Sunday, February 15

Article

बौद्ध संस्कृती आणि संस्कार
Article

बौद्ध संस्कृती आणि संस्कार

बौद्ध संस्कृती आणि संस्कार बौद्ध धर्म उदयास आल्या पासून बौद्ध संस्कृतीचे संस्कार उदयास आले. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत सतत पायी फिरून बुद्धांनी त्यांच्या धम्माचा प्रचार प्रसार केला. बुद्धाच्या जीवन काळामध्ये धम्म वेगाने वाढून पुढे राजाश्रय मिळाल्यामुळे अधिक भरभराटीस आला. अनेक राज्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्यामुळे प्रजाही बौद्ध बनली होती. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ही अनेक राजाद्वारे बुद्धाच्या अस्थींच्या रूपाने स्तुपांची निर्मिती करण्यात आली. बुद्धाची प्रतिमा तयार करण्यात आली. श्रद्धा भाव व्यक्त करण्यासाठी पालि गाथांची निर्मिती करण्यात आली. बुद्धांचा उपदेश ताडपत्र्यावर, झाडांच्या सालीवर, पुढे पाषाणावर कोरण्यात आलेले होता व त्यानुसार बुद्धाचे अनुयायी आचरण करीत असे. सम्राट अशोकाच्या काळात तर बुद्ध धर्माला फारच भरभराटीचे दिवस आले होते. बुद्धाच्या अस्तिवर चौर्‍याऐंशी हजार स्तूप निर्माण करून...
Article

‘घालीन लोटांगण’ या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ?

घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ? कोणतीही आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे. वैशिष्ट्ये : १. प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत. २. ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत. ३. पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. ४. बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते. ५. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. ६. वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे ...
Article

धम्मचक्र प्रवर्तन व आम्ही !

तथागत भगवान बुद्धाद्वारे दिलेले प्रथम प्रवचन हे पाली साहित्यामध्ये 'धम्मचक्कपवत्तन सुत्त' या नावाने आम्ही पाहतो. हा उपदेश भगवान बुद्धाने प्रथमत: पंचवर्गीय भिक्खुंना दिला. 'धम्म' शब्दाचा अर्थ सत्य, सदाचरण, शिलाचरण असा होतो. मुळात मानव शांतताप्रिय आहे हे बुद्ध जाणून होते. त्यांनी पंचवर्गीय भिंक्खूना प्रथमत: वार्तालाभ करुन काही प्रश्न विचारले की, शुद्ध आचरण करणे, मानवास मानवता प्राप्त करण्यास आवश्यक नाही का? शुद्ध व्यवहाराकरिता शुद्धचित्त होणे गरजेचे नाही का? त्याकरिता पंचशिल हे काया, वाचा, मनाने पाळणे आवश्यक नाही का? यावर पंचवर्गीय भिक्खूंचे उत्तर होकारार्थी आल्यावर त्यांनी त्यांना विशुद्धी मार्गावर प्रवचन दिले. विशुद्धी मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक होय. जो शील, समाधी, प्रज्ञामध्ये विभक्त आहे. 'शील' या संकल्पनेला बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये उच्च व महत्वाचे स्थान दिले आहे. व्यक्तीचे व्यक्तीमत्...
Article

धम्म म्हणजे माणुसकीची महाऊर्जा

"मानवता के इतिहास मे राष्ट्रीयता एक बहुत बडी शक्ती रही है।यह एकत्व की भावना है ,। किसी वर्ग- विशेष के संबंधित होना नही ।"- डॉ.बाबासाहेब आंबेडकरमानवाला नव्या प्रगतीपथावर जाण्यासाठी फक्त अर्थार्जनाची आवश्यकता नाही तर त्याला माणुसकीच्या ऊर्जेची गरज आहे. ही माणुसकीची महाऊर्जा म्हणजे धम्म होय. धम्म हा जगातील सर्व मानवांना समानतेने वागवणारा महाऊर्जावान स्तोत्र आहे. जगातील अनेक धर्मात रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, देवभोळेपणा यांची सांगड झालेली दिसते . पण बुद्ध धम्मामध्ये प्रतित्यसमुत्पाद या विज्ञानवादी दृष्टिकोनातून मानवी जीवनाकडे पाहाले गेले आहे.प्रत्येक माणसाला स्वातंत्र असले पाहिजे. तो जसा शरीराने स्वतंत्र असतो तसाच तो मनाने स्वतंत्र असला पाहिजे. स्व:हित कल्याणा बरोबर, प्राणिमात्रांच्या कल्याणाची स्वप्ने त्यांना पडली पाहिजेत. माणसातील भेदाभेद ,विषमता, गुलामी ,अन्याय,अत्याचार,शोषण विटंबना या पा...
Article

गारुडी…!

