Saturday, May 2

Blog

सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! झांसीत आजीचा भन्नाट कारनामा
News

सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! झांसीत आजीचा भन्नाट कारनामा

सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! झांसीत आजीचा भन्नाट कारनामाझांसी : सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! – हे वाक्य ऐकायला जरी विनोदी वाटत असलं तरी यामागची कहाणी एका कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेली आहे. झांसी जिल्ह्यातील सायवारी गावात एक ४० वर्षीय आजी आपल्या प्रियकरासोबत रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळून गेली, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.ही आजी दोन मुलांची आई आणि दोन नातवंडांची आजी असून, तिच्या ‘प्रेमाच्या उड्या’मुळे गावात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. कुटुंबातील सर्वजण या घटनेमुळे हादरले असून, घरातील सुनांचे दागिने आणि ४० हजार रुपये रोख गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.घटनेचा तपशील:महिला ही कामता प्रसाद यांची पत्नी असून, ती गेल्या अडीच वर्षांपासून वीटभट्टीवर काम करत होती. त्याच ठिकाणी तिची ओळख अमर सिंह प्रजापती नावाच्या पुरुषाशी झाली. ओळख प्रेमात बदलली आणि दोघां...
महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे
News

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरेपुणे : “निवडणुकीच्या आधी जशा महिलांच्या खात्यात दोन-तीन महिन्यांचे हप्ते जमा केले, तसेच आता पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते द्या, कारण सध्या गरज आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना,” अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पुण्यात झालेल्या अजित नागरी पतसंस्थेच्या महिला बचत गट कर्जदार भगिनींना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप व कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.ठाकरे म्हणाले, “लोकशाहीची ही दुर्दैवी अवस्था आहे की, कोर्टात न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. हातात दांडूका घेतल्यावरच न्याय मिळतो हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयात आमची केस सुरू आहे. आता आठ-दहा दिवसांत तारीख आहे, पण न्याय मिळायला २०४५–२०५० पर्यंत वाट पाहावी लागेल अशी आ...
मटण खाल्लं पण उधारी गिळली!  कोल्हापूरच्या दुकानदाराची भन्नाट उधारी वसुली शक्कल!
News

मटण खाल्लं पण उधारी गिळली! कोल्हापूरच्या दुकानदाराची भन्नाट उधारी वसुली शक्कल!

मटण खाल्लं पण उधारी गिळली! कोल्हापूरच्या दुकानदाराची भन्नाट उधारी वसुली शक्कल!कोल्हापूर : “मटण खाल्लं पण उधारी गिळली!” हे वाक्य सध्या कोल्हापूर जिल्ह्यात अक्षरशः हेडलाईन बनलं आहे. बहिरेश्वर गावातील चिकन-मटण विक्रेता सदल्या काशिद यांनी उधारी वसुलीसाठी घेतलेली हटके शक्कल आता चर्चेचा विषय ठरली आहे.ग्राहकांकडून उधारी वसूल होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या सदल्या काशिद यांनी थेट गावाच्या चौकात डिजिटल बोर्ड लावून सर्वांना इशारा दिला आहे. या बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे —“उधारी लवकरात लवकर जमा करा, अन्यथा दिवाळीमध्ये उधारीवाल्यांची नावं बोर्डवर झळकतील!”या इशाऱ्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. ज्यांनी कधी ‘फक्त थोडीशी उधारी’ केली होती, त्यांनाही आता आपलं नाव बोर्डावर येईल की काय, अशी धास्ती वाटू लागली आहे.कोल्हापूर हा रस्सा आणि मटणासाठी प्रसिद्ध जिल्हा. पण आता इ...
सोनं आणि संघर्ष: एका पानविक्री कुटुंबाचा संघर्ष.!
Editorial

सोनं आणि संघर्ष: एका पानविक्री कुटुंबाचा संघर्ष.!

सोनं आणि संघर्ष: एका पानविक्री कुटुंबाचा संघर्ष.!दसरा म्हणजे शहरात सोनं, दागिने, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि आनंदाचा सण. लोक खरेदी करतात, घर सजवतात आणि नवे कपडे घालतात. पण बडनेरच्या चावडी चौकात बसलेलं जनूना गावचं एक कुटुंब या चमकत्या आनंदापासून दूर, एका वेगळ्या संघर्षात दिसून आले. हे कुटुंब जंगलात तीन-चार दिवस राबून, काटेरी झुडपांतून आपट्याची पानं बाजारात आणतात. शहरातील लोक ती पानं सोन्याचे प्रतीक म्हणून घेतात, शुभेच्छांसाठी जपतात. पण जनूना गावातील कुटुंबासाठी ती पानं म्हणजे जीवनाचा आधार. ह्या मेहनतीतून त्यांना मिळतो थोडासा पैसा, घरसाठा, मुलांची शाळेची फी, औषधे आणि कपडे.सोनं विकलं… हा शब्द ऐकताना शहरातल्या लोकांच्या डोळ्यासमोर संपत्ती, चमचमणारे दागिने, सुवर्णमयी वस्तू उभी राहतात. पण या कुटुंबासाठी हे “सोनं” नाही; हा फक्त पोटाच्या तोंडभराईसाठी, मुलांच्या शाळेसाठी, घराच्या गरजांस...
प्रकाश आंबेडकरांचा घणाघाती आरोप: “विश्वगुरू की चपराशी?
News

प्रकाश आंबेडकरांचा घणाघाती आरोप: “विश्वगुरू की चपराशी?

