Friday, November 14

Article

मानवतावादी विचाराचे पाईक व्हा..!
Article

मानवतावादी विचाराचे पाईक व्हा..!

मानवतावादी विचाराचे पाईक व्हा..!   या पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक 'सजीवाला' भयमुक्त जगण्याचा 'अधिकार'आहे. असा कोणता 'जीव' आहे की,ज्याला जगावसं वाटत नाही..? ज्यांना भावना आहेत, सुखदुःखाच्या संवेदना आहेत, त्या सर्व जीवाला कधीच 'मरावसं' वाटत नाही तर अधिका अधिक जगावसं वाटतं. हे 'जगणं- मरण' नैसर्गिक असतं. कधी ते देहामध्ये आलेल्या सयंत्र बिघाडा मुळे 'तग' धरू शकत नाही. म्हणून कुणाला निर्धारित वेळेपेक्षा 'आधी' जावं लागतं. ही वेळ कुणाच्या आयुष्यात 'कधी' येईल सांगता येत नाही. कधी तर जन्म घेतानांच कुणाकुणाच्या वाट्याला आधीच जाणं येतं. तर कुणी शंभरापेक्षाही जास्त वर्ष जगतं. दगडावर आपटून सुद्धा त्याला मरण येत नाही. अशी ही देहयष्टी आणि काळाची महिमा आहे. जन्म- मरण हे 'निसर्गदत्त' आहे. कुणी कुणाचं 'जगणं' कुणी मग का म्हणून हिसकावून घ्यावं ? का कुणाच्या जगण्याला खंडित करावं? कुणाच्या जीवनामध्ये अडथळा ...
Article

शिक्षण: भ्रम आणि वास्तव

शिक्षण: भ्रम आणि वास्तवशिक्षण मानवाच्या जीवनाला नवा परिवर्तनशील महामार्ग दाखवणारा ऊर्जास्वल आहे. शिक्षण या तीन अक्षरापासून बनलेला हा शब्द मानवाच्या नवनिर्मितीची प्रक्रिया करतो. सुजाण व चांगला माणूस हा जगाचा महत्त्वाचा पाया आहे.आजचे शिक्षण नक्कीच्या या स्वरूपाचे आहे का..? हा प्रश्न देशातील सर्व बांधवांना पडला आहे. शिक्षणावर अनेक प्रयोग करण्याच्या नादात विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळू नये असा घाट काही वर्ग सातत्याने रचत आहेत. हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजेत.शिक्षण हे सरकारची जबाबदारी आहे. पण ६२ हजार शासकीय शाळा खाजगी कंपन्याकडे हस्तांतर करण्याचा नियम सरकारने करून खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सरकारी शाळेला नेऊन ठेवले आहे. शिक्षण हे सरकारची जबाबदारी आहे. ते त्यांचे संविधानिक काम आहे. पण आज शासन सरकारी क्षेत्र विकून स्वतः काहीच न करण्याचा प्रयत्न करत आहे.आज देशातील शिक्षण व्यवस्था...
बौद्ध देशांतील ‘पूर्वजांचा स्मृतीदिन’
Article

बौद्ध देशांतील ‘पूर्वजांचा स्मृतीदिन’

...भाद्रपद पौर्णिमेच्यानिमित्ताने..... बौद्ध देशांतील 'पूर्वजांचा स्मृतीदिन' ( Remembering the Ancestors) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ बौद्ध जगतामध्ये सप्टेंबर महिन्यातील पंधरवडा पूर्वजांबद्दल श्रद्धा व्यक्त करण्याचा एक सण म्हणून Pchum Ben/ Vu-Lan/ Obon/ Ulambana/ Ancestor Day अशा विविध नावांनी साजरा करतात. आपल्या घरातील पूर्वजांना वंदन करण्याची प्रथा बुद्ध काळातील अडीज हजार वर्षांपासून चालत आलेली होती. अनेक बौद्ध देशांत या पंधरवड्यात पूर्वजांची आठवण म्हणून त्यांना आवडनारे घरगुती पदार्थ तयार करतात. ते तयार केलेले पदार्थ आणि फुले-फळे विहारात, पॅगोडात मांडले जातात. पूर्वजांना व वडिलधाऱ्यानां नमन करतात. भिक्खूंना वंदन करून आशिर्वाद घेतले जातात. त्यांना चिवर दान केले जाते. अशा तऱ्हेने Remembering the Ancestors हा 'सण' म्हणून आनंदाने बौद्ध देशांत साजरा केला जातो.भारतात पाळला जाणारा 'पितृपक्ष' आणि आशिया खंडाती...
Article

