Wednesday, April 29

Article

भारत आणि चाबहार बंदर.!
Article

भारत आणि चाबहार बंदर.!

भारत आणि चाबहार बंदरचाबहार बंदर भारतासाठी खूप महत्वाचे आहे. ते एक धोरणात्मक व्यापार मार्ग प्रदान करते जे भारताला पाकिस्तानमधून न जाता अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांमध्ये प्रवेश करण्यास मदत करते. हे बंदर भारतासाठी पर्यायी व्यापार मार्ग तयार करते आणि मध्य आशिया आणि युरोपला आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) चा भाग म्हणून काम करते. शिवाय, ते भारताला इराणमध्ये महत्त्वपूर्ण उपस्थिती देते आणि प्रादेशिक भू-राजकारणात चीनच्या प्रभावाचे संतुलन साधण्यास मदत करू शकते.चाबहार बंदराचे धोरणात्मक महत्त्व:इराणमधील चाबहार बंदर भारतासाठी धोरणात्मक महत्त्वाचे आहे कारण ते भारताला पाकिस्तानला मागे टाकून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग प्रदान करते.हे बंदर अफगाणिस्तानमधून माल वाहतूक सुलभ करते, ज्यामुळे या प्रदेशाशी व्यापार आणि आर्थिक संबंध वाढतात.चा...
काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सव
Article

काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सव

काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सवकाकड आरतीचं स्वरूप खुप प्राचिन आहे.या काकड आरतीला नुसते आध्यात्मिक महत्त्व नसून त्याचा थेट संबंध तुमच्या आमच्या आरोग्याशी आहे. पहाटेच्या गार वाऱ्यात प्राणवायू ओझोन भरपूर प्रमाणात असतो. म्हणून आपले ऋषीमुनी एवढंच नाही तर सम्पूर्ण प्राणीमात्र भल्या पहाटे उठतात.काकडा आरती म्हणजे देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली विनवणी होय.या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात. भल्या पहाटे आंघोळ संडासंमार्जन, रांगोळया काढून सम्पूर्ण गावातून नामाचा गजर करत प्रदक्षिणा घालण्यात येते ग्रामीण व शहरी भागातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते.ही अनेक वर्षांपासूनची ही प्रथा, पंरपरा आजही जोपासली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष...
डॉ बाबासाहेबांचा शाळप्रवेश: शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराचा दिवस
Article

डॉ बाबासाहेबांचा शाळप्रवेश: शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराचा दिवस

डॉ बाबासाहेबांचा शाळप्रवेश: शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराचा दिवसभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला  जातो.डॉ. lबाबासाहेब आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिवस एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. त्यांच्या शाळाप्रवेशाने ते स्वतः प्रज्ञावंत झालेच आणि कोट्यवधीदलितांचे-वंचितांचे व  समस्त भारतीयांचे उद्धारकर्तेही झाले.बाबासाहेबांनी लिहिलेल्या  संविधानामुळे भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये रूजू शकली. त्यामुळेच त्यांच्या शाळा प्रवेशाचा दिवस ही महत्त्वाची घटना आहे.७ नोव्हेंबर १९०० या दिवशी बाबासाहेबांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, सातारा येथील शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा होते. या शाळेच्...
निवडणूका पारदर्शक होईल काय?
Article

निवडणूका पारदर्शक होईल काय?

निवडणूका पारदर्शक होईल काय?गेल्या साडेतीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत आता निवडणूक आयोगाने पालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रम घोषित केला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय वातावरण तापणार आहे यात प्रश्नच नाही बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता प्रभागा अंतर्गत राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत मात्र एक प्रश्न यातून निर्माण होतो तो म्हणजे या निवडणुका पारदर्शक होईल काय? कारण मतदार याद्यातील घोळ ,दुबार मतदार चुकीचे पत्ते लक्षात घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच घेण्यात याव्यात अशी मागणी विरोधक करत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.विरोधी पक्षांच्या आरोपांकडे थेट दुर्लक्ष करत निवडणूक आयोग...
भारतात बलात्कार हा वेगाने वाढणारा गुन्हा!
Article

भारतात बलात्कार हा वेगाने वाढणारा गुन्हा!

