Monday, October 27

Tag: Article

मुलांचा छातीत बसलेला घट्ट कफ कसा काढाल.?
Article

मुलांचा छातीत बसलेला घट्ट कफ कसा काढाल.?

मुलांचा छातीत बसलेला घट्ट कफ कसा काढाल.?लहान मुलांना वयाच्या ५ ते ७ वर्षापर्यंत सतत सर्दी, कफ, खोकला, ताप असे काही ना काही होतच असते, धुळीची ॲलर्जी, विविध विषाणूजन्य समस्या, बदलते हवामान अशा कारणांनी मुलांना या समस्या उद्भवतात. काही वेळा हा कफ ठराविक काळाने बरा होतो. मात्र काही वेळा औषधोपचार आणि घरगुती उपाय करुनही हा घट्ट कफ छातीत तसाच राहतो. अशावेळी वाफारा, शेक देणे, गरम पाणी पिणे असे उपाय केल्यावर हळूहळू बरेच दिवसांनी यावर थोड्या प्रमाणात आराम मिळतो. पण या सगळ्या काळात मुलांची अजिबातच झोप होत नाही. कफ, सर्दी किंवा खोकला यामुळे त्यांना सतत जाग येत राहते आणि मग सलग झोप मिळत नाही. त्यांच्याबरोबरच आपल्याही झोपेचे खोबरे होते ते वेगळेदुसरीकडे कफामुळे अन्न जात नाही त्यामुळे अंगात ताकद राहत नाही. त्यात खेळणे सतत सुरू असल्याने थकवा येतो. असे सगळे झाले की मुलांच्या एकूणच आरोग्यावर त्याचा विपरी...
भारतीय संविधानातील १० महत्त्वाच्या गोष्टी
Article

भारतीय संविधानातील १० महत्त्वाच्या गोष्टी

भारतीय संविधानातील १० महत्त्वाच्या गोष्टी संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे, संविधानिक मूल्यांचे आचरण करणे होय. संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थायी करायचे आहे. संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिक कर्तव्य पार पाडल्या शिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही.देशभरात आज संविधान दिवस साजरा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आजोयन करण्यात येते. या निमित्तानं जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी.१) २६ नोव्हेंबरला सं...
मानवी जीवन…
Article

मानवी जीवन…

मानवी जीवन..."व्यक्ती तितक्या प्रकृती" सर्वांचे गुणधर्म वेगळे, स्वभाव वेगळे, जसे  निसर्गात उमललेल्या प्रत्येक फुलांचा रंग, गंध वेगवेगळा असतो पण प्रत्येक आपापल्या वेगळ्या रंगरुपाने गंधाने आपले अस्तित्व टिकवून असते. सर्वच जर गुलाब असते तर प्रकृतीत उमलणाऱ्या प्रत्येक फुलांचा वेगळा गुणधर्म आपल्याला कळला नसता; तेव्हा  गुलाबच सुंदर आणि रानात उगवणारी रानफुले ही सुंदर नसतात, किंवा त्यात काहीही चांगला गुणधर्म नसते असे नाही, फक्त त्यांच्यातील सुप्त गुणधर्मांना समजून घेण्याची  आपल्याकडे मानसिक दुष्टी हवी.जसे नानाविध रंगाची गंधाची फुले आहे तशीच सृष्टीवर नानाविध स्वभावाची, स्वरूपाची माणसे सुद्धा आहेत. जेवढे गुण तेवढे दोष असे  गुणदोषांचे समीकरण म्हणजे मानवी जीवन आणि त्यांच्यातील विविधांगी स्वरूपानुसार बनलेला स्वभाव; स्वभावानुसार जगण्याचे विशिष्ट गुणदोष प्रत्येक व्यक्तीत असते, परिपूर्ण असा कुणीच नसतो...
भारतात कैद्याला फाशी नेहमी सूर्योदयापूर्वीच का दिली जाते?
Article

भारतात कैद्याला फाशी नेहमी सूर्योदयापूर्वीच का दिली जाते?

