Tuesday, April 21

Article

लोकशाही व संविधानावर हल्ला : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूटफेक प्रकरणाने देशभर संताप
Article

लोकशाही व संविधानावर हल्ला : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूटफेक प्रकरणाने देशभर संताप

लोकशाही व संविधानावर हल्ला : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूटफेक प्रकरणाने देशभर संतापभारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान भूतो न भविष्यती अशी घटना घडली. जी अतिशय निंदनीय असून या घटनेचा संपूर्ण देशातून निषेध केला जात आहे.सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान राकेश किशोर या वकिलांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी ६/१०/२५ रोजी दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली .न्यायालयातील सुरक्षकारक्षकानी प्रसंगावधान राखत या वकिलास सरन्यायाधीशांवर हल्ला करण्यापासून रोखलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही घटना अतिशय निंदनीय असून न्यायालयाच्या सुरक्षितता धोक्यात आणणारी आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न हा न्यायालयाच्या इमारतीचे संरक्षण, न्यायाधीशांची वैयक्तिक सुरक्षा आणि न्यायालयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आवश्...
लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जग
Article

लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जग

लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जगप्रिये,"जागतिक महिला दिनाच्या तुला खूप खूप आणि मनापासून हार्दिक शुभेच्छा. बस. आराम कर. दमली असशील." चेहऱ्यावर हसू आणत त्याने तिला बाजूच्या खुर्चीवर बसण्यासाठी खुणावले आणि पुढे बोलू लागला. "मागच्या वर्षी याच दिवशी तुला मी आश्वासन दिले होते. बघ ते पूर्ण केले कि नाही?" तो बोलत होता. त्याच्याकडे कान देत, त्रासिक आणि थकलेल्या भावनेने ती बाजूच्या खुर्चीवर बसली. त्याच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? हे न कळल्याने ती, तो नाराज होऊ नये म्हणून चेहऱ्यावर उसने हसू आणत त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागली. खरेतर काही ऐकून घेण्याच्या मानसिकतेत ती नव्हती. तो पुढे बोलू लागला, "मी तुला बोललो होतो. तुझ्या मनात जे काही आहे, ती इच्छा तू पूर्ण करू शकते. तुला शिकायचे असेल, कुठे फिरायला जायचे असेल, काही खायचे असेल, जे काय ल्यायचे असेल, ते तू करू शकत...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे धर्मचिंतन: सर्वधर्म समभाव आणि मानवहित
Article

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे धर्मचिंतन: सर्वधर्म समभाव आणि मानवहित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे धर्मचिंतन: सर्वधर्म समभाव आणि मानवहितमित्रांनो जगाच्या पाठीवर अनेक धर्म व त्या -त्या धर्माचे संस्थापक होऊन गेले. प्रत्येक धर्माचं आपलं एक वेगळं तत्वज्ञान आहे.आणी त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की कोणत्याही धर्मानं वा धर्मग्रंथानं आपलं मत मांडतांना एक दुसऱ्याला दोष दिला नाही. किंवा आपलाच धर्म श्रेष्ठ की इतरांचा कनिष्ठ यावरही भाष्यही केले नाही. प्रत्येकानं एक चांगलाच विचार समाजापुढे मांडलेला दिसून येतो.कोणताही धर्म वाईट विचारानं वागा असं जनमाणसास शिकवत नाही. विदर्भ पंढरीत जन्मलेल्या वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा हेच सर्वसमावेशक धर्म विषयक तत्वज्ञान सांगितले आहे. राष्ट्रसंतांनी जी परिस्थिती भजन, किर्तनाच्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या गावांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सर्व बारकाईने अवलोकन केली होती. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध बनले होते. ज्या ज्या ध...
भुलाबाईची गाणी: महाराष्ट्रातील पारंपरिक सण आणि आठवणी
Article

