Tuesday, May 5

Article

सोनालीचा अर्ज… डोळे पाणावणारी विनंती!
Article

सोनालीचा अर्ज… डोळे पाणावणारी विनंती!

सोनालीचा अर्ज… डोळे पाणावणारी विनंती!प्रति,मा. प्राचार्य,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,छ. संभाजीनगर,विषय- मागील गैरहजेरी माफ करून आणखी विशेष सुट्टी मिळणेबाबत ......अर्जदार- एस. जी. जाधव,संगणक शाखा,(तृतीय वर्ष )           सर, मी आपल्या महाविद्यालयातील तृतीय वर्षातील कंप्युटर शाखेतील विद्यार्थिनी आहे. सर, मागच्या आठ- दहा दिवसांपासून मी गावी गेल्यामुळे महाविद्यालयात उपस्थित राहू शकले नाही. तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की, माझी ही गैरहजेरी मंजूर करावी. तसेच सर आणखी दोन आठवड्यासाठी विशेष सुट्टी मिळावी, हि विनंती. सर, तुम्हाला माहित आहे की, मागील दोन्ही वर्षात आपल्या महाविद्यालयात संगणक शाखेत मी प्रथम आलेली आहे आणि एका विषयात मला विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळाले आहे.       &...
तळेगावची धग…
Article

तळेगावची धग…

तळेगावची धग...मी पंचाहत्तर साली नागपुरात असताना एका वाचनालयात उद्धव ज. शेळकेंची ' धग ' कादंबरी माझ्या हातात पडली. खरं तर पाच वर्षांपासून मी ह्या पुस्तकाच्या शोधत होतो. पण सापडत नव्हते. त्याला कारणही तसेच होते. काय झाले की एकदा आई वडिलांचे खूप भांडण झाले. अधूनमधून ते व्हायचेच. असे भांडण झाले की वडील रागे भरत. मग त्यांचे जेवण बंद, म्हणजे उपोषण. अशी उपोषणं आणि सत्याग्रह घराघरातून सुरू असतातच. नवराबायकोचे भांडण झाले की दोघांपैकी एक रुसतो आणि दुसरा समजावत राहतो.वडील उपोषणाला बसले की त्यांना समजावण्याची जबाबदारी माझ्याकडे असे. खूप प्रयत्नानंतर ते उपोषण सोडायला राजी होत. आधी आईची खूप निंदा करत , मी हो ला हो लावत ऐकून घेई. मत प्रदर्शन मात्र करत नसे. कारण आईची बाजू घेतली तर त्यांचा राग अजूनच वाढण्याची भीती. आईच्या निंदेत सहभागी झालो तरीही पंचाईत. कारण आई स्वयंपाक खोलीच्या दाराआड बसून सारे ...
‘वचपा’ कादंबरीचा प्रवास: नांदेड ते मुंबई; राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंतची साहित्ययात्रा
Article

‘वचपा’ कादंबरीचा प्रवास: नांदेड ते मुंबई; राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंतची साहित्ययात्रा

'वचपा' कादंबरीचा प्रवास: नांदेड ते मुंबई; राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंतची साहित्ययात्रा दोन तीन तारखेला मुंबई ठाणेहून सारखं फोन येत होतं. निनावी आसल्यामुळे मी फोन उचललो नाही.शेवटी विवेकनं फोन घेतला.समोरून एक बाई बोलत होत्या.बोलताना त्राससिक आवाजत बोलत होत्या.''दोन दिवसापासून फोन लावत आहे तुम्ही फोन घेत नाही.तुमच्या वचपा कादंबरीला पुरस्कार जाहीर झालेलं आहे.तुम्ही हजर राहणार का ?विवेक माझ्याकडे पहात हसत उत्तर दिलं , " हो ताई मी निश्चित येणार आहे." एका दिवस अगोदर जाण्याचं ठरलं.नातेवाईक मित्रमंडळी यांना भेटता येईल या अपेक्षेने मी दिनांक ४.१० .२०२५ सकाळी लवकर उठलो.घरात कारभारनीचा गजर झाला," मुंबईला जायचं आठ वाजलेत."आणि माझं मन एका वेगळ्याच उत्साहात रमलं.आजचा दिवस माझ्यासाठी साधा नव्हता.माझ्या “वचपा” कादंबरीसाठी मला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार स्विकारण्यासाठी (मुंबई ) ठाणे गाठायचं होतं.माझ्या...
समाज माध्यमावरील सीरियल्सच्या भावनिक आक्रमणामुळे नवतरुण पिढीच्या मन-मेंदूत सुखी जीवनाची संभ्रमणावस्था!
Article

समाज माध्यमावरील सीरियल्सच्या भावनिक आक्रमणामुळे नवतरुण पिढीच्या मन-मेंदूत सुखी जीवनाची संभ्रमणावस्था!