भारतात फाशी नेहमी सूर्योदयापूर्वीच का दिली जाते ? निर्भया प्रकरणातील बलात्कारी असो किंवा कोपर्डी प्रकरणातील आरोपी असो, त्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली मात्र तुम्हाला माहीती का? भारतात फाशी ही नेहमी सूर्योदयापूर्वीच का दिली जाते? काय कारणं आहेत यामागे?  चला जाणून घेऊया यामागची कारणं.* प्रशासकीय कारण तुरूंग प्रशासनासाठी फाशी देणं हे एक मोठं काम असतं. फाशी नंतरच्या वैद्यकीय चाचण्या, वेगवेगळ्या नोंदी, कैद्याच्या कुटुंबाकडं मृतदेह सोपवणं अशी अनेक कामं जेल प्रशासन करत असतं. त्यामुळे फाशी सूर्योदयापूर्वीच आटपून ही पुढची प्रक्रिया दिवसभर केली जाते.* नैतिक कारण कैद्याला फाशीसाठी जास्त वेळ वाट बघायला लावणं हे त्याच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम घडवू शकतं. आता मृत्यू जवळ आलेला पाहून कोणाला बरं वाटेल? त्यामुळे त्याला झोपेतून उठवून, नित्यकर्म उरकून लगेचच फाशी दिली जाते.हे वा...
Article

भारतीय ग्रामीण शेतकरी जीवनशैलीचा रथ- बैलगाडी

भारतीय ग्रामीण शेतकरी जीवनशैलीचा रथ- बैलगाडी(नाशिक जिल्ह्यातील कादवा शिवार दिवाळी अंक २०२३ च्या मुखपृष्ठावर टाकलेला प्रकाश)सालाबादप्रमाणे यंदाची दिवाळी फराळाची रेलचेल घेऊन आली. स्वयंपाकघरातील गृहिणींच्या हाताची चव फराळातून दिसून येत आहे... जून्या जाणत्या स्वयंपाकीण काकूंकडून नव्याने लग्न होऊन आलेल्या नववधू दिवाळीला फराळ शिकून घेतांना दिसल्या तर काही नववधूंनी माहेरात घेतलेलं अस्सल पाककलेचे कौशल्य सासरी अगदी सराईतपणे फराळ करून घरच्या आपल्या माणसांना खायला लावून त्यांच्या जिभेवर माहेराच्या फराळाची चव कशी रेंगाळत राहिल याची दक्षता घेतांना दिसून आल्या.....दिवाळी सण तसा ग्रामीण जीवनशैलीचा एक महत्त्वाचा सण मानला जातो.... वर्षभर शेतीमध्ये काबाडकष्ट करून आपल्या मुलाबाळांना, सुनांना, जावयांना वर्षाअखेरीस गोडधोड खायला घालून, रंगबेरंगी वस्त्राने शरीर आणि मन प्रसन्न करण्यासाठी हा दिवाळीसण साजरा क...
शुगर, बिपी कंट्रोल कसे करावे?
Article

शुगर, बिपी कंट्रोल कसे करावे?

शुगर, बिपी कंट्रोल कसे करावे ?* सीताफळ ठरेल उपयुक्त; फळ एक अन् फायदे अनेक.!शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे सर्वांत महत्त्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास किंवा व्याधी जडू शकतात. आताच्या घडीला डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे आजार अगदी सामान्यपणे पाहायला मिळतात. या आजारांवर नियंत्रण मिळण्यासाठी अनेक गोष्टी सहाय्यभूत ठरू शकतात. डायबिटीज आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी काही फळे उपयुक्त ठरू शकतात.डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा त्रास यामुळे हृदयविकाराचा धोका असतो. या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधे सुरू करावीत. मात्र, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी काही घरगुती उपायही प्रभावी ठरू शकतात. अनेक आयुर्वेदिक औषधे, मसाले आणि फळे यांचा आहारात समावेश करून रक्तदाब आणि मधुमेहावर सहज नियंत्रण ठेवता येऊ शकते.बाजारात अनेक प्रकारची फळे उपलब्ध ...
जाड असणं म्हणजे कुरुप नाही.!
Article

जाड असणं म्हणजे कुरुप नाही.!

जाड असणं म्हणजे कुरुप नाही.!एका wp गृपवर काल मिसयुनीव्हर्सवरुन चर्चा सुरु होती ८० किलो वजनाची स्त्री स्पर्धेत उतरते त्यावरुन चाललेला चिवडा माझ्या वाचनात आला. आता सकाळी योगा करत असताना मी उठा बश्या काढत होते. जमीनीवर हात न टेकता मला उठबस करता येते म्हणजे मी फिट आहे. मी इंडीयन टॉयलेट मधे बसउठ करु शकते म्हणजे मी फिट आहे.मी खाली बसुन कपडे धुवु शकते किवा भांडी खाली बसुन घासु शकते,  फरश्या घासु शकते , माझे हात खाली वाकल्यावर पायाला लागतात किवा डोकं गुडघ्याना लागतं म्हणजेच मला पोट नाही आणि मी फ्लेक्झीबल आहे असही होवु शकतं. इंटरकोर्स करताना अनेक पोजेसचा मी सहज आनंद घेउ शकतो/शकते म्हणजे मी फिट आहे. कुठलही काम करताना माझं पोट मधे येत नाही आणि छोट्या कामाने थकायला होत नाही म्हणजे मी फिट आहे. यातलं कोणाकोणाला काय काय जमतं पहा कारण आपण सगळे मिसयुनीव्हर्स होणार नाहीत पण मिसहेल्दी, मिसॲक्टीव्ह, मिसॲट...
बायको जाते माहेरी…
Article

