Monday, March 9

Article

भुलाबाईची गाणी: महाराष्ट्रातील पारंपरिक सण आणि आठवणी
Article

भुलाबाईची गाणी: महाराष्ट्रातील पारंपरिक सण आणि आठवणी

भुलाबाईची गाणी: महाराष्ट्रातील पारंपरिक सण आणि आठवणीआमच्या लहानपणी भुलाबाईच्या सणाची व गाण्यांची वेगळीच मजा असायची. हल्ली आता ही मजा पहायला भेटत नाही.सारं टिपीकल व बेगडी वाटते.असं वाटते या लोकसंस्कृतीचे वाहक असलेल्या सणाला हल्ली बेगडीपणाच रूप शिल्लक राहिलं की काय?असं वाटायला लागतं.आज पुन्हा भुलाबाईच्या निमित्तानं लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. भाद्रपद महिन्याच्या सरत्या शेवटी गणपती,दसरा व नवरात्र सणाच्या समाप्ती नंतर भाद्रपद पौर्णिमा दिवशी अशा भूलाबाई महाराष्ट्रात घरोघरी बघायला मिळतात.पूर्वी अशा तयार रंगरंगोटी केलेल्या मुर्त्या आमच्या खेडेगावात नसायच्या. नदीकाठावरील कुंभाराच्या पजायावरची लूसलूसीत माती घेऊन व मस्त त्यात घोड्याची लीद मिसळून पाणी टाकून एकजीव केल्यानंतर छान भुलाबाई बनवायचो. हातानं भुलाबाई तयार करून ज्वारीचे टपोरे दाणे डोळे म्हणून लावायचो.व दुकानातून आठान्याचा गे...
दहशतवादाबाबत जगाची दुटप्पी भूमिका.!
Article

दहशतवादाबाबत जगाची दुटप्पी भूमिका.!

दहशतवादाबाबत जगाची दुटप्पी भूमिका.!दहातवादाबाबत जगाचा दृष्टिकोन स्पष्ट नाही. दहशतवादाबाबत जगाची भूमिका दुटप्पी स्वरूपाची दिसून येते.दहशतवादाबाबत जगाच्या दुहेरी दृष्टिकोनाचा अर्थ असा आहे की काही देश दहशतवादाला एक गंभीर जागतिक समस्या म्हणून ओळखतात, तर काही जण त्यांच्या स्वतःच्या धोरणात्मक किंवा राजकीय फायद्यासाठी विशिष्ट दहशतवादी गटांविरुद्ध मवाळ भूमिका घेतात किंवा त्यांचा गैरफायदा घेतात. भारताने या दुहेरी मानकांवर सातत्याने टीका केली आहे आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध एकता निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका सारखे देश दहशतवादाविरुद्ध "कठोर" धोरण स्वीकारताना तालिबान आणि हमास सारख्या गटांशी वाटाघाटी करतात.मात्र पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाबाबत मात्र संदिग्ध भूमिका घेतात.काही देश दहशतवादी गटांना त्यांचे राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी समर्थन देतात किंवा मदत करतात, ज्यामुळे ते स...
बालपणाची निरागसता जपणारी कलाकृती – चांदणभूल
Article

बालपणाची निरागसता जपणारी कलाकृती – चांदणभूल

बालपणाची निरागसता जपणारी कलाकृती – चांदणभूलनाशिकचे साहित्यिक विजयकुमार मिठे यांचा चांदणभूल हा ललित लेखसंग्रह नुकताच वाचनात आला. खरे तर या संग्रहाला ललितलेखन म्हणणे वावगे ठरेल कारण या संग्रहातील लेखन हे लेखकाच्या बालपणापासून तर साठी गाठण्यापर्यंतचा थोडक्यात प्रवास मांडला आहे त्यामुळे या संग्रहाला आत्मलेखन किंवा स्वानुभवलेखन किंवा आत्मचरित्र म्हणता येईल असे मला वाटते. चांदणभूल या कलाकृतीच्या मुखपृष्ठाकडे पाहिले की, प्रत्येकाला आपले बालपण आठवते, कधी आई सोबत, तर कधी आजी आजोबांसोबत तर कधी मामा मावशी सोबत चांदण्यारात्री आभाळाकडे बघून चांदण्या मोजायच्या आणि चंद्राच्या कला अनुभवायच्या इतकी उत्सुकता लागलेली असायची.चांदणभूल या कलाकृतीच्या मुखपृष्ठाचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, माणसाच्या गत आयुष्याचे संदर्भ रेखाटले आहेत की काय असे वाटते. विजयकुमार मिठे यांच्या लेखनीची भाषा ग्रामीण...
बंजारा समाज मोर्चे आणि पक्षांचा सहभाग : सामाजिक न्यायासाठी संघर्ष की राजकीय स्टंट
Article

बंजारा समाज मोर्चे आणि पक्षांचा सहभाग : सामाजिक न्यायासाठी संघर्ष की राजकीय स्टंट

