Tuesday, December 2

News

GPS तुमच्यावर ठेवतोय पाळत ! IIT दिल्लीचा खुलासा.!
News

GPS तुमच्यावर ठेवतोय पाळत ! IIT दिल्लीचा खुलासा.!

मुंबई : तुमचा मोबाईल तुम्हाला फक्त लोकेशन दाखवत नाही, तर तुम्ही उभे आहात की झोपलेले, हे सुद्धा सांगतोय! IIT दिल्लीच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार, स्मार्टफोनमधील GPS (Global Positioning System) तंत्रज्ञान तुमच्या हालचाली ८७ टक्के अचूकतेने ओळखू शकते.प्रा. डॉ. स्मृती आर. सारंगी यांनी सांगितले की, तुम्ही जेव्हा एखादं ॲप डाउनलोड करून लोकेशन ‘Allow’ करता, तेव्हा GPS केवळ ठिकाणच नाही, तर तुम्ही मोठ्या घरात राहता की छोट्या, तुम्ही रेल्वे स्टेशनवर आहात की एअरपोर्टवर, इतकंच नव्हे तर तुमच्यासोबत किती लोक आहेत, हेही सांगू शकतो.GPS सिग्नल 10-12 सॅटेलाइट्सकडून मिळतो आणि त्यातून 32 पॅरामीटर्सवर आधारित मॅपिंग तयार होतं. यामुळे ॲप्स तुमच्या घराचा लेआऊट, हालचाली, व्यवहार आणि वैयक्तिक माहिती सहज ओळखू शकतात.डिजिटल पाळत टाळण्यासाठी IIT दि...
राहुल गांधींचा जलमय प्रचार! मच्छिमारांसोबत उतरले तळ्यात, बिहारमध्ये ‘देसी अंदाज’ चर्चेत
News

राहुल गांधींचा जलमय प्रचार! मच्छिमारांसोबत उतरले तळ्यात, बिहारमध्ये ‘देसी अंदाज’ चर्चेत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगात आली असून, प्रमुख नेत्यांचे दौरे आणि सभा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी बेगुसराय येथे प्रचारासाठी दाखल झाले. नेहमीप्रमाणे भाषणांमधून केंद्र व राज्य सरकारवर टीका करण्याबरोबरच, यावेळी त्यांनी एक वेगळा प्रयोग केला थेट लोकांमध्ये उतरून त्यांचा जीवनानुभव जाणून घेण्याचा.सभेपूर्वी राहुल गांधी स्थानिक मच्छिमार बांधवांना भेटण्यासाठी बेगुसरायमधील एका तळ्याकाठी पोहोचले. पारंपरिक पोशाखात त्यांनी अचानक तळ्यात उडी घेतली आणि स्थानिक मच्छिमारांसोबत मासेमारी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या "देसी अंदाजाचा" व्हिडिओ काँग्रेस पक्षाने आपल्या 'एक्स' (पूर्वीच्या ट्विटर) अकाऊंटवर शेअर करताच काही तासांतच तो व्हायरल झाला.या जलमय अनुभवातून राहुल गांधींनी मच्छिमार बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या दैनंदिन संघर्षांब...
भारताच्या विश्वविजेत्या वीरांगना: बीसीसीआयचा ५१ कोटींचा मानाचा मुजरा!
News

भारताच्या विश्वविजेत्या वीरांगना: बीसीसीआयचा ५१ कोटींचा मानाचा मुजरा!

मुंबई : नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघाने अभूतपूर्व पराक्रम साधला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला ५३ धावांनी पराभूत करत महिला वनडे विश्वचषक 2025 आपल्या नावे केला. भारताने प्रथम फलंदाजी करत २९९ धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव २४६ धावांवरच कोसळला. या विजयानंतर देशभरातून महिला संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच, बीसीसीआयनेही ऐतिहासिक निर्णय घेत ५१ कोटी रुपयांचं भव्य बक्षीस जाहीर केलं आहे.बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी ही घोषणा करताना सांगितलं की, या पुरस्कारात खेळाडूंसह कोचिंग स्टाफ, निवड समिती आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल. त्यांनी या विजयाचं श्रेय आयसीसी चेअरमन जय शाह यांच्या दूरदृष्टीला दिलं. शाह यांच्या प्रयत्नांमुळे महिला क्रिकेटमधील पुरस्कार रक्कमेत तब्बल ३०० टक्क्यांनी वाढ करण्य...
मेळघाटातील घुंगरू बाजार; परंपरेचा थाट, नात्यांचा उत्सव आणि माणुसकीचा सोहळा!
News

मेळघाटातील घुंगरू बाजार; परंपरेचा थाट, नात्यांचा उत्सव आणि माणुसकीचा सोहळा!

