Thursday, November 13

Article

Article

मंतरलेले दिवस.!

रात्रीच्या गर्भातून नव्या सूर्याचा उदय होत होता.सकाळची उषःकाल नव्या नवलाईने नटून येत होती .विसाव्याला आलेली खग किलबिलाट करून मनसोक्तपणे अवकाशात विहार करीत होती. कामाच्या थकव्याने मला थोडा आराम हवा असं वाटत होतं. तरी पण माझे ध्येय गाठण्यासाठी मला आराम करून चालणार नव्हते. माझे जीवन निरंतर चालत राहणारे असावे असा चंग मी माझ्या मनात बानला होता.दाहीदिशांनी संकटाचे वारे झेपावत होते .डहाळीला आलेले कोमल फुल वावटळीच्या झोताने गळून पडणार का..? अशी भीती मला वाटत होती. जीवनाचा नवा पथ पादाक्रांत करण्याची जिद्द मनाला नवी उभारी देत होती. नव्या जीवनाला सुरुवात करत असताना येणाऱ्या संकटावर मात करण्याची ताकद माझ्यात निर्माण होत होती.डि एड.चं शिक्षण संपलं होतं. शासनाने भरतीवर अघोषित बंदी लावली होती. माझ्यासमोर फार मोठा प्रश्न आर्थिकतेचा निर्माण झालेला होता. नागपूरच्या गगनचूंबी शहरात स्वतःच अस्तित्व शो...
Article

शहरांची नावे बदलण्यामागचे राजकारण.!

उस्मानाबादचे धाराशीव आणि औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं सर्वच राजकीय पक्षांनी जल्लोषात स्वागत केलं आहे. मात्र, एमआयएमने या नामांतराला विरोध केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. नामांतराच्या या निर्णयावर एमआयएमचे नेते असदुद्दीन औवैसीही प्रचंड भडकले आहेत. ओवैसी यांनी या निर्णयावरून केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही तर हुकूमशाही आहे, अशी टीकाच ओवैसी यांनी केली आहे.एखाद्या शहराचं नाव बदलण्यामागे 'ध्रुवीकरणाचा हेतू' असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं मत काही विश्लेषक व्यक्त करत आहेत.तरी देखील नामांतराचे समर्थन व विरोध करण्यामागे व्होट बँकेचे राजकारणच कारणीभूत आहे.२०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरक...
Article

प्रेम म्हणजे नेमकं काय..?

प्रेमाची संकल्पनाच खूप व्यापक आहे. ती कुठल्याच मापदंडात मोजता येत नाही.आपण कुणावर किती प्रेम करतो हे कुठल्याच तराजूत तोलता येत नाही.. प्रेम हा शब्द बोलून प्रेमाचा सुगधं दरवळत नाही, प्रेम हा शब्द हृदयात साठवून मुक्त हस्ते निखळ भावनेने, खळखळणाऱ्या झऱ्याप्रमाणे, शुभ्र फेसाळ धबधब्याप्रमाणे निस्वार्थ कोसळणारा असावा. प्रेम हे शीतल गारव्यासारखे वणव्यात ही मनाचा दाह कमी करणारे असावे! ठेच लागलेल्या पायाला सावरणारे असावे, चिघळलेल्या जखमांवर हळुवार आधाराची फुंकर घालणारे डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी धडपडणारे असावे... प्रेम हे जगायला शिकवते; पण त्यासाठी अपेक्षा विरहित प्रेम असावे! म्हणजे जगता आणि जागविता दोन्ही गोष्टी साध्य होतात. आपण निस्वार्थ भावनेने प्रेमाचे रंग आपल्या हृदयात भरले आणि त्या स्नेहमयी रंगाने कुणाच्या तरी आयुष्याचे चित्र आनंदाने रंगवता आले तर नक्कीच प्रेम या शब्दाचा अर्थ कळेल...आणि नैराश...
Article

विवाहाचे वाढते वय..!