समाज माध्यमावरील सीरियल्सच्या भावनिक आक्रमणामुळे नवतरुण पिढीच्या मन-मेंदूत सुखी जीवनाची संभ्रमणावस्था!समाज माध्यमे, टीव्हीवर जी काही अनैतिक, असामाजिक तत्त्वांची अकारण पेरणीची माथापच्ची सुरू आहे, याचे सामाजिक परिणाम आता वास्तविक जीवनामध्ये ढवळाढवळ करून तरुणाईच्या मनाची संभ्रमणावस्था वाढविण्यासाठी अधिक पोषक ठरत आहेत; नव्हे, ही पिढी नैराश्याच्या गर्तेमध्येच अधिक वावरताना दिसत आहे.आधीच मोबाईल फोनमुळे इथल्या तरुणांनी घरातील किंवा कुटुंबातील एकमेकांचा संवाद तोडून, आपल्या 'मुठीत' आलेल्या जगाशी 'मुकसंवाद' सुरू केलेला आहे. जवळच्या व्यक्तीशी ते बोलत नाहीत, तर अनोळखी व्यक्तीसोबत ते वारंवार न थकता रात्रंदिवस निष्फळ चर्चा करत असतात आणि आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ आपल्यासमोर जे वाढून ठेवलेले 'रील' असेल, ते पाहण्यात अकारण गमावत आहेत.टीव्ही वाहिन्यांवर दाखवण्यात येणाऱ्या सिरीयल, ज्यातून अधिकाध...
करवा चौथ का साजरा केला जातो? त्यामागील कथा काय आहे?
Article

करवा चौथ का साजरा केला जातो? त्यामागील कथा काय आहे?

करवा चौथ का साजरा केला जातो? त्यामागील कथा काय आहे?करवा चौथचा शब्दशः अर्थ 'पत्नीने तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी ठेवलेला उपवास' असा होतो. हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे ज्यामध्ये महिला सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास पाळतात आणि त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. या सणाचे महत्त्व पौराणिक कथांवर आधारित आहे, विशेषतः करवा माता आणि द्रौपदीच्या कथांवर, ज्या एका समर्पित पत्नीच्या शक्ती आणि श्रद्धेचे चित्रण करतात.करवा चौथ हा सर्व विवाहित महिलांसाठी एक महत्त्वाचा सण आहे. पत्नी आपल्या पतीच्या सुरक्षेसाठी उपवास ठेवतात. दिवसभर पाणी न पिता आणि काहीही न खाता उपवास करणे सोपे नसते, परंतु प्रेमळ पत्नी आपल्या पतींबद्दल खूप प्रेम आणि आदराने हे सर्व विधी करतात.करवा चौथचा अर्थ स्त्रीच्या पतीप्रती असलेल्या प्रेम, निष्ठा, भक्ती आणि पवित...
प्रिय वसुंधरा…! निसर्गाच्या वेदनेतून उमटलेले अंत:करणस्पर्शी पत्र
Article

प्रिय वसुंधरा…! निसर्गाच्या वेदनेतून उमटलेले अंत:करणस्पर्शी पत्र

प्रिय वसुंधरा…! निसर्गाच्या वेदनेतून उमटलेले अंत:करणस्पर्शी पत्रप्रिय वसुंधरा…!तुझे पत्र मिळाले.वाचून मी खरेच अंतर्मुख झालो.तुझ्यावर आणि तुझ्या लेकरांवर, माझ्याकडून कळत..नकळत झालेल्या अन्यायाबद्दल मी तुझी माफी मागतो…पण का गं प्रिये…मी हा जो उच्छाद मांडला म्हणतेस त्याला फक्त मी एकटाच जबाबदार आहे का..?तुझं नि माझं नातं तर अगदीच प्राचीन…विश्वाची उत्पत्ती झाल्यापासून आपण एकमेकांचे सहचर…एकमेकांना जिवापाड जपणारे…तुझ्या अस्तित्वाला चैतन्य देण्याचं काम हजारो..लाखो वर्षे करत आलो आहे.!पण मी का क्रोधित आहे…माहीत आहे…? अगं ज्यांना तू आपली प्रिय लेकरं मानते,त्या तुझ्या दिवट्यांनी विकासाच्या नावाखाली जो हैदोस घातला आहे ना तो मला उघड्या डोळ्यांनी बघवत नाही.पहिल्यांदा त्यांनी कधी शेतीच्या, कधी वस्तीच्या तर कधी औद्योगिकीकरणाच्या नावाखाली तुझे हिरवेगार वस्त्र काढून तुला कुरूप करण्याचा प्रयत्न सु...
प्रिय वरुण… वसुंधरेचं हृदयस्पर्शी पत्र; पावसाशी संवाद साधणारी धरणीमातेची कहाणी!
Article

प्रिय वरुण… वसुंधरेचं हृदयस्पर्शी पत्र; पावसाशी संवाद साधणारी धरणीमातेची कहाणी!

