Saturday, March 7

Article

Article

हमारी अधुरी कहाणी !

ज्या गोष्टींना कुणीही नाकारू शकत नाही, त्या गोष्टींना युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे शाश्वत सत्य असे म्हणतात. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे पहाटेचं स्वप्न...असं म्हटलं जातं की, पहाटेला बघितलेलं स्वप्न खरं ठरत असतं. तर असेल बहुतेक...एकदा अशाच एका पहाटेला गुलाबी बोच-या थंडीत मखमली दुलईमध्ये स्वत:ला टेक अप करून मी स्वप्नांच्या आटपाट नगरीत जावून लँड झालो. आणि... पुढे बघतो तर काय?   तिच्या प्रशस्त घराच्या उंबरठ्यावर ती उभी असताना माझी नजर तिच्यावर पडताच क्षणी तिचा तो निरागस चेहरा, तिचं स्मितहास्य, तिचा शांत व मनमिळाऊ स्वभाव यामुळे माझ्या ह्रदयरुपी कॅमे-याने तिची प्रतिमा टिपून माझ्या मनपटलावर चित्रित केली. तेव्हापासून माझं तिच्यावर प्रेम बसलं आणि स्वप्न माझं फुलणार, असं वाटायला लागलं. माझ्या आयुष्यातील तो एक अनमोल ठेवा आहे. पण हे स्वप्न सत्यात उतरणार काय? याची अनामिक भीती मनात साचलेली. आपलं पहिलं प्रेम कसं...
Article

समतेची क्रांती – महाड सत्याग्रह

महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह २० मार्च १९२७ रोजी झाला.त्यानंतर अनेक वर्षे हा दिवस ' समता दिन ' म्हणून साजरा केला जातो.आतापर्यंत समतेसाठी अनेक आंदोलने झाली.परंतु समतेसाठी ' जलक्रांती ' आंदोलन करणारे होते समतेचे खंदे पुरस्कर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर.इ.सन.१९२६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले.इ.स.१९२७ च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.महाड येथील चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.देशातील दलितांना उच्चवर्णीयांकडुन खुप अपमानास्पद वागणूक मिळत होती. अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास किंवा पिण्यास साधा अधिकार देखील नव्हता. ४ ऑगस्ट १९२३ रोजी ब्राम्हणेतर पक्षाचे नेते सी.के.बोले यांनी मुंबई प्रांतांच्या विधिमंडळा...
Article

गजरा का माळावा ? त्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे ?

* स्त्री चेआरोग्य सांभाळतो गजरा.गजरा हा "old fashioned" आहे म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत का ?...गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील ९०% स्त्रीया आजही रोज गजरा माळल्या शिवाय नोकरीला जात नाहीत.'गजरा - सौंदर्य' या दोहोंमधील संबंध सर्वश्रुत आहेच. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. पण निसर्गात पाहिल तर मोगरा, चाफा, बकुळी यांना बहर आला आहे. काळजी आहे निसर्गाला आपली. या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातचं केली गेली आहे हे लक्षात येतय का ?आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला...
‘विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का?
Article

‘विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का?

'विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का? जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे, तसतशी सज्जन आणि सभ्य लोकांची अस्वस्थता वाढतांना दिसते आहे. तिकडे मंबाजीच्या हालचालीही वाढत आहेत. मंबाजीची पिलावळ सर्वशक्तीनिशी कामाला लागली आहे. त्यांची भिस्त त्यांच्या स्वतःच्या कुटीलपणावर आहे. देशाच्या लुटीतून गोळा केलेल्या पैशावर आहे. द्वेष हा त्यांचा सर्वात मोठा आधार आहे. चन्द्रभागेच्या पाण्यात विष मिसळण्याची धडपड ते जिवाच्या आकांताने करताना दिसत आहेत. पंढरीचे पावित्र्य अबाधित राखण्याची जशी शेवटची संधी वारकऱ्यांसाठी आहे, तशीच मंबाजीच्या पिलांसाठी देखील, पंढरपूर आणि संपूर्ण चंद्रभागा ताब्यात घेण्याची ती शेवटची संधी आहे. दोन्ही बाजुंनी ’करा अथवा मरा’ अशीच २०२४ची लढाई आहे. विमान विकलं, रेल्वे विकली, एलआयसी विकली, जंगलं विकली, समुद्र विकला, तसे पंढरपूर आणि चंद्रभागा अडाणी-अंबानीच्या नावाने करण्याच्या हालचाली स...
Article

प्रत्येकाची आई महान, तेवढीच महत्वाची.!

