Thursday, November 13

Article

Article

एमपीएससीच्या अंतिम यादीत एकाचवेळी चमक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. यासाठी राज्यातून लाखो तरुण-तरुणी तयारी करतात. अहमदनगर जिल्ह्यात स्पर्धा परिक्षेशी संबंधित एक प्रेरणादायी अपघात घडला आहे. संसाराच्या वाटेवर मार्गक्रमण करणा-या एका पती पत्नीने स्पर्धा परिक्षेतील यशाच्या सप्तपदीला गवसणी घातली आहे.   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत पती पत्नीचे नाव एकाचवेळी झळकले आहे. सुरेश चासकर व मेघना चासकर अशी या उत्तीर्ण झालेल्या अधिकारी पती-पत्नीचे नावे आहेत. या दोघांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत वर्ग १ पदी निवड झाली आहे. हे दोघेजण आता लवकरच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास वन अधिकारी पदावर रुजू होतील.   सुरेश व मेघना हे दोघेही मे २०२२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. मेघना यांचे मूळ गाव कोपरगाव तालुक्यातील येसगाव...
Article

हरतालिका व्रत ; स्रीयांवर बंधन ठेवू नये.

दरवर्षी हरतालिका येते व सौभाग्यवती स्रीया तसेच कुमारिका मुलीही हा व्रत करतात.कशासाठी? तर इच्छित पती मिळावा. हा इच्छित पती मिळावा म्हणून कुमारीका, तर सौभाग्य अखंड टिकावं म्हणून सौभाग्य वती स्रीया हा व्रत करीत असतात. या दिवशी दिवसभर स्रीया उपवास करतात. रात्रीही त्यांना उपवास असतो. मग शरीरातील पोषकतत्वे कमी झाल्याने चक्कर येतात. यातच जीवही जावू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही! याच काळात उपवास केल्यानं शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास येणा-या संभाव्य धोक्याला कोणताच व्यक्ती वाचविणार नाही नव्हे तर वाचवायला येणार नाही. मग ज्या देवासाठी उपवास केला. तो देवही वाचविणार नाही.   हरतालिका व्रताची कथा काहीशी अशी आहे. पर्वतराजाची मुलगी ही भगवान शंकरावर प्रेम करीत होती. पण पित्याची इच्छा होती की तिनं श्रीविष्णूशी विवाह करावा. मग आपले वडील आपल्या मनात असलेल्या आपल्या पतीला मिळू देणार नाही. जबरदस्तीनं आप...
Article

पोळा खरंच बैलासाठी ना….!

आम्ही श्रावण महिण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात अमावस्येला पोळा हा सण मनवतो.आदल्या दिवशीपासुनच बैलाला अाराम देत त्याने वर्षभर शेतात काम केल्याने त्याला आराम व्हावा म्हणुनच त्याचे खांदे तेल आणि हळदीने शेकुन देतो.आपल्याला तेव्हा हे कळत नाही की वर्षभर काम करीत असतांना जे बैलाचे खांदे दुखतात,ते खरंच एकच दिवस शेकल्यानं बसेल काय?तरीही आपण आपल्या समाधानासाठी करतोय ते...त्यात बैलाचं हित नसतंच. बैलपोळा साजरा करणं हा आपला सण.वर्षभर राबणा-या बैलाला एक दिवस आराम मिळावा म्हणुन आपला या सणाच्या निमित्यानं का होईना व्रत पाळणे हा बहाणा.खरं तर खोलात जावुन विचार केल्यास तो बैलाचा सण वाटत नाही तर आपला स्वतःचाच सण वाटतोय.आम्ही बैलाचे खांदे शेकुन झाल्यावर दुस-या दिवशी त्याला चांगलं वैरण खावु घालतो.या दिवशी त्याला कामालाही लावत नाही.दुपारी लवकर त्याला सजवुन त्याला पोळ्यात नेतो.तसेच तोरण तुटताच त्या बैलांना धावत आ...
Article

शाळेतही मुली सुरक्षित नाही..!

