Wednesday, March 4

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Gerenal

‘व्हिटॅमिन डी’ हवेच..!

व्हिटॅमिन डी हा शरीरासाठी अत्यावश्यक घटक आहे हे आपण जाणतो. मस्तिष्क यंत्रणा, नर्व्हस सिस्टीम आणि स्केलेटन सिस्टीममध्ये सुसूत्रता राखण्यासाठी या घटकाचा उपयोग होतो. व्हिटॅमिन डी मुळे दृष्टी सुधारते त्याचबरोबर सोरायसिस आणि एक्झमा या सारख्या व्याधींपासून मुक्ती मिळते. या व्हिटॅमिनमुळे कंठ, तोंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगापासूनही शरीराचा बचाव होतो. व्हिटॅमिन डी मुळे हाडांना मजबुती मिळते त्याचप्रमाणे मांसपेशींवरची सूज, जळजळ कमी होऊन पेशींच्या विकासासाठी मदत होते. व्हिटॅमिन डी मुळे प्रजननक्षमता सुधारते त्याचप्रमाणे विविध व्याधींची तीव्रताही कमी होते. स्तनाचा कर्करोग अथवा श्‍वासनलिकेत संसर्ग उत्पन्न झाल्यास गंभीर संकट उभं राहू शकतं. मात्र व्हिटॅमिन डी चा पर्याप्त पुरवठा असल्यास व्याधी गंभीर रुप धारण करत नाही. या व्हिटॅमिनची पर्याप्त मात्रा मिळवण्यासाठी अधिकाधिक काळ सूर्यप्रकाश अंगावर घ्यावा.व्हि...
Gerenal

खरेदी इयर रिंगची

पेहराव कितीही सुंदर असला तरी त्याला साजेशा अँक्सेसरीजमुळे लूक अनेक पटीने उजळतो हे कोणीही नाकारणार नाही. या धर्तीवर पाहता भारतीय असो की पाश्‍चात्य, या दोन्ही प्रकारच्या साजेसे कानातले नखरा खुलवून जातात. मात्र इयररिंग खरेदी करताना चेहर्‍याचा आकारही लक्षात घ्यावा. उदाहरणार्थ चेहरा गोल असेल तर तो लंबुळका भासवण्यासाठी ओव्हरसाईज इयररिंग छान दिसतात. चौकोनी चेहरा असणार्‍या सखींनी रुंद इयररिंग वापरु नये. या महिलांनी झुमके वापरावे.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजया चेहर्‍याला हेवी इयररिंग अधिक सूट करतात. टॉप्सही शोभून दिसतात. आयताकृती चेहरा असल्यास जॉ लाईन शार्प आणि हनुवटी गोलाकार असते. या महिलांनी स्टड्स वापरणं योग्य ठरतं. त्या चंक स्टड्स, बटन अथवा राऊंड स्टड्सही वापरु शकतात. या बाबतीत ओव्हल शेप चेहरा असणार्‍या महिला लिक असतात. या चेहर्‍यावर कोणत्याही प्रकारच्या इयररिंग्ज शोभून दिसतात. चेहरा दीपिकास...
Gerenal

लवकर उठून व्यायाम केल्याने लाभ

दोस्तांनो, बर्‍याचजणांना सकाळी उठून व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. पहाटे उठायचं, आवरायचं आणि जीममध्ये जायचं हे रूटिन अनेकांना नकोसं वाटतं. पण पर्याय नसल्याने बरेचजण सकाळी उठून जीममध्ये जातात. मात्र सकाळचा व्यायाम जास्त प्रभावी असल्याचं काही संशोधनांमधून समोर आलं आहे. रात्रीची सात ते आठ तासांची झोप मिळाल्याने शरीर ताजंतवानं झालेलं असतं. त्यामुळे व्यायामाचे सर्वाधिक लाभ मिळवायचे असतील तर सकाळी उठायला सुरूवात करा. सकाळी बिछान्यात पडून राहण्याची सवय असणार्‍यांना या टिप्स नक्कीच मदतकारक करतील.जीममध्ये जात असाल तर सगळी तयारी रात्रीच करून ठेवा. तुमची बॅग भरून ठेवा. यामुळे सकाळी आवराआवरीला जास्त वेळ लागणार नाही आणि गडबड होणार नाही.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजवेळेत उठण्यासाठी रात्री लवकर झोपायला हवं. सकाळी कोणी उठवणारं नसेल तर फोनमध्ये अलार्म लावून घ्या. पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने चार ते पाच ...
Gerenal

डोक्याला मार लागलाय?

