Saturday, March 7

Article

Article

खरचं शेतक-याची बरोबरी करणं…देवाला पण शक्य नाही….!

सध्या दिवाळी मुळे माझ्या साड्यांच्या दुकानामध्ये गर्दी सुरूय. परवा अशाच गर्दी मधे एक २७_२८ वर्षाचा तरूण दुकानात आला. सुरवातीला तो दारातच उभा राहून आतमधे उचकून उचकून पाहू लागला. माझ लक्ष होतच. अर्थातच पहरावावरून तो शेतकरी वाटत होता. मी म्हटलं काय म्हणताय दादा. काय हवय. हळूच शब्दात तो ओठातल्या ओठात बोलला साडी हवीय... मी म्हटले थांबा थोडा वेळ. तो म्हटला हो हो आटपून घ्या तुमचं. थोडी शांतता झाल्यावर दुकानात एक दोनच बायका होत्या तेव्हा मी त्या तरूणाकडे वळून म्हटले की हा दादा सांगा कशी साडी हवी तुम्हाला... काय रेंज मधे हवी. तो म्हटला या ताईंच होवून जाऊ द्या...   मी म्हटले त्या अजून पसंत करताय आणि कोणी न कोणी कस्टमर येणे सुरूच राहील. सांगा तुम्हाला काय हवय. थोड बिचकत तो म्हटला की ताई मला माझ्या बायको साठी ५००_६०० पर्यंत जरी काठाची साडी हवीय. त्याचे बोलणे ऐकून दुकानात असलेल्या त्या बायका माझ्याकडे ...
Article

दिवाळी : संस्कृती जपण्याचा सण

दिवाळी म्हटले की लहानापासून तर मोठ्यापर्यंत आनंदाचे ठिकाण राहत नाही.दिवाळी हा आपल्या संस्कृती मधील सर्वात मोठा सण आहे ही भावना थोरा मोठ्यांची असते. आपण आपल्या संस्कृतीसह जन्माला येत नाही. परंतु एका विशिष्ट संस्कृतीत आपण जन्म घेत असतो. मग जन्मल्यापासून आपण ती ‘संस्कृती’ आत्मसात करत असतो. संस्कृती ही एक व्यापक संकल्पना आहे, जी आपण अविरतपणे व जिवंत असे पर्यंत पाहत असतो. ही गोष्ट आपण कधीच विसरू नये की, संस्कृती आपल्याला दिसते,आपण अनुभवतो ,आपण विविध गोष्टीतून शिकतो ती एवढीच नसून ती अधिक व्यापक प्रमाणात आहे. मानवाच्या जीवनाचा शोध घेण्यासाठी,किंवा त्याचे जीवन घडविण्यासाठी ‘संस्कृती’ हे वरदान ठरते. कारण संस्कृती ही एका जागी स्थिर नाही, तर ती एक गतिशील, क्रियाशील व प्रक्रियात्मक संकल्पना आहे. आपण बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत गेलो की संस्कृतीत वाढ होत राहते.याच संस्कृतीला जपण्याचा आपण मानवाने व्य...
Article

Vasanrao Naik : ‘शेतकऱ्यांचे कैवारी वसंतराव नाईक’

वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ,कायदेतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते.त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रदीर्घ कारकीर्द लाभली. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या आड वळणावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावात बंजारा समाजातील शेतकरी कुटुंबात फुलसिंग व होनुबाई नाईक यांच्या पोटी १ जुलै १९१३ रोजी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला.महानायक वसंतराव नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक समजले जातात.माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी “वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत.” या शब्दात नाईकांचा गौरव केला. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना मदतीच्या योजना राबवल्या. नाईक यांना ‘शेतकऱ्यांचा जाणता राजा’, ‘हरितयोद्धा’ म्हणूनही संबोधतात.काहींनी त्यांचे ‘आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत’ या...
Article

