Sunday, February 15

Article

Article

विनावेतन शिक्षकांची दैनावस्था

*५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त विशेष लेख*   ---------------------------------------------------   *विनावेतन शिक्षकासाठी नियमित वेतनाची तरतूद करता येत नसेल तर या शिक्षक दिनी सर्व विनावेतन शिक्षकांना शासन मान्य "वेठबिगारी"चे प्रमाणपत्र देऊन गौरव करावा अशी आर्त हाक या विनावेतन शिक्षकांची आहे !*   ---------------------------------------------------   व्यक्तिगत तसेच देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षणाचे अत्यंत मोलाचे असे स्थान आहे.देशासाठी आवश्यक तसेच योग्य आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्याची सोबतच संस्कारक्षम भावी पिढी घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकाच्या खांद्यावर आहे. शिक्षकही असे आवाहन तितक्याच जबाबदारीने पेलतो. परंतु शासनाची शिक्षकाप्रति उदासीन नीती तसेच सोईस्कर आणि तकलाटू धोरणाने समाजातील एका जबाबदार घटकाला अर्थात शिक्षकालाच पंगू बनविले.वेठबिगारीचे जिने त्याच्या माथी मारलेत.समाजबांधणी ...
Article

मीच आहे विकसित भारताचा शिल्पकार……शिक्षक

तारी तो अज्ञान सागरातूनीशिकवी परंपरा आणि रूढी विद्यावान,  कलागुण संपन्न जो घडवितो राष्ट्राची पिढी......   इतिहास ग्वाही देतो विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अनामिक नात्याची, गुरु द्रोणाचार्य पासून ते साने गुरुजी पर्यंत ,आजतागायत शिक्षक या शब्दाला विशेष असे महत्त्व आहे.... शिक्षक म्हणजे सर्वगुणसंपन्न, कला पारंगत, सुस्वभावी व नीतिमत्ता जपणारा असा व्यक्ती डोळ्यासमोर उभा राहतो... मास्तर ,गुरुवर्य, गुरु, शिक्षक, अशा विविध उपाध्या उराशी बाळगून ज्ञानार्जन करणारा या व्यक्तीला समाजशील असे कार्य दिले आहे, त्यानुसार त्याला ते मानाचे स्थान प्राप्त झाले. कालानूपरत्वे त्याच्यामध्ये आधुनिकता आली असेल, बदलत्या जीवनशैलीने औद्योगीकरणाने  त्याला बदलवले असेलही, पण शिक्षकाची नीतिमत्ता व निष्ठा अजूनही कायम आहे. भारतातील शिक्षण प्रणालीचा विचार करता शिक्षक  शिस्तप्रिय ,नियोजन बद्ध , शीलवान असा असावा.. पूर्वी गुरु...
Article

डेल्टा प्लस

कोविड दुसरी लाट संपलेली आहे असे मानायला आता हरकत नाही. रुग्णसंख्या कमी झालेली आहे. गंभीर रुग्ण येण्याचे तसेच सारीचे रुग्ण सुद्धा कमी झाले आहेत. याचा अर्थ कोरोना संपला असा नाही. आणि तो एवढ्या लवकर संपेल असेही नाही. त्याचे जागतिक स्वरूप संपेल परंतु तुरळक ठिकाणी तो त्याचे अस्तित्व कायम ठेवेल हे नक्की. सार्स किंवा मर्स या आजाराच्या साथीची लाट यापूर्वी येऊन गेली परंतु आताही या आजारांचे रुग्ण निघत आहेत. याचाच अर्थ या आजाराचे विषाणू वातावरणात असून ते मनुष्याला संसर्गित करत आहेत. असाच प्रकार कोरोनाच्या बाबतीत राहील असे शास्त्रज्ञाचे मत आहे. आणि त्यामुळे या सर्व विषाणूच्या सहवासात मानवजातीला राहायचं आहे. हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज विषाणूच्या बदलाच्या संदर्भात आपल्याला म्युटेशन, स्त्रेन आणि व्हेरीएंट या तीन शब्दांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. म्युटेशन हा विषाणूचा एक गुणधर्म आहे. विषाणू स्वतःपासून ...
Article