घसरून पडल्याने, अपघात झाल्यास किंवा आपटल्यास डोक्याला मार लागतो. अनेकदा हा मार साधा असतो तर अनेकदा तो जीवघेणाही ठरतो. या आघाताने मेंदूला इजा होण्याची शक्यता असते. अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. डोक्याला मार लागल्याने मेंदू किंवा कवटीला इजा होण्याची शक्यता असते. अनेकदा डोक्याच्या आतल्या भागाला जखम होण्याचीही शक्यता असते. ही जखम उघड्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे तातडीने काही चाचण्या करण्याची गरज असते.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजअनेकदा एखादी वस्तू डोक्यात आरपार गेल्याने गंभीर स्वरूपाची इजा होऊ शकते. रस्ते अपघात, घरी किंवा कामाच्या ठिकाणी झालेला अपघात, भांडण, पडणं, खेळताना होणारी इजा यामुळे डोक्याला मार बसतो. बेशुद्ध पडणं, रक्तस्राव, उलट्या, नाकातून रक्त किंवा पाणी येणं, अचानक ऐकू न येणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, चव, वास यांची जाणीव न होणं, बोलताना त्रास होणं, हृदयाचे अनिय...
Gerenal

नकोशी लव घालवण्यासाठी…

शरीरावर बारीक लव असते. पण ही लव दाट अथवा उठून दिसणारी असेल तर सौंदर्यात बाधा उत्पन्न होते. विशेषत महिलांच्या ओठांवरील लव विचित्र दिसते. त्यामुळेच ती हटवण्यासाठी नियमित वॅक्सिंग अथवा थ्रेडिंगचा पर्याय निवडावा लागतो. पण काही उपायाने हा त्रास कायमस्वरुपी नाहिसा होऊ शकतो. डाळीच्या पिठात डेड स्किन दूर करणारी तत्त्व असतात. म्हणूनच याच्या वापराने ओठांवरील लव दूर करता येते.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजत्यासाठी चमचाभर डाळीच्या पिठात चमुटभर हळद आणि थोडं पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठांवर लावून सुकेपर्यंत ठेवा. सुकल्यावर स्क्रब करुन चेहरा धुवा. सलग दोन आठवडे हा उपाय केल्यास लव कमी झालेली दिसेल. बाऊलमध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर, चमचाभर साखर आणि एका अंड्याचा पांढरा बलक हे साहित्य एकत्र करा. हे मिर्शण १५-२0 मिनिटांसाठी ओठांवर लावून ठेवा आणि नंतर धुवा. या उपायानेही ओठांवरील लव नाहिशी होते. नको...
Gerenal

विवाह मानक-यांची किंमत कमी होत चालली आहे

आज विवाह मोठे थाटामाटात होतांना आपल्याला दिसतात. पुर्वीही होत होते. त्यावेळच्या परिस्थीतीनुसार थाटामाटातच व्हायचे. मग गरीब असो की श्रीमंत.आज विवाहसोहळ्याची पद्धतच बदलली. आजचेह विवाहसोहळे हे कर्ज काढून थाटामाटात होत होत असतात. पुर्वी एवढ्या थाटात विवाहसोहळे होत नव्हते. तसेच त्या विवाहसोहळ्यात परंपरा राबविण्याला जास्त महत्व होते. त्याचप्रमाणे मानक-यालाही महत्व होते. मानकरी अर्थात मधला माणूस.कोणताही सौदा जर करायचा असेल तर ज्याप्रमामे मधला माणूस हवा असतो. ज्याला दलाल म्हणतात. असाच मधला माणूस विवाह जोडणी करतांनाही हवा असतो. ज्याला मानकरी संबोधतात. हा मानकरी पुर्वीही असायचा. आजही आहे.मानकरी हा विवाह जोडण्याचं काम करायचा. त्यानं विवाह जोडला की त्याला वधू आणि वर........तो मानकरी ज्याचा असेल, ती मंडळी विवाहात त्याला एक शालजोडी घ्यायचे. अर्थात कपडे घ्यायचे. त्याला काही धान्यही द्यायचे. त्यातच काही...
Gerenal

केक कापताय?.. सावधान.!

वाढदिवस म्हटला की केक हा आलाच. फक्त वाढदिवशीच नाही तर लग्नाचा वाढदिवस आणि आनंदाच्या इतर प्रसंगातही केक कापण्याचं प्रमाण वाढलं आहे. केकवर लावलेल्या मेणबत्त्या फुंकर मारून विझवल्या जातात. मात्र या कृतीमुळे तुम्ही आजारी पडू शकता, असं कोणी सांगितलं तर आपला विश्‍वास बसणार नाही. पण हे खरं आहे. अशाप्रकारे मेणबत्त्या विझवल्यामुळे केकच्या पृष्ठभागावर जंतू पसरण्याचा धोका तब्बल १५ हजार पटींनी वाढतो. अमेरिकेत केलेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली.दक्षिण कॅरोलिना प्रांतातल्या क्लेंम्सन विद्यापीठातल्या संशोधनून काही धक्कादायक बाबी समोर आल्या. कोणत्याही उष्ण घटकामुळे एअरोसोलची निर्मिती होते आणि हेच एअरोसोल बॅक्टेरियांच्या वाढीला कारणीभूत ठरतं, असं संशोधनकांचं म्हणणं आहे. या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी आयसिंग असलेल्या केकच्या एका तुकड्यावर काही पेटवलेल्या मेणबत्त्या लावल्या.त्या विझवल्यानंतर साधारण प...
Gerenal

