Sunday, March 8

Article

स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते…!
Article

स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते…!

स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते   स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते ते पाहून असंख्य प्रश्नांनी मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता....   हेच ते प्रेत जिवंत असताना माझेमाझे करत असेल, एक एक रुपयासाठी झगडत असेल, मोह - माया - काम - क्रोध - मत्सर यांना घेऊन समाजात जगत असेल, आरे ला कारे करणारा देह , आज मात्र जळतोय शांत, स्तब्ध, एकाकी तरीही शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय..   जीवलगांनी त्यांच्यासाठी जीव लावला. ते आज ओक्साबोक्षी रडले. घरा पासून स्मशानभूमी पर्यंतच सोबती झाले-खरे; परंतु विधी संपताच त्यांनी घराचा रस्ता धरला. घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील, आज दोन चारघास पण उद्या पासून पोटभर अन्न खातील ते.   जमवलेल्या लाखो रूपयाच्या संपत्तीपैकी फक्त फुटका रूपया मुखात आलाय, जीवनात १०० एकर जमिनीच्या तुकड्याला खरेदी केले, तरीही जाळायला नेले स्मशानभूमीतील एकाकी घा...
शॉट असावा तर असा….
Article

शॉट असावा तर असा….

शॉट असावा तर असा....      कधी कधी सचिन ला आणि मला काहीतरी वेगळं करायची हुक्की येते.. नवरा बायको असलो म्हणुन काय झालं , थोडा रोमान्स टिकवायचा असेल तर बदल हवा काहीतरी हटके हवं मग माझ्या लेखिकेच्या डोक्यात काहीतरी भन्नाट आयडीयाज येतात .. कधीतरी त्या बहरतात कधीतरी फेल जातात..   मुळात रसिकता ठासुन भरलेली असल्याने शब्दावर विनोद सुचतात आणि घरात हास्याचे फवारे उडतात.. इतर नवरा बायको सारखं रटाळवाणं लाइफ नक्कीच नाही.. पण कधीतरी करायला जातो गणपती आणि होतं माकड असही होतं..      काल संध्याकाळी असच काहीसं गमतीशीर घडलं.. सचिन मला म्हणाला , आज शॉट मारायचा का ??.. २५ वर्षानंतरही इश्य असा सहज शब्द तोंडुन आला.. सोनल तु आणि लाजतेस ??.. असा खडुस प्रश्न सचिनकडुन आला आणि मग मात्र मी जरा रागानेच त्याच्याकडे पाहिलं.. आमच्यात साधी धुसफुसही नसते त्यामुळे भांडण व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही.. लटक्या रागात बेडरुममधे गेल...
महागडे फोन घेताना नेमका कोणता विचार कराल?
Article

महागडे फोन घेताना नेमका कोणता विचार कराल?

महागडे फोन घेताना नेमका कोणता विचार कराल? आयफोन  किंवा मग सॅमसंग, 60  हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचाफोन विकत घेतल्याने नेमका कोणता जगावेगळा स्टेटस मध्ये फरक  येतो? काही महिन्यांपूर्वी एका  गावात एका पोराने घरचे IPhone घेऊन देत नाहीत, म्हणून आत्महत्या केली. विषेश म्हणजे मुलाचे आईवडील गवंडी काम करतात, पण पोराने आईबापाजवळ नुसता नाद लावला होता आय फोन पाहिजे. शेवटी आई बापाने  पोराच्या हट्टापुढे हात टेकले आणि वडिलांनी दुकानात जाऊन आय फोन घ्यायच ठरवल पण पोराला पाहिजे तो कलर तिथे नव्हता. आणि हट्ट मात्र काही केल्या  कमी करत नव्हता .म्हणून बापाने सरप्राइज द्यायच ठरवल होत, व ते जेव्हा दुपारी घरी आले तोपर्यंत मुलाने मोबाईल घेऊन देत नाही म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  आणि विषेश म्हणजे पोरग पण काही लहान नव्हत  महाविद्यालयात शिकत होत.दुसर ही असच एक पोरग पाहिलं. कॉलेजच राहणीमान अस होत कि बा...
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना नव्हे, तर आम्हाला माणसात आणलं…
Article

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना नव्हे, तर आम्हाला माणसात आणलं…

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना नव्हे, तर आम्हाला माणसात आणलं....! गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात. गावाबद्दल उगं रोमँटिक लिहणारे कवी आणि लेखक लोकं तद्दन भामटे असतात. कारण गावगाडा मांडताना ते आम्हा पाटलांच्या घरांमध्ये देवळीत ठेवलेला फुटक्या बाळीचा कप, आणि सालगडी माणसांची वेगळी ताटं आणि ग्लास कधीच मांडत नाहीत.* आमच्या गढ्या आणि वाड्यांच्या मोठमोठाल्या मातीच्या भिंती उभारायला अख्खा महारवाडा जनावरांसारखा राबला. रेड्याच्या पाठीवर लादलेल्या पखालीतून पाणी वाहून कैक माणसांचे पाय वाकडे झाले. आमच्या माड्यांचे अवजड नक्षीदार खांब बनवण्यासाठी लागणारे लाकडं डोंगरातून खांद्यावर वाहून आणल्याने कित्ये...
आजची व्यसनाधीनता आणि आम्ही भारताचे लोक…!
Article

आजची व्यसनाधीनता आणि आम्ही भारताचे लोक…!

