Monday, December 1

Article

Article

बाबासाहेब एक चळवळ

सहा डिसेंबर १९५६ सकाळी नेहमीप्रमाणं लोकांनी वर्तमानपत्र पाहिलं.त्यात एक बातमी झळकली.अस्पृश्यांचा नेता काळाच्या पडद्याआड.खरं तर चवदार तळ्याचा जेव्हा सत्याग्रह झाला.तेव्हा ज्या ज्या वृत्तपत्रांनी बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या आंदोलनाला विरोध केला.त्या केशरी आणि मराठा या वृतिचपत्रांनीही वृत्ताची दखल घेत आपल्या पहिल्याच पानावर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी झळकवली होती.   डाँ बाबासाहेब एक झंजावातच होते.नव्हे तर एक चळवळ.त्या बाबासाहेबांनी कित्येक आंदोलनं करीत आपल्या अस्पृश्य जातींना त्या विटाळाच्या काळ्या बुरख्यातुन बाहेर काढले होते.दलितांना न्याय मिळवुन दिला होता.त्यापुर्वी कोणी त्या गोष्टींना परंपरा समजत होते तर कोणी त्याच गोष्टीला देवाची लीला......खरंच अस्पृश्यांना त्यांच्या हक्कापासुन वंचित करणे याला देवाची लीला कसे म्हणता येईल?तरीही उच्चवर्णीयांच्या गोटातील काही मंडळी म्हणत होती ...
Article

नक्षत्रपेरणी कवी बा.ह.मगदूम आस्वादक (परीक्षण) मुबारक उमराणी, सांगली

जगण्यातील संवेदनक्षम अनुभवाचा आशय प्रतिभाच्या अन् प्रतिमाच्या द्वारे माणसात गंधाळत चिंतनसुत्रे मांडणारा सशक्त काव्य संग्रह नक्षत्रपेरणी " नक्षत्र पेरणी " हा काव्यसंग्रह नुकतेच वाचनात आला .ह्दयाच्या व मनाच्या कप्यात लपलेल्या वेदना,दाह,निसर्ग, संकटे,दुःखमय यातना,उपासमारी,रोगराई, दुष्काळ, निराशा,सुखद घटना यांच्या बियाणांची ह्दयात अक्षरपेरणी मनाच्या सुपीक जमिनीत करत, शब्दांनी नक्षत्रांच्या रुपाने आपले विचार,भावभावनाने कवितेचा शिवार बहरत व फुलविण्यात दिसून येत आहे. विविध विषयावर कवितेद्वारे साहित्यिक मळा कणसानी बहरलेला असून साहित्याची रास करणारा असा हा सुपीक मनाचा , शब्द पेरणी करणारा कवी म्हणजे बा.ह.मगदूम सर होय. सांगली जिल्ह्यातील धुळगावचा हा अल्पभुधारक कवी अनुभव संपन्न असून मराठी मळ्यात शब्द खळखळा करीत अक्षराची फुलमाळ ज्ञानोबा तुकोबा, बहिणाबाई,छत्रपती शिवराय ,सावळा विठ्ठलाचा वारसा जपत, मराठीच...
Article

थेट किना-यावर….!

-"शेर लिहण्या मी मला बेभान करतो, गझ़लसाठी या जिवाचे रान करतो" "थांबते दारात माझ्या रात्र जेव्हा, चांदणे माझे तिला मी दान करतो", असे म्हणत मा.संदीपजी वाकोडे यांनी, गझ़ल रसिकांना दर्जेदार,विविधांगी,बहारदार असा 'किनारा' गझ़ल संग्रह समर्पित केला.'किनारा'. येण्याची शब्दश: वाट पाहिली. आणि एक दिवस शाळेत असतांना घरुन फोन आला , 'किनारा' घरी पोहचल्याचा. 'किनारा' हातात घेतला , वाटलं जणू गझ़लेच्या प्रशांत सागरास शब्दांचे अर्ध्य देण्यास सज्ज झालाय 'किनारा'.समर्पक आणि न्याय्य असे शिर्षक असलेला,माननीय संदीपजी वाकोडे यांचा गझ़ल संग्रह 'किनारा'सर्वप्रथम 'किनाराकाराचे ' मन:पुर्वक अभिनंदन!   किना-याचे मुखपृष्ठ आकर्षक आणि प्रतिकात्मक आहे.मलपृष्ठावरची 'गझ़लनवाज़ आदरणीय भिमरावजी पांचाळे' ,यांची भरभरून कौतुक करणारी दाद ,किना-याच्या समृध्दीत भर टाकते.अर्पणपत्रिकेत कुटूंबाविषयीची माया,मुर्तिजापूरच्या मातीचा रास्त ...
Article

