Monday, December 1

Article

Article

धम्मचक्र प्रवर्तन व आम्ही !

तथागत भगवान बुद्धाद्वारे दिलेले प्रथम प्रवचन हे पाली साहित्यामध्ये 'धम्मचक्कपवत्तन सुत्त' या नावाने आम्ही पाहतो. हा उपदेश भगवान बुद्धाने प्रथमत: पंचवर्गीय भिक्खुंना दिला. 'धम्म' शब्दाचा अर्थ सत्य, सदाचरण, शिलाचरण असा होतो. मुळात मानव शांतताप्रिय आहे हे बुद्ध जाणून होते. त्यांनी पंचवर्गीय भिंक्खूना प्रथमत: वार्तालाभ करुन काही प्रश्न विचारले की, शुद्ध आचरण करणे, मानवास मानवता प्राप्त करण्यास आवश्यक नाही का? शुद्ध व्यवहाराकरिता शुद्धचित्त होणे गरजेचे नाही का? त्याकरिता पंचशिल हे काया, वाचा, मनाने पाळणे आवश्यक नाही का? यावर पंचवर्गीय भिक्खूंचे उत्तर होकारार्थी आल्यावर त्यांनी त्यांना विशुद्धी मार्गावर प्रवचन दिले. विशुद्धी मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक होय. जो शील, समाधी, प्रज्ञामध्ये विभक्त आहे. 'शील' या संकल्पनेला बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये उच्च व महत्वाचे स्थान दिले आहे. व्यक्तीचे व्यक्तीमत्...
Article

धम्म म्हणजे माणुसकीची महाऊर्जा

"मानवता के इतिहास मे राष्ट्रीयता एक बहुत बडी शक्ती रही है।यह एकत्व की भावना है ,। किसी वर्ग- विशेष के संबंधित होना नही ।"- डॉ.बाबासाहेब आंबेडकरमानवाला नव्या प्रगतीपथावर जाण्यासाठी फक्त अर्थार्जनाची आवश्यकता नाही तर त्याला माणुसकीच्या ऊर्जेची गरज आहे. ही माणुसकीची महाऊर्जा म्हणजे धम्म होय. धम्म हा जगातील सर्व मानवांना समानतेने वागवणारा महाऊर्जावान स्तोत्र आहे. जगातील अनेक धर्मात रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, देवभोळेपणा यांची सांगड झालेली दिसते . पण बुद्ध धम्मामध्ये प्रतित्यसमुत्पाद या विज्ञानवादी दृष्टिकोनातून मानवी जीवनाकडे पाहाले गेले आहे.प्रत्येक माणसाला स्वातंत्र असले पाहिजे. तो जसा शरीराने स्वतंत्र असतो तसाच तो मनाने स्वतंत्र असला पाहिजे. स्व:हित कल्याणा बरोबर, प्राणिमात्रांच्या कल्याणाची स्वप्ने त्यांना पडली पाहिजेत. माणसातील भेदाभेद ,विषमता, गुलामी ,अन्याय,अत्याचार,शोषण विटंबना या पा...
Article

गारुडी…!

जमुरे ताली बजा.. वाह वाह जमुरे इस जूनीबस्ती को नमस्कार करके ताली बजा... ताली बजा.. वो सब के नाम से जो ये गारूडी का खेल देखने थोडा रूक गया ताली बजा उनके नाम से जो ये सामने आके बैठ गया ताली बजा उनके नाम से जो बच्चे ईस्कूल मे जाते जाते इदर रूक गये ताली बजा ये बावाजी के नाम से जो ईसटेशन जाते जाते सामने आके बैठ गया.. ... ... गेम पायाची असंन तं येथी ठीकठाक बसा लागंन. ...ओ पोट्ट्या ठीक बस नं बे .आयकू नाई येत का ?काऊन थ्या पोथळीत वाकू वाकू पाऊन रायला तं ? काळू काय भोरांग्या? मंग पयशीन नं बाबू ? चूपच्याप बस नं.अन गम्मत पाय. .. तो, जमूरे ताली बजा ताली बजा सबके नाम डुगू डुगू डुगू डुगू.. डुगू डुगू... जमूरे अब हम खेल दिखाएगा...सब को दिखाएगा ? दिखाएगा.. डुगू डुगू डुगू डुगू....ढुगू ढुगू ढुगू....ढुगू ?? ढुगू ढुगू...? डमरू क्यूं नई बज रहा बराबर आज ? डुगू डुगू ..ढुगू ढुगू.. पायवं पोट्टे त्या डमरू ले काय झाल...
Article

धम्ममार्गाने जाऊया …!