भुलाबाईची गाणी: महाराष्ट्रातील पारंपरिक सण आणि आठवणी

भुलाबाईची गाणी: महाराष्ट्रातील पारंपरिक सण आणि आठवणीआमच्या लहानपणी भुलाबाईच्या सणाची व गाण्यांची वेगळीच मजा असायची. हल्ली आता ही मजा पहायला भेटत नाही.सारं टिपीकल व बेगडी वाटते.असं वाटते या लोकसंस्कृतीचे वाहक असलेल्या सणाला हल्ली बेगडीपणाच रूप शिल्लक राहिलं की काय?असं वाटायला लागतं.आज पुन्हा भुलाबाईच्या निमित्तानं लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. भाद्रपद महिन्याच्या सरत्या शेवटी गणपती,दसरा व नवरात्र सणाच्या समाप्ती नंतर भाद्रपद पौर्णिमा दिवशी अशा भूलाबाई महाराष्ट्रात घरोघरी बघायला मिळतात.पूर्वी अशा तयार रंगरंगोटी केलेल्या मुर्त्या आमच्या खेडेगावात नसायच्या. नदीकाठावरील कुंभाराच्या पजायावरची लूसलूसीत माती घेऊन व मस्त त्यात घोड्याची लीद मिसळून पाणी टाकून एकजीव केल्यानंतर छान भुलाबाई बनवायचो. हातानं भुलाबाई तयार करून ज्वारीचे टपोरे दाणे डोळे म्हणून लावायचो.व दुकानातून आठान्याचा गे...
दहशतवादाबाबत जगाची दुटप्पी भूमिका.!
Article

दहशतवादाबाबत जगाची दुटप्पी भूमिका.!

दहशतवादाबाबत जगाची दुटप्पी भूमिका.!दहातवादाबाबत जगाचा दृष्टिकोन स्पष्ट नाही. दहशतवादाबाबत जगाची भूमिका दुटप्पी स्वरूपाची दिसून येते.दहशतवादाबाबत जगाच्या दुहेरी दृष्टिकोनाचा अर्थ असा आहे की काही देश दहशतवादाला एक गंभीर जागतिक समस्या म्हणून ओळखतात, तर काही जण त्यांच्या स्वतःच्या धोरणात्मक किंवा राजकीय फायद्यासाठी विशिष्ट दहशतवादी गटांविरुद्ध मवाळ भूमिका घेतात किंवा त्यांचा गैरफायदा घेतात. भारताने या दुहेरी मानकांवर सातत्याने टीका केली आहे आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध एकता निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका सारखे देश दहशतवादाविरुद्ध "कठोर" धोरण स्वीकारताना तालिबान आणि हमास सारख्या गटांशी वाटाघाटी करतात.मात्र पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाबाबत मात्र संदिग्ध भूमिका घेतात.काही देश दहशतवादी गटांना त्यांचे राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी समर्थन देतात किंवा मदत करतात, ज्यामुळे ते स...
बालपणाची निरागसता जपणारी कलाकृती – चांदणभूल
Article

बालपणाची निरागसता जपणारी कलाकृती – चांदणभूल

बालपणाची निरागसता जपणारी कलाकृती – चांदणभूलनाशिकचे साहित्यिक विजयकुमार मिठे यांचा चांदणभूल हा ललित लेखसंग्रह नुकताच वाचनात आला. खरे तर या संग्रहाला ललितलेखन म्हणणे वावगे ठरेल कारण या संग्रहातील लेखन हे लेखकाच्या बालपणापासून तर साठी गाठण्यापर्यंतचा थोडक्यात प्रवास मांडला आहे त्यामुळे या संग्रहाला आत्मलेखन किंवा स्वानुभवलेखन किंवा आत्मचरित्र म्हणता येईल असे मला वाटते. चांदणभूल या कलाकृतीच्या मुखपृष्ठाकडे पाहिले की, प्रत्येकाला आपले बालपण आठवते, कधी आई सोबत, तर कधी आजी आजोबांसोबत तर कधी मामा मावशी सोबत चांदण्यारात्री आभाळाकडे बघून चांदण्या मोजायच्या आणि चंद्राच्या कला अनुभवायच्या इतकी उत्सुकता लागलेली असायची.चांदणभूल या कलाकृतीच्या मुखपृष्ठाचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, माणसाच्या गत आयुष्याचे संदर्भ रेखाटले आहेत की काय असे वाटते. विजयकुमार मिठे यांच्या लेखनीची भाषा ग्रामीण...
बंजारा समाज मोर्चे आणि पक्षांचा सहभाग : सामाजिक न्यायासाठी संघर्ष की राजकीय स्टंट
Article

बंजारा समाज मोर्चे आणि पक्षांचा सहभाग : सामाजिक न्यायासाठी संघर्ष की राजकीय स्टंट