शाळा म्हणजे विद्येचं मंदीर, मात्र सध्या शाळांमध्येही अगदी घृणास्पद प्रकार समोर येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे दिल्लीमध्ये शाळांचा दर्जा सुधारल्याचे बोलले जात असताना व न्यूयॉर्क टाइम्सने दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्याची दखल घेतली असताना दिल्लीच्या एका महानगरपालिका शाळेत अत्यंत विकृत प्रकार घडल्याचे समोर आल्याने शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये अज्ञात व्यक्तीने आठ वर्षांच्या दोन मुलींचे कपडे उतरवल्याची घटना समोर आली आहे. ही व्यक्ती या मुलींच्या वर्गात गेली, त्यानंतर त्याने या मुलींचे कपडे उतरवले. त्यानंतर या व्यक्तीने स्वतःचेही कपडे उतरवून वर्गासमोर लघवी केली. दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी याबाबत माहिती दिली. ही शाळा दिल्लीच्या भजनपुरा भागातील असल्याचे त्यांनी सांगितले.धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेबाबत मुलींनी शाळेती...
Article

क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणारी सर्वश्रेष्ठ कविता

  आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही आपण नुकताच साजरा केला आहे. जसजसा काळ बदलला तसतसा जीवन जगण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल व्हायला लागला. संयुक्त कुटुंब पद्धतीत शांततामय आणि आरामात जीवन जगणारा माणूस विभक्त कुटुंब पद्धतीच्या तडाख्यात सापडून कुटूंबाची मुळ चौकटच मोडीत काढायला निघाला. आचारविचार बदलले. माणसाची विचार करण्याची पद्धत बदलायला लागली. जीवन जगण्याची वैचारिक बैठक मोडकळीस आली. संयमाचा बांध फुटायला लागला. समाजाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवल्या जावू लागले. नव्या कल्पना आणि नव्या विचारांचे वारे सुसाट वेगाने ओसंडून वाहत असताना जुन्या धाटीतील शांत आणि संयमी दिव्याची ज्योत कशी तेवत ठेवावी अशा द्विधा मनस्थितीत असतांनाच संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या अमूल्य विचारांचा ठेवा आठवल्या शिवाय राहत नाही. शेकडो वर्षांपूर्वी विज्ञानवादाचा स्पर्शही जेमतेम झाला असावा अशा...
Article

व्हायरल आणि वास्तव…

परवा खोतवाडीच्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानिमित्ताने समाजात उमटलेले प्रतिबिंब न्याहाळताना... असे व्हिडिओ किंवा अशा बातम्याचे मथळे पाहिले की अंतर्मुख व्हायला होतं. आणि मग अनेक तर्क वितर्क, शिव्या शाप, पोलिसीखाकी, घराण्याची बदनामी, लेकासुनेवर कार्यवाही व्हावी इतपत सामाजिक दडपण, इ. असे एक ना अनेक चर्चा करत विविध समाजसुधारक जागे होतात आणि प्रत्येकजण आपल्या पद्धतीने शक्कल लढवतात. खरंतर अशा घटना घडायलाच नको हेही तितकच खरं आहे. परंतु घटनेची अगोदरची पार्श्वभूमी अथवा त्या घरातली वास्तव परिस्थिती कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. ही एक पुढारलेल्या समाजातील शोकांतिका म्हणावी लागेल फार वर्षांपूर्वी सासुरवास नावाचा डंख समाजामध्ये खोलवर रुजला होता. त्याची पाळेमुळे एवढे खोलवर रुजले होते की अगदी अनेक समाजसुधारकांची आणि साधुसंतांची देखील या त्रासातून सुटका झाली नव्हती. अज्ञान, अंधश्रद्धा...
बंजारा अस्मिता जागविणारे भाषा गौरवगीत
Article

बंजारा अस्मिता जागविणारे भाषा गौरवगीत

बंजारा अस्मिता जागविणारे भाषा गौरवगीत प्रत्येक जीवा जीवाची भावना, आचारविचार आदानप्रदान करण्याची एक शैली असते तिलाच आपण भाषा असे म्हणतो. प्रत्येक पशुपक्षी, प्राण्यांची सुध्दा एक भाषा असते. भलेही त्यांची भाषा आपल्याला कळत नसेल; परंतु त्यांची भाषा त्यांना मात्र कळते कारण त्याद्वारे ते त्यांचा जीवन व्यवहार व्यतित करित असतात. जगात मानव जात ही सर्व प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान गणल्या गेली; याचे कारण म्हणजे मानवाला निसर्गाने प्रदान केलेले बुध्दी चातुर्य होय. मानवाने आपली स्वतःची एक भाषा विकसित केली. त्या माध्यमातून तो विचारांची आदानप्रदान करायला लागला. जगात आज अनेक भाषा बोलल्या जातात. त्यापैकीच एक आगळीवेगळी, स्वतंत्र असलेली भाषा म्हणजे बंजारा समाजाची मातृभाषा होय. पुरातन काळापासून हा समाज आपल्या मायड भाषाला (मातृभाषा) आजतागायत जीवापाड जपत आला आहे. मग भलेही आजपर्यंत कित्येक स्थित्यंतरे झाली असत...
Article

घ्या आपल्या दातांची काळजी..!