आज काही बौद्धवस्तीत डोकावून पाहिले की, सद्धम्माचे पालन नाही. विहारात जाण्यासाठी कुणाजवळ वेळ नाही. महिलांना टीव्ही सिरीयल पासून फुरसत नाही. बौद्ध संस्कृती अर्थात भारतीय शालीन संस्कृती आपल्या पायाखाली तुडवित फॅशनेबल युगाने झपाटलेल्या तरुणी ज्येष्ठांचा मान राखीत नाहीत.क्रिकेट, मोबाईल, इंटरनेट आणि टीव्हीपासून कोणता तरुण अलिप्त असेल, असे वाटत नाही. लहान मुलांवर धम्माचे संस्कार नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची, अभ्यासाची आवड दिसत नाही. दारुवाल्यापासून त्रस्त नसेल असे गाव शोधूनही सापडणार नाही. नशेच्या आहारी जात असलेल्या तरुणाईला कोणी आवरायला मागत नाही. कोणी कोणाचा गुरू नाही, कोणाचा चेला नाही.वस्तीवर अंकुश ठेवणारे नेतृत्व दृष्टीस पडत नाही. परिणामी गावात एकीकरण नाही. बाप-लेकात मेळ नाही. भावा-भावात पटत नाही. माय-लेकीत बनत नाही, सून-सासचे ऐकत नाही, सासूही आपल्या वजनाने राहत नाही. पती-पत्नीत समन्वय न...
Article

गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!

भारतीय संस्कृती मध्ये सण उत्सवाला खूप महत्व आहे. मराठी वर्षामध्ये सण उत्सव उत्साहात साजरे केले जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांनी एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, बिकट परिस्थितीत एकमेकांना मदत करावी, आपुलकी निर्माण व्हावी, कामाच्या व्यापातून थोडाफार विरंगुळा मिळावा, भजन पुजनाने मनातील कर्मठ विचार दूर व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा चालू केली..पूर्वी एक गाव एक गणपती अशी संकल्पना होती. त्यामुळे या उत्सवाबद्दल लोकांच्या मनात खूप उत्सुकता असायची.. सर्व गाव एकत्र येवून गणपती उत्सव साजरा करायचे. गणपती सजावट प्रसाद, हार, तोरण या सर्व गोष्टी एकत्र येऊन करायचे. आरती, भजन, कीर्तन सर्व गाव एकत्र येऊन ऐकायला बसायचे. त्याच निमित्याने आपुलकी, जिव्हाळा वाढायचा दुसरे कुठले विरंगुळ्याचे साधन नसल्याने विचार विनिमय होऊन सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या अशा गोष्टी एकत...
Article

तत्वनिष्ठ धम्मानुयायी : नारायणराव मुंद्रे

नारायणराव मुंद्रे यांचे जाणे दुःखद आहे. एक आदर्श शिक्षक , संस्कारी पिता आणि धम्मानुयायी अशी आपली ओळख आपल्या सादगीने त्यांनी समृद्ध केली. मीतभाषी कोणाच्याही अस्तित्वाचा स्वीकार करणे . ऐकून घेण्याची क्षमता फार थोड्या शिक्षकांना लाभते. आपले मुले आपण मोठ्या पदावर नेऊन पोहचवली याची दर्पोक्ती त्यांच्या स्वभावाला शिवली नाही. शुभ्र सदराआणि धोतर अशी निटनेटकी वेशभूषा. अनाग्रही व संतुष्ट व्यक्तीमत्व त्यांनी कमावले होते.  रविंद्र मुंद्रे यांची जडणघडण ज्या मुसीतून झाली तो पारदर्शीपणा स्पष्टपणा हे गुण त्यांच्या वडिलांचा वारसा आहे. मातीशी नाते जपून जगणे हे मातीच्या माणसाला मुश्किल होत चालले. तो संवाद आणि सौहार्द कसा टिकवून ठेवावा? हा कळीचा प्रश्न आहे. अशाही काळात व्यापक समाजहितास जाणीवेच्या केंद्रस्थानी ठेवणे भल्या भल्यांना जमत नाही.पण ही जाणीव आपल्या अवघ्या कुटुंबातील व्यक्तीच्या ठायी उतरवणे सोपे नसते...
Article

प्रगल्भ वैचारिक बैठकीची ‘अस्वस्थतेची डायरी’