बंजारा समाज मोर्चे आणि पक्षांचा सहभाग : सामाजिक न्यायासाठी संघर्ष की राजकीय स्टंटबंजारा समाज हा पारंपरिकरीत्या व्यापारी व जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारा समाज आहे. "गोर" म्हणून ओळखला जाणारा हा समाज भारताच्या प्रत्येक राज्यात पसरलेला आहे. त्यातल्यात्यात महाराष्ट्र, तेलंगणा,आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश,कर्नाटक,गुजरात,राजस्थान येथे यांची लक्षणीय वस्ती आहे.आज बंजारा समाज प्रामुख्याने शेतमजूर, कामगार,नावालाच लहान व्यापारी व बोटावर मोजण्याइतके सरकारी नोकरदार म्हणून जगतो आहे.परंतु हा समाज सामाजिक न्यायाच्या शर्यतीत खूप मागे राहिलेला आहे. व आज मागे राहिल्याची भावना समाजात तीव्र होत आहे.भारतातील लोकशाहीत कोणत्याही समाजघटकाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलने, मोर्चे,अर्ज,निवेदन ही साधने वापरावी लागतात. बंजारा समाज,ज्याला लांब इतिहास आहे,तो देखील शिक्षण,नोकरी,सामाजिक न्याय या प्रश्नांवर संघर्ष करीत आल...
ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
Article

ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदेराज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत . घरादारांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली आहेत .विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे . या पार्श्वभूमीवर आज राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.पण ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय ? ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते ? जाणून घेण्याचा हा प्रयत्न…खरंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. मात्र यात प्रामुख्याने दोन शब्द वापरले गेले आहेत.पहिला अवकर्षण काळ. ज्यात सरासरीपेक्षा १०% कमी पाऊस झाला तर अवकर्षण काळ असं म्हटलं जातं. तर दहा टक्क्यांपेक्षा अधिक ...
‘धम्मचक्र प्रवर्तन’ चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?
Article, Story

‘धम्मचक्र प्रवर्तन’ चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?

'धम्मचक्र प्रवर्तन' चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?          मुळात 'बौद्ध' या संज्ञेत विद्वत्ता, चिकित्सा, आणि शिलसंपन्नता अंतर्भूत आहे; पण दुःखद म्हणजे पारंपरिक अथवा धर्मांतरित बौद्धांमध्ये या तिन्ही बाबींचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसतो. बौद्ध समाजात क्वचित लोक या तिन्ही साच्यात बसणारे आढळतील. पारंपारिक बौद्ध म्हणजे उत्तर-पूर्व (ईशान्य) भारतातील समूहात वज्रयान, तंत्रयान व काही अंशी महायान सिद्धांतांचा प्रभाव असल्याने त्यांच्याकडून आंबेडकरप्रणित धम्म अपेक्षितही नाही, मात्र बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध हा १००% विद्वत्ता, चिकित्सा, व शिलसंपन्नतेचा आग्रह धरत असल्यामुळे बाबासाहेबांसमवेत धर्मांतरित झालेल्या बौद्धांची ही स्वाभाविक जबाबदारी आहे, की आपण आपला सांस्कृतिक इतिहास शुद्ध स्वरूपात रुजवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ...
मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख
Article

मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख

मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेखसध्या मी मिक्स कॉलनीत राहतो. मिक्स कॉलनी ह्यासाठी म्हणालो की, मोठया शहरातून सुद्धा जात- धर्म निदर्शक वसाहती आहेत. माझ्या कॉलनीचे नावही हरिओम नगर आहे. माझा पत्ता मात्र पुष्पगंधा कॉलनी असा आहे कारण माझे घर हरीओम नगरातले शेवटचे आहे आणि माझ्या शेजारच्या  घरापासून पुष्पगंधा कॉलनी सुरु होते. मला हरीओम पेक्षा पुष्पगंधा नाव सोयीचे वाटले. म्हणून माझा पत्ता ‘अशोक थोरात. पुष्पगंधा कॉलनी ’ असा झाला. एकतर मी देव धर्म इत्यादी काही मानत नाही म्हणून हरीओम  नावाची अॅलर्जी, आणि कवी वगैरे असल्यामुळे पुष्पगंधा नावाचे आकर्षण. मला अनेक पत्र ‘ अशोक थोरात. वि.म.वि.  अमरावती ’ एवढयाच पत्यावर येतात. ह्याचा अर्थ मी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे असा नाही तर टपाल भरपूर येत असल्यामुळे पोस्टमन ओळखीचे होऊन जातात आणि वि.म.वि.ला टपाल का...
नभाला भिडावे निळ्या पाखरांनी : अरुण विघ्ने गझलसंग्रह समीक्षा
Article

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी : अरुण विघ्ने गझलसंग्रह समीक्षा

