विश्वशांती साठी बुध्द तत्वज्ञानाची गरज
बुध्द पुष्प
मानवतेच्या झाडावर फुललेले हे पुष्प अपरिमित वर्षानंतर एकदाच जन्माला येते पण जेव्हा उमलते तेव्हा या संपूर्ण जगाला प्रज्ञा,आणि करूणेचा मधुर रस देऊन जाते.धम्मचक्र परीवर्तन बुध्दाने केले भुतो न भविष्य असे तत्त्वज्ञान या सृष्टीतील सम्यक ज्ञान जगाला दिले तो दिवस म्हणजे धम्म चक्रपरिवर्तन म्हणून प्रसिद्ध पावला ..माणसाने माणसासोबत माणुसकीने वागावे हाच बुध्द जीवनाचा पाया आहे.जगाला बुध्दाच्या विचाराची अत्यंत गरज आहे.जेवढी गरज माणसाला भाकरीची आहे त्या पेक्षा अधिक माणसाला बुध्दाची गरज आहे..असे डाँ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुध्द म्हणजे सर्वज्ञ ह्याचा अर्थ सृष्टीतील सर्व चराचर गोष्टीचे सम्यक ज्ञान ,जे जगातील सर्व विषयासमधी प्राप्त झालेले ज्ञान असते त्याला सम्यक समंबुध्द असे म्हणतात. बुध्द म्हणजे क्रांतिकारक लढा,अन्यायकारक गोष्टीचा ,अन दुःखाचा मुळापासून शोध घेणे म्हणजे बुध्द होय ऋषिपतनाच्या मृ...