आई म्हटलं तर आई या शब्दातच महान अर्थ दडलेला आहे. आ म्हणजे आधार देणारी व ई म्हणजे ईमानदारी शिकविणारी. आ चा अर्थ आधार देणे असा लावल्यास खरंच आई आधार देते का? असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर होय असंच आहे. आई ही आपल्या बाळाला बापापेक्षा जास्त प्रमाणात आधार देत असते. ती सर्वप्रथम आपल्या बाळाला स्वगर्भात नऊ महिने ठेवते. अन्न पाणी पुरवते. त्याचं नवही महिने संरक्षण करते. त्याला त्रास होवू देत नाही. चांगलं संगोपन करते. त्यानंतर ते बाळ जेव्हा गर्भातून बाहेर पडतं. तेव्हा मात्र तिच आई उन्हातून सावलीत नेल्यागत त्याचं गर्भाबाहेरही संगोपन करते. अगदी त्याचा विवाह होईपर्यंत. एवढंच नाही तर विवाह झाल्यानंतरही ती जेव्हापर्यंत आपले डोळे मिटत नाही. तेव्हापर्यंत आपली आई आपल्याला सांभाळून घेत असते. मग आपल्या कितीही मोठ्या चुका असल्या तरी आपली आई त्या पदरात घेवून आपल्याला माफ करते. हा झाला आधाराचा विषय. आता ई चा वि...
Article

मंतरलेले दिवस.!

रात्रीच्या गर्भातून नव्या सूर्याचा उदय होत होता.सकाळची उषःकाल नव्या नवलाईने नटून येत होती .विसाव्याला आलेली खग किलबिलाट करून मनसोक्तपणे अवकाशात विहार करीत होती. कामाच्या थकव्याने मला थोडा आराम हवा असं वाटत होतं. तरी पण माझे ध्येय गाठण्यासाठी मला आराम करून चालणार नव्हते. माझे जीवन निरंतर चालत राहणारे असावे असा चंग मी माझ्या मनात बानला होता.दाहीदिशांनी संकटाचे वारे झेपावत होते .डहाळीला आलेले कोमल फुल वावटळीच्या झोताने गळून पडणार का..? अशी भीती मला वाटत होती. जीवनाचा नवा पथ पादाक्रांत करण्याची जिद्द मनाला नवी उभारी देत होती. नव्या जीवनाला सुरुवात करत असताना येणाऱ्या संकटावर मात करण्याची ताकद माझ्यात निर्माण होत होती.डि एड.चं शिक्षण संपलं होतं. शासनाने भरतीवर अघोषित बंदी लावली होती. माझ्यासमोर फार मोठा प्रश्न आर्थिकतेचा निर्माण झालेला होता. नागपूरच्या गगनचूंबी शहरात स्वतःच अस्तित्व शो...
Article

शहरांची नावे बदलण्यामागचे राजकारण.!

उस्मानाबादचे धाराशीव आणि औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं सर्वच राजकीय पक्षांनी जल्लोषात स्वागत केलं आहे. मात्र, एमआयएमने या नामांतराला विरोध केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. नामांतराच्या या निर्णयावर एमआयएमचे नेते असदुद्दीन औवैसीही प्रचंड भडकले आहेत. ओवैसी यांनी या निर्णयावरून केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही तर हुकूमशाही आहे, अशी टीकाच ओवैसी यांनी केली आहे.एखाद्या शहराचं नाव बदलण्यामागे 'ध्रुवीकरणाचा हेतू' असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं मत काही विश्लेषक व्यक्त करत आहेत.तरी देखील नामांतराचे समर्थन व विरोध करण्यामागे व्होट बँकेचे राजकारणच कारणीभूत आहे.२०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरक...
Article

प्रेम म्हणजे नेमकं काय..?