प्रिय वरुण… वसुंधरेचं हृदयस्पर्शी पत्र; पावसाशी संवाद साधणारी धरणीमातेची कहाणी!प्रिय वरुण,मी आता इथे आयसीयुमध्ये असताना, श्वास कोंडत असताना, तुला पत्र लिहू कि नको, या विचारात असतानासुद्धा, शेवटी माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत पोचवायच्या असतील तर दुसरा पर्याय नाही. या माझ्या लेखनाने तुला काही फरक पडेल कि नाही? माहित नाही. आणि तसेही मी तुला काही सांगत असताना तू कधी काही ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नसतो, तर कधी मला जमत नाही. कधी तू ऐकून न ऐकल्यासारखं करतो. पण असो.माझ्या प्रिया, मागच्या वर्षी तू दिवाळीत आला होतास. म्हणजे धावपळीत ओझरते दर्शन देऊन गेलास. पण अहाहा! काय रम्य दिवाळी होती ती. तुला बघून मी आणि माझी मुलं किती रे सुखावून गेली. तू आलास ना तर तुझ्या प्रेमळ स्पर्शाने आणि मायेने आम्हांला तसं फील होतंच. परत लवकरच येतो, असं सांगून तू गेलास, नाताळ संपून नवे वर्ष सुरु झाले. कडाक्याची...
मराठीची उंची मोठी करूया!
Article

मराठीची उंची मोठी करूया!

मराठीची उंची मोठी करूया!मराठी भाषेकडे लक्ष द्या अशी विनंती करण्याची गरज आज आपल्या सर्वांवर आली आहे. मराठी भाषा मोठी आहे ही बाब सिद्ध करण्याची गरज नसताना आज मोठ्याने ठासून सांगावे लागत आहे की मराठी भाषेला समृद्ध करा. हे आपले किती मोठे दुर्दैव? आपलीच भाषा आज आपल्यासाठी परकी झाली आहे नव्हे ती आपणच परकी करून टाकली मराठी भाषा इतकी समृद्ध असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी कित्येक वर्ष करावी लागली. पुरावे सादर करावे लागले.मराठी भाषेची प्राचीनता व साहित्य समृद्ध असताना देखील राजकीय अनास्तेपायी व मराठी भाषिकांच्या अनास्थेपायी मराठी भाषेवर अवकळा आली आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत एकनाथ या संतांसह अनेक मराठी साहित्यिकांनी एवढे मोठे काम करून ठेवले आहे की ते साऱ्या जगाने पाहावे.मराठी साहित्याचा इतिहास साधारणपणे १० व्या शतकापासून सुरू होतो, जेव्हा प्राकृत भाषेच्या...
लोकशाही व संविधानावर हल्ला : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूटफेक प्रकरणाने देशभर संताप
Article

लोकशाही व संविधानावर हल्ला : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूटफेक प्रकरणाने देशभर संताप

लोकशाही व संविधानावर हल्ला : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूटफेक प्रकरणाने देशभर संतापभारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान भूतो न भविष्यती अशी घटना घडली. जी अतिशय निंदनीय असून या घटनेचा संपूर्ण देशातून निषेध केला जात आहे.सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान राकेश किशोर या वकिलांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी ६/१०/२५ रोजी दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली .न्यायालयातील सुरक्षकारक्षकानी प्रसंगावधान राखत या वकिलास सरन्यायाधीशांवर हल्ला करण्यापासून रोखलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही घटना अतिशय निंदनीय असून न्यायालयाच्या सुरक्षितता धोक्यात आणणारी आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न हा न्यायालयाच्या इमारतीचे संरक्षण, न्यायाधीशांची वैयक्तिक सुरक्षा आणि न्यायालयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आवश्...
लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जग
Article

लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जग

लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जगप्रिये,"जागतिक महिला दिनाच्या तुला खूप खूप आणि मनापासून हार्दिक शुभेच्छा. बस. आराम कर. दमली असशील." चेहऱ्यावर हसू आणत त्याने तिला बाजूच्या खुर्चीवर बसण्यासाठी खुणावले आणि पुढे बोलू लागला. "मागच्या वर्षी याच दिवशी तुला मी आश्वासन दिले होते. बघ ते पूर्ण केले कि नाही?" तो बोलत होता. त्याच्याकडे कान देत, त्रासिक आणि थकलेल्या भावनेने ती बाजूच्या खुर्चीवर बसली. त्याच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? हे न कळल्याने ती, तो नाराज होऊ नये म्हणून चेहऱ्यावर उसने हसू आणत त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागली. खरेतर काही ऐकून घेण्याच्या मानसिकतेत ती नव्हती. तो पुढे बोलू लागला, "मी तुला बोललो होतो. तुझ्या मनात जे काही आहे, ती इच्छा तू पूर्ण करू शकते. तुला शिकायचे असेल, कुठे फिरायला जायचे असेल, काही खायचे असेल, जे काय ल्यायचे असेल, ते तू करू शकत...