Monday, January 26

News

टप्पू-बबिताच्या साखरपुड्याच्या अफवेवर भव्य गांधीचा खुलासा!
News

टप्पू-बबिताच्या साखरपुड्याच्या अफवेवर भव्य गांधीचा खुलासा!

टप्पू-बबिताच्या साखरपुड्याच्या अफवेवर भव्य गांधीचा खुलासा!मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील ‘टप्पू’ आणि ‘बबिता’ म्हणजेच भव्य गांधी आणि मुनमुन दत्ता यांचा गुपचूप साखरपुडा झाला का? इंस्टाग्राम, यूट्यूब आणि X (पूर्वीचं ट्विटर) वर फोटो, रील्स, हेडलाईन्सचा पूर आला होता. लोकांचं कुतूहल वाढत होतं, काही जण या नात्याचं स्वागत करत होते, तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं. पण अखेर या अफवांवर स्वतः ‘टप्पू’ उर्फ भव्य गांधीनेच विराम दिला आहे.“मीही त्या बातम्या वाचून चकित झालो!” भव्य म्हणतो, “पहिली गोष्ट म्हणजे, ज्या टप्पूचा साखरपुडा झाल्याचं लोक म्हणतायत, तो मी नाही. दुसरी म्हणजे, ही अफवा बडोद्यातून पसरली. आईला अचानक फोन आला ‘अरे, तुमच्या मुलाचा साखरपुडा झाला का?’ ती एवढी चिडली की तिनेच विचारलं, ‘तुम्हाला अक्कल आहे का?’ हे सगळं...
भीमनगर नालंदा बुद्ध विहाराची कंपाऊंड वॉल धोकादायक; त्वरित काम सुरू करण्याची मागणी
News

भीमनगर नालंदा बुद्ध विहाराची कंपाऊंड वॉल धोकादायक; त्वरित काम सुरू करण्याची मागणी

भीमनगर नालंदा बुद्ध विहाराची जीर्ण कंपाऊंड वॉल – नागरिकांचा निवेदनाद्वारे निषेधअमरावती (प्रतिनिधी) : भीमनगर परिसरातील नालंदा बुद्ध विहाराच्या कंपाऊंड वॉलची अवस्था अतिशय जीर्ण व जर्जर झाली असून ती कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणी लहान मुले नेहमी खेळत असतात, त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून स्थानिक नागरिकांनी तातडीने भिंतीचे बांधकाम सुरू करण्याची मागणी केली आहे.या संदर्भात खासदार बळवंत वानखडे यांनी दिनांक 24 मार्च 2025 रोजी महानगरपालिकेला पत्र देऊन भिंतीचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आवाहन केले होते. मात्र, अद्यापही काम सुरू न झाल्याने परिसरातील नागरिकांत नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उपायुक्त नरेंद्र वानखडे यांना निवेदन देऊन परिस्थितीची गंभीर दखल घेण्याची विनंती करण्यात आली. उपायुक्त वानखडे यांनी तात्काळ निवेदनाची नोंद घेत संबंधित अधिकारी व अ...
जिमनंतरचं अंडं ठरलं जीवघेणं! फिटनेसप्रेमी संदीपच्या अचानक निधनाने खळबळ!
News

जिमनंतरचं अंडं ठरलं जीवघेणं! फिटनेसप्रेमी संदीपच्या अचानक निधनाने खळबळ!

इंदूर : नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवन आणि आरोग्याबद्दल जागरूकता हे सर्व असूनही एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने इंदूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. खातीपुरा परिसरातील 32 वर्षीय संदीप या तरुणाचा जिममधून परत आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.मंगळवारी संध्याकाळी संदीप नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम करून घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने अंडा हाफ फ्राय खाल्लं. त्यानंतर काही क्षणांतच त्याला छातीत दुखायला लागलं, जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं आहे.संदीप गेल्या सहा वर्षांपासून नियमित व्यायाम करत होता. फिटनेस आणि आहाराबाबत तो अत्यंत शिस्तप्रिय होता. त्याचा अकाली मृत्यू अनेकांसाठी धक्कादायक ठरल...
सोमनाथ पगार यांना ‘कारुण्यबोध’ कवितासंग्रहासाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार
News

सोमनाथ पगार यांना ‘कारुण्यबोध’ कवितासंग्रहासाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार

कराड : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत अनुदान प्राप्त साहित्यिक, गीतकार, कवी, ट्रान्सलेटर, ब्लॉगर, युट्युबर म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या नाशिक येथील सोमनाथ पगार यांना त्यांच्या ‘कारुण्यबोध’ या कवितासंग्रहासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यस्तरीय स्व. राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कराड शहरातील वेणूताई चव्हाण स्मृती सदन येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साम टीव्ही न्यूजचे संपादक निलेश खरे, प्रेरणादायी वक्ते डॉ. विनोद बाबर, महंत अहिल्यागिरिजी महाराज, सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे, दिग्दर्शक अरुण कचरे, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, पत्रकार सेजल पुरवार, सिनेअभिनेते योगेश पोवार, सिनेअभिनेत्री प्...
कुंभारी तांड्यावर गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा
News

कुंभारी तांड्यावर गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा

कुंभारी तांड्यावर गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळाकुंभारी तांडा (ता. पुसद, जि. यवतमाळ) प्रतिनिधी : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी संघटनेतर्फे कुंभारी तांड्यावर सामाजिक भान, प्रेरणा आणि एकतेचा अनोखा मेळ साधणारा सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात गावातील ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा, नवीन शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा, तसेच सेवानिवृत्त मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तांड्याचे नायक श्री. सुधाकर राठोड यांनी भूषविले, तर प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष प्रा. शेषराव राठोड यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. विष्णू चव्हाण (सहसचिव, अखिल भारतीय तांडा सुधार समिती) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, एमपीएससी, पोलीस भरती आणि उच्च शिक्षणाच्या संधींवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि ...
GPS तुमच्यावर ठेवतोय पाळत ! IIT दिल्लीचा खुलासा.!
News

GPS तुमच्यावर ठेवतोय पाळत ! IIT दिल्लीचा खुलासा.!

मुंबई : तुमचा मोबाईल तुम्हाला फक्त लोकेशन दाखवत नाही, तर तुम्ही उभे आहात की झोपलेले, हे सुद्धा सांगतोय! IIT दिल्लीच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार, स्मार्टफोनमधील GPS (Global Positioning System) तंत्रज्ञान तुमच्या हालचाली ८७ टक्के अचूकतेने ओळखू शकते.प्रा. डॉ. स्मृती आर. सारंगी यांनी सांगितले की, तुम्ही जेव्हा एखादं ॲप डाउनलोड करून लोकेशन ‘Allow’ करता, तेव्हा GPS केवळ ठिकाणच नाही, तर तुम्ही मोठ्या घरात राहता की छोट्या, तुम्ही रेल्वे स्टेशनवर आहात की एअरपोर्टवर, इतकंच नव्हे तर तुमच्यासोबत किती लोक आहेत, हेही सांगू शकतो.GPS सिग्नल 10-12 सॅटेलाइट्सकडून मिळतो आणि त्यातून 32 पॅरामीटर्सवर आधारित मॅपिंग तयार होतं. यामुळे ॲप्स तुमच्या घराचा लेआऊट, हालचाली, व्यवहार आणि वैयक्तिक माहिती सहज ओळखू शकतात.डिजिटल पाळत टाळण्यासाठी IIT दि...
राहुल गांधींचा जलमय प्रचार! मच्छिमारांसोबत उतरले तळ्यात, बिहारमध्ये ‘देसी अंदाज’ चर्चेत
News

राहुल गांधींचा जलमय प्रचार! मच्छिमारांसोबत उतरले तळ्यात, बिहारमध्ये ‘देसी अंदाज’ चर्चेत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगात आली असून, प्रमुख नेत्यांचे दौरे आणि सभा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी बेगुसराय येथे प्रचारासाठी दाखल झाले. नेहमीप्रमाणे भाषणांमधून केंद्र व राज्य सरकारवर टीका करण्याबरोबरच, यावेळी त्यांनी एक वेगळा प्रयोग केला थेट लोकांमध्ये उतरून त्यांचा जीवनानुभव जाणून घेण्याचा.सभेपूर्वी राहुल गांधी स्थानिक मच्छिमार बांधवांना भेटण्यासाठी बेगुसरायमधील एका तळ्याकाठी पोहोचले. पारंपरिक पोशाखात त्यांनी अचानक तळ्यात उडी घेतली आणि स्थानिक मच्छिमारांसोबत मासेमारी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या "देसी अंदाजाचा" व्हिडिओ काँग्रेस पक्षाने आपल्या 'एक्स' (पूर्वीच्या ट्विटर) अकाऊंटवर शेअर करताच काही तासांतच तो व्हायरल झाला.या जलमय अनुभवातून राहुल गांधींनी मच्छिमार बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या दैनंदिन संघर्षांब...
भारताच्या विश्वविजेत्या वीरांगना: बीसीसीआयचा ५१ कोटींचा मानाचा मुजरा!
News

भारताच्या विश्वविजेत्या वीरांगना: बीसीसीआयचा ५१ कोटींचा मानाचा मुजरा!

