Saturday, March 7

Article

Article

खरे वारकरी…

वारकरी धर्म हा महाराष्ट्राच्या मातीतील अत्यंत लोकप्रिय धर्म आहे.आमच्या संतांनी वारकरी धर्माची पताका संपूर्ण देशभरात पोहचवली आहे.संत नामदेव,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,सावता महाराज, संत गोरा महाराज,सेना महाराज,जगनाडे महाराज यासारख्या अनेक संतांनी १३ व्या शतकापासून तर आधुनिक काळामधे संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्व संतांनी वारकरी धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आहे.या संतांनी आपापल्या कालखंडात आपल्या भजन,कीर्तन,प्रवचन आणि साहित्यातून लोकांचे खरे प्रबोधन केले.लोकांना भक्तीचा खरा मार्ग समजून सांगितला.देव कुठे आहे आणि खरी देवाची भक्ती कशात आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने आमच्या संतांनी येथील कष्टकरी,कामकरी, शेतकरी वर्गाला समजावून सांगितले. विठ्ठल हे समस्त बहुजन समाजाचे दैवत आहे.या विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून आमच्या अनेक संतांनी बहुजन समाजाची वैचारिकदृष्ट्या नांगरणी आणि वखरणी केल...
Article

काॅलेज जीवनातील किस्सा…

* परदेशी परदेशी जाना नही... जो वाचनार तो पोट धरून हसनारपरदेशी परदेशी जाना नही हे मी कॉलेजला असताना आमीर खान आणि करिष्मा कपूर यांच्या राजा हिंदुस्थानी या सिनेमातील प्रचंड गाजलेलं गाणं. आजही मी हे गाणं कुठं ऐकल्यावर गाण्यात मग्न होऊन जातो. अन् जेव्हा कधी हे गाणं ऐकेल त्यावेळी प्रचंड हसू येतं. मन काही क्षणात कॉलेजमध्ये वर्गात घेऊन जातं. या गाण्याबरोबर असलेली अनोखी आठवण/किस्सा तुमच्या समोर मांडतोय....आमच्या वर्गात स्नेहल परदेशी नावाची मुलगी होती, भिंगार वरून यायची. अतिशय सुंदर, सडपातळ, काळेभोर वाऱ्यासोबत हवेत लहरणारे केस, सरळ नाक आणि नाकासारखीच सरळ चालणारी, बोलके डोळे, कधी नजरानजर झालीच तर तिचे डोळे आपल्याशी बोलताय असा भास व्हायचा, एकंदरीत पाहताक्षणी कुणीही प्रेमात पडेल असे सौंदर्य.. आम्ही सगळे मित्र सतत तिच्याकडे पाहत राहायचो, पण तिने जर कधी चुकुन आमच्याकडे पाहिले तर धन्य झाल्यासारखं व...
Article

इंग्रजीच फॅड….

नेहमी प्रमाणे मी आपला संध्याकाळी चालायला आमच्या इंथे असणाऱ्या राजीव गांधी क्रीडागणात गेलो. माझ्या अगोदर ही तिथे भलतेच नुमने रोज असतात. खर तर मी गेलो की पहिली नजर फिरवून घेतो. आहो तस काही नाही हो उगाच तुमच्या मनात काळ येत ,नजर ह्या साठी फिरवतो तिथे असणारी मंडळी आणि त्यांचा व्यायाम ,कधीच न पाहिलेला व्यायामाचा प्रकार रोज दिसतो म्हणजे दिसतो. कोण कसला व्यायाम करेल आणि कुठून आसन शोधून आणेल त्यांची त्यांना माहीत बिचाऱ्या रामदेव बाबांना ही माहीत नसतील अशी आसन इथं नजरेस पडतात.हा आता मी इतका ही नाकापुढे चालणारा नाही बर की जे आजूबाजूला सुंदर दिसत त्या कडे एक कटाक्ष ही टाकणार नाही.मी सुंदर दिसल की कटाक्ष टाकतो ,आणि मनात म्हणतो बर का व्हावं " काय सुंदर आहे. कधी तरी मात्र मी मनात म्हणतो काय सुंदर आहे राव आणि अचानक ती सुंदरी माझ्या कडे पहाते त्या वेळी वाटत हिला मनात बोललेलं समजत तर नाही ना! असो विष...
Article

साखरे ऐवजी गुळ का वापरावा…?

उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन- B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात. याठिकाणी गुळ खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे.* गुळ खाण्याचे हे आहेत फायदे :* हिमोग्लोबिन वाढवते-ऍनिमिया दूर करण्यासाठी गुळ खाणे फायदेशीर असते. 100 ग्रॅम गुळामध्ये 11 mg लोहाचे प्रमाण असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास गूळ फार उपयुक्त असते.* रक्तदाब नियंत्रित ठेवतो-गूळ खाण्यामुळे ब्लडप्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते. कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.* पचनशक्ती सुधारते- ...
Article

प्रिय बाबासाहेब,

प्रिय बाबासाहेब, तुमच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या जगभरातील लोकांसाठी आजचा दिवस तसा दुःखाचा आहे. परंतु तुमच्या विचारांमुळे,संघर्षामुळे व बलिदानामुळेच आज कोट्यावधी लोक मानवी अवस्थेमध्ये आले आहेत.स्वतः दुःख सोसून तुम्ही असंख्य लोकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.हातात शस्त्र न घेता व रक्ताचा एक थेंबही न सांडवता एक व्यक्ती किती मोठी क्रांती करू शकतो याचे तुम्ही जगातील मोठे उदाहरण आहात. दुर्दैवाची बाब म्हणजे आम्ही अजूनही तुम्हाला समजून घेऊ शकलो नाही.अजूनही आम्ही तुम्हाला जातीच्या बाहेर काढू शकलो नाही. अजूनही आम्ही तुमचे उपकार,तुमचे कार्य,तुमचे देशप्रेम समजून घ्यायला तयार नाही.या देशातील वर्चस्ववादी,विषमतावादी व्यवस्थेने आमच्या मनात आणि डोक्यात तुमच्याविषयी विष पेरून ठेवले आहे व आजही ते पेरण्याचे काम ताकदीने सुरू आहे.त्यामुळे तुमचा जीवघेणा संघर्ष अजूनही या देशातल्या लोकांना समजलेला नाही.ज...
Article

बदलते लग्न सोहळे..!

असं म्हणतात कि लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. पृथ्वीवर फक्त काडीमोड होतो.गमतीचा भाग सोडून देऊ. भटक्या अवस्थेतील माणूस जेव्हा पाण्याचे साठे पाहून स्थिर झाला त्या वेळी लग्न हा प्रकार अस्तित्वातच नव्हता. एखादी सुंदर दिसणारी स्री असेल तर टोळीचा म्होरक्या तिच्यावर आपला हक्क सांगायचा.कोणीही कोणाबरोबर राहू शकत होते. पण मग यातून होणाऱ्या संततीचे काय ? तिची जबाबदारी नेमकी कोणी घ्यायची हा प्रश्न पडला. मग पुढे जाऊन गाळपेरात पीक घेण्याची म्हणजेच शेतीची पद्धत सुरू झाली. गावे वसली आणि त्यानंतर एक हक्काचा जोडीदार असावा, कुटुंब असावं यासाठी लग्न पद्धतीची सुरुवात झाली. हा झाला खूप प्राचीन इतिहास. त्या काळी लग्न म्हणून स्थानिक देवतेपुढे हार घालणे वगैरे खूप मर्यादित विधी होते.त्या नंतर आपल्या आजी आजोबांच्या काळात तर बैलगाडीने वऱ्हाड निघायचं नवरीच्या गावी.मजल दर मजल करीत हा काफिला चालायचा आणि वाट...
Article

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संविधानाचे निर्माते ते एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संविधानाचे निर्माते ते एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. आंबेडकर हे केवळ संविधानाचे निर्मातेच नव्हे तर ते एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञही होते.डॉ.भीमराव आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना बनवण्यात तर महत्त्वाची भूमिका बजावली. शिवाय त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून देशाच्या उभारणीतही मोलाचे योगदान दिले.डॉ. भीमराव आंबेडकर यांचे नाव येताच भारतीय संविधानाचा उल्लेख आपोआप येतो. संपूर्ण जग त्यांना एकतर भारतीय राज्यघटनेचे निर्माते म्हणून किंवा भेदभाव करणाऱ्या जातिव्यवस्थेवर कठोर टीका करणारे आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवणारे योद्धा म्हणून स्मरण करतात .या दोन्ही प्रकारात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अद्वितीय भूमिकेला कमी लेखता येणार नाही. पण एक दिग्गज अर्थतज्ञ म्हणूनही डॉ.आंबेडकरांनी देशाच्या आणि जगाच्या पटलावर अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे.डॉ.आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाणारे देशा...
Article

