Thursday, January 15

Article

Article

Ravishkumar : रवीश,तू जीवंतपणीच इतिहास झालाय !

प्रिय रवीश, तीन वर्षांपूर्वी तुला आशिया खंडाचे नोबेल समजल्या जाणाऱ्या मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि आता तुझ्यावर निघालेला एक चित्रपट टोरोंटोमध्ये प्रदर्शित झाला आहे.टोरोंटो फिल्म फेस्टिवल मध्ये परदेशी प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सिनेमा हॉलमध्ये शंभर मिनिटांचा हा चित्रपट जगाला प्रभावित करून गेला.भारतातील मीडियाने जरी अजूनपर्यंत तुझ्यावरील या चित्रपटाची दखल घेतली नसली तरी परदेशात मात्र तुझ्या प्रामाणिक पत्रकारितेचे खूप कौतुक होत आहे व यातच तुझ्या कार्याचा सन्मान आहे.मॕगसेसे पुरस्कार मिळाला तेव्हाही भारतीय मीडियाने तुला अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आताही तसेच झाले. परंतु तुला या बिकाऊ व लाचार मीडियाच्या प्रसिद्धीची गरज नाही. कारण सच्च्या देशप्रेमी लोकांच्या हृदयात तू घर केले आहे हे आम्हाला ठाऊक आहे.म्हणूनच परदेशातही तुझ्या नावाची आणि पत्रकारितेची सन्मानपूर्...
Article

विदर्भातील अष्टविनायक

गणपती सगळीकडंच बसतात. त्यातील पुुण्याचे गणपती विशेष प्रसिद्ध आहेत. कारण त्यांचा गाजावाजा झाला. परंतू विदर्भातही अष्टविनायक आहेत. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होईल. परंतू ते सत्य आहे. विदर्भातही अष्टविनायक आहेत.    १) नागपूरचा टेकडी गणेश महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेलं शहर म्हणून नागपूरची ओळख असून इथे एका टेकडी भागात एक गणपती आहे. त्याला गणेश टेकडी असं नाव दिलंं आहे.हे टेकडी मंदिर नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्टेशनजवळ असून ते नागपूरातील सर्वात मोठे गणपती मंदिर आहे. याला प्राचीन वारसाही लाभलेला आहे. या मंदिराचं बांधकाम अर्वाचीन असून राजे भोसले यांनी अठराव्या शतकात बांधल्याचे उल्लेख मिळतात. तशी मुुर्ती बरीच प्राचीन आहे. हा गणेश नवसाला पावतो असेही म्हटले जाते.  २)आदास्याचा विघ्नेश  आदासा हे नागपूर जिल्ह्यातील व सावनेर तालुक्यातील एक गाव. हे ठिकाण नागपूरपासून अंदाजे चाळीस किमीच्या अंतराव...
Article

दारूबंदी….!

मी अशा एका देशात राहते की, ज्या देशात 2020 या वर्षी covid-19 सारख्या भयानक रोगांचा सहवास होता. घरातून बाहेर सुद्धा जाता येत नव्हत. असं म्हणतात की आपल्या देशाचा कायदा खूप कडक असतो. पण तस वागणार कोणी नाही. आत्ता दारूचं बघा ना..तेवढ्या कडक lockdown मध्ये सुद्धा आपल्या सरकार ने दारू विकायला परवानगी दिली. का ? कारण देशाची अर्थव्यवस्था सांभाळायची होती. आपला देश हा विकसनशील मार्गावर आहे. माझा हा मुद्दा नाही की सरकार कसं आहे. काय आहे. मला माझ्या लेखातून एवढंच सांगायचं आहे की, आपल्या देशात जास्त प्रमाणात दारूची विक्री केली जाते.एकदा जर माणूस दारू प्यायला ना तो पूर्णपणे दारूच्या आहारी जातो.   आपल्याला असे अनेक किस्से ऐकण्यात येतात, की दारूमुळे घरदार उध्वस्त झालं, नोकऱ्या गेल्या, पण हे सर्वसामन्यांना परवडत नाही...मी तुम्हाला एक माझ्या सोबतच किस्सा सांगते. मी जेव्हा शाळेत शिकत होते ना. तेव्हा ground च...
Article