‘ओसीडी’वर मात करताना

ओसीडी अर्थात ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर या मानसिक आजाराविषयी काही जाणून ‘ओसीडी’चा विकार असलेली व्यक्ती अनावर व अवास्तव विचारांनी सतत त्रस्त असते. - डॉ. मकरंद ठोंबरे ओसीडी अर्थात ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर या मानसिक आजाराविषयी काही जाणून ‘ओसीडी’चा विकार असलेली व्यक्ती अनावर व अवास्तव विचारांनी सतत त्रस्त असते. त्याचबरोबर मन व्यापून टाकणाऱ्या निरनिराळ्या कल्पना व त्यासाठी करावीशी वाटणारी अनिवार्य कृती, हे प्रामुख्याने ‘ओसीडी’ या आजाराचे मुख्य स्वरूप असते. ‘ओसीडी’ या मनोविकाराची कारणमीमांसा करताना हा विकार बऱ्याचदा अनुवांशिक असल्याचे आढळून आले आहे. अनुवंशिकतेबरोबरच लहानपणी घरात असलेली अतिरिक्त शिस्त, धाक, पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अतिरिक्त दबाव, लहानपणापासून पडलेली अतिरिक्त कौटुंबिक जबाबदारी, लहानपणापासून मनावर झालेले आघात, आलेले कटू अनुभव आणि या सर्व कारणांमुळे आयुष्यात यशस्व...
Article

स्मशानातील सोनं – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरत आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबड धोबड दिसत होते. त्या आक्राळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता.वारा मंद वाहत होता. त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला नि त्या घरात मानसं राहात होती. बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर च्या धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता. पोर खेळत होती. एका प्रचंड चिंचेखा...
Article

अण्णाभाऊ साठे; एक थोर व्यक्तीमत्व

अण्णाभाऊ साठे हे एक अलौकिक व्यक्तीमत्वाचे धनी होते. ते कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावीत झाले होते. त्यांनी लालबावटा कलापथक स्थापन केलं होतं.अण्णाभाऊ साठेचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होतं. त्यांचा जन्म १ आगष्ट १९२० रोजी झाला होता. त्यांचा जन्म सांगलीचा. ते समाजसुधारक, लोककवी व लेखकही होते. त्यांनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी आजही जगतात गाजत आहे.अण्णा हे आंबेडकरवादी व मार्क्सवादी विचारसरणीचे होते. सुरुवातीला त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव पडला व नंतर ते आंबेडकरवादी झाले. ते शिक्षण शिकले नाही. अर्थात कोणत्याच शाळेत गेले नाही. तरीही ते शाहिर, कादंबरीकार व कथाकार म्हणून ओळखले जातात.त्यांच्या आईचे नाव वालबाई होतं. तर पत्नीचे नाव जयवंता. त्यांच्या पत्नीला कोंडाबाई देखील म्हणत असत.अण्णा हे मातंग समाजाचे असून त्या काळी होत असलेल्या भेदभावाचे चटके ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांना बसले. तसेच ते अण...
Article

प्लास्टिक आणि पॉलिमर… भविष्यातील नवीनतम संधी

विसाव्या शतकाच्या सुरवातीला रसायन शास्त्रामध्ये झालेल्या पाच प्रमुख शोधांमधील पदार्थ म्हणजे प्लास्टिक (काळ 1909 ते 1972). त्या काळचे इतर प्रमुख शोध म्हणजे 'अमोनिया' ची निर्मिती, पेनिसिलीन, गर्भनिरोधक गोळ्या आणि लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (LCD). रसायन शास्त्रामध्ये झालेल्या या पाच प्रमुख शोधामुळे आपण आधुनिक जगाची कल्पना करू शकलो.मुळात प्लास्टिक हे पॉलिमर पासून बनविले जाते. पॉलिमरवर यांत्रिक प्रक्रिया (moulding) करून जे उत्पादन बनविले जाते त्याला 'प्लास्टिक' म्हणतात. पॉलिमर हे असंख्य अश्या कार्बन आणि हायड्रोजन रेणू पासून बनलेले असतात. कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) शुद्धीकरण प्रक्रियेत जे घटक बाहेर पडतात त्यापासून पॉलिमर बनविले जाते. प्लास्टिक हे अल्पावधीतच सर्व क्षेत्रांमध्ये वापरले जाऊ लागले. कारण की त्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे. प्लास्टिक हे हलके, टिकाऊ, मजबूत, विद्युतरोधक आणि पुनर्वापर य...
Article