अमरावती : जिल्ह्यातील अतिदुर्गम मेळघाट भागात दरवर्षी दिवाळीनंतर एक अनोखा बाजार भरतो. हा बाजार केवळ खरेदी-विक्रीचं ठिकाण नाही, तर प्रेम, परंपरा आणि संस्कृतीचा जिवंत मेळा आहे. स्थानिक गोंड आणि आदिवासी समाज या बाजाराला प्रेमानं “घुंगरू बाजार” किंवा “थाट्या बाजार” म्हणून ओळखतात.दिवाळीनंतरच्या पहिल्या आठवडी बुधवारी हरिसाल, धारणी, सेमाडोह, कोल्हा आदी भागांमध्ये हा बाजार भरतो. पांढरा सदरा, धोतर, कवड्यांची माळ, आणि डोक्यावर पक्ष्यांच्या पिसांनी सजविलेली पगडी परिधान केलेली गोंड मंडळी ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या नादात नाचत बाजारात फिरतात. बांबूपासून तयार केलेल्या बासऱ्यांचे सूर आणि म्हशीच्या शिंगापासून तयार केलेल्या फुंक्यांचे आवाज संपूर्ण बाजारभर घुमत राहतात. या नादात मिसळलेली रंगीबेरंगी माणसं मेळघाटाच्या संस्कृतीचं जिवंत दर्शन घडवतात.या दिवशी लोक वर्षभरातील शेतीमाल विक्रीतून मिळालेल्य...
ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी तळेगाव दशासर येथे काँग्रेसचा हल्लाबोल!
News

ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी तळेगाव दशासर येथे काँग्रेसचा हल्लाबोल!

तळेगाव दशासर : धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दशासर परिसर आज दणाणून गेला, कारण हजारो शेतकरी, महिला व युवकांनी माजी आमदार मा. विरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारविरोधात दोन तासांचा ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन केला. “सरकार जागे व्हा!”, “शेतकऱ्यांना न्याय द्या!”, “कर्जमाफी जाहीर करा!” अशा घोषणांनी औरंगाबाद रोडवर जनआक्रोशाचा लोंढा उसळला.काँग्रेसचा सरकारला इशारामाजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांनी आंदोलनादरम्यान सांगितले,“शेतकरी आत्महत्येच्या टोकावर आहे. कर्जमाफी ही त्याची मागणी नाही, ती त्याची गरज आहे. सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करतं, पण शेतकऱ्याला मात्र न्याय मिळत नाही. आम्ही शांत बसणार नाही — काँग्रेस रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार!” ते पुढे म्हणाले,“शेतकऱ्यांचा घाम सोन्यासारखा मौल्यवान आहे. जर सरकारने त्यांच्या अश्रूंना किंमत दिली नाही, तर जनता ...
पती-पत्नी दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये; मुलं कोणाकडे?
News

पती-पत्नी दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये; मुलं कोणाकडे?

पती-पत्नी दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये; मुलं कोणाकडे?देहराडून (उत्तराखंड) : प्रेमाला ना वयाचं बंधन, ना नात्याचं! पण या “प्रेमकहाणी”नं मात्र नात्यांचे सगळे अर्थ बदलून टाकले आहेत. उत्तराखंडातील देहराडूनमध्ये घडलेली ही घटना ऐकून कुणीही थक्क होईल कारण इथे फक्त पत्नीच नव्हे, तर पतीदेखील आपल्या जोडीदाराला सोडून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये गेले आहेत!एका विवाहित महिलेने आपल्या पतीला आणि तीन मुलांना सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण यानंतर जे घडलं ते आणखीन धक्कादायक तिच्या पतीलाही दुसऱ्या महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जाताना पाहून लोकांचं डोकं फिरलं. आता प्रश्न एकच मुलांचं काय?महिला आयोगाकडे दोन्ही बाजूंकडून तक्रार दाखल झाली आहे. पत्नीचं म्हणणं “माझ्या पतीला एका महिलेनं फसवलं!” तर पतीचं म्हणणं “माझ्या पत्नीची दिशाभूल करण्यात आली!” आता नेमका बळी कोण आणि दोषी कोण हे ठरवणं आय...
जगातील सर्वात स्वस्त हॉटेल फक्त 20 रुपयांत मुक्काम!
News

जगातील सर्वात स्वस्त हॉटेल फक्त 20 रुपयांत मुक्काम!