जमुरे ताली बजा.. वाह वाह जमुरे इस जूनीबस्ती को नमस्कार करके ताली बजा... ताली बजा.. वो सब के नाम से जो ये गारूडी का खेल देखने थोडा रूक गया ताली बजा उनके नाम से जो ये सामने आके बैठ गया ताली बजा उनके नाम से जो बच्चे ईस्कूल मे जाते जाते इदर रूक गये ताली बजा ये बावाजी के नाम से जो ईसटेशन जाते जाते सामने आके बैठ गया.. ... ... गेम पायाची असंन तं येथी ठीकठाक बसा लागंन. ...ओ पोट्ट्या ठीक बस नं बे .आयकू नाई येत का ?काऊन थ्या पोथळीत वाकू वाकू पाऊन रायला तं ? काळू काय भोरांग्या? मंग पयशीन नं बाबू ? चूपच्याप बस नं.अन गम्मत पाय. .. तो, जमूरे ताली बजा ताली बजा सबके नाम डुगू डुगू डुगू डुगू.. डुगू डुगू... जमूरे अब हम खेल दिखाएगा...सब को दिखाएगा ? दिखाएगा.. डुगू डुगू डुगू डुगू....ढुगू ढुगू ढुगू....ढुगू ?? ढुगू ढुगू...? डमरू क्यूं नई बज रहा बराबर आज ? डुगू डुगू ..ढुगू ढुगू.. पायवं पोट्टे त्या डमरू ले काय झाल...
Article

धम्ममार्गाने जाऊया …!

आज काही बौद्धवस्तीत डोकावून पाहिले की, सद्धम्माचे पालन नाही. विहारात जाण्यासाठी कुणाजवळ वेळ नाही. महिलांना टीव्ही सिरीयल पासून फुरसत नाही. बौद्ध संस्कृती अर्थात भारतीय शालीन संस्कृती आपल्या पायाखाली तुडवित फॅशनेबल युगाने झपाटलेल्या तरुणी ज्येष्ठांचा मान राखीत नाहीत.क्रिकेट, मोबाईल, इंटरनेट आणि टीव्हीपासून कोणता तरुण अलिप्त असेल, असे वाटत नाही. लहान मुलांवर धम्माचे संस्कार नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची, अभ्यासाची आवड दिसत नाही. दारुवाल्यापासून त्रस्त नसेल असे गाव शोधूनही सापडणार नाही. नशेच्या आहारी जात असलेल्या तरुणाईला कोणी आवरायला मागत नाही. कोणी कोणाचा गुरू नाही, कोणाचा चेला नाही.वस्तीवर अंकुश ठेवणारे नेतृत्व दृष्टीस पडत नाही. परिणामी गावात एकीकरण नाही. बाप-लेकात मेळ नाही. भावा-भावात पटत नाही. माय-लेकीत बनत नाही, सून-सासचे ऐकत नाही, सासूही आपल्या वजनाने राहत नाही. पती-पत्नीत समन्वय न...
Article

गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!

भारतीय संस्कृती मध्ये सण उत्सवाला खूप महत्व आहे. मराठी वर्षामध्ये सण उत्सव उत्साहात साजरे केले जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांनी एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, बिकट परिस्थितीत एकमेकांना मदत करावी, आपुलकी निर्माण व्हावी, कामाच्या व्यापातून थोडाफार विरंगुळा मिळावा, भजन पुजनाने मनातील कर्मठ विचार दूर व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा चालू केली..पूर्वी एक गाव एक गणपती अशी संकल्पना होती. त्यामुळे या उत्सवाबद्दल लोकांच्या मनात खूप उत्सुकता असायची.. सर्व गाव एकत्र येवून गणपती उत्सव साजरा करायचे. गणपती सजावट प्रसाद, हार, तोरण या सर्व गोष्टी एकत्र येऊन करायचे. आरती, भजन, कीर्तन सर्व गाव एकत्र येऊन ऐकायला बसायचे. त्याच निमित्याने आपुलकी, जिव्हाळा वाढायचा दुसरे कुठले विरंगुळ्याचे साधन नसल्याने विचार विनिमय होऊन सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या अशा गोष्टी एकत...
Article