संधिवातावरील उपचार

संधिवात खूपच त्रासदायक ठरतो. या व्याधीवर आधुनक वैद्यकशास्त्राऐवजी आयुर्वेदिक उपचार घेण्यावर अनेकांचा भर असतो. शारीरिक वेदनांना वातदोष कारणीभूत असतो, असं आयुर्वेद सांगतं. संधिवात हा वातविकार असल्याने उपचारांच्या माध्यमातून शरीरातल्या वाताचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यावर आयुर्वेद भर देतं. पचनसंस्थेशी संबंधित तक्रारींमुळे शरीरात आम हा विषारी घटक तयार होतो. आमामुळे शरीरातल्या वातनिर्मितीचा वेग वाढतो. हा आम संपूर्ण शरीरात पसरतो आणि शेवटी सांध्यांमध्ये स्थिरावतो. या आमामुळे प्रभावित झालेल्या सांध्यांमध्ये संधिवाताची समस्या निर्माण होते.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजया त्रासावर शिल्लक आणि गुग्गुळ या औषधी घटकांचं सेवन करण्याचा सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञ देतात. या घटकांनी युक्त कॅप्सुल्समुळे रुग्णाला आराम मिळतो. या कॅप्सुल्स दिवसातून तीन वेळा घेतल्याने वेदनांचं प्रमाण कमी होतं. या औषधी वनस्पतींच्या सेवन...
Gerenal

या उद्देशाने टाल्कम पावडर लावली जाते…

आता उन्हाचा कहार वाढतो आहे. पुढचे दोन महिने वाढत्या उष्म्याला सामोरं जाण्याखेरीज पर्याय नाही. त्यामुळे या काळात शरीराला येणारा घामाच्या दुर्गंधीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजायला हवे. याकामी टाल्कम पावडर उपयुक्त ठरु शकते. याखेरीज अन्य कामांसाठीही ती उपयुक्त ठरते. केस तेलकट असतील तर चांगला श्ॉम्पू यावरील उपाय ठरु शकतो. मात्र केस अति तेलकट असतील तर अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी केसांच्या मुळांपाशी टाल्कम पावडर भुरभुरा आणि हलक्या हाताने स्क्रब करा.मस्कारा लावण्यापूर्वी पापण्यांवर टाल्कम पावडर भुरभरावी. यामुळे मस्कारा एकसारखा पसरतो. लिपस्टिक सेट करण्यासाठी आणि लाँग लास्टिंग इफेक्ट मिळवण्यासाठी टाल्कम पावडरचा उपयोग होतो. लिपस्टिक लावून झाल्यानंतर टिश्यू पेपरवर थोडी पावडर घ्या आणि हा पेपर ओठांवर दाबून धरा. आता परत लिपस्टिकचा हलका कोट द्या. यामुळे लप कलर अधिक काळ टिकतो. वॅक्सिंग करण्यापूर्वी त...
Gerenal

कार्य मूत्रपिंडाचे….

शरीरयंत्रणेतील गुंतागुंत आणि त्यात विस्कळीतपणा आल्यास होणारे परिणाम अभ्यासण्याजोगे असतात. आपल्या शरीरात अनेक जीवरासायनिक क्रिया सतत सुरू असतात. अशा प्रत्येक क्रियेदरम्यान काही टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. ते साचून राहणं घातक ठरतं. त्यामुळे त्यांचा नियमित निचरा होण्याची गरज असते. त्याशिवाय आपण कळत-नकळत शरीरावर अत्याचारही करत असतो. अबरचबर खात असतो. त्यांच्या पचनातून शरीराला घातक अशी उच्छष्ट उरतात. त्यांचाही नचरा होणं आवश्यक असतं.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजयापैकी टाकाऊ पदार्थ रक्तात उतरतात आणि ते त्यातून काढून रक्त शुद्ध करण्याची जबाबदारी मूत्रपिंडावर असते. रक्त गाळून त्यातले टाकाऊ पदार्थ विरघळवून शरीराबाहेर टाकण्याचं कामही मूत्रपिंडाद्वारे होतं. शिवाय शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल राखण्याचं कामही मूत्रपिंडांना करावं लागतं. उन्हाळ्यात भरपूर घाम येतो. त्यामुळे शरीरातल्या पाण्याचा निच...