Friday, June 19

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
बैलपोळा सण : शेतकऱ्यांचा सच्चा मित्र बैल आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन
Article

बैलपोळा सण : शेतकऱ्यांचा सच्चा मित्र बैल आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन

बैलपोळा सण : शेतकऱ्यांचा सच्चा मित्र बैल आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शनसालाबादप्रमाणे वर्षाच्या श्रावण अमावस्येच्या दिवशी म्हणजे पीठोरी अमावस्येच्या दिवशी पोळा हा सण येतो.हा दिवस म्हणजे शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबातील लोकांना अगदी आनंदाचं उधाण आणणारा असतो. भारत हा कृषिप्रधान देश असून ७०% लोकांची उपजीविकेचं साधन हे बहुतांश शेतीवरच अवलंबून आहे. म्हणजे शहरांपेक्षा खेडयाची वसाहत आजही जास्त प्रमाणात आहे.हल्ली शेतीचं बहुतांश ठिकाणी यांत्रिकीकरण झालं असलं तरी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी अजूनही बैलजोड्या आपलं अस्तित्व म्हणून राखून ठेवल्या आहेत. आणखी हा दिवस बैल पोळा म्हणून ग्रामीण व शहरी भागामधून फार मोठ्या आंनदाने साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना दररोजच्या शेतीच्या कष्टाच्या, मशागतीच्या कामापासून  थोडा आराम दिला जातो. गावातील कुशल बैलांची शिंगे,खुरं काढणाऱ्य...
स्वातंत्र्यानंतरची शैक्षणिक प्रगती आणि आपली जबाबदारी | स्वतंत्र भारतातील शिक्षणाची वाटचाल
Article

स्वातंत्र्यानंतरची शैक्षणिक प्रगती आणि आपली जबाबदारी | स्वतंत्र भारतातील शिक्षणाची वाटचाल

स्वातंत्र्यानंतरची शैक्षणिक प्रगती आणि आपली जबाबदारी | स्वतंत्र भारतातील शिक्षणाची वाटचालभारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवण्याची धोरणे राबवली जात होती. शिक्षणाचा प्रसार केवळ उच्चवर्ग आणि काही शहरांपुरता मर्यादित होता. ग्रामीण भाग, महिलावर्ग, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर होते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने शिक्षण हा राष्ट्रनिर्मितीचा प्रमुख आधारस्तंभ मानून त्यात सातत्याने सुधारणा केल्या.भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा हक्क दिला. कलम २१(अ) अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा अधिकार देण्यात आला. शिक्षणाला मूलभूत हक्काचा दर्जा देणे ही भारताच्या शैक्षणिक प्रगतीतील एक ऐतिहासिक पायरी ठरली.स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये देशातील साक्षरतेचे प...
केदारे प्रज्वल दादू, अचूक नेमबाज.!
Article

केदारे प्रज्वल दादू, अचूक नेमबाज.!

केदारे प्रज्वल दादू, अचूक नेमबाज.!काल म्हणजे रविवारी सकाळीच सात वाजता याच्या वस्तीवर काही कामानिमित्त जायचा योग आला . जवळजवळ जंगलातच घर आहे त्याचं . रस्ता इतका अडचणीचा की तिथून जाताना एखादं जंगली जनावर अंगावर झेप घेतंय की काय अशी सारखी भीती वाटत होती . घराला कंपाऊंड सोडा भिंती आणि पक्का दरवाजा सुद्धा नाही. जंगली श्वापदं कधीही येऊन त्रास देतात. आणि मग त्याच्यापासून वाचण्याचं हे एकमेव अस्त्र. वाघाचं कातडं पातळ असल्यामुळं जर खरंच या गलोलीतून सुटलेला एखादा दगड त्याला जिव्हारी बसला तर तो परत कधीच त्या भागात फिरकत नाही . हे यांचं खरंखुरं ‘प्रयोगातून विज्ञान’ .प्रत्येकाच्या झोपडीपुढं चार–दोन कोंबड्या , शेळ्या , मेंढ्या सतत असल्यामुळं लांडगा , रानमांजर , ऊद , मुंगूस हे तर यांचे नेहमीचेच पाहुणे त्यामुळं त्यांच्या पाहुणचारासाठी हे स्वस्त, मस्त आणि प्रभावी असं हत्यार जे एक मूलभूत गरज म्हण...
कुमारी गौरी खापरकर हिचे जलतरण स्पर्धेमध्ये उज्वल यश!
News

कुमारी गौरी खापरकर हिचे जलतरण स्पर्धेमध्ये उज्वल यश!