आजची व्यसनाधीनता आणि आम्ही भारताचे लोक...! देशात झपाट्याने बेरोजगारी वाढत आहे.शिक्षण महाग होऊन ते तकलादू 'स्वरूपाचे' दिल्या जात आहे. त्यातून बेरोजगाराची 'फौज' निर्माण होत आहे. यावर' ब्र' शब्दही न काढणारी तरुण युवक 'मंडळी' वेगळ्याच स्वाभिमानाच्या, रूढी परंपरेच्या नादी लागून त्यांचे भवितव्य आधीच 'बरबाद' होत असतांना माणसाला 'तिसरा डोळा' प्रदान करणारी जन्म झाल्यापासून पहिल्यांदाच 'अ ब क ड' शिकवून पाया पक्का करणारी आपल्या भाषेतील आपली मराठी सरकारी शाळा देणगीदाराच्या देणगीने 'ठोक्याने' देण्यात येत आहे. यातच 'दारू' विक्रीसाठी गावा गावात परवाना देण्याचं सुनियोजित करण्यात आलं आहे. हे सर्व 'अचंबित' करण्यासारखं वाटत असलं तरीही त्यावर तरुणाई 'आवाज' उठवत नाही. मागचे 'इतिहास 'उकरून काढून तरुणांमध्ये वेगळाच जातीय अभिमान पेरला जात आहे. ही बाब सर्वसमावेशक समतेच्या विचाराचं 'खंडन' करीत एका विशिष्ट विचाराचं ...
मानवतावादी विचाराचे पाईक व्हा..!
Article

मानवतावादी विचाराचे पाईक व्हा..!

मानवतावादी विचाराचे पाईक व्हा..!   या पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक 'सजीवाला' भयमुक्त जगण्याचा 'अधिकार'आहे. असा कोणता 'जीव' आहे की,ज्याला जगावसं वाटत नाही..? ज्यांना भावना आहेत, सुखदुःखाच्या संवेदना आहेत, त्या सर्व जीवाला कधीच 'मरावसं' वाटत नाही तर अधिका अधिक जगावसं वाटतं. हे 'जगणं- मरण' नैसर्गिक असतं. कधी ते देहामध्ये आलेल्या सयंत्र बिघाडा मुळे 'तग' धरू शकत नाही. म्हणून कुणाला निर्धारित वेळेपेक्षा 'आधी' जावं लागतं. ही वेळ कुणाच्या आयुष्यात 'कधी' येईल सांगता येत नाही. कधी तर जन्म घेतानांच कुणाकुणाच्या वाट्याला आधीच जाणं येतं. तर कुणी शंभरापेक्षाही जास्त वर्ष जगतं. दगडावर आपटून सुद्धा त्याला मरण येत नाही. अशी ही देहयष्टी आणि काळाची महिमा आहे. जन्म- मरण हे 'निसर्गदत्त' आहे. कुणी कुणाचं 'जगणं' कुणी मग का म्हणून हिसकावून घ्यावं ? का कुणाच्या जगण्याला खंडित करावं? कुणाच्या जीवनामध्ये अडथळा ...
Article

शिक्षण: भ्रम आणि वास्तव

शिक्षण: भ्रम आणि वास्तवशिक्षण मानवाच्या जीवनाला नवा परिवर्तनशील महामार्ग दाखवणारा ऊर्जास्वल आहे. शिक्षण या तीन अक्षरापासून बनलेला हा शब्द मानवाच्या नवनिर्मितीची प्रक्रिया करतो. सुजाण व चांगला माणूस हा जगाचा महत्त्वाचा पाया आहे.आजचे शिक्षण नक्कीच्या या स्वरूपाचे आहे का..? हा प्रश्न देशातील सर्व बांधवांना पडला आहे. शिक्षणावर अनेक प्रयोग करण्याच्या नादात विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळू नये असा घाट काही वर्ग सातत्याने रचत आहेत. हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजेत.शिक्षण हे सरकारची जबाबदारी आहे. पण ६२ हजार शासकीय शाळा खाजगी कंपन्याकडे हस्तांतर करण्याचा नियम सरकारने करून खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सरकारी शाळेला नेऊन ठेवले आहे. शिक्षण हे सरकारची जबाबदारी आहे. ते त्यांचे संविधानिक काम आहे. पण आज शासन सरकारी क्षेत्र विकून स्वतः काहीच न करण्याचा प्रयत्न करत आहे.आज देशातील शिक्षण व्यवस्था...
बौद्ध देशांतील ‘पूर्वजांचा स्मृतीदिन’
Article