‘अर्ल डिक्सन’ चा आज जन्मदिवस…

आज तुम्हाला ‘नाईलाजापोटी’ लागलेल्या एका रंजक शोधाची गोष्ट सांगतोय.‘अर्ल डिक्सन’ नावाचा एक सामान्य चाकरमानी तरुण ‘जॉन्सन ॲंड जॉन्सन’ या बहुराष्ट्रीय कंपनीत इमानेइतबारे काम करत होता.अगदी आपल्याकडं जसं ‘चाणाक्ष-कार्यतत्पर-गृहकर्तव्यदक्ष’ वगैरे निकष लावून वधुपरिक्षा घेतात तशी परिक्षा घेत याच दरम्यान त्याचं ‘जोसेफिन’नामक तरुणीशी लग्नही झालं.पहिले काही गोड गुलाबी प्रेमळ दिवस पार पडले. दोघांच्या छानपैकी ताराही जुळल्या. सगळं काही स्वप्नवत चाललं होतं पण एक समस्या मात्र होती. समस्या फार मोठी होती असं नव्हे, पण ती रोजचीच झाल्यानं ‘डोकेदुखी’ बनली होती. जोसेफिन स्वयंपाकघरात गेली रे गेली की तिला जखम झालीच समजा.टोमॅटो कापला लागला चाकू, दार बंद करायला गेली लागला खिळा, दुध गरम करायला गेली बसला चटका. जोसेफिन प्रेमळ असली तरी अंमळ वेंधळी होती.नोकरीसोबतच डिक्सनला घरात जोसेफिनच्या जखमा ध...
Article

सेल्फीच्या ट्रेंडला आवर घालण्याची गरज

सेल्फीच्या ट्रेंडला आवर घालण्याची गरजप्रवास करताना सेल्फी घेणे हा एक लोकप्रिय ट्रेंड बनला आहे. सोशल मीडिया आल्यापासून सेल्फीची क्रेझ अधिकच पाहायला मिळत आहे. पण सेल्फीचा ट्रेंड लोकांच्या जीवालाही मोठा धोका बनत आहे. गेल्या काही वर्षात केवळ सेल्फी काढल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अर्थातच तुम्ही सेल्फीद्वारे अविस्मरणीय क्षण टिपू शकता, परंतु काही वेळा तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो.मोबाईल कॅमेर्‍याद्वारे सेल्फी घेणे ही जगातील गंभीर समस्यांपैकी एक आहे. सेल्फीचा छंद म्हणजेच मोबाईल कॅमेऱ्यातून स्वत:चे छायाचित्र काढण्याचा छंद जीवघेणा ठरत असल्याच्या बातम्या आजकाल ऐकायला मिळत आहेत. नवी पिढी या सापळ्यात खोलवर अडकली आहे. आज प्रत्येकजण आपल्या जीवाची पर्वा न करता थरारक, आश्चर्यकारक आणि विस्मयकारक सेल्फी घेत आहे. कुणी पाण्यात उडी मारताना सेल्फी काढताना, कुणी सापासोबत, कुणी सिंह, वाघ, चित्...
Article

अराजकता…

अराजकता...              तीन दिवसांपूर्वी समाजमाध्यमात पसरलेला मणिपूरचा 'तो' व्हिडियो समाजमाध्यमात बघितला आणि सुन्न होऊन जागेवरच मटकन  बसले, काहीच सुचेना...! एवढे अमानवीय, विकृत कसे वागू शकतात माणसं? बरं 'माणूस' तरी कसे म्हणावे त्यांना? हिंस्त्रं श्वापदासारखी दिसत, भासत, वागत होती ती झुंड त्या विशीतल्या मुलीबरोबर. कोणत्या काळात जगतोय आपण नक्की? मोठ्ठं प्रश्नचिन्ह!! एकवीस वर्षाच्या त्या तरुण मुलीला विवस्त्र करून तिच्या अवयव, गुप्तांगाशी भयंकर पद्धतीने चाललेली छेडछाड, ती हजार पुरुषांची बेभान उन्मादित झुंड आणि त्या विकृत झुंडीत जिवाच्या आकांताने रडणारी-याचना करणारी भेदरलेली ‘ती’ असहाय एकटी. पुढे एका घोळक्यात पुन्हा एक स्त्री तशाच अगतिक अवस्थेत विवस्त्र तो घोळका दोघींची नग्न धिंड काढत त्यांच्या शरीराचे वाट्टेल तसे लचके तोडत चाललाय. जराशीही संवेदनशीलता वा माणूसपण शिल्लक असणाऱ्या सुसंस्कृत व्यक...
Article