बायको जाते माहेरी…

बायको जाते माहेरी........ घरी आणा...........वरील गाळलेली जागा ज्याची त्याने भरायची आहे.. ज्या पध्दतीने तो ती जागा भरेल त्यानुसार त्याची वैयक्तिक जडणघडण ठरते.. कारण सगळ्यात महत्वाचे विचार..हा विषय माझ्या मित्राने दिलाय ज्याची बायको कालच माहेरी गेली आहे.. दिवाळी संपली .. मुलांना सुट्ट्या त्यामुळे बऱ्याचशा सख्या माहेरी गेल्या आहेत आणि इकडे नवरोबाना स्वातंत्र्य मिळालं आहे.. प्रत्येकाचं स्वातंत्र्य उपभोगण्याची पध्दत वेगळी.. मी माहेरी फार कमी जाते त्यामुळे सचिन मला म्हणतो , अरे मी काय पाप केलं.. बायको माहेरी गेली घरी आणा पीतांबरी ही ॲड सगळ्याना माहीत आहे पण काहीना घरी कादंबरीही आणायची असते ( सोनल ची ).. म्हणजे चोरुन फॅंटसी वाचायच्या असतात.. कोणाला वाटेल निलांबरी आणावी .. choice is yours.... अहो , तो ओला टॉवेल बेडवर टाकु नका , कितीदा तुम्हाला सांगितलं.. तुम्ही ऐकतच नाही यातुन काहीना स्वातंत्र्य ह...
मी तंदुरस्त आहे का.?
Article

मी तंदुरस्त आहे का.?

मी तंदुरस्त आहे का.?जमीनीवर हात न टेकता मला उठबस करता येते म्हणजे मी फिट आहे.. मी इंडीयन टॉयलेटमधे बसउठ करु शकते म्हणजे मी फिट आहे.. मी खाली बसुन कपडे धुवु शकते किवा भांडी खाली बसुन घासु शकते,  फरश्या घासु शकते , माझे हात खाली वाकल्यावर पायाला लागतात किवा डोकं गुडघ्याना लागतं म्हणजेच मला पोट नाही आणि मी फ्लेक्झीबल आहे असही होवु शकतं, कुठलही काम करताना माझं पोट मधे येत नाही आणि छोट्या कामाने थकायला होत नाही म्हणजे मी फिट आहे.. यातलं कोणाकोणाला काय काय जमतं पहा कारण आपण सगळे मिसयुनीव्हर्स होणार नाहीत पण मिस हेल्दी ,मिसॲक्टीव्ह , मिसॲट्रॅक्टीव्ह , मिसप्रमाणबध्द, मिस उत्तम बायको, उत्तम आई या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यात गरजेच्या आहेत.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..! हातात मोबाईल घेउन बसुन कोणीही फिट रहाणार नाही तर त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, तोंडावर ताबा हवा आणि काय ...
थंडीत प्या खास लसणाचा चहा.!
Article

थंडीत प्या खास लसणाचा चहा.!

थंडीत प्या खास लसणाचा चहा.!* कफ, सर्दी, खोकला आणि ताप दूर करण्यासाठी  * जाणून घ्या कसा बनवाल!जसजशी थंडी वाढते तसतशा आरोग्यासंबंधी अनेक समस्या डोकं वर काढतात. जसे की, कफ, सर्दी, खोकला आणि ताप. इतरही अनेक गंभीर समस्या होण्याचा धोका या दिवसात वाढत असतो. अशात लोक अनेक घरगुती उपाय करतात. असाच एक खास उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. लसूण, आलं, काळे मिरे यांसारख्या उष्ण गुण असलेल्या पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच कफ आणि सर्दी दूर करण्यासाठी तर लसणाचा चहा अधिक फायदेशीर मानला जातो.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!लसणाचा चहा आणि त्यापासून होणाऱ्या फायद्यांबाबत अनेकांना माहीत असेलच. लसणाचा चहा म्हणजेच गार्लिक टी एका पावरफुल टॉनिक मानलं जातं. ज्याने कफ आणि सर्दी-पळसा दूर करण्यास मदत मिळते.अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, लसणाचा चहा हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्या...