कुमारी गौरी खापरकर हिचे जलतरण स्पर्धेमध्ये उज्वल यश!(पिंपळखुटा/स्वाती इंगळे)डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा येथील गुणवंत विद्यार्थिनी कुमारी गौरी खापरकर हिने आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे.ही जलतरण स्पर्धा श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय, अमरावती येथे पार पडली. या स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गौरीने ५० मीटर फ्री स्टाईल व ५० मीटर बॅकस्ट्रोक गटात आपली सरस कामगिरी सादर करत प्रथम क्रमांक पटकावला.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदागौरीच्या या यशामागे प्रा. मनीषा लांडे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचे उद्घाटन मा. दिलीप इंगळे, प्राचार्य डॉ. सी.एम. प्रा. देशमुख, डॉ. शशांक देशमुख, श्री ...
“…आणि रामा कलेक्टर झाला” – संघर्षातून शिखरावर जाण्याची प्रेरणादायक कहाणी
Article

“…आणि रामा कलेक्टर झाला” – संघर्षातून शिखरावर जाण्याची प्रेरणादायक कहाणी

"…आणि रामा कलेक्टर झाला" – संघर्षातून शिखरावर जाण्याची प्रेरणादायक कहाणीअशोक पवार लिखित '…आणि रामा कलेक्टर झाला ' ही कादंबरी नुकतीच वाचून झाली. या कादंबरीला आयकर उपायुक्त श्री विष्णूजी औटी साहेब यांची प्रस्तावना लाभलेली असून ज्येष्ठ साहित्यिक व आमचे गुरुवर्य संजयजी पठाडे सर यांची पाठराखणरुपी शुभेच्छा लाभलेली आहे. कादंबरीचे बोलके मुखपृष्ठ हे अरविंदजी शेलार यांनी तयार केलेले आहे .ही कादंबरी इतकी वाचनीय आहे की, कादंबरीचे वाचन चालू असताना कधी-कधी डुल्याचा संवाद वाचताना बऱ्याच वेळा हसायला येते. परंतु पुढच्याच क्षणात वाचता-वाचता अपोआप डोळ्यातून अचानक कधी पाणी वाहू लागते हेही कळत नाही. कादंबरी वाचताना वाचन मध्येच बंद करावे असे कधीही वाटतं नाही. माझी तर ऐवढी मोठी कांदबरी मन लावून पुर्णपणे वाचन केलेली पहिलीच कांदबरी आहे.सतत दुष्काळाशी सामना करत असलेल्या गावातील अतिशय गरीब कुटुंबातील एक ...
‘अण्णाभाऊ साठे जयंती : झुंजार लेखणीचा साहित्यसूर्याला अभिवादन’
Article

‘अण्णाभाऊ साठे जयंती : झुंजार लेखणीचा साहित्यसूर्याला अभिवादन’

'अण्णाभाऊ साठे जयंती : झुंजार लेखणीचा साहित्यसूर्याला अभिवादन'1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊ साठे उर्फ तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. शिक्षणाची कसलीही परंपरा नसताना अण्णाभाऊंनी जागतिक कीर्तीचे साहित्य लिहिले. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वास्तववादी होते. त्यांची लेखणी ही तिखट आणि झुंजार होती. अण्णा भाऊ लिहितात की, "ही न्याय व्यवस्था काहिकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजडयांची हवेली झाली,मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे..! कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली…!हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदातत्कालीन व्यवस्थेवर अण्णाभाऊंनी आपल्या तळपत्या झुंजार लेखणीने प्रहार केला होता. आजही त्यांचे ते विचार आजच्या व्यवस्थेला, राजकारणाला लागू पडतो.अण्णाभाऊनी मराठी साहित्याला भरभरून कथा, कादंबऱ्या, नाटके, पोवाड...
‘आत्महत्या : समाजाला लागलेली कीड – मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पुन्हा मांडणी’
Article

‘आत्महत्या : समाजाला लागलेली कीड – मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पुन्हा मांडणी’

"आत्महत्या : समाजाला लागलेली कीड – मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पुन्हा मांडणी"कोणतंही दैनिक उघडा,टिव्ही चॅनलवरवरच्या बातम्या पहा,रेडीयोच्या बातम्या ऐका त्यात किमान एकतरी बातमी आत्महत्येची असते.हे सर्व पाहून ऐकून अतिशय खेदाने नमूद करावेसे वाटते की आधुनिक समाजात आत्महत्याची प्रवृती वाढत आहे.ही प्रवृती तारुण्यांच्या भरात असलेल्या व तारुण्याच्या उंबरवठ्यावर असलेल्या मुलामुलींमध्ये वाढत आहे.आपल्याला किती मौल्यवान,अमुल्य असं शरीर व जीवन मिळालेलं आहे.आणि आपण काहीतरी शुल्लक कारणांसाठी ते संपवत आहोत.आत्महत्या समाजाला लागलेली कीड आहे.ही कीड तरुण पिढीला पोखरत आहे. आत्महत्या कोण करतय? सांगा बरं , ज्यांचं मन दुबळं आहे,ज्याच्यांत जीवन जगण्याची धमक नाही,जो दुबळा,भित्रा भागूबाई आहे,जो जीवनातील आव्हनं स्विकारू शकत नाही तोच हा मार्ग स्विकारत असतो.जो मनाने कणखर आहे,स्वतःच्या जीवनाचा स्वतःच ...
‘रामा कलेक्टर झाला : ध्येयासाठी झपाटलेली वाटचाल’
Article