सूर…

सूर..माझ्या ताईचं दोन वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. लग्नानंतर सासरी कसं फटकून वागायचं याबाबत तिच्याकडून मोलाच्या टिप्स मिळत होत्या. लग्नाने फक्त नवरा आपला झालेला असतो, त्यामुळे सासू-सासरे आणि इतर नातेवाईक यांना अजिबात भाव द्यायची गरज नाही. सुरवाती पासूनच त्यांना निग्लेक्ट करत त्यांच्याशी रोखठोक  वागायचं, म्हणजे भविष्यात ते डोक्यावर बसू शकत नाहीत हे मी मनावर पक्क  बिंबऊन घेतलं होतं.आई सांगत असे. ताईचं लग्न झालं. नवलाईचे नऊ दिवस संपले. संसार सुरु झाला. ज्या सासू-सासरे नामक व्यक्तींना आता पर्यंत कधी पाहिलेही नव्हते त्यांना एकाएकी आई-बाबा म्हणणे तिला खूप जड जात असे. संसाराला दोन वर्ष झालेयत ताईच्या. सासरी अजून पाहिजे तसे सूर जुळले नाहीत तिचे इतरांशी. आता मलाही त्या दिव्यातून जायचे होते.ठरल्या दिवशी मुहूर्तावर अक्षता पडल्या. आमची एवढी सगळी तयारी असूनही ऐन वेळेवर थोडासा गोंधळ उडालाच! पण आईच...
Article

भूस्खलनाच्या वाढत्या घटना चिंताजनक

भूस्खलनाच्या वाढत्या घटना चिंताजनकअलीकडे दरड  कोसळण्याच्या प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.. रायगड येथील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. एनडीआरएफ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरे दबली गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. यापूर्वी उत्तराखंडमधील जोशीमठाला भूस्खलना मुळे घरांना तडे जावून दरड कोसळल्या या भागातील ७२३ घरांना तडे गेल्याने अनेक कुटुंबे उधास्वस्त झालीत.दरड कोसळण्याच्या घटनांना भूस्खलन म्हणतात. दरडी कोसळण्यास नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही घटक कारणीभूत ठरतात.भूस्खलन ही उतारावर जमीन वेगाने सरकण्याची स्थिती आहे, ज्यामध्ये खडक, ढिगारा आणि माती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली एकत्र घसरतात. भौतिकशास्त्रातील त्याचे स्पष्टीकरण थोडे क्लिष्ट आहे. यानुसार, पर्वत आणि डोंगर उतारा...
Article

आज बँक ऑफ बडोदा स्थापना दिवस

आज बँक ऑफ बडोदा स्थापना दिवस स्थापना : २० जुलै १९०८बँक ऑफ बडोदाची स्थापना बडोद्याचे महाराज तिसरे सयाजीराव गायकवाड महाराजांनी २० जुलै १९०८ मध्ये केली. बडोदा मधील बाजारपेठेतल्या एका छोट्याशा दुकानगाळ्या मध्ये बडोद्या मधली पहिली बँक सुरु झाली. सयाजी गायकवाड महाराजांनी बँक ऑफ बडोदाची पहिली डिपॉजीट करून बँकेची अधिकृत सुरवात केली होती. कोणताही राजा त्याकाळी बँक वगेरे काढत नसे, पण सयाजीराव यांची दूरदृष्टी होती की, त्यांनी अर्थकारणाला चालना देण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून शाश्वत दिशेनी पावलं टाकली. महाराजांच्या डोक्यात बँकेचा विचार येताच त्यांनी गुजरात मधील बड्या व्यावसाईकाना विश्वासात घेतले. त्यात संपतराव गायकवाड, राल्फ व्हाईटन्याक, विठलदास ठाकरसी, तुलसीदास कालीचंद आणि एन.एम. चोक्सी ही सर्व मंडळी होती. त्यावेळी तत्कालीन गुजरातचे अर्थकारण याच लोकांभोवती फिरत होते त्यामुळे चाणाक्ष महाराजां...
चकवा…
Article

चकवा…

चकवा...उन्हाळ्याचे दिवस.सकाळपासूनच ऊन रगेल बनायचा. सकाळी सकाळी पक्षांच्या किलबिलाट ऐकू यायचा ;पण उन्हाचा पारा चढाय लागला की पक्षी एखाद्या दाट झाडामध्ये फांदीवर बसुन आराम करायाचे.विशेष करून बाभळीच्या खोडावर बसलेले विशिष्ट किडे मात्र किर्र किर्र असा आवाज करुन रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याराला भंडावून सोडायचे.आमच्या घरची अतिशय गरीब परिस्थिती.दोन दोन तीन तीन दिवस जेवायला मिळू नये .माझ्या दादाला त्या काळी किती रुपये दिले होते हे मला माहित नाही ;पण आमचे बा वर्षभरासाठी बोली करुन बाबशेटवाडी या गावात एका सावकाराकडे गायी म्हशी राखण्यासाठी माझ्यापेक्षा मोठया भावाला नोकर म्हणून ठेवला होता. त्यावेळी माझ्या दादाच वय असेल जेमतेम आठ नऊ वर्षाचं.मी दादापेक्षा तीन वर्षानी लहान. दादा गावात रहात असल्यामुळे त्याला मराठी भाषा बोलता यायची ;पण मला मराठी भाषा समजत नव्हती व बोलताही येत नव्हती.एकदा दादा त्याच्या ...