Saturday, May 2

Blog

शेगाव हादरलं! गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर वारंवार अत्याचार; आरोपीच्या बहिणीचाही सहभाग
News

शेगाव हादरलं! गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर वारंवार अत्याचार; आरोपीच्या बहिणीचाही सहभाग

शेगाव : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातून संतापजनक व अंगावर काटा आणणारे प्रकरण उघडकीस आले आहे. विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात आरोपीसोबत त्याची बहीणही सामील असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या घटनेमुळे शेगाव शहर हादरले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.फिर्यादी विवाहित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सचिन ज्ञानेश्वर चोपडे याने तिला आपल्या घरी बोलावले. तिला चहा देत त्यामध्ये गुंगी आणणारे औषध मिसळले आणि ती शुद्ध हरपल्यावर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. इतक्यावरच तो थांबला नाही तर पीडितेचे नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीमुळे पीडिता दीर्घकाळ आरोपीच्या अत्याचाराला बळी पडत राहिली.या गुन्ह्यात आरोपीच्या बहिणीचीह...
बंजारा समाजाचा एल्गार: एस.टी. आरक्षणासाठी समाज, युवा आणि राजकीय नेत्यांचा सहभाग
Article

बंजारा समाजाचा एल्गार: एस.टी. आरक्षणासाठी समाज, युवा आणि राजकीय नेत्यांचा सहभाग

बंजारा समाजाचा एल्गार: एस.टी. आरक्षणासाठी समाज, युवा आणि राजकीय नेत्यांचा सहभागबंजारा समाज हा भटक्या जीवनशैलीसाठी परिचित आहे. व्यापारी, पशुपालक,धान्यवाले,वाहतूक करणारे,जंगलातून स्थलांतर करणारे असे विविध व्यवसाय समाजाने इतिहासात केले.ब्रिटिश राजवटीत वसाहती कायद्यांतर्गत त्यांना “गुन्हेगार जमाती”चा शिक्का बसला होता.हा डाग १९५२ नंतर दूर झाला,पण सामाजिक व आर्थिक परिणाम मात्र आजतागायत जाणवत आहेत.बंजारा समाजात शिक्षणाच्या संधींची कमतरता,गावाबाहेर वसाहती,आरोग्याची दयनीय अवस्था,स्त्री-पुरुष दोघांच्याही रोजगारातील मर्यादा या कारणांमुळे बंजारा समाज अजूनही मोठ्या प्रमाणावर वंचित आहे.शिक्षण,नोकरभरती,राजकीय प्रतिनिधित्व या क्षेत्रांत त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.म्हणूनच त्यांची मागणी आहे की त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गात (एस.टी.) समाविष्ट करावे.महाराष्ट्रातील विविध समाजघटकांनी मागील काही दशकांत...
नापिकी: रामभाऊच्या मेहनतीची शेतकरी संघर्षकथा
Story

नापिकी: रामभाऊच्या मेहनतीची शेतकरी संघर्षकथा

"नापिकी: रामभाऊच्या मेहनतीची शेतकरी संघर्षकथा"मंगयवारचा गावच्या आठवडी बजार असल्यानं,पायटीच रामभाऊनं ढोराईले गव्हाणीत आदल्या दिवशी कापून आणलेल्या गावरान कडावूचे धांडे लाकडावर कुऱ्हाडीनं बारीक गेंडुरे करून ढोराईपुढे टाकले व गवत कापाचे ईवे वयनाटीतून काढून घराजोळच्या नालीच्या कोपऱ्यावर ठेवलेल्या खरपाच्या गोटयावर साजरे खराखरा घासले. तसा त्या खरपाच्या गोटयाचा उपयोग कोणाचे ट्रॅक्टर, आऊतभांडे,बैलबंडया, ढोरवासरं घराच्या ओट्याले शेंदून जाऊ नये म्हणून त्यानं नालीवर बरोबर बसवले होते. ओटयासमोर इलेक्ट्रीकचा लोखंडी पोल व त्या पोलच्या व भिंतीच्या बरोबर मधात इंधनकाडीसाठी वावरातून तोडून आणलेले मोठमोठे लाकडाचे फाटे व्यवस्थीत रचून ठेवलेले. समोर गाईवासराचे दोन खुटे दिवसभर रिकामेच असायचे.कारण गावचा दल्लारवाला म्हणजे ढोरं वयणाऱ्याकडं गाय, वासरू त्यानं हप्त्यावारी बऱ्याच दिवसांपासून टाकलेले. त्यामुळे दिवस...
अमृतसर एक्स्प्रेसचा थरार : दोन डबे मागे राहिले, प्रवाशांचा जीवघेणा अनुभव
News