आज कलाम साहेब असते तर…

वर्तमान पेपर 'पुढारीने' घडवून आणलेल्या उपक्रमात अनेक शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला पाहून खरंच समाधान वाटलं. कित्येक विद्यार्थी कलाम साहेबांच्या वेशभूषेत वर्तमान पेपर वाटताना दिसत होते. एवढेच नव्हे तर "मी डॉक्टर अब्दुल कलाम बोलतोय" या सदराखाली आपले स्वगत व्यक्त करताना पाहायला मिळाले. यानिमित्ताने का होईना कित्येक विद्यार्थ्यांनी डॉक्टर कलाम यांचे चरित्र चाळायला सुरुवात केली.   डॉक्टर कलाम साहेब बनून रस्त्यावर उतरलेली मुलं पाहताना खरंच कलाम साहेब असते तर त्यांना काय वाटलं असतं? पुढारीने राबवलेल्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला हे पाहून कदाचित कलाम साहेबांना पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटलं असेल. ज्या काळात त्यांना वाचनाची भूक भागवण्यासाठी वर्तमान पेपर विक्रेता व्हावे लागले, ज्ञानाची खूप काय असते? वाचनानंतर मिळणार समाधान काय असतं? हे सांगण्यापेक्षा अनुभवाने जास्त समजतं, हे कला...
Article

A P J Kalam : वाचते व्हा….

वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष लेख(एपीजे अब्दुल कलाम एक महान वैज्ञानिकच नव्हे तर एक द्रष्टे विचारवंत आणि थोर शिक्षक होते. असंख्य युवकांचे ते प्रेरणास्थान आहेत. विद्यार्थ्यांना प्रेरणा देतानाच त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्याचे बळ कलाम यांच्या विचारांमध्ये आहे. त्यामुळेच 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून आपण साजरा करत असतो.)एपीजे अब्दुल कलाम एक महान वैज्ञानिकच नव्हे तर एक द्रष्टे विचारवंत आणि थोर शिक्षक होते. असंख्य युवकांचे ते प्रेरणास्थान आहेत. विद्यार्थ्यांना प्रेरणा देतानाच त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्याचे बळ कलाम यांच्या विचारांमध्ये आहे. त्यामुळेच 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून आपण साजरा करत असतो.लहानपणी शाळेत असतांना शिक्षकांकडून आपल्याला प्रथम अक्षरओ...
Article

Rashtrasant : गुरुकुंज व ग्रामगीता

'सबके लिये खुला है,मंदीर यह हमारा' व 'विश्व स्नेहका ध्यान धरे,सबका सब सम्मान करे',गुरुकुंजाच्या महाद्वारावरील हे बोधवाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेते.गुरुकुंज आश्रमाची निर्मीतीच मूळात अशा बोधभावनेतून जगदोद्धाराकरिता वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ह्यांनी करुन ठेवलेली आहे.तिथे आलेल्या प्रत्येकालाच काही ना काही स्फूर्ती आश्रमातल्या आतील प्रत्येक द्वारावर लिहिलेल्या बोधवाक्यातून मिळत असते.१९३५ साली एका झोपडीतून निर्माण झालेल्या या आश्रमाचे आता वटवृक्षात रुपांतर झालेले आहे.गुरुकुंज हा नुसता आश्रम नसून ते 'मानवतेचे विद्यापीठ' ठरावे.तेथील प्रार्थना मंदिरातील सिंहासनावर कोणत्याही देवी-देवतांची मूर्ती विराजमान नसून सर्वधर्मसमभावाचे जगातील हे एकमेव मंदीर ठरावे.तेथील गाभाऱ्यात बसून कोणत्याही देशातील,धर्मातील मुमुक्षुला आपल्या अंतस्थ असलेल्या भावाने ध्यान,प्रार्थना करता येते.लौकिकार्थाने गुरुकुंज हा ...
Article

मोबाईलच्या वापरामुळे भरकटलेली पिढी

आपल्या देशात covid-19 हा भयानक रोग आला. त्यामूळे clg ,classes,schools सगळे बंद आल्या. Online teaching सुरू झाले. Lockdown मध्ये मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, and इतर गॅजेट्सची सवय लागली. आता ही सवय कमी करत असताना पालकांना मुलांचा मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला दिसून येत आहे.आधी मुलांना काही वेळेसाठी मोबाईल हातात मिळत होता. शाळा, classes, मैदानी खेळ, यात वेळ जात होता. पण आत्ता घरी बसून मुल मोबाईल स्क्रीनच्या अत्यंत जवळ गेली आहेत.आजकाल आपण बघत आहोत की, मुल तासनतास मोबाईल मध्ये घुसून असतात. अभ्यास, मित्रमैत्रीणीशी बोलण, खेळणं हे सर्व फोन मध्येच होत आहे. पण पालकांना माहिती असायला हवं की, मोबाईल मुळ काय काय आजार होऊ शकतात, फोन use कारण किती धोकादायक आहे. आतच्या मुलांना तर वेगळीच सवय लागली आहे.हातात मोबाईल असल्याशिवाय जेवण पण करत नाही.आणि ही सवय लावायला पालकही तितकेच जबाबदार आहेत.जेवण करत नाही म्ह...
Article