प्रवासासाठी किंवा कामानिमित्त अनेकजण वेगवेगळ्या शहरांत मुक्काम करतात. मात्र हॉटेलचं वाढतं भाडं अनेकदा खिशाला चटका लावतं. पण जर तुम्हाला सांगितलं की जगात असं एक हॉटेल आहे जिथे केवळ २० रुपयांत एक रात्र मुक्काम करता येतो तर? होय! पाकिस्तानमधील पेशावर शहरात असलेलं हे अनोखं हॉटेल सध्या जगभर चर्चेत आहे.या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी फक्त ७० पाकिस्तानी रुपये, म्हणजेच अंदाजे २० भारतीय रुपये आकारले जातात. एवढ्या कमी दरात कोणत्या सुविधा मिळतात हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल.या हॉटेलच्या खास सुविधा या हॉटेलमध्ये झोपण्यासाठी एक खाट, स्वच्छ चादर, पंखा, कॉमन बाथरूम आणि मोफत चहा या सुविधा दिल्या जातात. मात्र येथे खोली नसून झोपण्यासाठी इमारतीच्या छतावर जागा दिली जाते. म्हणजेच प्रवासी आकाशातील तारे पाहत झोपतात एक वेगळाच अनुभव!हे हॉटेल पारंपरिक पश्तून वास्तुकलेने बांधलेलं आहे आणि ते विटा व दगडांनी बन...
अमिताभ बच्चन यांचा ‘दहा हजारांचा’ दिवाळी बोनस; जनता म्हणते – ‘बिग बी की स्मॉल गिफ्ट?
News

अमिताभ बच्चन यांचा ‘दहा हजारांचा’ दिवाळी बोनस; जनता म्हणते – ‘बिग बी की स्मॉल गिफ्ट?

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि भेटवस्तूंचा उत्सव. पण यंदा सोशल मीडियावर मात्र बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या दिवाळी भेटीवरून वाद पेटला आहे.अमिताभ बच्चन यांनी आपल्या घरातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचा डबा आणि 10,000 रुपयांची रोख रक्कम दिल्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. एका कंटेंट क्रिएटरने जुहू येथील ‘जलसा’ बंगल्या बाहेर हा व्हिडिओ शूट केला असून, कर्मचाऱ्यांपैकी एकाने स्वतः ही माहिती दिली आहे.हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी बिग बींवर टीकेची झोड उठवली आहे. “बिग बींची संपत्ती जशी प्रचंड, तशी भेट मात्र ‘मिनिमल’ का?” असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. एका युजरने लिहिलं, “ज्या कर्मचाऱ्यांनी वर्षभर त्यांच्यासाठी काम केलं, त्यांना फक्त 10 हजार? लाजिरवाणं आहे हे!”तर काहींनी बच्चन यांच्या बाजूनेही मत मांडलं. “भेट किती दिली हे न...
एकतेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्टेशनवर ३७व्या जनआंदोलनातून साजरी अनोखी दिवाळी
News

एकतेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्टेशनवर ३७व्या जनआंदोलनातून साजरी अनोखी दिवाळी

एकतेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्टेशनवर ३७व्या जनआंदोलनातून साजरी अनोखी दिवाळीएकतेचा संदेश देत शकुंतला रेल्वे स्टेशनवर एक अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या ३७व्या प्रतीकात्मक जनआंदोलनातून ही दिवाळी सामाजिक एकतेचा दीपोत्सव ठरली. दिवाळीचा उत्सव सामान्यतः प्रत्येकजण आपल्या घरात साजरा करतो; परंतु या वेळेस नागरिक, महिला, बालगोपाल, व्यापारी आणि सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन रेल्वे स्टेशन परिसरातच आनंदोत्सव साजरा केला. विषमतेचा अंधार दूर करून एकतेचा प्रकाश जागविण्याच्या हेतूने शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीने हा अभिनव उपक्रम हाती घेतला.अचलपूर रेल्वे स्टेशनवर दुपारी चार वाजता स्वच्छता अभियानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती, माहेर फाउंडेशन, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, जमात-ए-इस्लामिक महिला संघटन, मानव सेवा समिती, व्य...
१० रुपयांत दिवाळीचा फराळ!
News

१० रुपयांत दिवाळीचा फराळ!

१० रुपयांत दिवाळीचा फराळ!अंबरनाथ : दिवाळीचा सण लोकांसाठी आनंद आणि गोडी घेऊन येतो. मात्र महागाईमुळे फराळाचे साहित्य अनेक कुटुंबांसाठी परवडणं कठीण झालं आहे. अशा पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये शिवसेनेने एक आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबवला आहे — फक्त १० रुपयांत दिवाळी फराळाचे साहित्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले.या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ५ ते ६ हजार कुटुंबांची दिवाळी गोड झाली आहे. फराळ साहित्यामध्ये चिवडा, शेव, लाडू, करंजी यांसारखी पारंपारिक दिवाळीची गोडीची वस्त्रे होती.हा उपक्रम माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत “सणाच्या आनंदात गोडी आणणारा” असं शिवसेनेच्या प्रयत्नाचं वर्णन केलं.स्थानिक नागरिकांनी सांगितलं की, “आजच्या काळात फक्त १० ...