मुंबई : नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघाने अभूतपूर्व पराक्रम साधला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला ५३ धावांनी पराभूत करत महिला वनडे विश्वचषक 2025 आपल्या नावे केला. भारताने प्रथम फलंदाजी करत २९९ धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव २४६ धावांवरच कोसळला. या विजयानंतर देशभरातून महिला संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच, बीसीसीआयनेही ऐतिहासिक निर्णय घेत ५१ कोटी रुपयांचं भव्य बक्षीस जाहीर केलं आहे.बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी ही घोषणा करताना सांगितलं की, या पुरस्कारात खेळाडूंसह कोचिंग स्टाफ, निवड समिती आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल. त्यांनी या विजयाचं श्रेय आयसीसी चेअरमन जय शाह यांच्या दूरदृष्टीला दिलं. शाह यांच्या प्रयत्नांमुळे महिला क्रिकेटमधील पुरस्कार रक्कमेत तब्बल ३०० टक्क्यांनी वाढ करण्य...
मेळघाटातील घुंगरू बाजार; परंपरेचा थाट, नात्यांचा उत्सव आणि माणुसकीचा सोहळा!
News

मेळघाटातील घुंगरू बाजार; परंपरेचा थाट, नात्यांचा उत्सव आणि माणुसकीचा सोहळा!

अमरावती : जिल्ह्यातील अतिदुर्गम मेळघाट भागात दरवर्षी दिवाळीनंतर एक अनोखा बाजार भरतो. हा बाजार केवळ खरेदी-विक्रीचं ठिकाण नाही, तर प्रेम, परंपरा आणि संस्कृतीचा जिवंत मेळा आहे. स्थानिक गोंड आणि आदिवासी समाज या बाजाराला प्रेमानं “घुंगरू बाजार” किंवा “थाट्या बाजार” म्हणून ओळखतात.दिवाळीनंतरच्या पहिल्या आठवडी बुधवारी हरिसाल, धारणी, सेमाडोह, कोल्हा आदी भागांमध्ये हा बाजार भरतो. पांढरा सदरा, धोतर, कवड्यांची माळ, आणि डोक्यावर पक्ष्यांच्या पिसांनी सजविलेली पगडी परिधान केलेली गोंड मंडळी ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या नादात नाचत बाजारात फिरतात. बांबूपासून तयार केलेल्या बासऱ्यांचे सूर आणि म्हशीच्या शिंगापासून तयार केलेल्या फुंक्यांचे आवाज संपूर्ण बाजारभर घुमत राहतात. या नादात मिसळलेली रंगीबेरंगी माणसं मेळघाटाच्या संस्कृतीचं जिवंत दर्शन घडवतात.या दिवशी लोक वर्षभरातील शेतीमाल विक्रीतून मिळालेल्य...
ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी तळेगाव दशासर येथे काँग्रेसचा हल्लाबोल!
News

ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी तळेगाव दशासर येथे काँग्रेसचा हल्लाबोल!

तळेगाव दशासर : धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दशासर परिसर आज दणाणून गेला, कारण हजारो शेतकरी, महिला व युवकांनी माजी आमदार मा. विरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारविरोधात दोन तासांचा ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन केला. “सरकार जागे व्हा!”, “शेतकऱ्यांना न्याय द्या!”, “कर्जमाफी जाहीर करा!” अशा घोषणांनी औरंगाबाद रोडवर जनआक्रोशाचा लोंढा उसळला.काँग्रेसचा सरकारला इशारामाजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांनी आंदोलनादरम्यान सांगितले,“शेतकरी आत्महत्येच्या टोकावर आहे. कर्जमाफी ही त्याची मागणी नाही, ती त्याची गरज आहे. सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करतं, पण शेतकऱ्याला मात्र न्याय मिळत नाही. आम्ही शांत बसणार नाही — काँग्रेस रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार!” ते पुढे म्हणाले,“शेतकऱ्यांचा घाम सोन्यासारखा मौल्यवान आहे. जर सरकारने त्यांच्या अश्रूंना किंमत दिली नाही, तर जनता ...