मानवतेचे प्रणेते : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

विदर्भातील यावली या गावाने एक सुपुत्र जन्माला घातला. आणि संपूर्ण विश्व माझे घर आहे असा व्यापक विचार करणारा राष्ट्रसंत या विदर्भात उदयास आला. समाजसुधारणेसाठी बेभान झालेल्या त्या अवलीयाचे नाव होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.राष्ट्रसंताच्या घरी त्यांचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा मानत असत.त्यामुळे लहानपणापासून विठ्ठल भक्तिचे बाळकडू त्यांना घरीच मिळाले. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या कार्याचा ठसा बालपणीच राष्ट्रसंताच्या मनात रोवल्या गेला.राष्ट्रसंताचे मूळ नाव माणिक होते.माणिकने वर्ग तिसरीतून आपली शाळा सोडून दिली व ध्यान, प्रार्थना, भजन यामध्ये बाल माणिक रमू लागला. एक दिवस माणिकचे गुरू श्री आडकुजी महाराज यांच्याशी त्यांची भेट झाली. आणि आता इकडे तिकडे भटकणारा माणिक गुरू आज्ञे प्रमाणे अभंग रचू लागला.लोक आता माणिकला तुकडोजी महाराज या नावाने ओळखु लागले. ईश्वरभक्ती, सामाजिक जनजागृतीचा प्रसा...
Article

भारतीय संविधानातील धर्म स्वातंत्र्याचा अर्थ एक मिमांसा

भारत देश हा एक विविधतेने नटलेला, विविध जाती धर्म समुदायाला घेवून चालणारा आणि धार्मिकतेला विशेष प्राधान्य़ देऊन जीवन कंठणारा देश आहे. तरी पण विश्वात तो एक मोठा लोकशाहीवादी देश म्हणून त्याची ओळख सर्वश्रूतच आहे. विशेषत: बुध्द़ भुमी म्हणून भारताची विशेष ओळख आहे. भारत हा एक संघ एक समातेने वाट चाल करणाऱ्या पैकी आहे हा देश विविध संप्रदायाने पंथाने,धर्माने खुपच समृध्द़शाली झाला आहे. आणि हा देश प्रगती प्रथावर नेण्याच काम आपण जर पाहिल तर सम्राट अशोक काळा पासून या देशाने तत्कालीन राज्य़कर्ते सुध्दा पाहिले आहे. या भारतात युगानुयुगे चालत आलेल्या परंपरा या देशाला खुपच दुरवर नेऊन ठेवतात हाही मोठा प्रश्ऩ आहे या संस्कृतीने युगानुयुगे फक्त़ विषमतेचे संवर्धन करुन एक समृद्ध अशी धार्मिक चळवळ केली आहे पुरातन काळापासून अद्ययापर्यत त्यामध्ये परिवर्तन होतांना आढळत नाही. आणि परिवर्तन झाले तरी म्हणाल असा त्या परिवर...
संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ
Article

संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ

संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ जगभरातील विविध देशाच्या संविधाना पैकी भारतीय संविधान हे लोकशाही प्रधान असलेले सर्वश्रेष्ठ संविधान आहे.विविध जाती,धर्म,पंथ बोलीभाषा आणि रूढी,प्रथा,परंपरा असलेल्या भारतासारख्या विशालकाय देशातील समस्त नागरिकांना एका धाग्यात गुंफण्याची किमया ही भारतीय संविधानाने करून दाखवीली आहे.सात दशकांचा कालावधी उलटूनही भारतीय संविधान अबाधित आहे. घटनाकारांची दूरदृष्टी यासाठी कारणीभूत आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले बुद्धिकौशल्य पणाला लावून आणि अहोरात्र कष्ट उपसून ही सर्वसमावेशक अशी भारतीय राज्यघटना लिहिली.भारतीयासाठी ही एकप्रकारची अनमोल अशी देणगीच म्हणावे लागेल. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा विधिग्राह्य आणि नियमानुसार सुव्यवस्थितरित्या चालावा यासाठी भारतीय संविधानाचा अंगीकार करण्यात आला.भारतीय संविधान सभेमध्ये एकूण २९६ सदस्य आणि मसुदा समि...