Saturday, May 2

Blog

कुमारी गौरी खापरकर हिचे जलतरण स्पर्धेमध्ये उज्वल यश!
News

कुमारी गौरी खापरकर हिचे जलतरण स्पर्धेमध्ये उज्वल यश!

कुमारी गौरी खापरकर हिचे जलतरण स्पर्धेमध्ये उज्वल यश!(पिंपळखुटा/स्वाती इंगळे)डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा येथील गुणवंत विद्यार्थिनी कुमारी गौरी खापरकर हिने आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे.ही जलतरण स्पर्धा श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय, अमरावती येथे पार पडली. या स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गौरीने ५० मीटर फ्री स्टाईल व ५० मीटर बॅकस्ट्रोक गटात आपली सरस कामगिरी सादर करत प्रथम क्रमांक पटकावला.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदागौरीच्या या यशामागे प्रा. मनीषा लांडे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचे उद्घाटन मा. दिलीप इंगळे, प्राचार्य डॉ. सी.एम. प्रा. देशमुख, डॉ. शशांक देशमुख, श्री ...
“…आणि रामा कलेक्टर झाला” – संघर्षातून शिखरावर जाण्याची प्रेरणादायक कहाणी
Article

“…आणि रामा कलेक्टर झाला” – संघर्षातून शिखरावर जाण्याची प्रेरणादायक कहाणी

"…आणि रामा कलेक्टर झाला" – संघर्षातून शिखरावर जाण्याची प्रेरणादायक कहाणीअशोक पवार लिखित '…आणि रामा कलेक्टर झाला ' ही कादंबरी नुकतीच वाचून झाली. या कादंबरीला आयकर उपायुक्त श्री विष्णूजी औटी साहेब यांची प्रस्तावना लाभलेली असून ज्येष्ठ साहित्यिक व आमचे गुरुवर्य संजयजी पठाडे सर यांची पाठराखणरुपी शुभेच्छा लाभलेली आहे. कादंबरीचे बोलके मुखपृष्ठ हे अरविंदजी शेलार यांनी तयार केलेले आहे .ही कादंबरी इतकी वाचनीय आहे की, कादंबरीचे वाचन चालू असताना कधी-कधी डुल्याचा संवाद वाचताना बऱ्याच वेळा हसायला येते. परंतु पुढच्याच क्षणात वाचता-वाचता अपोआप डोळ्यातून अचानक कधी पाणी वाहू लागते हेही कळत नाही. कादंबरी वाचताना वाचन मध्येच बंद करावे असे कधीही वाटतं नाही. माझी तर ऐवढी मोठी कांदबरी मन लावून पुर्णपणे वाचन केलेली पहिलीच कांदबरी आहे.सतत दुष्काळाशी सामना करत असलेल्या गावातील अतिशय गरीब कुटुंबातील एक ...
‘अण्णाभाऊ साठे जयंती : झुंजार लेखणीचा साहित्यसूर्याला अभिवादन’
Article

‘अण्णाभाऊ साठे जयंती : झुंजार लेखणीचा साहित्यसूर्याला अभिवादन’

'अण्णाभाऊ साठे जयंती : झुंजार लेखणीचा साहित्यसूर्याला अभिवादन'1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊ साठे उर्फ तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. शिक्षणाची कसलीही परंपरा नसताना अण्णाभाऊंनी जागतिक कीर्तीचे साहित्य लिहिले. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वास्तववादी होते. त्यांची लेखणी ही तिखट आणि झुंजार होती. अण्णा भाऊ लिहितात की, "ही न्याय व्यवस्था काहिकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजडयांची हवेली झाली,मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे..! कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली…!हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदातत्कालीन व्यवस्थेवर अण्णाभाऊंनी आपल्या तळपत्या झुंजार लेखणीने प्रहार केला होता. आजही त्यांचे ते विचार आजच्या व्यवस्थेला, राजकारणाला लागू पडतो.अण्णाभाऊनी मराठी साहित्याला भरभरून कथा, कादंबऱ्या, नाटके, पोवाड...
‘आत्महत्या : समाजाला लागलेली कीड – मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पुन्हा मांडणी’
Article

‘आत्महत्या : समाजाला लागलेली कीड – मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पुन्हा मांडणी’

