Wednesday, January 21

भारतातील एकमेव न्यायाधीश ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली ?

भारतातील एकमेव न्यायाधीश ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली ?

उपेंद्र नाथ राजखोवा असे फाशीची शिक्षा ठोठावलेल्या भारताच्या एकमेव न्यायाधीशाचे नाव आहे. उपेंद्र नाथ राजखोवा हे आसामच्या दुबरी जिल्ह्याच्या कोर्टात जिल्हा व सत्र न्यायाधीश पदावर होते. त्याने पत्नी व मुलींचा खून केला. या प्रकरणाने संपूर्ण आसाम हादरला.

या खळबळजनक खून प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आणि अखेर राजखोवाला या गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आले आणि मे 1973 मध्ये त्याला मृत्यूदंड ठोठावण्यात आला. गुवाहाटी उच्च न्यायालयाने एक वर्षानंतर त्याच्या फाशीची शिक्षा पुष्टी केली. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांची दया याचिका नाकारल्यानंतर अखेर 14 फेब्रुवारी 1976 रोजी जोरहाट तुरूंगात त्याला फाशी देण्यात आली.

उपेंद्र नाथ राजखोवा यांना हत्येप्रकरणी फाशी देण्यात आली होती, त्यात पत्नी व मुलींची हत्या करण्यात आली होती. पण यातली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजखोवाने आपल्या स्वत: च्या बायकोची आणि मुलींची हत्या का केली याबद्दल कोणालाही कधी सांगितले नाही. हे अजूनही एक रहस्य आहे.

उपेंद्र नाथ राजखोवा हे भारतातील एकमेव न्यायाधीश आहेत ज्यांना फाशी देण्यात आली. असे म्हटले जाते की जगात असा कोणताही न्यायाधीश नाही ज्याला हत्येसाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

विकास भायगुडे 

 

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

0 Comments

Leave a Reply