बदलते लग्न सोहळे..!
असं म्हणतात कि लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. पृथ्वीवर फक्त काडीमोड होतो.गमतीचा भाग सोडून देऊ. भटक्या अवस्थेतील माणूस जेव्हा पाण्याचे साठे पाहून स्थिर झाला त्या वेळी लग्न हा प्रकार अस्तित्वातच नव्हता. एखादी सुंदर दिसणारी स्री असेल तर टोळीचा म्होरक्या तिच्यावर आपला हक्क सांगायचा.कोणीही कोणाबरोबर राहू शकत होते. पण मग यातून होणाऱ्या संततीचे काय ? तिची जबाबदारी नेमकी कोणी घ्यायची हा प्रश्न पडला. मग पुढे जाऊन गाळपेरात पीक घेण्याची म्हणजेच शेतीची पद्धत सुरू झाली. गावे वसली आणि त्यानंतर एक हक्काचा जोडीदार असावा, कुटुंब असावं यासाठी लग्न पद्धतीची सुरुवात झाली. हा झाला खूप प्राचीन इतिहास. त्या काळी लग्न म्हणून स्थानिक देवतेपुढे हार घालणे वगैरे खूप मर्यादित विधी होते.त्या नंतर आपल्या आजी आजोबांच्या काळात तर बैलगाडीने वऱ्हाड निघायचं नवरीच्या गावी.मजल दर मजल करीत हा काफिला चालायचा आणि वाट...