"आत्महत्या : समाजाला लागलेली कीड – मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पुन्हा मांडणी"कोणतंही दैनिक उघडा,टिव्ही चॅनलवरवरच्या बातम्या पहा,रेडीयोच्या बातम्या ऐका त्यात किमान एकतरी बातमी आत्महत्येची असते.हे सर्व पाहून ऐकून अतिशय खेदाने नमूद करावेसे वाटते की आधुनिक समाजात आत्महत्याची प्रवृती वाढत आहे.ही प्रवृती तारुण्यांच्या भरात असलेल्या व तारुण्याच्या उंबरवठ्यावर असलेल्या मुलामुलींमध्ये वाढत आहे.आपल्याला किती मौल्यवान,अमुल्य असं शरीर व जीवन मिळालेलं आहे.आणि आपण काहीतरी शुल्लक कारणांसाठी ते संपवत आहोत.आत्महत्या समाजाला लागलेली कीड आहे.ही कीड तरुण पिढीला पोखरत आहे. आत्महत्या कोण करतय? सांगा बरं , ज्यांचं मन दुबळं आहे,ज्याच्यांत जीवन जगण्याची धमक नाही,जो दुबळा,भित्रा भागूबाई आहे,जो जीवनातील आव्हनं स्विकारू शकत नाही तोच हा मार्ग स्विकारत असतो.जो मनाने कणखर आहे,स्वतःच्या जीवनाचा स्वतःच ...
‘रामा कलेक्टर झाला : ध्येयासाठी झपाटलेली वाटचाल’
Article

‘रामा कलेक्टर झाला : ध्येयासाठी झपाटलेली वाटचाल’

'रामा कलेक्टर झाला : ध्येयासाठी झपाटलेली वाटचाल'युवा साहित्यिक अशोक पवार लिखित '…आणि रामा कलेक्टर झाला ' ही कादंबरी वाचण्यास नुकतीच हाती घेतली. सदर कादंबरीस आयकर उपायुक्त विष्णू औटी यांची आशयगर्भी प्रस्तावना मिळालेली असून ज्येष्ठ साहित्यिक, संजय पठाडे यांची वाचकांच्या काळजास हात घालणारी दमदार पाठराखण लाभलेली आहे. मुखपृष्ठ इतके बोलके आहे की, कादंबरीच्या अंतरंगात कोणकोणते सहस्य दडलेले आहे हे पाहण्यासाठी वाचकांचे मन क्षणात भरारी घेते.मनात असलेली जिद्द धगधगत्या मशालीसारखी सदैव पेटती ठेवल्यास आलेल्या कोणत्याही संकटावर मात करण्यास दहा हत्तींचे बळ देवून जाते. परिस्थिती माणसाला अनेकदा निराश करू शकते, परंतु पराजीत करू शकत नाही. हा या कादंबरीचा मूळ गाभा आहे. जर आपल्या डोळ्यांत स्वप्न असेल आणि काळजात जिद्द असेल, तर कोणतीही अडचण यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकत नाही. हा संदेश देण्यात ही ...
‘किनारे सरकत आहे’ : आंबेडकरी गझल संग्रहाचे अमरावतीत प्रकाशन
News

‘किनारे सरकत आहे’ : आंबेडकरी गझल संग्रहाचे अमरावतीत प्रकाशन

'किनारे सरकत आहे' : आंबेडकरी गझल संग्रहाचे अमरावतीत प्रकाशनगौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : प्राध्यापक सतेश्वर मोरे स्मृती प्रतिष्ठान व डीऑन पब्लिशिंग हाऊस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने "किनारे सरकत आहे" या आंबेडकरी गझल संग्रहाचे प्रकाशन सोहळा १० ऑगस्ट २०२५, रविवारी दुपारी दोन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, भीमटेकडी परिसर, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.गझलकार नंदकिशोर दामोदरे 'नंदा' यांनी लिहिलेल्या या संग्रहात सामाजिक वास्तव, तळागाळातील वेदना आणि परिवर्तनाची आंबेडकरी प्रेरणा उमटलेली आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय घरडे असून, प्रमुख अतिथी म्हणून अरुण भी विघ्ने, डॉ. मनोज सोनवणे यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे संचालन रोशन गजभिये करणार आहेत.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदादुपारी दोन वाजता "आंबेडकरी गझलप्रज्ञा...
ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणारी कादंबरी…आणि रामा कलेक्टर झाला.!
Article

ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणारी कादंबरी…आणि रामा कलेक्टर झाला.!

ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणारी कादंबरी…आणि रामा कलेक्टर झाला.!ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना प्रेरणा देऊन त्यांच्यातील विजिगीषु वृत्ती जागृत करणारी ' आणि रामा कलेक्टर झाला ' ही कादंबरी नुकतीच माझ्या वाचनात आली.मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये क्लिअरिंग एजंट म्हणून काम करणाऱ्या अशोक पवार या हरहुन्नरी तरुणाने या प्रेरणादायी कादंबरीचे लेखन केलेले आहे.दुष्काळ पाचवीला पुजलेल्या पारनेर सारख्या दुष्काळी भागातील एका छोट्या गावातील एका जिद्दी तरुणाची ही कथा आहे.खरं तर स्पर्धा परीक्षा हे एक मृगजळ आहे.१०..१५ वर्षांपूर्वी शहरातील तरुणांचीच ती मक्तेदारी होती.पण हळूहळू ग्रामीण भागातील तरुणांना या परीक्षेने भुरळ घालायला सुरुवात केली.दुर्दम्य इच्छाशक्ती,जबर मेहनत करण्याची वृत्ती आणि ध्येयवेडे होऊन यशाला गवसणी घालणारा टोकाचा आत्मविश्वास या बळावर ग्रामीण भागातील तरुणांन...
‘जनतेची झळ, सत्तेचा खेळ’
Editorial

