
कागदी बॉंडचा काळ संपला; महाराष्ट्रात आजपासून ई-बॉंडची धडक सुरुवात!
मुंबई : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयात-निर्यात व्यवहारात क्रांती घडवून आणली आहे. आजपासून महाराष्ट्रात कागदी बॉंड बंद करून ई-बॉंडची सुरुवात झाली असून, या नव्या प्रणालीमुळे व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ई-बॉंड प्रणाली महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग, National E-Governance Services Limited (NeSL) आणि National Informatics Centre (NIC) यांच्या तांत्रिक सहाय्याने सुरू करण्यात आली आहे. आता आयातदार व निर्यातदार वेगवेगळ्या कागदी बॉंडची गरज न करता, एकाच इलेक्ट्रॉनिक बॉंडद्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकतील.
या नव्या प्रणालीचे महत्वाचे फायदे:
- प्रोव्हिजनल असेसमेंट, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स, वेअरहाऊसिंग व मॅन्युफॅक्चरिंग इन बॉन्डेड वेअरहाऊसेससाठी ई-बॉंड वापरता येईल.
- सर्व व्यवहार पूर्णपणे ऑनलाईन व डिजिटल पद्धतीने होतील, ज्या ई-स्वाक्षरी व ई-स्टॅम्पिंगद्वारे सुरक्षित होतील.
- मुद्रांक शुल्कासह सर्व शुल्क ऑनलाईन भरता येईल; ५०० रुपयांचे कागदी स्टॅम्प आता इतिहासात जात आहे.
- रिअल-टाईम पडताळणीमुळे फसवणूक थांबवता येईल, प्रक्रिया पारदर्शक व जलद होईल.
- ई-बॉंडमध्ये आवश्यक ते बदल किंवा रक्कमवाढ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करता येणार आहे.
- कागदपत्रांची गरज संपून ग्रीन गव्हर्नन्सकडे मोठा टप्पा पुढे जाईल. E-Bond
महसूल मंत्री बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली ही पावले राज्यातील व्यवसायिकांसाठी सुलभता व डिजिटल इंडियाच्या उद्दिष्टाला चालना देतील. आयात-निर्यात व्यवहार आता अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि गतिमान होणार आहेत.
महाराष्ट्रात आजपासून E-Bond प्रणाली सुरू; राज्य सरकारचा …