देखील करते, कारण तुळशी मातेला देवी लक्ष्मीचा अवतार म्हटले जाते. हा तुलसी विवाह सोहळा केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही तर कुटुंबातील एकता, प्रेम आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे.तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि देवी तुळशी यांच्या विवाहाचा उत्सव आहे, जो भक्त आणि देव यांच्यातील प्रेम, विश्वास आणि भक्त...
अमर्त्य सेन : भारतरत्न व नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ, मानवी विकासाचे जागतिक विचारवंत
Article

अमर्त्य सेन : भारतरत्न व नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ, मानवी विकासाचे जागतिक विचारवंत

अमर्त्य सेन हे जागतिक कीर्तीचे मानवतावादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ आहेत.त्यांचा जन्म सन : १९३३ सालातील नोव्हेंबर महिन्याच्या तीन तारखेला झाला. आज दि.३ नोव्हेंबर २०२५ ला असलेल्या त्यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्ठचिंतन॥नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना 'अमर्त्य' अर्थात अमर हे नाव दिले होते. अमर्त्य सेन यांचे माध्यमिक शिक्षण ढाक्का येथील सेंट ग्रेगरी हायस्कूलमध्ये झाले आणि नंतर त्यांनी विश्वभारती आणि कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून शिक्षण घेतले.सन : १९५३ मध्ये त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्रात बी.ए. पदवी मिळवली. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले आणि केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमधून सन : १९५९ मध्ये त्यांनी एम.ए.आणि पी.एच.डी. पदव्या प्राप्त केल्या.अवघ्या २३ व्या वर्षी सेन जादवप...
आंदोलनादरम्यान होणारी वाहतूक कोंडी चिंताजनक!
Article

आंदोलनादरम्यान होणारी वाहतूक कोंडी चिंताजनक!

आंदोलना  दरम्यान "रस्ता रोको" (नाकाबंदी) आंदोलन चुकीचे आहे की नाही हे एखाद्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. काहींचा असा विश्वास आहे की यामुळे सामान्य लोकांना गैरसोय आणि त्रास होतो, तर काहींचा असा युक्तिवाद आहे की ते एखाद्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक आवश्यक आणि प्रभावी माध्यम आहे. आंदोलनादरम्यान हिंसा  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी  रस्ता रोको आंदोलने करू नये.अनेक आंदोलनाला हिंसेचे स्वरूप मिळाले.रस्ता रोको मुळे अनेकांचे प्राण गेले. आंदोलन कोणत्याही प्रकारचे का असेना  त्या आंदोलकांना रस्त्याची नाकाबंदी करू देऊ नये.सुरक्षित प्रवास हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे.रस्तावर जनतेची कोंडी होत असेल तर हा प्रकार मानवी अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे.आपल्या मागण्या प्रभावीपणे  शासनापर्यंत  मांडण्यासाठी वापरली आंदोलक  रस्ता रोको आंदोलन करत...
रीलचा प्राणघातक खेळ: प्रसिद्धीच्या नादात जीव धोक्यात!
Article

रीलचा प्राणघातक खेळ: प्रसिद्धीच्या नादात जीव धोक्यात!

रीलचा प्राणघातक खेळ: प्रसिद्धीच्या नादात जीव धोक्यात!३० सेकंदांच्या छोट्या व्हिडिओंना शॉर्ट्स म्हणतात. तथापि, काही व्हिडिओ २ मिनिटांपर्यंतचे असतात. रील्स हा देखील एक प्रकारचा लघु व्हिडिओ आहे. रील्स बनवण्याची क्रेझ टिकटॉक अॅपपासून सुरू झाली. भारतात टिकटॉकवर बंदी घालताच लोकांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्व प्रकारचे रील्स अपलोड करण्यास सुरुवात केली. मजेदार, माहितीपूर्ण, भावनिक, सर्व प्रकारचे व्हिडिओ रील्सवर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणूनच लोक त्याचे व्यसन करत आहेत. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वजण या रील्स बनवत आहेत, परंतु मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये त्याची जास्त क्रेझ दिसून येत आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अपलोड करण्यासाठी  काही जण जीवाची पर्वा न  करता वाटेल त्या प्रकारचे रील्स बनवत आहे.तरुण लोक रीलसाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. मध्यप्रदेश मध्ये  एका त...
घटस्फोट : गुन्हा की यल्गार? आधुनिक वैवाहिक वास्तव
Article

घटस्फोट : गुन्हा की यल्गार? आधुनिक वैवाहिक वास्तव

घटस्फोट : गुन्हा की यल्गार? आधुनिक वैवाहिक वास्तवआज बर्‍याच आत्महत्या होत आहेत. काही घटस्फोटातून आहेत व वाटायला लागलं आहे की घटस्फोट हा गुन्हा आहे की यल्गार? खरं तर घटस्फोट व्हायला हवेत. पती पत्नीचं जर एकमेकांशी पटत नसेल तर..... परंतु कधीकधी घटस्फोट हे वेगळ्याच कारणानं होतात. जेव्हा कधीकधी विवाहाचा वापर हा खावटी म्हणून पैसा कमवून ऐषआरामात जीवन जगण्यासाठी केल्या जातो. काही वेळेस विवाह हे खावटी मिळवून ऐषआरामाचं आयुष्य जगण्यासाठी केले जात असल्याचं निदर्शनास येतं. अशाच कारणातून कधीकधी आत्महत्या वा खुनासारखे कृत्य घडून येतात. ज्यातून स्वतः जन्मास घातलेली मुलंही सुटत नाहीत. आज बर्‍याच आत्महत्या होत आहेत. कधी शेती पिकली नाही म्हणून. कधी परीक्षेत नापास झाले म्हणून. कधी प्रेमभंग झाला म्हणून तर कधी कोणी कोणाला छळलं म्हणून. परंतु पती पत्नी वितुष्टातून आत्महत्या झालेल्या जास्त करुन कोणी ऐ...