मनाला स्पर्शून जाणारी कविवर्य स्व. दादासाहेब काळमेघ यांची काव्यसंपदा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे लोकप्रिय अध्यक्ष स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या दि. 29/07/2021 ला असलेल्या 24 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचे त्यांच्याच कवितेतून काव्यमय दर्शन घडविणारा ”मनाला स्पर्शून जाणारी कविवर्य स्व. दादासाहेब काळमेघ यांची "काव्यसंपदा” हा प्रा. अरुण बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.- संपादकराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे शैक्षणिक व सामाजिक विचार आचरणात आणणारे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे लोकप्रिय अध्यक्ष, विद्वत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी करणारे लोकमहर्षी, राष्ट्रसंताचे व संत गाडगेबाबांचे तत्त्वज्ञान-विचारसारणी आंमलात आणणारे कीर्तनकार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात डोळसपण...
Article

समाजसुधारक फातिमा शेख

“फातिमा शेख या आधुनिक भारताच्या समाज सुधारक होत्या” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या. त्यांनी सावित्रीबाई बरोबर शिक्षण घेतले होते. त्यांनी पुणे येथे अध्यापकीय शिक्षण घेतले होते.त्यामुळे त्या भारतातील मुस्लीम समाज्याच्या पहिल्या शिक्षिका म्हणून अग्रेसर होत्या. महात्मा जोतीराव फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या भिडे वाडा येथे मुलीसाठी पहिली शाळा सुरु केली त्या शाळेत फातिमा शेख सावित्रीमाई फुले बरोबर शिकविण्याचे कार्य करीत होत्या त्या शाळेत प्रवेश घेतलेल्या ६ मुली होत्या काही लोकांच्या मते फातिमा शेख या त्या पैकी एक होत्या, असा समज आहे असे नसून महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या बरोबरीने काम करणारी धाडसी महिला होती यासाठी फातिमा शेख यांचा भाऊ उस्मान शेख यांनीही सहकार्य केले आहे. खरे तर इंग्रज सरकारच्या काळात आणि सनातनी जातीयवादी ब्राह्मण यांच्या विरो...
Article

जिद्द व परिश्रमाचे दुसरे नाव उत्तम सोनकांबळे

उभ्या आयुष्याला संघर्षमय खाचखळगे लाभले असतांना अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीतून परिश्रमाच्या जोरावर उत्तम कांबळे ह्यांनी राज्यसेवा परिक्षेत यश मिळविले. आता ते औरंगाबादला सहसंचालक (कोषागार विभाग) पदावर कार्यरत आहेत. आयुष्याला उजेडवाट मिळाली आहे. मात्र ह्या वाटेवर पोहोचण्यासाठी त्यांनी केलेला प्रवास कुणालाही चकित करुण टाकणारा 'आश्वासक' असाच आहे. जाणून घेऊ या त्यांच्या प्रवासाविषयी ...दोन वेळच्या भाकरीच्या शोधात त्यांच्या वडीलांनी मुखेड तालुक्यातील शिकारा हे गांव गाठलं. शिकारा गावची त्यावेळेची वस्ती फारतर एक हजार लोकांची. गावात घर नव्हतं, शेती नव्हती, उत्पन्नाचं साधन नव्हतं. तरीही मुलांना त्यांनी शाळेत घातलं. खेड्यापाड्यातील आंबे, पपई, फळे, भाजीपाला ठोकभावाने विकत घ्यायचा व गावापासून ८, १० किलोमिटर अंतरावर मुखेडला नेवुन, बाजारात दिवसभर विकायचा. अंधार पडण्याच्या आत ज्वारी-बाजरी विकतघ्यायची ती ति...