Wednesday, December 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

अक्षय तृतीया;केवळ पुजापाठ नको,कर्तृत्वही हवं..!

अक्षय तृतीया भारतात मोठ्या उत्साहानं साजरा होणारा सण आहे.हा सण हिंदूंचाच नाही तर जैन लोकही या सणाला मोठ्या उत्साहानं साजरा करतात.नव्हे तर या पाठीमागे एक पुरातन परंपरा आहे.       या दिवसाला साजरा करण्यामागे काही पुरातन परंपरा खालीलप्रमाणे         या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला.तोच विष्णुचा सहावा अवतार मानला जातो.या दिवशी परशुराम जयंती साजरी करण्याच्या दृष्टीने या दिवसाचे महत्व आहे.गंगा नदीही याच दिवशी भगीरथाने पृथ्वीवर आणली.तसेच या दिवशी गंगेत स्नानाचे महत्व आहे.हिंदू पुराणानुसार याच दिवशी अन्नपूर्णा मातेचाही जन्मदिवस मानला जातो.त्यामुळे या देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ या दिवशी बनवून ते अन्नपूर्णा देवीला चढवले जातात.याच दिवशी कुबेराने जास्त धन प्राप्ती व्हावी म्हणून शिवपुरम येथे भगवान शिवाची पुजा केली.याच दिवशी महर्षी वेद व्यास यांनी महाभारत कथा लिहिण्यास  प्रारंभ केली....
Article

वऱ्हाडाचा कुबेर राघोजी महार

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसाहत करून असणारा आजचा *बौद्ध  व पूर्वीचा महार* गेली कित्येक हजार वर्षापासून दारिद्र्यात जीवन जगत होता. आधुनिक भारताच्या इतिहासात महारांच्या कहाण्या आपण ऐकले आहेत.पण विदर्भातील वाशिम जवळून १५ किलोमीटरच्या अंतरावर असणारे तोरणाळा गावचा* काही वेगळाच इतिहास आहे.या गावी  राघोजी नावाचा सावकार होऊन गेला ज्याच्या गोष्टी आजही लोकांच्या तोंडी एकाला मिळतात राघो महार यांचा जन्म 1839 मध्ये झाला राघो स्वभावाने जिद्दी आणि मेहनती होता. असे सांगतात की एकदा काम करत असताना त्याला सोन्याने भरलेला हंडा सापडला. त्यातून त्याने मोह विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आपल्या मेहनतीने व चिकाटीने तो मोहविक्रेता म्हणून प्रसिद्ध झाला.  ज्याच्या हजारो पिढया गरीबीच्या अंधारात खितपत पडल्या होत्या त्या समाजात सावकार म्हणून त्याची ख्याती व्हायला वेळ लागला नव्हता. लोकांना आलेल्या छोट्या छोट्या आर्थिक ...
Article

कुटे गुरुजी…एक निरपेक्षवृत्तीचा -उपक्रमशील शिक्षक

नारायणराव गोविंदराव कुटे गुरुजी यांचा जन्म २६ जुलै १९४१ साली वरुडखेड येथे झाला. कुटे गुरूजी म्हटले की, चांगले साडे पाच फुटांपेक्षा उंच तसेच अंगापिंडाने भरलेले गौरवर्णी, थोडा लांब चेहरा, पांढरा शुभ्र पायजमा, त्यावर प्रेसचे शर्ट असे अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व त्यांचॆ होते. ते स्वभावाने जरी कडक असले तरी तितकेच मनमिळावू होते. तसेच सद्वर्तनी आणि निष्कलंक चारित्र्याचे होते.मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डीएड केले आणि १७ जुलै १९६३ ला ते यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये माळेगाव येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. सेवारत असताना अचलपूर येथे इंग्रजी विषयाचा कोर्स पूर्ण केला, नंतर पांढुर्णा आणि करजगाव येथे १९६७ ला रूजू होऊन १९९७ पर्यंत करजगांवला ३० वर्ष कार्यरत होते, असा त्यांच्या सेवेचा प्रवास झाला.करजगावी असताना त्यांना सदाशिव गोविंदराव भोयर, सालपे गुरूजी, भालेराव गुरूजी, गायकवाड गुरूजी इत्याद...
Gerenal

कितने अजीब रिश्ते है यहाँ पे !