प्रेमाची संकल्पनाच खूप व्यापक आहे. ती कुठल्याच मापदंडात मोजता येत नाही.आपण कुणावर किती प्रेम करतो हे कुठल्याच तराजूत तोलता येत नाही.. प्रेम हा शब्द बोलून प्रेमाचा सुगधं दरवळत नाही, प्रेम हा शब्द हृदयात साठवून मुक्त हस्ते निखळ भावनेने, खळखळणाऱ्या झऱ्याप्रमाणे, शुभ्र फेसाळ धबधब्याप्रमाणे निस्वार्थ कोसळणारा असावा. प्रेम हे शीतल गारव्यासारखे वणव्यात ही मनाचा दाह कमी करणारे असावे! ठेच लागलेल्या पायाला सावरणारे असावे, चिघळलेल्या जखमांवर हळुवार आधाराची फुंकर घालणारे डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी धडपडणारे असावे... प्रेम हे जगायला शिकवते; पण त्यासाठी अपेक्षा विरहित प्रेम असावे! म्हणजे जगता आणि जागविता दोन्ही गोष्टी साध्य होतात. आपण निस्वार्थ भावनेने प्रेमाचे रंग आपल्या हृदयात भरले आणि त्या स्नेहमयी रंगाने कुणाच्या तरी आयुष्याचे चित्र आनंदाने रंगवता आले तर नक्कीच प्रेम या शब्दाचा अर्थ कळेल...आणि नैराश...
Article

विवाहाचे वाढते वय..!

दोन मनं,दोन वंश नवीन सुरुवात जीवनाची आनंदी जीवन जगण्याची !!खरंच विवाह म्हणजे पवित्र बंधन अतूट नातं साता जन्माचा तसे बघितले तर विवाहाचे कायदेशीर वय मुलांसाठी 21 वर्षे आणि मुलींसाठी अठरा वर्षे असेच निश्चित केलेले आहे. कारण या वयात मुलं-मुली मध्ये परिपक्वता आलेली असते पण ही पद्धत हळूहळू बदलत चाललेली आहेत. त्यातल्या त्यात कुटुंब नियोजन त्यामुळे बदलती सामाजिक परिस्थिती आणि शिक्षणाचे वाढते प्रमाण बघता प्रत्येक जण करिअरच्या मागे धावत आहे. त्यामुळे विवाहाचे वय वाढत चाललेले आहे याचा परिणाम विवाह संस्थांवर देखील झालेला दिसतो, त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील परिस्थिती आणि शहरातील परिस्थिती यात बराच फरक बघायला मिळतो. याचबरोबर विवाहाच्या कल्पना आणि विवाहाची पद्धत सुद्धा बदलत चाललेली आहे काही ग्रामीण क्षेत्रात अजूनही बालविवाहाची प्रथा सुरूच आहे. उदाहरणार्थ राजस्थान मध्य प्रदेश आसाम याउलट शहरात आहे म...
Article

प्रेम म्हणजे न मांगता देणं

माणूस हा भावनिक नात्यांची विण गुंफणारा सहोदर आहे. आपल्याला जर जग जिंकायचं असेल तर ते फक्त आणि फक्त प्रेम ह्या शब्दांनीच जिंकता येतं. प्रेमाशिवाय जीवन म्हणजे मृत्यूतत्त्वांचा नुसता अंधारकल्लोळच असतो .आई-बाबा, भाऊ-बहीण, नाते-गोते,मित्र-मैत्रिणी असे विविध नाते प्रेमाने मोहरून येतात. त्याचा सुवास सदोदित दरवळत असतो. पण त्या प्रेमाला माणुसकीची किनार असावी लागते. भावनिकतेचा ओलावा असावा लागतो .मातृत्वाची किनार असावी लागते. आपल्या मनात जोपर्यंत निखळ व स्वच्छ भावगर्भ निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण खरच प्रेम करतो काय..? हा यक्षप्रश्न माझ्या मनाला पडत असतो .संत कबीर आपल्या एका दोह्यात लिहितात की,   पोथी पढि-पढि जग मुआ पंडित भया न कोय। ढाई आखर प्रेम का पढै सौ पंडित होय ।। आपण कितीही ग्रंथाचे पारायण केले पण जर लोकांशी प्रेमाने वागलो नाही तर त्या पारायणाला काहीच अर्थ उरत नाही.   प्रेम ही एक अनमोल अशी देण...