भाविकांचे श्रद्धास्थान श्री संत शंकर महाराज

* श्रीसंत शंकर महाराज यांचा प्रगटदिन (हरितालिका दि ३० ऑगस्ट) निमित्ताने महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.संत परंपरेचा वारसा हा अमरावती जिल्याला सुद्धा लाभलेला आहे.महाभारत काळापासून तर आधुनिक काळापर्यंत अनेक संत/महात्मे याच भूमीत जन्मलेले आहे.अशा या संताच्या भूमीमध्ये पूर्वीचा तिवसा आणि विद्यमान धामणगाव रेल्वे तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळखुटा या लहानशा खेड्यामध्ये श्री संत शंकर महाराज यांचा १९४५ मध्ये गरीब व निरक्षर कुटुंबामध्ये हरितालिका या दिवशी जन्म झालेला आहे. बुधाजी नागपुरे व भागीरथीबाई नागपुरे हे त्यांचे माता-पिता.श्री संत शंकर महाराज हे त्यांचे सातवे रत्न.   बाबाचा जन्म तसा अत्यंत दारिद्र्यमध्ये व्यतीत करणाऱ्या भूमिहीन कुटुंबामध्ये झालेला आहे.त्यातच श्री संत शंकर महाराज त्यांच्या बंधू पैकी सर्वात ज्येष्ठ.गरिबीच्या परिस्थितीमध्ये कुटुंबाला आपला सुद्धा आर्थिक हातभार असावा म्हणून शंकरबाब...
Article

एमपीएससीच्या अंतिम यादीत एकाचवेळी चमक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. यासाठी राज्यातून लाखो तरुण-तरुणी तयारी करतात. अहमदनगर जिल्ह्यात स्पर्धा परिक्षेशी संबंधित एक प्रेरणादायी अपघात घडला आहे. संसाराच्या वाटेवर मार्गक्रमण करणा-या एका पती पत्नीने स्पर्धा परिक्षेतील यशाच्या सप्तपदीला गवसणी घातली आहे.   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत पती पत्नीचे नाव एकाचवेळी झळकले आहे. सुरेश चासकर व मेघना चासकर अशी या उत्तीर्ण झालेल्या अधिकारी पती-पत्नीचे नावे आहेत. या दोघांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत वर्ग १ पदी निवड झाली आहे. हे दोघेजण आता लवकरच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास वन अधिकारी पदावर रुजू होतील.   सुरेश व मेघना हे दोघेही मे २०२२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. मेघना यांचे मूळ गाव कोपरगाव तालुक्यातील येसगाव...
Article

हरतालिका व्रत ; स्रीयांवर बंधन ठेवू नये.

दरवर्षी हरतालिका येते व सौभाग्यवती स्रीया तसेच कुमारिका मुलीही हा व्रत करतात.कशासाठी? तर इच्छित पती मिळावा. हा इच्छित पती मिळावा म्हणून कुमारीका, तर सौभाग्य अखंड टिकावं म्हणून सौभाग्य वती स्रीया हा व्रत करीत असतात. या दिवशी दिवसभर स्रीया उपवास करतात. रात्रीही त्यांना उपवास असतो. मग शरीरातील पोषकतत्वे कमी झाल्याने चक्कर येतात. यातच जीवही जावू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही! याच काळात उपवास केल्यानं शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास येणा-या संभाव्य धोक्याला कोणताच व्यक्ती वाचविणार नाही नव्हे तर वाचवायला येणार नाही. मग ज्या देवासाठी उपवास केला. तो देवही वाचविणार नाही.   हरतालिका व्रताची कथा काहीशी अशी आहे. पर्वतराजाची मुलगी ही भगवान शंकरावर प्रेम करीत होती. पण पित्याची इच्छा होती की तिनं श्रीविष्णूशी विवाह करावा. मग आपले वडील आपल्या मनात असलेल्या आपल्या पतीला मिळू देणार नाही. जबरदस्तीनं आप...
Article

पोळा खरंच बैलासाठी ना….!

आम्ही श्रावण महिण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात अमावस्येला पोळा हा सण मनवतो.आदल्या दिवशीपासुनच बैलाला अाराम देत त्याने वर्षभर शेतात काम केल्याने त्याला आराम व्हावा म्हणुनच त्याचे खांदे तेल आणि हळदीने शेकुन देतो.आपल्याला तेव्हा हे कळत नाही की वर्षभर काम करीत असतांना जे बैलाचे खांदे दुखतात,ते खरंच एकच दिवस शेकल्यानं बसेल काय?तरीही आपण आपल्या समाधानासाठी करतोय ते...त्यात बैलाचं हित नसतंच. बैलपोळा साजरा करणं हा आपला सण.वर्षभर राबणा-या बैलाला एक दिवस आराम मिळावा म्हणुन आपला या सणाच्या निमित्यानं का होईना व्रत पाळणे हा बहाणा.खरं तर खोलात जावुन विचार केल्यास तो बैलाचा सण वाटत नाही तर आपला स्वतःचाच सण वाटतोय.आम्ही बैलाचे खांदे शेकुन झाल्यावर दुस-या दिवशी त्याला चांगलं वैरण खावु घालतो.या दिवशी त्याला कामालाही लावत नाही.दुपारी लवकर त्याला सजवुन त्याला पोळ्यात नेतो.तसेच तोरण तुटताच त्या बैलांना धावत आ...
Article