भारतात बलात्कार हा वेगाने वाढणारा गुन्हा!बदलापूर आणि कोलकाता येथील बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला. या घटनांमुळं महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. यापूर्वीही अशा घटना घडत होत्या. मात्र, सामाजिक स्तरावर त्याची फारशी चर्चा होत नव्हती.महाराष्ट्रात डॉ संपदा मुंडे यांच्या हत्येचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता रविवारी तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील विमानतळाजवळ एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे तीन  जणांनीअपहरण करून सामूहिक बलात्कार  केल्याचे  घटनेने संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली आहे.पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.मंगळवारी( ३/११/२५)पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर आरोपी थावसी, कार्तिक आणि कालीस्वरन यांना अटक करण्यात आली. त्यांना पायात गोळ्या घालून रुग्णालयात नेण्यात आले.कोइम्बतूरमधील एका खाजगी महाविद्यालयात शिकणारी ही विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासह कारमध्ये हो...
घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!
Article

घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!

घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!          आज सर्वांनाच आधाराची गरज आहे. साधी तिरडी न्यायची असेल तरी आधार हे लागतोच. निदान प्रेत उचलून नेण्यासाठी तरी आधार हवा असतो. यासाठीच कालची मंडळी खुर सारी मुलं जन्माला घालत होती. त्याचं कारणही तसंच होतं.         पुर्वीच्या काळात जास्त लेकरं जन्माला घालण्याची बरीच कारणं होती. पहिलं कारण होतं रोगराई व त्या रोगराईवर पाहिजे त्या प्रमाणात नसलेली उपाययोजना. पुर्वी गावात साथीचे रोग यायचे. ज्यात समुहानं घरची मंडळी मरण पावत असत. तद्नंतर काळ बदलला व बदलत्या काळानुसार औषधांचा शोध लागला व मरणयोग कमी झाला. दुसरं कारण होतं, एखाद्यावेळेस माणूस मरण पावलाच तर त्याच्या मरणाला माणसं मिळणं. कारण नातेवाईक हे दूर अशा ठिकाणी राहायचे. शिवाय अशा नातेवाईकांना पायी येण्याशिवाय मार्ग नसायचा व असा नातेवाईक पोहोचेपर्यंत मयत आटोपवून टाकावी...
कर्जमाफी: तात्पुरता दिलासा, कायमस्वरूपी नव्हे!
Article

कर्जमाफी: तात्पुरता दिलासा, कायमस्वरूपी नव्हे!

कर्जमाफी: तात्पुरता दिलासा, कायमस्वरूपी नव्हे!शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्या घेऊन प्रहारचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू  यांनी नागपुरमध्ये शेतकऱ्यांचं मोठं चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. काहीही झालं तरी कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही,असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. त्यांच्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विदर्भ तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी  नागपुरात दाखल झाले आहेत. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता कडू यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी नागपुरात ठाण मांडले आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी बच्चू कडू आंदोलन करत असले तरी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ही एक तात्पुरती व्यवस्था आहे. कारण ती शेतकऱ्यांना त्वरितदिलासादेते,कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील,ही बाब मान्य केली तरी  कर्जमाफी त्यांच्या मूलभूत समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढत नाही. शेत...
नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रह
Article

नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रह

नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रहव्यक्तीच्या अवतीभवती बऱ्याच बरेवाईट घटना घडत असतात. त्यातून त्याची जडणघडण होते. परिणामी एक विशिष्ट व्यक्तिमत्व घडत जाते. संवेदनशील व्यक्तीच्या मनावर अशा घटना परिणाम करतात. आलेले अनुभव अशा संवेदनशील व्यक्तीला शांत बसू देत नाही. परिणामी आपल्या अनुभवांचा उपयोग होऊन समाजाला दिशा मिळावी, पुढील पिढ्याना आपल्या अनुभवाचा उपयोग व्हावा, यासाठी धडपड सुरु होते. यातूनच लेखक संदीप राक्षे यांच्या ‘नि मि त्त मा त्र’ कथासंग्रहाचा जन्म झाला असावा. असे मला वाटते.बुधवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव येथे आयोजित संत ज्ञानोबाराय द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला चाकूरकर, हास्यकवी संजय कावरे यांचे शुभहस्...
आयुष्याची फाईल, भावनांचे व्हायरस आणि जगण्याचा ‘रिस्टार्ट’.!
Article

आयुष्याची फाईल, भावनांचे व्हायरस आणि जगण्याचा ‘रिस्टार्ट’.!

डिजिटल माणसाचं भावनिक हँग होणं ,आजचा माणूस डिजिटल जगात सर्वाधिक ‘कनेक्टेड’ आहे, पण भावनिकदृष्ट्या सर्वाधिक ‘डिस्कनेक्टेड’.स्मार्टफोन हातात असला तरी, मनाचं नेटवर्क वारंवार ‘नो सिग्नल’ दाखवतं. बाहेरून तो स्मार्ट, स्टायलिश आणि ‘अपडेटेड’ दिसतो, पण आतून त्याचं मन मंदावलेलं, थकलंलेलं, हँग झालेलं असतं.असं का?कारण आयुष्याच्या फोल्डरमध्ये नकोशा फाईल्स साचल्या आहेत. तक्रारी, कटुता, ईर्षा, अपयशाच्या आठवणी, तुटलेल्या नात्यांचे स्क्रीनशॉट्स.या सगळ्या फाईल्सचा भार मनाच्या रॅमवर पडतो आणि आत्म्याची सिस्टीम संथ होते.माणूस स्वतःचा यूजर राहिलेला नाही, तर स्वतःच्या विचारांचा बळी झालेला आहे.अशा वेळी आवश्यक असतं  “मनाचा क्लीनअप आणि जीवनाचा रिस्टार्ट!” कर्म नियतीच्या सर्व्हरवरील खरी ओळख“कुणी बघत नाही म्हणून मनाप्रमाणे वागावं”  हा विचार मोहक आहे, पण त्यात विनाश लपलेला आहे.कारण नियतीचा सर्व्हर नेहमी ऑ...
संवाद हरवलेला आहे!
Article

संवाद हरवलेला आहे!

आज आपल्याला दिसतंय की सर्वच लोकं मोबाईलवर व्यस्त दिसतात. घरादारात हीच परिस्थिती आहे व लोकांचा घरादारातील हा व्यवहार पाहून असं वाटायला लागलं आहे की आज संवाद घराघरातून हरवत चालला की काय? यावर बरेच लोकं चिंताही व्यक्त करीत आहेत व वर्तमानपत्रातून त्यास्वरुपाच्या बातम्याही छापून येत आहेत.           संवाद...... संवाद हरवला आहे. तो घरातून कुठे निघून गेला ते कळत नाही. शेजारी जावून बसला असेल असं वाटल्यानं तिथंही दिसला नाही. वस्तीत शोधलं संवादाला. तिथंही सापडला नाही. मग गेलो गावात. तिथंही नव्हताच. त्यानंतर तालुक्यात, शहरात, राज्यात, देशात व जगात संवादाला शोधलं. तरीही संवाद आढळलेलाच नाही. मग टिव्हीवर एक बातमी रुपानं त्याचा एक अवयव दिसला. व्हाट्सअपवर एक अवयव दिसला. फेसबुकवर व इंन्ट्राग्रामवर एक अवयव दिसला. यु ट्यूबवर एक अवयव दिसला. तेव्हा जाणवलं की...