अमृतसर एक्स्प्रेसचा थरार : दोन डबे मागे राहिले, प्रवाशांचा जीवघेणा अनुभव

अमृतसर एक्स्प्रेसचा थरार : दोन डबे मागे राहिले, प्रवाशांचा जीवघेणा अनुभवपालघर : रविवार दुपारी डहाणू रोड स्थानकाजवळ मुंबई-अमृतसर एक्स्प्रेसमध्ये घडलेली घटना प्रवाशांसाठी अक्षरशः थरारक ठरली. दुपारी साडेदीडच्या सुमारास ही गाडी डहाणू स्थानक ओलांडून थोड्याच अंतरावर गेली असता अचानक कपलिंग तुटले आणि गाडीचे दोन डबे मागे राहिले. इंजिनासह अठरा डबे वेगाने पुढे धावू लागले. क्षणभर प्रवाशांना काहीच कळेना; गाडी दोन भागांत विभागल्याचे लक्षात आल्यानंतर डब्यांमध्ये आरडाओरड सुरू झाली. भीतीपोटी काही प्रवाशांनी थेट खाली उड्या मारल्या.सुदैवाने त्या वेळी एक्स्प्रेसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे गाडी काही अंतरावर थांबवण्यात आली. परंतु तोपर्यंत प्रवाशांचा जीव अक्षरशः अडकल्यासारखा झाला होता. काही क्षणांसाठी डहाणू परिसरात रेल्वे अपघात झाल्याचीच चर्चा रंगली....
सेवेतून संस्कार NSS स्थापना दिनी विद्यार्थिनींचं श्रमदान
News

सेवेतून संस्कार NSS स्थापना दिनी विद्यार्थिनींचं श्रमदान

सेवेतून संस्कार NSS स्थापना दिनी विद्यार्थिनींचं श्रमदानअमरावती : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात दिनांक २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात स्वयंसेविकांसाठी उद्बोधन कार्यक्रम तसेच विकसित भारत २०४७ या उपक्रमांतर्गत श्रमदानाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय कोल्हे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पुनम चौधरी (कार्यकारिणी सदस्य, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी) व मार्गदर्शक म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय काळे उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले.गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सीमा अढाऊ यांनीही विद्यार्थिनींन...
मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!
Article

मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!

मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे लातूर येथील एका खासगी रुग्णालयात आज निधन झाले. जांभळढव्हपासून बिरडं पर्यंतचा प्रवास आज थांबला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हासेगाव येथील ते रहिवासी होते.मराठवाड्याच्या तहानलेल्या मातीला, दुष्काळाने होरपळलेल्या शिवारांना आणि उपाशीपोटीही मुले शिकवणाऱ्या ग्रामीण आईच्या जगण्याला शब्द देणारा सशक्त आवाज आज कायमचा थांबला आहे. ख्यातनाम कथाकार भास्कर तात्याबा चंदनशिव यांच्या निधनाने मराठी साहित्य सजीव कथनकलेचे एक तेज गमावून बसले आहे. त्यांच्या कथांनी केवळ ग्रामीण समाजाचेच नव्हे, तर जातीय, स्त्रीवादी आणि दलित जीवनाचे दु:ख, आशा, संघर्ष आणि मूक करुणा आपल्या समोर उभी केली.१२ जानेवारी १९४५ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील हासेगावात जन्मलेल्या संवेदनशील या बालकाने पुढे मराठी साहित्याला कथाकार भास्कर चंदन...
कर्जबाजारी शेतकरी दांपत्याची हृदयद्रावक आत्महत्या, पत्नीने विहिरीत उडी, पतीने गळफास
News

कर्जबाजारी शेतकरी दांपत्याची हृदयद्रावक आत्महत्या, पत्नीने विहिरीत उडी, पतीने गळफास

छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री) – राज्यातील शेतकरीवर्गावर वाढत असलेल्या कर्जाच्या दबावामुळे शेतकरी दांपत्याने हृदयद्रावक आत्महत्या केली. फुलंब्री तालुक्यातील आळंद गावातील 43 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी विलास रामभाऊ जमधडे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी कर्जबाजारीपणामुळे आपले जीवन संपवले.कर्जाचा ताण आणि शेतीतून अपुर्या उत्पन्नामुळे विलास आणि रमाबाई यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मजुरीवर अवलंबून साधत होते, मात्र त्यांच्यावर बँक, सोसायटी आणि खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते. रमाबाई यांच्यावर बचत गटाचेही कर्ज असल्याचे स्पष्ट झाले.शुक्रवारी रमाबाई यांनी शेतातील विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मुलं आणि नातेवाईक घरी परतले. परंतु सायंकाळी पाचच्या सुमारास विलास जमधडे यांनी गावापासून दोन किलोमीटर दूर शेतात जाऊन व्हॉट्सअॅप ग्रुपवर “कर्जबाज...
रजोनिवृत्ती : स्त्रीच्या आयुष्यातील नवा टप्पा आणि बदलांचा प्रवास
Gerenal

रजोनिवृत्ती : स्त्रीच्या आयुष्यातील नवा टप्पा आणि बदलांचा प्रवास

स्त्रीचे आयुष्य म्हणजे ऋतूंचा प्रवास. बालपणापासून किशोरवय, तरुणाई, मातृत्व, आणि नंतर वृद्धत्व असा हा प्रवास असतो. या प्रत्येक टप्प्यात शरीर आणि मनामध्ये अनेक बदल होत राहतात. मासिक पाळी सुरू होणे हा जसा एका नव्या जीवनाचा प्रारंभ असतो, तसाच मासिक पाळी थांबणे म्हणजे एका वेगळ्या टप्प्याची सुरुवात असते. या टप्प्यालाच आपण रजोनिवृत्ती म्हणतो.रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या प्रजननक्षमतेचा शेवट दर्शवते. साधारणतः 45 ते 55 वयोगटात ती दिसून येते, पण काहींमध्ये ती 40 च्या आसपासही सुरू होते. जेव्हा सलग बारा महिने मासिक पाळी येत नाही, तेव्हा या स्थितीला रजोनिवृत्ती मानले जाते. हा काळ फक्त शारीरिक बदल घडवून आणत नाही तर मानसिक आणि भावनिक बदलही घडवतो.या काळात स्त्रीला अनेक नवीन अनुभवांना सामोरे जावे लागते. सुरुवातीला मासिक पाळी अनियमित होऊ लागते. कधी दोन महिने पाळी थांबते, पुन्हा येते, तर कधी अचान...
आशिया कप २०२५ ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाचा नकार
News

आशिया कप २०२५ ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाचा नकार

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. हा विजय ऐतिहासिक ठरला असला तरी सामन्यानंतरचा प्रसंग अधिक गाजला. कारण भारतीय संघाने विजेत्यांची ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.प्रेमदासा स्टेडियमवर सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरणाचा समारंभ जवळपास तासभर उशिरा सुरू झाला. या विलंबामुळे मैदानावर गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन तसेच पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या हस्ते द्यायची होती. नक्वी हे भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जात असल्याने भारतीय संघाने सामूहिकरित्या व्यासपीठावर जाण्यास नकार दिला.सूत्रसंचालक सायमन डुल यांनी समारंभ थांबवताना जाहीर केले की, “भारतीय संघ आज रात्री पारितोषिकं स्वीकारणार नाही.” परिणामी संघाचा सामूहिक फोटो घेण्यात आला नाह...
कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिक
Article

कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिक

कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिककला ही आत्माविष्काराची पहिली पायरी आहे, प्रत्येक माणसाच्या अंगी एकतरी कला असावी. माणसाला कधीही उपाशी ठेवत नाही. कला निराशामय काळोखातील एक प्रकाशमान बिंदू आहे, जो माणसाला वादळातील पणतीप्रमाणे सतत संघर्ष करत जगण्याची प्रेरणा देतो. अशा सुंदर लालित्यपूर्ण लेखन करणाऱ्या पुसद जि यवतमाळ येथील लेखिका निशा डांगे यांची कपाळ गोंदण ही ललितलेख असलेली साहित्य कलाकृती नुकतीच वाचनात आली. लेखिकेने स्त्री जीवनातील अनेक सुखदुःखाच्या हिंदोळ्यावरील आलेले अनुभव या कलाकृतींमधून मांडले आहेत.कपाळ गोंदण या कलाकृतीतील ललित साहित्याच्या अनुषंगाने मुखपृष्ठावर साकारलेल्या भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका स्त्रीच्या प्रातिनिधिक चित्राने स्त्री जीवनातील अनेक गोष्टींना अधोरेखित केले आहे. ही कलाकृती स्त्री जीवनाला केंद्रस्थानी ठेवून तिच्या भोवती ...