बंजारा समाज मोर्चे आणि पक्षांचा सहभाग : सामाजिक न्यायासाठी संघर्ष की राजकीय स्टंटबंजारा समाज हा पारंपरिकरीत्या व्यापारी व जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारा समाज आहे. "गोर" म्हणून ओळखला जाणारा हा समाज भारताच्या प्रत्येक राज्यात पसरलेला आहे. त्यातल्यात्यात महाराष्ट्र, तेलंगणा,आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश,कर्नाटक,गुजरात,राजस्थान येथे यांची लक्षणीय वस्ती आहे.आज बंजारा समाज प्रामुख्याने शेतमजूर, कामगार,नावालाच लहान व्यापारी व बोटावर मोजण्याइतके सरकारी नोकरदार म्हणून जगतो आहे.परंतु हा समाज सामाजिक न्यायाच्या शर्यतीत खूप मागे राहिलेला आहे. व आज मागे राहिल्याची भावना समाजात तीव्र होत आहे.भारतातील लोकशाहीत कोणत्याही समाजघटकाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलने, मोर्चे,अर्ज,निवेदन ही साधने वापरावी लागतात. बंजारा समाज,ज्याला लांब इतिहास आहे,तो देखील शिक्षण,नोकरी,सामाजिक न्याय या प्रश्नांवर संघर्ष करीत आल...
ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
Article

ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदेराज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत . घरादारांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली आहेत .विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे . या पार्श्वभूमीवर आज राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.पण ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय ? ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते ? जाणून घेण्याचा हा प्रयत्न…खरंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. मात्र यात प्रामुख्याने दोन शब्द वापरले गेले आहेत.पहिला अवकर्षण काळ. ज्यात सरासरीपेक्षा १०% कमी पाऊस झाला तर अवकर्षण काळ असं म्हटलं जातं. तर दहा टक्क्यांपेक्षा अधिक ...
‘धम्मचक्र प्रवर्तन’ चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?
Article, Story

‘धम्मचक्र प्रवर्तन’ चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?

'धम्मचक्र प्रवर्तन' चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?          मुळात 'बौद्ध' या संज्ञेत विद्वत्ता, चिकित्सा, आणि शिलसंपन्नता अंतर्भूत आहे; पण दुःखद म्हणजे पारंपरिक अथवा धर्मांतरित बौद्धांमध्ये या तिन्ही बाबींचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसतो. बौद्ध समाजात क्वचित लोक या तिन्ही साच्यात बसणारे आढळतील. पारंपारिक बौद्ध म्हणजे उत्तर-पूर्व (ईशान्य) भारतातील समूहात वज्रयान, तंत्रयान व काही अंशी महायान सिद्धांतांचा प्रभाव असल्याने त्यांच्याकडून आंबेडकरप्रणित धम्म अपेक्षितही नाही, मात्र बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध हा १००% विद्वत्ता, चिकित्सा, व शिलसंपन्नतेचा आग्रह धरत असल्यामुळे बाबासाहेबांसमवेत धर्मांतरित झालेल्या बौद्धांची ही स्वाभाविक जबाबदारी आहे, की आपण आपला सांस्कृतिक इतिहास शुद्ध स्वरूपात रुजवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ...
मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख
Article

मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख

मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेखसध्या मी मिक्स कॉलनीत राहतो. मिक्स कॉलनी ह्यासाठी म्हणालो की, मोठया शहरातून सुद्धा जात- धर्म निदर्शक वसाहती आहेत. माझ्या कॉलनीचे नावही हरिओम नगर आहे. माझा पत्ता मात्र पुष्पगंधा कॉलनी असा आहे कारण माझे घर हरीओम नगरातले शेवटचे आहे आणि माझ्या शेजारच्या  घरापासून पुष्पगंधा कॉलनी सुरु होते. मला हरीओम पेक्षा पुष्पगंधा नाव सोयीचे वाटले. म्हणून माझा पत्ता ‘अशोक थोरात. पुष्पगंधा कॉलनी ’ असा झाला. एकतर मी देव धर्म इत्यादी काही मानत नाही म्हणून हरीओम  नावाची अॅलर्जी, आणि कवी वगैरे असल्यामुळे पुष्पगंधा नावाचे आकर्षण. मला अनेक पत्र ‘ अशोक थोरात. वि.म.वि.  अमरावती ’ एवढयाच पत्यावर येतात. ह्याचा अर्थ मी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे असा नाही तर टपाल भरपूर येत असल्यामुळे पोस्टमन ओळखीचे होऊन जातात आणि वि.म.वि.ला टपाल का...