‘कितीही प्रयत्न झाले तरी आंदोलनाची तीव्रता कमी होणार नाही – मनोज जरांगे; मराठा आरक्षणाच्या लढ्याचा जाज्वल्य इशारा’
“कितीही प्रयत्न झाले तरी आंदोलनाची तीव्रता कमी होणार नाही – मनोज जरांगे; मराठा आरक्षणाच्या लढ्याचा जाज्वल्य इशारा”मुंबई : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शासनाकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न झाले तरी हे आंदोलन थांबणार नाही, अशी ठाम भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “मराठा समाजाच्या हक्काचा प्रश्न हा केवळ कायदेशीर लढाई नाही तर अस्तित्वाची लढाई आहे. शासन आमच्याशी चर्चा करतं, आश्वासनं देतं, पण प्रत्यक्ष कृती मात्र होत नाही. त्यामुळे समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. कितीही प्रयत्न करून हे आंदोलन कमी करण्याचा प्रयत्न झाला, तरी समाजाच्या भावनांचा उद्रेक रोखता येणार नाही.”हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय...