तत्वनिष्ठ धम्मानुयायी : नारायणराव मुंद्रे

नारायणराव मुंद्रे यांचे जाणे दुःखद आहे. एक आदर्श शिक्षक , संस्कारी पिता आणि धम्मानुयायी अशी आपली ओळख आपल्या सादगीने त्यांनी समृद्ध केली. मीतभाषी कोणाच्याही अस्तित्वाचा स्वीकार करणे . ऐकून घेण्याची क्षमता फार थोड्या शिक्षकांना लाभते. आपले मुले आपण मोठ्या पदावर नेऊन पोहचवली याची दर्पोक्ती त्यांच्या स्वभावाला शिवली नाही. शुभ्र सदराआणि धोतर अशी निटनेटकी वेशभूषा. अनाग्रही व संतुष्ट व्यक्तीमत्व त्यांनी कमावले होते.  रविंद्र मुंद्रे यांची जडणघडण ज्या मुसीतून झाली तो पारदर्शीपणा स्पष्टपणा हे गुण त्यांच्या वडिलांचा वारसा आहे. मातीशी नाते जपून जगणे हे मातीच्या माणसाला मुश्किल होत चालले. तो संवाद आणि सौहार्द कसा टिकवून ठेवावा? हा कळीचा प्रश्न आहे. अशाही काळात व्यापक समाजहितास जाणीवेच्या केंद्रस्थानी ठेवणे भल्या भल्यांना जमत नाही.पण ही जाणीव आपल्या अवघ्या कुटुंबातील व्यक्तीच्या ठायी उतरवणे सोपे नसते...
Article

प्रगल्भ वैचारिक बैठकीची ‘अस्वस्थतेची डायरी’

डॉ.प्रतिभा जाधव या लेखिकेचे नाव महाराष्ट्राला एव्हाना चांगलेच परिचित झालेले आहे. नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावसारख्या ग्रामीण भागात वरिष्ठ महाविद्यालयात त्या प्राध्यापिका आहेत. नोकरीच्या निमित्ताने त्या छोट्याशा खेड्यात सध्या वास्तव्यास असल्या तरी त्यांची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर आहे॰ कविसंमेलने, एकपात्री प्रयोग, बोधपर व्याख्याने, साहित्य संमेलने, वृत्तपत्र स्तंभलेखन अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.पुणे येथील संवेदना प्रकाशनाने त्यांच्या दैनिक सकाळमध्ये प्रकाशित लेखांचा एकत्रित संग्रह ‘अस्वस्थतेची डायरी’ या नावाने प्रकाशित केला आहे. ‘अस्वस्थतेची डायरी’ च्या रूपात डॉ.प्रतिभा जाधव यांच्या वाचक वर्गाला एक अतिशय उच्च दर्जाचे वाचन मूल्य असणारे पुस्तक हाती दिले आहे असे मी म्हणेन. आजकाल अनेक पुस्तके अक्षरश: मिनिटात चाळून दूर ठेवली जातात; कारण वरवर चाळले तरी पुस्तकाचा अंदा...
Article

पोळा आणि पाऊस..!

ते रामपूर नावाचं गाव. त्या गावात महादेव नावाचा एक शेतकरी राहात होता. तो आपली पत्नी शिला व दोन लहान मुलासमवेत खुश होता. अगदी गुण्यागोविंदानं तो मुलांच्या व आपल्या पत्नीच्या इच्छा पुरवीत असे.            गाव तसं पाहिल्यास जंगलात होतं. सह्यांद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेलं ते गाव. सह्यांद्रीला वारे अडून दरवर्षी पाऊस यायचा. तो मोजता यायचा नाही. त्यातच दरड कोसळणे व ओढ्याला पूर येणे. त्यातच त्या ओढ्यातून माणसं वाहून जाणे  इत्यादी घटना नेहमी होत असायच्या.            आज पाऊस सुरु होता. पावसाची संततधार पाहून शिलाला विचार येत होता. दोन्ही मुलं तिच्या भोवताल तिला चिपकून बसली होती. त्यातच तिला काय करावं सुचत नव्हतं.           आज पोळ्याचा सण होता. सर्व गावातील मंडळी आनंदात होती. ते पोळ्याचा सण साजरा करीत ह...