“मुंबईत राहून राजगृह पाहिलं नाही तू...? चल मी घेऊन जाते“ असं म्हणून संगीता मला दादरला घेऊन गेली. राजगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचताच एरव्ही सर्वसामान्यांसाठी खुले असलेले सभागृह त्यादिवशी बंद होते. राजगुहाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी कुणालाही प्रवेश नव्हता. दोघीही निराश झालो. परतीचा विचार सुरु केला. असं म्हणतात, “विश्वास दृढ झाला की, निष्ठा येते. निष्ठा दृढ झाली कि श्रद्धा. श्रद्धा दृढ झाली की, भक्ती आणि भक्तीही दृढ झाली की समर्पिता.” याच समर्पित दृढ भावनेनं संगीता एकटीच राजगृहाच्या वरच्या मजल्यावर जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परपोतीला घेऊन खाली आली. त्यादिवशी मी केवळ संगीतामुळे राजगृहापर्यंत पोहचले पण राजगृह पाहण्याची ईच्छा मात्र अपुर्णच राहिली.2014 साली आम्ही 11 जण एकाचवेळी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात रूजू झालो. त्यानंतर अनेक सहकारी बदलीमुळे वेगवेगळ्या जिल्ह्या...
Gerenal

सम्राट अशोक : एक श्रेष्ठ तम सम्राट

       इतिहासाच्या पानापानांवर परिच्छेदा च्या परिच्छेदांवर गर्दी करून असणाऱ्या लक्षावछधी राजांच्या नावामध्ये, सम्राट अशोकाचे एकट्याचेच नाव एखाद्या तळपत्या तार् यासारखे चकाचक राहते, अशोकाचे हे वेगळेपण असामान्य आहे, अलैकिक आहे. हेच आपण नेमके समजावून घेतले पाहिजे, कलिंगच्या लढाईनंतर त्याच्या व्यक्ती मत्वात झालेल्या अमूलाग्र बदल हेच त्यांच्या वेगळेपणाचे गमक आहे, शत्रुपक्षाची प्राणहानी, वित्तहानी पाहून सामान्यतः पराक्रमी राजे आपली पाठ थोपटून घेतात, यशाने उन्मत्त होतात, सम्राट अशोक राजा असा सामान्य राजासारखा उन्मत्त झाला नाही, त्याने शांतपणे विचार केला, प्राणहानीने, वित्तहानीने तो व्यथित झाला आणि हिंसेचा मार्ग अवलंबल्याबद्दल त्याला पश्चात्ताप झाला. त्याने हिंसेचा मार्ग सोडला असे हे राजाने वागणे. हेच त्यांच्या असामान्य पणाचे अलैकिक करुणामय होणे होय. म्हणजे मानवी मनाला स्पर्श करून त्यांचे दुख स्वत...
Gerenal

महिला सक्षमीकरणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाची विविध पैलू आहेत.एक महान समाज क्रांतिकारक,शिक्षणतज्ञ अर्थतज्ञ,परराष्ट्र नितीतज्ञ म्हणून भारताच्या जडणघडणीत त्यांचे अत्यंत महत्वपूर्ण असे योगदान आहे.विसाव्या शतकातील सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतीचे मुख्य प्रणेते असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महिला सक्षमीकरणासाठी ही तितकेच महत्वपूर्ण असे योगदान आहे.शोषित,पीडित,वंचित घटकाच्या उद्धाराबरोबरच महिलाच्या उत्कर्षासाठीही त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले,त्यांच्या हक्कासाठी पोटतिडकीने लढलेत,झटलेत, झिजलेत.सर्वधर्मीय महिलांना त्यांच्या अधिकार व हक्काची जाणीव करून दिली.अधिकार व हक्काच्या लढाईसाठी प्रेरित केले. सर्वांगीण विकासाची वाट मोकळी करून दिली.डॉ.आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आजच्या समस्त महिला वर्गाच्या आयुष्यात सोनियाचा दिवस उगवला हे सूर्यप्रकाशाइतके सत्य कुणीच नाकारणार नाही. भारतातील वर्णव्यवस्था...
Gerenal

आधुनिक भारताचे शिल्पकार

भारतातील वर्ग आणि जातीअंताच्या लढय़ाला आकार व दिशा देण्याचे भरीव काम विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषणमुक्ती आणि समतेसाठीच्या लढय़ांमध्येही डॉ. बाबासाहेब प्रेरणादायी ठरले आहेत. जगाच्या इतिहासात असे योगदान देणार्‍या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये त्यांचे स्थान अग्रणी आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात. सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषत: वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकारासाठी त्यांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता. लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप. डॉ. बाबासाहेबांना बालपणापासून अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. इ.स.१९३५-३६ या कालावधीदरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत त्यांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटू अनु...
Gerenal

“भारतरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकरांचे विचार अन्यायग्रस्तांसाठी -“तेज – प्रकाश निर्माण करणारे”

महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक १४ एप्रिल १८९१ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर अपार कष्ट करून ज्ञानसाधना करून अनेक विषयात ज्ञानशांखावर त्यांनी प्रभुत्व संपादन केले याद्वारे त्यांनी स्वतःची शैक्षणिक उन्नती तर साधलीच अन्यायग्रस्त समाजासाठी त्यांनी मोलाचे अतुलनीय कार्य केले अशा लोकांसाठी त्यांनी त्यांच्यामध्ये चेतना,जागृती निर्माण करण्यासाठी विपुल लिखाण केले. जातीपातीचा विचार न करता सर्वांसाठी मानव कल्याणासाठी त्यांनी कार्य केले. स्रियांच्या सन्मानासाठी केलेल्या कार्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे.प्रत्येकाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करायलाच पाहिजे. *"वाचाल तर वाचाल,"* असा संदेश बाबासाहेबांनी दिल्यामुळे आज अन्यायग्रत्तांना गुलामगिरीच्या बेड्या तोडून ताठ मानेने जगायला भारतरत्न बाबासाहेबांनी शिकविले. अन्यायग्रस्ताच्या वाट्याला आलेले दुःखे ...
Gerenal

मुलांच्या पाठदुखीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका…..

पाठदुखीची समस्या सर्वसामान्य बाब बनली असून आता ती लहानग्यांनाही सतावू लागली आहे. निरोगी जीवनशैली, बसण्याची योग्य स्थिती आणि सर्वसाधारण व्यायाम करून पाठदुखी जडण्याची शक्यता बर्‍याच अंशी कमी करता येते. लहान मुलांमधल्या पाठ तसंच मानदुखीची अनेक कारणं असू शकतात. म्हणूनच मुलांच्या पाठदुखीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. शाळेत बराच काळ बसून राहणं, गॅझेट्सचा वापर करताना चुकीच्या पद्धतीने बसणं, शारीरिक हालचालीचा अभाव अशा कारणांमुळे पाठदुखी उद्भवू शकते. जड दप्तरामुळेही मुलांमध्ये पाठदुखी उद्भवत असल्याची बाब समोर आली होती.लहानग्यांमधली प्रत्येक प्रकारची पाठदुखी गंभीर स्वरूपाची नसते. अगदी साधे उपाय करून हा त्रास दूर करता येतो. त्यामुळे पालकांनी घाबरून जायचं काहीच कारण नाही. आधी नमूद केल्याप्रमाणे बैठी जीवनशैली आणि बसण्याची अयोग्य पद्धत ही पाठदुखीची प्रमुख कारणं आहेत. त्यामुळे मुलांना साधे व्यायामप्...
Gerenal

मेंदू आणि विस्मरण

एखाद्या व्यक्तीला अपघात झाला किंवा कोणी डोक्यात काठी हाणली तर त्याला मागचं काहीच आटवत नसल्याचे प्रसंग चित्रपट, मालिकांमधून आपण पाहतो. पण प्रत्यक्षात माणसाला इतक्या पटकन विस्मरण होत नाही. असह्य़ अशा शारीरिक किंवा भावनिक इजेवर मात करण्यासाठीचं शरीराचं ते एक संरक्षक साधन असल्याने हे घडण्यासाठी माणसावर तितकी महाभयंकर वेदना सहन करण्याची पाळी यावी लागते. मुळात कोणत्याही घटनेची, अनुभवाची, शिकवणीची आठवण साठवून ठेवण्याच्या कामात मेंदूची अनेक उपांग कार्यरत असतात. त्यात 'हप्पोकॅम्पस'चा मोठा सहभाग असतो.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजया प्रक्रियेत काही बाधा आली तर त्या अल्पकालीन स्मृतीचं दीर्घकालीन स्मृतीत अवस्थांतर होऊ शकत नाही. साहजिकच ती पुसली जाते. अपघातात डोक्याला बाह्य इजा झाली असेल पण मेंदूला त्याची झळ पोहोचली नसेल तर स्मृतीभ्रंश होण्याची शक्यता फार कमी आहे. तसंच सारं व्यक्तिमत्त्वच ढवळून काढणारा...