Sunday, May 3

Blog

मॉडर्न ते गोल्डन
Poem

मॉडर्न ते गोल्डन

आम्ही परसाकडे जात होतो तेव्हा,तुम्ही शौचालय गाठलंआम्हालाही वाटलंतुमच्यात यावंम्हणून,आम्ही पण शौचालयाजवळ आलोपण तुम्ही,ते सोडलं आणिबाथरूम मध्ये गेलातआम्हीच आम्हाला मागास ठरवूनबाथरूम मध्ये येणारचतोवर तुम्ही टॉयलेटकडे पळालातमग,आम्ही पण धावत टॉयलेट जवळ आलोपण तेवढ्यात तुम्हीवॉशरूम घेतलंआम्ही वॉशरूम पर्यंत यायच्या आधीचतुम्ही,डायरेक्ट फ्रेश व्हायला निघून गेलात…तुमचा पाठलाग करूनआम्ही थकून गेलोतुम्ही आम्हाला गावंढळ समजूनलांब ठेवलं…आम्ही मिरच्या भाजूनझणझणीत ठेचा कुटलातेव्हा तुम्ही सॉस घेतलाआम्ही आळणी वाढणारतेवढ्यात तुम्ही सूप पिलेपातीचा कांदा आम्ही ताटाला लावलातर तुम्ही सॅलड मागवलं..आम्ही चुलीवरपिठलं भाकरी बनवून दिलीतुम्ही पिझ्झा बर्गर जवळ केला..साजूक तुपातली खिचडी घेऊन ...
गर्भधारणेदरम्यान काय करू नये?
Article

गर्भधारणेदरम्यान काय करू नये?

गर्भधारणेदरम्यान काय करू नये?गर्भधारणा ही प्रत्येक स्त्रीसाठी आनंददायी आणि आयुष्य बदलणारी प्रक्रिया असते. या काळात आईचे शारीरिक व मानसिक आरोग्य बाळाच्या विकासावर थेट परिणाम करते. त्यामुळे, गर्भधारणेदरम्यान काही गोष्टींपासून दूर राहणे गरजेचे असते. अशाच गोष्टींचा ऊहापोह या लेखामध्ये केला आहे ज्या गर्भवती महिलांनी टाळायला हव्यात.ताणतणाव घेणे :गर्भधारणेदरम्यान मानसिक शांतता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ताणतणावामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि याचा बाळाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. ध्यान, योग किंवा शांत विश्रांतीत वेळ घालवा.पुरेशी झोप न घेणे :रोज 7-8 तासांची पुरेशी झोप घेणे अनिवार्य आहे. झोपेच्या अभावामुळे थकवा, चिडचिडपणा, आणि इतर आरोग्यविषयक तक्रारी होऊ शकतात.वजनावर नियंत्रण न ठेवणे :अति वजन वाढणे किंवा वजन कमी होणे दोन्हीही घातक ठरू शकते. आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यान...
हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?
Article

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?

हिवाळा आला की थंडीचे झोंबेरे वारे, सुकटलेली हवा, आणि कोरडी त्वचा आपली सोबत करत असते. या ऋतूमध्ये आपली त्वचा नेहमीपेक्षा जास्त संवेदनशील होते. हिवाळ्यातील कोरडे हवामान त्वचेला ओलसरपणा गमावून बसते, ज्यामुळे त्वचा कोरडी, फाटलेली, आणि खाज व त्रासदायक होते. यासाठी हिवाळ्यात त्वचेची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.हिवाळ्यात त्वचेवर होणारे परिणामहिवाळ्यात हवेतील आर्द्रता खूपच कमी होते, त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलसरपणा कमी होतो. यामुळे त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात, हात-पाय रुक्ष होतात, आणि चेहऱ्यावर खरखरी जाणवते. याशिवाय, सूर्यप्रकाश कमी असल्याने त्वचेसाठी आवश्यक असलेला व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळत नाही, ज्याचा परिणाम त्वचेच्या चमकदारपणावर होतो.त्वचेची काळजी घेण्यासाठी उपयोगी टिप्सत्वचेची स्वच्छता:त्वचेची स्वच्छता राखण्यासाठी सौम्य फेसवॉश किंवा साबण वापरा. फार तीव्र रसाय...
मधुमेही आणि किडनी स्टोन असलेल्यांसाठी हे फुल आहे रामबाण औषध.!
Article

मधुमेही आणि किडनी स्टोन असलेल्यांसाठी हे फुल आहे रामबाण औषध.!