‘रामा कलेक्टर झाला : ध्येयासाठी झपाटलेली वाटचाल’

'रामा कलेक्टर झाला : ध्येयासाठी झपाटलेली वाटचाल'युवा साहित्यिक अशोक पवार लिखित '…आणि रामा कलेक्टर झाला ' ही कादंबरी वाचण्यास नुकतीच हाती घेतली. सदर कादंबरीस आयकर उपायुक्त विष्णू औटी यांची आशयगर्भी प्रस्तावना मिळालेली असून ज्येष्ठ साहित्यिक, संजय पठाडे यांची वाचकांच्या काळजास हात घालणारी दमदार पाठराखण लाभलेली आहे. मुखपृष्ठ इतके बोलके आहे की, कादंबरीच्या अंतरंगात कोणकोणते सहस्य दडलेले आहे हे पाहण्यासाठी वाचकांचे मन क्षणात भरारी घेते.मनात असलेली जिद्द धगधगत्या मशालीसारखी सदैव पेटती ठेवल्यास आलेल्या कोणत्याही संकटावर मात करण्यास दहा हत्तींचे बळ देवून जाते. परिस्थिती माणसाला अनेकदा निराश करू शकते, परंतु पराजीत करू शकत नाही. हा या कादंबरीचा मूळ गाभा आहे. जर आपल्या डोळ्यांत स्वप्न असेल आणि काळजात जिद्द असेल, तर कोणतीही अडचण यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकत नाही. हा संदेश देण्यात ही ...
‘किनारे सरकत आहे’ : आंबेडकरी गझल संग्रहाचे अमरावतीत प्रकाशन
News

‘किनारे सरकत आहे’ : आंबेडकरी गझल संग्रहाचे अमरावतीत प्रकाशन

'किनारे सरकत आहे' : आंबेडकरी गझल संग्रहाचे अमरावतीत प्रकाशनगौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : प्राध्यापक सतेश्वर मोरे स्मृती प्रतिष्ठान व डीऑन पब्लिशिंग हाऊस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने "किनारे सरकत आहे" या आंबेडकरी गझल संग्रहाचे प्रकाशन सोहळा १० ऑगस्ट २०२५, रविवारी दुपारी दोन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, भीमटेकडी परिसर, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.गझलकार नंदकिशोर दामोदरे 'नंदा' यांनी लिहिलेल्या या संग्रहात सामाजिक वास्तव, तळागाळातील वेदना आणि परिवर्तनाची आंबेडकरी प्रेरणा उमटलेली आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय घरडे असून, प्रमुख अतिथी म्हणून अरुण भी विघ्ने, डॉ. मनोज सोनवणे यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे संचालन रोशन गजभिये करणार आहेत.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदादुपारी दोन वाजता "आंबेडकरी गझलप्रज्ञा...
ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणारी कादंबरी…आणि रामा कलेक्टर झाला.!
Article

ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणारी कादंबरी…आणि रामा कलेक्टर झाला.!

ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणारी कादंबरी…आणि रामा कलेक्टर झाला.!ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना प्रेरणा देऊन त्यांच्यातील विजिगीषु वृत्ती जागृत करणारी ' आणि रामा कलेक्टर झाला ' ही कादंबरी नुकतीच माझ्या वाचनात आली.मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये क्लिअरिंग एजंट म्हणून काम करणाऱ्या अशोक पवार या हरहुन्नरी तरुणाने या प्रेरणादायी कादंबरीचे लेखन केलेले आहे.दुष्काळ पाचवीला पुजलेल्या पारनेर सारख्या दुष्काळी भागातील एका छोट्या गावातील एका जिद्दी तरुणाची ही कथा आहे.खरं तर स्पर्धा परीक्षा हे एक मृगजळ आहे.१०..१५ वर्षांपूर्वी शहरातील तरुणांचीच ती मक्तेदारी होती.पण हळूहळू ग्रामीण भागातील तरुणांना या परीक्षेने भुरळ घालायला सुरुवात केली.दुर्दम्य इच्छाशक्ती,जबर मेहनत करण्याची वृत्ती आणि ध्येयवेडे होऊन यशाला गवसणी घालणारा टोकाचा आत्मविश्वास या बळावर ग्रामीण भागातील तरुणांन...