शाळेतही मुली सुरक्षित नाही..!

शाळा म्हणजे विद्येचं मंदीर, मात्र सध्या शाळांमध्येही अगदी घृणास्पद प्रकार समोर येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे दिल्लीमध्ये शाळांचा दर्जा सुधारल्याचे बोलले जात असताना व न्यूयॉर्क टाइम्सने दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्याची दखल घेतली असताना दिल्लीच्या एका महानगरपालिका शाळेत अत्यंत विकृत प्रकार घडल्याचे समोर आल्याने शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये अज्ञात व्यक्तीने आठ वर्षांच्या दोन मुलींचे कपडे उतरवल्याची घटना समोर आली आहे. ही व्यक्ती या मुलींच्या वर्गात गेली, त्यानंतर त्याने या मुलींचे कपडे उतरवले. त्यानंतर या व्यक्तीने स्वतःचेही कपडे उतरवून वर्गासमोर लघवी केली. दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी याबाबत माहिती दिली. ही शाळा दिल्लीच्या भजनपुरा भागातील असल्याचे त्यांनी सांगितले.धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेबाबत मुलींनी शाळेती...
Article

क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणारी सर्वश्रेष्ठ कविता

  आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही आपण नुकताच साजरा केला आहे. जसजसा काळ बदलला तसतसा जीवन जगण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल व्हायला लागला. संयुक्त कुटुंब पद्धतीत शांततामय आणि आरामात जीवन जगणारा माणूस विभक्त कुटुंब पद्धतीच्या तडाख्यात सापडून कुटूंबाची मुळ चौकटच मोडीत काढायला निघाला. आचारविचार बदलले. माणसाची विचार करण्याची पद्धत बदलायला लागली. जीवन जगण्याची वैचारिक बैठक मोडकळीस आली. संयमाचा बांध फुटायला लागला. समाजाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवल्या जावू लागले. नव्या कल्पना आणि नव्या विचारांचे वारे सुसाट वेगाने ओसंडून वाहत असताना जुन्या धाटीतील शांत आणि संयमी दिव्याची ज्योत कशी तेवत ठेवावी अशा द्विधा मनस्थितीत असतांनाच संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या अमूल्य विचारांचा ठेवा आठवल्या शिवाय राहत नाही. शेकडो वर्षांपूर्वी विज्ञानवादाचा स्पर्शही जेमतेम झाला असावा अशा...
Article

व्हायरल आणि वास्तव…

परवा खोतवाडीच्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानिमित्ताने समाजात उमटलेले प्रतिबिंब न्याहाळताना... असे व्हिडिओ किंवा अशा बातम्याचे मथळे पाहिले की अंतर्मुख व्हायला होतं. आणि मग अनेक तर्क वितर्क, शिव्या शाप, पोलिसीखाकी, घराण्याची बदनामी, लेकासुनेवर कार्यवाही व्हावी इतपत सामाजिक दडपण, इ. असे एक ना अनेक चर्चा करत विविध समाजसुधारक जागे होतात आणि प्रत्येकजण आपल्या पद्धतीने शक्कल लढवतात. खरंतर अशा घटना घडायलाच नको हेही तितकच खरं आहे. परंतु घटनेची अगोदरची पार्श्वभूमी अथवा त्या घरातली वास्तव परिस्थिती कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. ही एक पुढारलेल्या समाजातील शोकांतिका म्हणावी लागेल फार वर्षांपूर्वी सासुरवास नावाचा डंख समाजामध्ये खोलवर रुजला होता. त्याची पाळेमुळे एवढे खोलवर रुजले होते की अगदी अनेक समाजसुधारकांची आणि साधुसंतांची देखील या त्रासातून सुटका झाली नव्हती. अज्ञान, अंधश्रद्धा...