डॉ.प्रतिभा जाधव या लेखिकेचे नाव महाराष्ट्राला एव्हाना चांगलेच परिचित झालेले आहे. नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावसारख्या ग्रामीण भागात वरिष्ठ महाविद्यालयात त्या प्राध्यापिका आहेत. नोकरीच्या निमित्ताने त्या छोट्याशा खेड्यात सध्या वास्तव्यास असल्या तरी त्यांची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर आहे॰ कविसंमेलने, एकपात्री प्रयोग, बोधपर व्याख्याने, साहित्य संमेलने, वृत्तपत्र स्तंभलेखन अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.पुणे येथील संवेदना प्रकाशनाने त्यांच्या दैनिक सकाळमध्ये प्रकाशित लेखांचा एकत्रित संग्रह ‘अस्वस्थतेची डायरी’ या नावाने प्रकाशित केला आहे. ‘अस्वस्थतेची डायरी’ च्या रूपात डॉ.प्रतिभा जाधव यांच्या वाचक वर्गाला एक अतिशय उच्च दर्जाचे वाचन मूल्य असणारे पुस्तक हाती दिले आहे असे मी म्हणेन. आजकाल अनेक पुस्तके अक्षरश: मिनिटात चाळून दूर ठेवली जातात; कारण वरवर चाळले तरी पुस्तकाचा अंदा...
Article

पोळा आणि पाऊस..!

ते रामपूर नावाचं गाव. त्या गावात महादेव नावाचा एक शेतकरी राहात होता. तो आपली पत्नी शिला व दोन लहान मुलासमवेत खुश होता. अगदी गुण्यागोविंदानं तो मुलांच्या व आपल्या पत्नीच्या इच्छा पुरवीत असे.            गाव तसं पाहिल्यास जंगलात होतं. सह्यांद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेलं ते गाव. सह्यांद्रीला वारे अडून दरवर्षी पाऊस यायचा. तो मोजता यायचा नाही. त्यातच दरड कोसळणे व ओढ्याला पूर येणे. त्यातच त्या ओढ्यातून माणसं वाहून जाणे  इत्यादी घटना नेहमी होत असायच्या.            आज पाऊस सुरु होता. पावसाची संततधार पाहून शिलाला विचार येत होता. दोन्ही मुलं तिच्या भोवताल तिला चिपकून बसली होती. त्यातच तिला काय करावं सुचत नव्हतं.           आज पोळ्याचा सण होता. सर्व गावातील मंडळी आनंदात होती. ते पोळ्याचा सण साजरा करीत ह...
Article

विनावेतन शिक्षकांची दैनावस्था

*५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त विशेष लेख*   ---------------------------------------------------   *विनावेतन शिक्षकासाठी नियमित वेतनाची तरतूद करता येत नसेल तर या शिक्षक दिनी सर्व विनावेतन शिक्षकांना शासन मान्य "वेठबिगारी"चे प्रमाणपत्र देऊन गौरव करावा अशी आर्त हाक या विनावेतन शिक्षकांची आहे !*   ---------------------------------------------------   व्यक्तिगत तसेच देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षणाचे अत्यंत मोलाचे असे स्थान आहे.देशासाठी आवश्यक तसेच योग्य आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्याची सोबतच संस्कारक्षम भावी पिढी घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकाच्या खांद्यावर आहे. शिक्षकही असे आवाहन तितक्याच जबाबदारीने पेलतो. परंतु शासनाची शिक्षकाप्रति उदासीन नीती तसेच सोईस्कर आणि तकलाटू धोरणाने समाजातील एका जबाबदार घटकाला अर्थात शिक्षकालाच पंगू बनविले.वेठबिगारीचे जिने त्याच्या माथी मारलेत.समाजबांधणी ...
Article

मीच आहे विकसित भारताचा शिल्पकार……शिक्षक

तारी तो अज्ञान सागरातूनीशिकवी परंपरा आणि रूढी विद्यावान,  कलागुण संपन्न जो घडवितो राष्ट्राची पिढी......   इतिहास ग्वाही देतो विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अनामिक नात्याची, गुरु द्रोणाचार्य पासून ते साने गुरुजी पर्यंत ,आजतागायत शिक्षक या शब्दाला विशेष असे महत्त्व आहे.... शिक्षक म्हणजे सर्वगुणसंपन्न, कला पारंगत, सुस्वभावी व नीतिमत्ता जपणारा असा व्यक्ती डोळ्यासमोर उभा राहतो... मास्तर ,गुरुवर्य, गुरु, शिक्षक, अशा विविध उपाध्या उराशी बाळगून ज्ञानार्जन करणारा या व्यक्तीला समाजशील असे कार्य दिले आहे, त्यानुसार त्याला ते मानाचे स्थान प्राप्त झाले. कालानूपरत्वे त्याच्यामध्ये आधुनिकता आली असेल, बदलत्या जीवनशैलीने औद्योगीकरणाने  त्याला बदलवले असेलही, पण शिक्षकाची नीतिमत्ता व निष्ठा अजूनही कायम आहे. भारतातील शिक्षण प्रणालीचा विचार करता शिक्षक  शिस्तप्रिय ,नियोजन बद्ध , शीलवान असा असावा.. पूर्वी गुरु...