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली अभ्यासाने व अंगिकारणानेच.!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ज्ञ, समाजशात्रज्ञ, मानववंश, तत्वज्ञान, बुद्धिझम यांचे ही गाढे अभ्यासक होते. परंतु त्यांची या विषयाची अवतरणे दिली जात नाहीत. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे अवतरण, " या देशाच्या संस्कृतीची मुख्य समस्या ही बौद्धिक अप्रामाणिकता आहे. ही खरोखर आपल्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपणास ६ डिसेंबर १९५६ ला सोडून गेले. आज ६६ वर्ष झालीत परंतु अजूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांपर्यंत पोहचू शकले नाहीत.आपण कुठल्याही महापुरुषाची जयंती व पुण्यतिथी साजरी करतो ही फक्त त्या दिवसा पुरतीच असते. साधारणतः ह्या दिवशी हार, तुरे, पुष्प व त्या महापुरुषांबद्दल गौरवोद्गार काढले जातात. ह्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याचा उद्देश हा या महापुरुषांना स्मरण करणे, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचविणे हाच असतो. परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला डॉ. बाबासाह...
Article

तूच आमचा भाग्यविधाता

संविधानासारखी अनमोल ठेव समस्त भारतीयांसाठी ठेवून सर्वांना सन्मानाने जगण्याची नवी उमेद निर्माण करून देणाऱ्या महान सूर्याचा अस्त 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. आणि भारताला नवी दिशा देणारा तेजस्वी युगपुरुष काळाच्या पडद्याआड गेला. 5 डिसेंबरच्या रात्री 'बुद्ध आणि त्याचा धम्म' या ग्रंथाच्या दोन प्रकरणाच्या प्रती सोबत घेऊन त्याची तपासणी केली व दुसऱ्याच दिवशी डॉ आंबेडकरांचे निधन झाले. म्हणजेच मरणाच्या शेवटच्या दारात असताना सुद्धा ज्या मानवाने आपले लक्ष हे विचलित न होऊ देता फक्त आणि फक्त जनकल्याणासाठी आपले आयुष्य खर्च केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो पण त्यांची ओळख नुसती संविधानाचे शिल्पकार नसून, एक महान समाज सुधारक, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ,राजनीतिज्ञ, महान तत्वज्ञ, अशी सुद्धा आहे. न्याय मंत्री म्हणून त्यांनी आयुष्यभर मागासलेल्याचा, दलितांच्या अन्यायाविरुद...
Article

बाबासाहेब तुम्ही होतात म्हणून..

हक्क कर्तव्याचे भान बाबासाहेब, तुम्ही आम्हाला दिलं. खरं सांगू बाबासाहेब, तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने माणूसपण दिलं.आजवरच्या इतिहासात आत्तापर्यंत कित्येक महात्मे जन्माला आले आणि आपल्या अनमोल कार्याने अजरामर झाले. एका कनिष्ठ जातीत जन्माला येऊनही खऱ्या अर्थाने विश्वरत्न म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन. असं एकमेव व्यक्तिमव कि ज्यांचे पूर्ण विश्वात पुतळे उभारले गेले आहेत. माणसाला कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे ठरवण्याचा अधिकार नसला तरी मिळालेल्या जन्माचे आपल्या कार्याने सोने करणे महत्त्वाचे असते. सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून आजही पूर्ण जगात भारताची राज्यघटना आदराने संबोधिली दिली जाते. आत्ता दीप भव या बुद्धांच्या शिकवणी प्रमाणे बाबासाहेब स्वतःच स्वतःचा प्रकाश झाले आणि आपल्या अनुयायांनाही त्यांनी अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर निघण्याचा ...