दोन मनं,दोन वंश नवीन सुरुवात जीवनाची आनंदी जीवन जगण्याची !!खरंच विवाह म्हणजे पवित्र बंधन अतूट नातं साता जन्माचा तसे बघितले तर विवाहाचे कायदेशीर वय मुलांसाठी 21 वर्षे आणि मुलींसाठी अठरा वर्षे असेच निश्चित केलेले आहे. कारण या वयात मुलं-मुली मध्ये परिपक्वता आलेली असते पण ही पद्धत हळूहळू बदलत चाललेली आहेत. त्यातल्या त्यात कुटुंब नियोजन त्यामुळे बदलती सामाजिक परिस्थिती आणि शिक्षणाचे वाढते प्रमाण बघता प्रत्येक जण करिअरच्या मागे धावत आहे. त्यामुळे विवाहाचे वय वाढत चाललेले आहे याचा परिणाम विवाह संस्थांवर देखील झालेला दिसतो, त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील परिस्थिती आणि शहरातील परिस्थिती यात बराच फरक बघायला मिळतो. याचबरोबर विवाहाच्या कल्पना आणि विवाहाची पद्धत सुद्धा बदलत चाललेली आहे काही ग्रामीण क्षेत्रात अजूनही बालविवाहाची प्रथा सुरूच आहे. उदाहरणार्थ राजस्थान मध्य प्रदेश आसाम याउलट शहरात आहे म...
Article

प्रेम म्हणजे न मांगता देणं

माणूस हा भावनिक नात्यांची विण गुंफणारा सहोदर आहे. आपल्याला जर जग जिंकायचं असेल तर ते फक्त आणि फक्त प्रेम ह्या शब्दांनीच जिंकता येतं. प्रेमाशिवाय जीवन म्हणजे मृत्यूतत्त्वांचा नुसता अंधारकल्लोळच असतो .आई-बाबा, भाऊ-बहीण, नाते-गोते,मित्र-मैत्रिणी असे विविध नाते प्रेमाने मोहरून येतात. त्याचा सुवास सदोदित दरवळत असतो. पण त्या प्रेमाला माणुसकीची किनार असावी लागते. भावनिकतेचा ओलावा असावा लागतो .मातृत्वाची किनार असावी लागते. आपल्या मनात जोपर्यंत निखळ व स्वच्छ भावगर्भ निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण खरच प्रेम करतो काय..? हा यक्षप्रश्न माझ्या मनाला पडत असतो .संत कबीर आपल्या एका दोह्यात लिहितात की,   पोथी पढि-पढि जग मुआ पंडित भया न कोय। ढाई आखर प्रेम का पढै सौ पंडित होय ।। आपण कितीही ग्रंथाचे पारायण केले पण जर लोकांशी प्रेमाने वागलो नाही तर त्या पारायणाला काहीच अर्थ उरत नाही.   प्रेम ही एक अनमोल अशी देण...
Article

भरडधान्यांचे महत्व आणि कृषी महोत्सव

खाद्यसंस्कृती प्रदेशाची रचना, भौगोलिक स्थिती, हवामान, पाणी, पीकपद्धती यातून आकाराला येते. प्रदेशात, परिसरात पिकणारी अन्नधान्ये हीच त्या भागातील नागरिकांच्या आहाराचा मुख्य भाग असतात. महाराष्ट्रात पीकपद्धतीत वैविध्य आढळते. त्यानुसार भात आणि भाकरी किंवा पोळी खाल्ली जाते. त्यातही पूर्वी ज्वारीच्या भाकरी हा आपल्या आहाराचा प्रमुख घटक होता. नंतर त्याची जागा गव्हाच्या पोळीने घेतली. पूर्वी प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यानुसार ज्वारी, बाजरी, तांदुळाची किंवा नाचणीची भाकरी आवडीने खाल्ली जात असे.कष्टकरी माणसांचा भाकरी हा हक्काचा आहार होता. नंतर गव्हाचा समावेश झाला. त्यात बेकरी पदार्थ वाढले. केबल टीव्हीवरील जाहिरातींच्या माध्यमातून निरनिराळ्या पदार्थांचा आहारात समावेश झाला. चायनीजच्या गाड्या खेडोपाडीही सुरू झाल्या. जंक फूडच्या चटकेपोटी आरोग्य बिघडत असल्याचे दिसू लागले. हे असे असताना पुन्हा एकदा भरडधान...
Article

आज ही शिवाजी महाराज हवे हवेसे का वाटतात ?

खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाज रचना आहे. शिवाजी राजे हे सुध्दा सरंजामी राजे होते. आपण राजेशाही नाकारली आणि त्या जागी लोकशाही स्वीकारली शिवाजी महाराजा नंतर जे राजे महाराजे आपण बघितले राजे राजवाडे बघितले त्यांच्या अन्यायकारक आणि जुलमी राजवटीला आपण कंटाळलो. म्हणूनच ती समाजव्यवस्था आपण नाकारली. भांडवशाही ब्रिटिशाविरुद्ध भारतातील सरंजामशाही राज्ये तग धरू शकली नाही. या वरून सरंजामशाही व राजेशाही समाजव्यवस्था टाकाऊ होती हे सिद्ध होते. आपण लोकशाही स्वीकारली आणि ती स्वीकारल्यानंतर सुध्दा सरंजामशाही व राजेशाहीतला राजा आपल्या चेतना आणि स्पूर्ती का देतोय? का आपण त्यांचा जय जयकार का करतो? शिवाजी महाराज यांच्या आधीही आणि नंतर ही अनेक राजे महाराजे होऊन गेले तरी फक्त शिवाजी महाराज यांचीच जयंती साजरी का करतात? त्यांचेच स्मरण त्यांचीच जयंतीला आपल्याला एवढं स्पूर्तिदाई का वाट...
Article

स्वातंत्र्यलढ्यांचा प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज

'दिल्लीच्या तख्ताविरुद्ध शिवाजी महाराजांनी जो दीर्घकाळ लढा दिला, तो आज आधुनिक भारताला स्वातंत्र्यासाठी लढताना प्रेरणादायी ठरतो आहे, आज शिवछत्रपती हे दमनकारी साम्राज्यशाहीविरुद्धच्या राष्ट्रवादी लढ्याचे प्रतीक ठरले आहेत,’ हे उद्गार आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे. एकदा नोबेल पारितोषिक प्राप्त थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांना जपानी लोकांनी विचारले की, ‘तुमच्या भारताची खरी ओळख काय?’ तेव्हा रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज यांची लोककल्याणकारी व्यवस्था ही भारताची खरी ओळख आहे.बंगालच्या फाळणीनंतर वंगभंगाची चळवळ उभी राहिली. या चळवळीची प्रेरणा होते छत्रपती शिवाजी महाराज. रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेली 'शिवाजी उत्सव'. ही कविता वंगभंग चळवळीचे स्फूर्तीगान ठरली. आपल्या या कवितेत रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘या भारत देशात स्वराज्य धर्म जागृती होणार, या तुझ्या महावचनाला आम्ही बनवू आ...
Article

शिवजयंतीचे खरे प्रणेते – महात्मा ज्योतिबा फुले

मराठी अस्मितेचा मानबिंदू, महाराष्ट्राचे स्फुर्तीस्थान, बहुजनांचे प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदा ३९३ वी जयंती आपण १९ फेब्रुवारीला साजरी करित आहोत. तर, या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधुन काढली ? जगातील पहिली शिवजयंती कोणी साजरी केली ? छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले पुस्तक कोणी लिहिले ? या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे शिवजयंती मागील खरा इतिहास जाणून घेणे होय.महाराष्ट्राच्या जाणता राजाची शिवरायांची समाधी शोधून काढणारे होते.महात्मा ज्योतिबा फुले. जगातील पहिली शिवजयंती साजरी करणारे होते, महात्मा ज्योतिबा फुले.छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले पुस्तक लिहिणारे होते महात्मा ज्योतिबा फुले.मात्र षडयंत्री मनुवादी लेखकांनी शिवरायांचा पराक्रमी, गौरवशाली इतिहास दडपुन षडयंत्री खोटा इतिहास समाज...
Article

प्राचीनकालीन हेमाडपंथी शिव मंदिर धामंत्री

महाशिवरात्री विशेषतिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अने...