सणांचा राजा श्रावण सुरू आहे. आता पुढचे सगळे दिवस व्रतवैकल्यं आणि सणांचे आहेत. सण म्हटलं की गोड खाणं आलं. अशा गोड पदार्थांमुळे कॅव्हिटी म्हणजे दातांमध्ये खड्डे पडण्याची समस्या निर्माण होते. मात्र थोडी काळजी घेऊन ही समस्या टाळता येते.    गोड खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरली पाहिजे. यामुळे दातात अडकलेले अन्नकण निघून जातात आण बॅक्टेरियांच्या वाढीला आळा बसतो. गोड खाताना सतत पाणी पित रहा. पाणी पणं चूळ भरण्यासारखंच असतं. गोड घासासोबत पाणी प्यायल्याने दातांवर साखरेचा थर साचत नाही. सलग दोन जेवणांमध्ये गोड पदार्थ खाणं टाळा. कॅल्शियमयुक्त पदार्थांचं सेवन करा. दूध, दही, चीज यासारख्या पदार्थांमुळे कॅव्हिटीजची समस्या कमी होऊ शकते. प्रत्येक जेवणानंतर चूळ भरा. यामुळे तोंड आतून स्वच्छ होतं आणि बॅक्टेरियांच्या वाढीला आळा घालता येतो. माउथवॉशचा वापर करता येईल. माउथवॉॅशमध्ये बॅक्टेरियाविरोधी घटक असतात. दिवसातून दो...
Article

वृत्तपत्रांच्या निकोप वाढीसाठी निस्वार्थी झटणारे जेष्ठ संपादक नेते : आप्पासाहेब पाटील

  सांगलीचे ज्येष्ठ संपादक *आप्पासाहेब पाटील यांचा आज वाढदिवस* आप्पासाहेब पाटील यांनी आपल्या जीवनामध्ये अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्याचबरोबर ज्या कामात ते हात घालतात अथवा जे काम हाती घेतात ते तडीस नेण्यासाठी तन,मन,धनासह अपार कष्ट व अभ्यास करीत असतात. यामुळे आप्पासाहेब पाटील यांचे व्यक्तिमत्व सर्वांना हवेहवेसे वाटते. ज्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल, त्या क्षेत्रातील बारकांव्याचा अभ्यास करून अनेकांना मदत करायची हा आप्पासाहेबांचा स्थायीभाव असल्यामुळे आप्पासाहेब पाटील यांचा महाराष्ट्रभर मित्रपरिवार फार मोठा आहे. सांगली जिल्हा युवक अध्यक्ष, सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ते ज्येष्ठ संपादक असा आप्पासाहेब पाटील यांचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा व अभ्यासपूर्ण आहे. या प्रवासामध्ये आप्पासाहेबांना जो मित्रांचा गोतावळा लाभला तो क्वचितच एखाद्याच्या नशिबी असतो, असे म्हणावे लागेल...
Article

जनसामान्याच्या अंतर्मनातील कोलाहल शब्दातीत करणारी गझल :’एक कैफियत ‘

"काळ्या अंधाराला आता तुडवत गेलो दुःखालाही मी सोन्याने मढवत गेलो !" आयुष्यातील अंधार पायदळी तुडवून, दुःखाला सोन्याने मढवित जाणारा मु.पो.शृंगारतळी, त.गुहागर,जि.रत्नागिरी येथील दिलदार,जिगरबाज गझलकार, कवी, कादंबरीकार प्रा.डाँ.बाळासाहेब लबडे यांचा 'एक कैफियत' हा पहिलाच गझलसंग्रह ,महाजन पब्लिकेशन हाऊस, पुणे यांनी प्रकाशीत केला आहे. यात छोट्या बहरपासून मोठ्या बहरातील एकूण 87 गझलांचा समावेश आहे. याची प्रस्तावना प्रख्यात जेष्ठ गझलकार ए.के.शेख, पनवेल यांनी लिहीली आहे. ते डाँ.लबडे यांचे गझलेविषयी व्यक्त होताना म्हणतात..." साहित्यकृतीतील ताल-तोल, लय, प्रतिमा, भाषा त्यांच्या व्यासंगावर अवलंबून असतो. लबडेसरांचं मन कलासक्त आहे. त्यांच्या गझलेची भाषा,आशय, सामान्य सर्वसामान्य माणसाच्या अंतर्मनाचा ठाव घेणारा आहे. आपल्या अनुभवाचे, विचारांचे,भावनांचे, प्रतिमांचे शब्दसिद्धीचे, स्वरसंहितेचे सर्व संचित सरांनी गझ...