बौद्ध देशांतील ‘पूर्वजांचा स्मृतीदिन’

...भाद्रपद पौर्णिमेच्यानिमित्ताने..... बौद्ध देशांतील 'पूर्वजांचा स्मृतीदिन' ( Remembering the Ancestors) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ बौद्ध जगतामध्ये सप्टेंबर महिन्यातील पंधरवडा पूर्वजांबद्दल श्रद्धा व्यक्त करण्याचा एक सण म्हणून Pchum Ben/ Vu-Lan/ Obon/ Ulambana/ Ancestor Day अशा विविध नावांनी साजरा करतात. आपल्या घरातील पूर्वजांना वंदन करण्याची प्रथा बुद्ध काळातील अडीज हजार वर्षांपासून चालत आलेली होती. अनेक बौद्ध देशांत या पंधरवड्यात पूर्वजांची आठवण म्हणून त्यांना आवडनारे घरगुती पदार्थ तयार करतात. ते तयार केलेले पदार्थ आणि फुले-फळे विहारात, पॅगोडात मांडले जातात. पूर्वजांना व वडिलधाऱ्यानां नमन करतात. भिक्खूंना वंदन करून आशिर्वाद घेतले जातात. त्यांना चिवर दान केले जाते. अशा तऱ्हेने Remembering the Ancestors हा 'सण' म्हणून आनंदाने बौद्ध देशांत साजरा केला जातो.भारतात पाळला जाणारा 'पितृपक्ष' आणि आशिया खंडाती...
Article

‘अर्ल डिक्सन’ चा आज जन्मदिवस…

आज तुम्हाला ‘नाईलाजापोटी’ लागलेल्या एका रंजक शोधाची गोष्ट सांगतोय.‘अर्ल डिक्सन’ नावाचा एक सामान्य चाकरमानी तरुण ‘जॉन्सन ॲंड जॉन्सन’ या बहुराष्ट्रीय कंपनीत इमानेइतबारे काम करत होता.अगदी आपल्याकडं जसं ‘चाणाक्ष-कार्यतत्पर-गृहकर्तव्यदक्ष’ वगैरे निकष लावून वधुपरिक्षा घेतात तशी परिक्षा घेत याच दरम्यान त्याचं ‘जोसेफिन’नामक तरुणीशी लग्नही झालं.पहिले काही गोड गुलाबी प्रेमळ दिवस पार पडले. दोघांच्या छानपैकी ताराही जुळल्या. सगळं काही स्वप्नवत चाललं होतं पण एक समस्या मात्र होती. समस्या फार मोठी होती असं नव्हे, पण ती रोजचीच झाल्यानं ‘डोकेदुखी’ बनली होती. जोसेफिन स्वयंपाकघरात गेली रे गेली की तिला जखम झालीच समजा.टोमॅटो कापला लागला चाकू, दार बंद करायला गेली लागला खिळा, दुध गरम करायला गेली बसला चटका. जोसेफिन प्रेमळ असली तरी अंमळ वेंधळी होती.नोकरीसोबतच डिक्सनला घरात जोसेफिनच्या जखमा ध...
Article

सेल्फीच्या ट्रेंडला आवर घालण्याची गरज

सेल्फीच्या ट्रेंडला आवर घालण्याची गरजप्रवास करताना सेल्फी घेणे हा एक लोकप्रिय ट्रेंड बनला आहे. सोशल मीडिया आल्यापासून सेल्फीची क्रेझ अधिकच पाहायला मिळत आहे. पण सेल्फीचा ट्रेंड लोकांच्या जीवालाही मोठा धोका बनत आहे. गेल्या काही वर्षात केवळ सेल्फी काढल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अर्थातच तुम्ही सेल्फीद्वारे अविस्मरणीय क्षण टिपू शकता, परंतु काही वेळा तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो.मोबाईल कॅमेर्‍याद्वारे सेल्फी घेणे ही जगातील गंभीर समस्यांपैकी एक आहे. सेल्फीचा छंद म्हणजेच मोबाईल कॅमेऱ्यातून स्वत:चे छायाचित्र काढण्याचा छंद जीवघेणा ठरत असल्याच्या बातम्या आजकाल ऐकायला मिळत आहेत. नवी पिढी या सापळ्यात खोलवर अडकली आहे. आज प्रत्येकजण आपल्या जीवाची पर्वा न करता थरारक, आश्चर्यकारक आणि विस्मयकारक सेल्फी घेत आहे. कुणी पाण्यात उडी मारताना सेल्फी काढताना, कुणी सापासोबत, कुणी सिंह, वाघ, चित्...