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी : अरुण विघ्ने गझलसंग्रह समीक्षा"माणसाला माणुसपण बहाल करणार्या प्रज्ञासूर्य महामानवाचे विचार मूल्य पेरणारा 'नभाला भिडावे निळ्या पाखरांनी' : विद्रोही कवी साहेबराव मोरेकवी, गझलकार अरूण विघ्ने   यांचा "नभाला भिडावे निळ्या पाखरांनी' हा पहिला गझल संग्रह वाचनात आला .सुरेश भट ते भीमराव पांचाळे यांनी मराठी गझल समृद्ध केली, नावारूपाला आणली,आज अनेक नवागत कवी, गझल लेखनाकडे वळले आहेत.भीमराव पांचाळे यांच्या लोकमत मधील गझल संदराने‌ नवागतांना उर्मी दिली.गझल ही कवितेसारखीच कविता असते.तंत्रबद्ध ,भाषिक व्याकरणाचा  आकृतीबंध असलेली . गझल हा तंत्रशुद्ध काव्यप्रकार आहे. सुंदर व योग्य शब्दांचा अचूक वापर गझलेत असावा लागतो.अरबीचा प्रभाव हे एक मूलाधार तत्व असल्याने काफिया रदीफ,मिसरा,शेर ,अलामत  असे शब्दप्रयोग यमक, अन्त्ययमक,लघु गुरू स्वर  यासाठी आले आहेत....
गर्दी व्यवस्थापनाचे अपयश चिंताजनक : करूर चेंगराचेंगरीनंतर गंभीर प्रश्न
Article

गर्दी व्यवस्थापनाचे अपयश चिंताजनक : करूर चेंगराचेंगरीनंतर गंभीर प्रश्न

गर्दी व्यवस्थापनाचे अपयश चिंताजनक : करूर चेंगराचेंगरीनंतर गंभीर प्रश्नतामिळनाडूतील करूर येथे विजय थलपती यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी होऊन ३३ जणांचा मृत्यू झाला.चेंगराचेंगरीने पुन्हा एकदा गर्दी व्यवस्थापनाचे अपयश उघड केले आहे. प्रशासनाच्या ,पोलिसांच्या व आयोजकांची हलगर्जी जास्त गर्दी, बाहेर काढण्याच्या मार्गांचा अभाव आणि अव्यवस्थित व्यवस्थापनामुळे ही दुर्घटना घडली. मात्र या घटनेला जबाबदार कोण? अलिकडच्या काळात जगभरात नोंदवलेल्या घटनांच्या मालिकेतील नवीनतम घटना आहे जिथे गर्दी नियंत्रणातील त्रुटींचे गंभीर परिणाम झाले आहेत. धार्मिक कार्यक्रमांव्यतिरिक्त, क्रीडा कार्यक्रम, राजकीय रॅली आणि सांस्कृतिक उत्सव लाखो लोकांना आकर्षित करतात, जिथे गर्दी व्यवस्थापनातील किरकोळ त्रुटी देखील भयानक आपत्तींमध्ये बदलू शकतात. उदाहरणार्थ, २०२२ मध्ये, दक्षिण कोरियातील इटावॉन हॅलोविन उत्सवात गर्दीमुळे १५० हून ...
गवई कुटुंबाचा भांडाफोड.! : आरएसएसशी जवळीक की आंबेडकरी चळवळीशी दगाफटका?
Article

गवई कुटुंबाचा भांडाफोड.! : आरएसएसशी जवळीक की आंबेडकरी चळवळीशी दगाफटका?

गवई कुटुंबाचा भांडाफोड.! : आरएसएसशी जवळीक की आंबेडकरी चळवळीशी दगाफटका?नुकतेच काल-परवापासून एका वृत्तपत्रातील कात्रण सर्वत्र झपाट्याने पसरत आहे ज्यात कमल गवईच्या फोटोसह बाजूला कमल गवई पाहुणी म्हणून आरएसएसच्या कार्यक्रमात जाणार असल्याची एक बातमी पाहायला मिळतेय...आरएसएस ही सर्वार्थाने आंबेडकरी चळवळ व समूहाला कशी व किती मारक असणारी संघटना आहे हे वेगळे सांगावयास नको, आंबेडकरी समूहातील पोरा-सोरांना चळवळीतले काही कळो अथवा न कळो पण आरएसएस आपली शत्रूसंघटना व भाजप आपला शत्रूपक्ष असल्याचे भल्याने कळते, याच धर्तीवर स्वतःला आंबेडकरी चळवळीचे नेते वगैरे असल्याची भलावणं करणाऱ्या गवईविषयी आंबेडकरी चळवळीच्या विसंगत वागत असल्याची बातमी पाहून आंबेडकरी चळवळीतील काही सुजाण लोकांनी समाजमाध्यमांवरून आक्षेप नोंदवायला सुरुवात केली असता, समाजाचा आपल्याविरोधात जाणारा कल पाहून कमल गवईने कमालीची पलटी म...