मधुमेही आणि किडनी स्टोन असलेल्यांसाठी हे फुल आहे रामबाण औषध.!आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या विविध आजारांवर फायदेशीर आहे, त्यापैकीच एक पळस. पळस औषधी गुणधर्म असलेली एक झाड आहे आणि त्याचे सर्व भाग अनेक रोग आणि विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. लाल फुलांमुळे पळसाला 'फॉरेस्ट फायर' म्हणतात. आयुर्वेदात पळस एक शक्तिवर्धक म्हणून वापरला जातो.myupchar.com के डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला सांगतात की पळसामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरिअल, वेदनाशामक आणि अँटी-ट्युमर गुणधर्म आहेत. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो, शिवाय लघवीचं प्रमाण वाढतं. त्याच्या पानांमध्ये तुरट आणि अँटी-ओव्हुलेटरी गुणधर्म असतात. त्याची फुलंसुद्धा अनेक गुणांनी समृद्ध आहेत.डोळ्यातील मोतीबिंदूचा उपचारमोतीबिंदू आणि रातांधळेपणा यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पळस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी पळसाच्या मुळांचा रस ...
अशी घ्या गरोदरपणात काळजी
Article

अशी घ्या गरोदरपणात काळजी

अशी घ्या गरोदरपणात काळजी कुपोषित बालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. याचे मुख्य कारण गरोदर स्त्रियांनी गरोदरपण आणि प्रसुतीनंतर योग्य ती काळजी घेतलेली नसणे तसेच जन्माअगोदर आणि जन्मानंतर बालकाचे स्वास्थ्य चांगले असण्यासाठी गरोदर मातेने आपल्या बाळाची काळजी गरोदर असल्यापासून घेणे आवश्यक असते. बाळाचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी गरोदर मातेने गरोदरपणात काळजी घेणे आवश्यक आहे. गरोदरपणातील काळजी बाळ सुदृढपणे जन्माला येण्याकरिता गरोदर स्त्रियांनी गरोदरपणातच काळजी घ्यावी. गरोदर मातेने गरोदरपणात तीन महिन्यांत आपली नोंदणी जवळच्या सरकारी रुग्णालयात (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय) येथे करुन घेणे आवश्यक आहे. गरोदर मातेने गरोदरपणात दोन टीटीचे इंजेक्शन, लसीकरण डोस घेणे आवश्यक आहे. तसेच गरोदरपणात दोन सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. पहिली सोनोग्राफी 16 ते 18...
जत्रा.!
Article

जत्रा.!

जत्रा.!कार्तिक महिना उजाडला म्हणजे गावाकडं चांगली कडाक्याची थंडी पडायची.सगळीकडे गारठा जाणवायचा. लोकांची गहू हरभरा रब्बीची पेरणी सुरू व्हायची.कापसाचं शितादही पूजन करून, सगळीकडे दहीभाताचं बोणं शिंपडून चांगल्या पीकाची आशा केली जायची. वेचणाऱ्या बाया सांगुन पहिला नवा वेचा काढल्या जायचा. शेतकऱ्यांच्या या पहिल्या घरात येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत केल्या जायचं. शेतात खाण्या लायक अंबाडीची भाजी, बारीक टमाटी, वायकं,शेंगा, भेंडी,गवारांच्या शेंगा,बरबटीच्या शेंगा खायला व भाजीला भरपूर उपलब्ध असायचं.आमचे आबा शेतात गेली म्हणजे धोतराच्या घोयात भरपूर काकड्या,वायकं,बोरं,चिंचा काहीना काही खायला हमखास आणायचे. सग्या, सोयऱ्यांनाही उडीद, भुईमूग, सुर्यफुलाचे बिया नवं म्हणून पायली भर सोबत बांधून द्यायचे. आदानप्रदान संस्कृती होती. पोरीच्या घरी बाप रिकाम्या हातानं कधी जायचा नाही.नवीन निघालेले काही ना काही सोबत लेकीकड...
बुलबुलवाले  युसुफभाई.!
Article

बुलबुलवाले युसुफभाई.!

बुलबुलवाले युसुफभाई.!शहरात गतकाळात एक बँड ग्रुप चांगलाच फेमस होता. काळाच्या ओघात मागील दोन दशकांत लहान मोठे बँड मोठ्या संख्येत बंद पडले. यात कामाला असणाऱ्या कलाकारांपैकी अनेकांनी आपला व्यवसाय बदलला. त्यांना चरितार्थाची सोय जमली. मात्र ज्यांची उमर या पेशात ढळून गेली होती त्यांना परिवर्तन करण्याची संधी मिळाली नाही. मिळेल ते काम करत राहणे त्यांच्या नशिबी आलेलं. युसुफभाई त्यातलेच एक. ते अगदी उत्तमरित्या बुलबुल / बँजो वाजवत. काही वर्षापूर्वी त्यांचा बँड बंद पडला असला तरी त्यांची कला जिवंत होती. कुणीही बोलवलं तरी ते हजर होत! पैसे मिळाले नाही तरी चालेल मात्र आपला हात हलता राहिला पाहिजे ही त्या भल्या माणसाची विचारसरणी!कालांतराने ते सद्यकालिन संगीताच्या मागे पडत गेले. त्यांना ज्या ट्यून्स यायच्या त्याची फर्माईश कुणीच करत नसे. नव्या पिढीच्या झिंगंत नाचणाऱ्या पोरांना जी गाणी आवडत ती त्यांना बँजोव...
आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले
Article

आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले

आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले(राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन.! त्यानिमित्ताने हा लेख 'भारताचे महानायक महानायिका' पुस्तकातून देत आहे.-  लेखक:रामेश्वर तिरमुखे,जालना 9420705653.- संपादक)महात्मा जोतीराव फुले हे महान क्रांतिकारक होते.जी क्रांती त्यांनी मानवाच्या स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय यावर आधारित राष्ट्रनिर्माण,जी क्रांती सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, साहित्यिक सह मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी होती.जोतीराव फुले यांचा जन्म 11एप्रिल 1827 ला पुणे येथे झाला.त्यांच्या आई चिमनाबाई तर वडील गोविंदराव होत. जोतीराव रांगत असतांनाच त्यांच्या आईचे निधन झाले होते.सगुणाबाई क्षीरसागर या मावस बहिणीने जोतीराव यांचा सांभाळ करण्यासाठी मदत केली होती.गोविंदराव शेती आणि फुलांचा व्यवसाय करत होते. वयाच्या 7व्या वर्षी जोतीराव यांना...
पांगलेला गाव.!
Article

पांगलेला गाव.!

पांगलेला गाव.!नदी काठावरून दुरवर नजर जाईल जिकडे तिकडे हायब्रीडच हायब्रीड पेरलेली हिरवीगार शेतं.नदीकाठच्या डबक्या, डबक्यात साचलेल्या पाण्यावर ऑईल इंजिन बसवून वांग्याची ,टमाटयाची हिरवीगार डुंगे बहरलेली दिसायची.तयार होवून निंघालेली वांगी टमाटी विकायसाठी गावच्या आठवडी बजारात शेतकरी लोकं मांडायची.गावात पिक पाणी तसं चांगलं होतं.चांगली आबादानी होती. जो तो आपल्या मेहनतीत व्यस्त रहायचा. शेणपाणी आटपून रंगरावनं गोठ्यातील बैल मोकये सोडून त्याईच्या पाठीवर दोर टाकले. बैलांनी पाणी प्याले सरका नदीचा मार्ग धरले‌ला. बादशाहा भाईच्या नदीपल्याडच्या मईच्या वावरात आज हायब्रीडच्या वावरात डवऱ्याचा फेर होता.कायाभोर मईच्या वावरात कायभोर हायब्रीड चांगलं टोंग्या,मांड्या,बसलं होतं. वावरंही तसं ताकदचं म्हणजे हेल्याचं मस्तकच होतं.साजरं शेणखत व पुराच्या पाण्यामुळे येणारा सुपीक गायवटी भाग असल्यानं व घरच्याच दहा बारा बै...
सप्रेम नमस्कार.!
Article

सप्रेम नमस्कार.!

सप्रेम नमस्कार.!                       खऱ्या अर्थाने निवडणूक म्हणजे एक सोहळा असतो, हे आता दिसून येऊ लागलं असून लोकसभेपेक्षा ही जास्त हा विधानसभेचा निवडणूक सोहळा रंगतदार होणार अस दिसत आहे.मतदार राजा आणि जनतेच्या हिताचे इतके निर्णय धडाधड होत आहेत,की  हे पाहून अस वाटत हेच मुख्यमंत्री"उपमुख्यमंत्री होते की नवीन आलेत. किती धाडसी निर्णय घेत आहेत नाही का ? चीफ तर नाही ना यांच्या मध्ये बसवली धाडसी निर्णय घेण्याची.            तोल जाऊ पर्यंत जनता ओरडून थकली परंतु टोल बंद झाले नाही.परंतु निवडणूक आली असता  न मागता मुंबईत जाणारे  टोल माफ. आणि नवीन किती तरी महामंडळे स्थापन वाह काय वेग पकडलाय नाही सरकारने .खऱ्या अर्थाने गतिमान सरकार  झालंय.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!          इथून मागेच हे निर्णय घेतले असते तर खूप बरं झालं असत . बाकी मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला ते काम मात्...