‘जनतेची झळ, सत्तेचा खेळ’

'जनतेची झळ, सत्तेचा खेळ'सध्याचा महाराष्ट्र पाहिला, तर मनात अनेक प्रश्न उभे राहतात. शहरं वाढतायत, पण शेतामधून पाणी ओसरतंय. राजकारण गडबडलंय, पण जनतेच्या प्रश्नांची उत्तरं मात्र अद्याप धूसरच आहेत. महागाईच्या दरांनी सामान्यांचे बजेट कोलमडले आहे, तर शेतकरी आकाशाकडे पाहून पावसाच्या आल्या-न आल्याच्या बातम्या ऐकत हातात माती चोळतो आहे. एका बाजूला सत्तेची समीकरणं बदलत आहेत, शिंदे-फडणवीस-पवार यांचे युती–वियोगाचे राजकारण जनतेला रोज नवा तमाशा दाखवत आहे. विधानसभेचे वातावरण रणांगणासारखे आहे, आणि गावपातळीवर प्रश्न अजूनही तसेच पिण्याच्या पाण्याचा अभाव, रस्त्यांची खडबडीत अवस्था, आरोग्य केंद्रांची उणीव, आणि रोजगाराच्या संधींचा अभाव.कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालंय, तर विदर्भात पाऊस फसला आणि शेतकरी पुन्हा नैराश्याच्या कडेलोटावर.मराठवाड्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई, आता पाव...
साहित्यसूर्याला विनम्र अभिवादन.!
Article

साहित्यसूर्याला विनम्र अभिवादन.!

साहित्यसूर्याला विनम्र अभिवादन.!ज्यांच्या लेखणीने मराठी भाषेतील साहित्य सातासमुद्रापार अजरामर झाले. आपल्या झुंजार लेखणीने तळागाळातील कष्टकरी, शोषितांच्या व्यथा साहित्यातून मांडणाऱ्या जन नायकाचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगावी झाला. ते साहित्यसूर्य अण्णाभाऊ साठे होय. त्यांनी साहित्यातली सर्व प्रकार लिहिले आहेत. नवलाईची गोष्ट ही की, फक्त दिड दिवस शाळा शिकून वैश्विक,परिवर्तनवादी, सामाजिक, विचार आपल्या साहित्यातून व्यक्त केले.खरे तर अण्णाभाऊ साठे एक जागतिक कीर्तीचे साहित्यिक होते. परंतु इथल्या व्यवस्थेमुळे उपेक्षितच राहिले. फकिरा, वारणेचा वाघ, वैजयंती, माकडीचा माळ, आवडी, माझा रशियाचा प्रवास यासारख्या अनेक कथा, कादंबर्‍या, पोवाडे, नाटके, प्रवासवर्णन अण्णाभाऊंनी मराठी साहित्याला, महाराष्ट्राला दिलेली अनमोल भेट आहे.अशा या महान साहित्यिकाचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला...
१८ जुलै ; पहिल्या सुपरस्टारची आठवण
Editorial

१८ जुलै ; पहिल्या सुपरस्टारची आठवण

18 जुलै ; पहिल्या सुपरस्टारची आठवण१८ जुलै. ही तारीख जगाच्या दिनदर्शिकेत एक सामान्य दिवस असू शकते, पण लाखो हिंदी सिनेरसिकांच्या हृदयात ती एक हळवी जखम उलगडते. कारण या दिवशी, २०१२ साली, हिंदी सिनेसृष्टीचा पहिला सुपरस्टार, "काका" – राजेश खन्ना यांचा आपल्यातून कायमचा निरोप झाला. त्यांचे नुसते जाणे नव्हते, तर एका भावविश्वाचं, एका नजरेत बोलणाऱ्या अभिनेत्याचं, आणि असंख्य प्रेमकथा घडवणाऱ्या चेहऱ्याचं अस्त होतं.राजेश खन्ना म्हणजे केवळ एक अभिनेता नव्हता. तो एक भावना होता. त्यांच्या अभिनयात एक सहजतेची, हळवेपणाची, आणि प्रेमळ अशा शांत प्रकाशाची सरिता वाहायची. "बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं…", हा संवाद आजही ऐकला की अंगावर काटा येतो. कारण हा संवाद फक्त "आनंद" सिनेमातील नव्हता, तो त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार होता.६० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा राजेश खन्ना रुपेरी पडद्याव...