जयंती: संत्या ते संतोष चा मार्ग

"जयंती" हा अनलॉक नंतर सिनेमागृहात आलेला पहिलाच मराठी चित्रपट. चित्रपटाविषयी फारच उत्सुकता होती. जेवढी उत्सुकता होती त्यापेक्षा खूप जास्त या चित्रपटाने विचार दिला. हा चित्रपट बघतांना सुमार चित्रपट आहे असे अजिबात वाटले नाही. अतिशय दर्जेदार चित्रपट. सर्वांगाने दर्जेदार. या पूर्वी फँड्री, सैराट हे चित्रपट आलेत मात्र ते वेगळ्या धर्तीवर आधारित होते. हा चित्रपट कोणत्याही एक महामानवर आधारित नाही तर समस्त महापुरुषांवर आहे. सर्व महापुरुषांची जयंती अगदी थाटामाटात साजरी केली जाते. मात्र त्यांचे विचार काय, कार्य काय हे जाणून न घेता. जयंती भावनिक होऊन, डोक्यावर घेऊन साजरी करण्यापेक्षा डोक्यात घेऊन साजरी करावी असा मोलाचा संदेश या चित्रपटातून दिला आहे. त्यांचे विचार आचरणात आणून त्यांची जयंती साजरी करावी. कित्येक लोक दारू पिऊन डीजे वाजवून जयंती साजरी करतात. अनेक ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमात डीजे नाही म्हणू...
Article

थंडीतली स्टाईल

आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. साहजिक ऊबदार कपड्यांची तयारी सुरू करावी लागेल. सर्वसाधारणपणे थंडीत स्वेटर, ज्ॉकेट कॅरी केले जातात. प्रसंगी शालीला पसंती असते. पण प्रत्येक वेळी शाल गुंडाळणं, स्वेटर घालणं शक्य नसतं. वेगळं ट्राय करायचं तर पोंचोचा पर्याय आहे. हा कॅज्युअल, पार्टी वेअर म्हणून कॅरी करू शकता.'टी शर्ट, स्वेट शर्टवर केप स्टाईल पोंचो घालता येईल. गाऊ न किंवा लाँग स्कर्टवर हा प्रकार शोभून दिसेल. फ्लोरल, प्लेन, चेक्स, स्ट्राईप्स या प्रकारांमधून तुम्ही केप स्टाईल पोंचोची निवड करू शकता. ' जीन्स किंवा एथनिक्सवर फुल लेंथ किंवा फ्लोअर लेंथ पोंचो वापरावा. ' आवड आणि गरजेनुसार व्ही, राउंड किंवा हाय नेकवाले पोंचो घेता येतील. ' समारंभासाठी लोकरीवर थ्रेड, मरर वर्क तसंच नक्षीकाम केलेले पोंचो खरेदी करू शकता. ' आजकाल फेदर किंवा फिं्रज पोंचोचा ट्रेंड आहे. ही स्टाईलही छान दिसते. ' नेहमीच्या हुडीपेक्षा...
Article

महात्मा फुले ; क्रांतीचे आधारस्तंभ

सध्या आम्हाला सर्वत्र सुधारणा झालेली दिसते.महिलाही शिक्षणात आघाडीवर गेलेल्या दिसतात.दलितही सुधारलेले दिसतात.विधवाही ब-याच पुढे गेलेल्या दिसतात.केशवेपन प्रथा राहिलेली नाही.सतीप्रथा तर नाहीच नाही.सतीप्रथेचा कायदा लार्ड विल्यम बेंटिकने बनवुन सतीप्रथेला तिलींजली दिली होती.ही सती प्रथा राजा राममोहन रायच्या प्रयत्नातुन बंद झाली होती.लार्ड विल्यम बेंटिकच नाही तर पुर्ण इंग्रज अधिकारी वर्गाच्या लक्षात सतीप्रथा वाईट गोष्ट आहे,हे राजा राममोहन रायने लक्षात आणुन दिले होते.सतीप्रथा बंद झाली असली तरी समाजात बाकी सा-याच प्रथा जोमात सुरु होत्या.विधवा झाल्यानंतर तिचा श्रुंगार नष्ट करुन तिने पांढरी साडी घालावी.तसेच तिला पुन्हा विवाह करण्याचा हक्क नसुन तिच्याकडे कोणी पाहु नये म्हणुन तिचा चेहरा विद्रुप केला जात असे.अँसीड टाकुन नाही तर तिच्या डोक्यावरचे केस काढुन.त्या स्रियांनी आवाज उठवु नये,त्या स्रियांना य...
मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ- संविधान..!
Article

मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ- संविधान..!

मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ- संविधान..! महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम भारतवासीयांना मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ -संविधान हा आपल्या खडतर प्रवास आणि प्रदीर्घ लेखणीतून बहाल केला आहे* सन 2015 सालापासून आपण 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतो. ही अत्यंत आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. हा मानवी जीवन कल्याणाचा दिवस आहे. भारतात हजारो ग्रंथ असताना दीन-दलित, भटके विमुक्त, आदिवासी दीनदुबळे लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे संविधान होय. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली. दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 रोजी होऊन त्यामध्ये आठ महत्त्वाच्या समित्या बनवल्या. त्यामध्ये *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे मसुदा समिती देण्यात आली.* 29 ऑगस्ट 1947 रोजी समिती गठित करण्यात आली. मसुदा समितीकडे आलेल्या सर्व दस्तऐवजाचा डॉक्टर बा...
Article

धडा बापाचा

येक पोट्ट रमेश नावाचं लाडात वाढलं. माय बाप साधारन कुटुंबातलं व्हतं. बाप खाजगी नोकरीत व्हता. पोरग चांगलं व्हावं, चांगलं शिकावं  परतेकमाय बापाले वाटते. अन आपल्या पोट्यासाटी वाट्टेल  थे मेहनत करतेत. तसं रमेश च्या माय बापानं केलंत. पन पोट्ट्याले काई कदर नाई.  मस्त आपल्याच मस्तीत राये. शान शौकीन ,दंगा मस्ती , पैसा उडवे, माय बाप परेशान. येकटच पोट्ट त्याईले वाटे कां मोठं झाल्यावर आधार भेटन जराकसा. पन कायचा आधार नसता डोक्साले ताप. देवाले नवस करुन झाले. उपास तापास झाले. पन कायबी फरक नाई. आखीर बापानं पोट्ट्याचा नाद सोडला. पन मन काई मानेना.... येक दिस बापाच्या मनात ईचार आला. अन त्यानं पोट्याले धडा शिकवाचा ठरुवलं. बापानं रमेश ले लई दूर नेला. येक उची भिंत व्हती . रमेश मने बापु  येथ कायले आनल. बाप गुपचुप व्हता. त्यान रमेश ले भितीवर (दिवाल) चढासाटी सांगतलं पोट्ट पयले नाई मने. आखीर कसा बसा चढला त्याच्या...
Article

मातृभाषेला लागलेली उतरती कळा..!

भारतीय परंपरा जपणारी, भारतीय संस्कृतीचे जाण असलेली माय मवाळ मराठी भाषा. मातृभाषेबद्दल असणारा आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात,   "माझा मऱ्हाटीचि बोलु कवतुके परी अमृताते ही पैजेसी जिंके॥' पूर्वी सर्व मुले मराठी भाषेतून शिकत होती व त्यानेच ती मोठी नामवंत झाली. ब्रिटिश काळात इंग्रजी भाषा आली. त्या ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्याकरता तिला भारतात स्थान दिले. पण भारतीय हळुहळू एवढे भाळले की त्यांना तिची गोडी लागली. पूर्वी मोजक्याच इंग्रजी शाळा होत्या पण सध्या मराठी  शाळांची स्थिती एवढी खालावलीय की सरसकट सगळेच इंग्रजीच्या आहारी गेलेत. रोष इंग्रजी भाषेवर नाही. भाषा वेगवेगळ्या जाणून शिकून घ्याव्याच पण मराठीकडे एवढे दुर्लक्ष नको ना! अरे मुलांना जरी इंग्रजी माध्यमात घातलं तरी मातृभाषा का दुरावता. घरी तरी ती बोली भाषा जागृत ठेवा ना! आज भाषेची सर्वांनी मिसळ केली आहे. मराठी बोलतांना बहुतांश शब्द त...
Article

आदिवासी आपले शत्रू नाहीत

दूर डोंगराळ भागात राहणारी आदिवासी जमात. बिचारे किडे, मुंग्या खावून उदरनिर्वाह करीत असतात. त्यांना औषधीचं पुरेपूर ज्ञान आहे. तसेच ही मंडळी सापासारखे विषारी प्राणीसुद्धा अत्यंत शितापीनं पकडत असतात. त्यातच जंगलातील कंदमुळं, झाडपाला खावून तसेच मिळेल त्या अन्नावर आजही पोट भरत असतात. त्यातच ही मंडळी स्वाभीमानी असतात. चोर नसतातच. चोर जर असती तर ते अगदी समृद्ध जीवन जगत राहिली असती अगदी चो-या करुन.   ती मंडळी जंगलातील लाकडं गोळा करतात. डिंक, राळ औषध्या गोळा करतात. चारं, बोरं गोळा करतात. त्या वस्तू शहरात विकतात आणि स्वतःचं पोट भागवतात. परंतू आज हीच शहरातील मंडळी त्यांची शत्रू बनत चालली आहे. त्यांना चोर ठरवू लागली आहे. त्यामुळं त्यांच्यात व शहरातील जनमाणसात एक खोल दरी निर्माण होत चाललेली आहे.चोर..........चोर कुठं नाहीत. ते श्रीमंतांच्या घरी सुद्धा जन्माला येत असतात. परंतू श्रीमंतांच्या घरचं मुसळ खपतं...