प्रकाश आंबेडकरांचा घणाघाती आरोप: “विश्वगुरू की चपराशी?अकोला: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांच्या जागतिक ‘विश्वगुरू’ भूमिकेविरुद्ध तीव्र टीका केली. त्यांनी आरोप केला की, “जागतिक पातळीवरील अनेक देश पंतप्रधानांना मित्र मानत नाहीत, उलट भारतीयांची हकालपट्टी केली जाते. हा सर्व प्रयत्न दाखवण्यासाठी केला जातो की भारत ‘विश्वगुरू’ आहे की फक्त चपराशी?”भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवातील धम्म मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. जी. वानखडे उपस्थित होते. यावेळी वंचित आघाडीच्या प्रा. अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, माजी आमदार नातिकोद्दिन खतिब, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, बालमुकुंद भिरड आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.ॲड. प्रकाश आंबेडकर म्ह...
‘कांतारा’ने पहिल्याच दिवशी केली 60 कोटींची कमाई
News

‘कांतारा’ने पहिल्याच दिवशी केली 60 कोटींची कमाई

‘कांतारा’ने पहिल्याच दिवशी केली 60 कोटींची कमाईबंगळुरू, : रिषभ शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘कांतारा चॅप्टर 1’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल ६० कोटी रुपयांची कमाई करत २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.चित्रपटाचे बजेट सुमारे १२५ कोटी रुपये असले तरी, पहिल्या दिवशीच मिळालेल्या या विक्रमी प्रतिसादामुळे निर्माते आणि टीम उत्साहित आहेत. देशभरात ‘कांतारा’चे विकेंडचे जवळपास सर्व शो हाऊसफुल झाले आहेत. अनेक शहरांमध्ये थिएटरसमोर चाहत्यांची गर्दी उसळली असून, सोशल मीडियावर चित्रपटाचे कौतुकांचा वर्षाव सुरू आहे.‘कांतारा चॅप्टर 1’ने पहिल्या दिवशी केलेल्या कमाईमुळे तो थेट सुपरस्टार्सच्या यादीत पोहोचला आहे. २०२५ मधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये —पहिल...
आजपासून RBI चा मोठा निर्णय : चेक क्लिअरन्स त्याच दिवशी, ग्राहकांना थेट फायदा
News

आजपासून RBI चा मोठा निर्णय : चेक क्लिअरन्स त्याच दिवशी, ग्राहकांना थेट फायदा

आजपासून RBI चा मोठा निर्णय : चेक क्लिअरन्स त्याच दिवशी, ग्राहकांना थेट फायदामुंबई : बँकिंग सिस्टिममध्ये आजपासून मोठा बदल झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टिम लागू केली असून यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत चेक क्लिअर होण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असे. पण आता ही प्रतिक्षा संपली आहे.नव्या प्रणालीत कॉन्टिन्युअस चेक क्लिअरिंग मोड सुरू करण्यात आला आहे. यानुसार सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बँकेत जमा झालेले सर्व चेक तात्काळ स्कॅन करून त्यांची इमेज आणि डेटा क्लिअरिंग हाउसकडे पाठवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संबंधित बँकेने त्या चेकची पुष्टी करणे आवश्यक असेल. मात्र वेळेत उत्तर दिले नाही तर तो चेक आपोआप क्लिअर झालेला मानला जाईल.या बदलामुळे ग्राहकांना चेक जमा केल्यानंतर पैसे त्याच दिवशी खात्यात जमा होत...
मृतालाही नोटीस? हायकोर्टाचा आयकर विभागाला झटका!
News

मृतालाही नोटीस? हायकोर्टाचा आयकर विभागाला झटका!

मृतालाही नोटीस? हायकोर्टाचा आयकर विभागाला झटका!मुंबई : मृत व्यक्तीला आयकर विभागाने नोटीस पाठवल्याचा अजब प्रकार नुकताच समोर आला आहे. "मृताच्या नावे आयकर नोटीस पाठवली तर ती कायद्याने ग्राह्य धरता येत नाही" असा ठोस निर्वाळा बॉम्बे हायकोर्टाने देत ही नोटीस रद्द केली आहे. या प्रकरणी हायकोर्टाने आयकर विभागाच्या निष्काळजीपणावर थेट बोट ठेवत विभागाला चपराक दिली.निनांच्या याचिकेतून उघडकीसया प्रकरणाची सुरुवात नीना शाह यांनी दाखल केलेल्या याचिकेतून झाली. नीना शाह यांचे पती जतीन शाह यांचे 23 फेब्रुवारी 2019 रोजी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर त्यांनी तत्काळ आयकर विभागाला अधिकृतपणे कळवून याची नोंद करून घेतली होती. मात्र, ही माहिती असूनही आयकर विभागाने 2013-14 या आर्थिक वर्षातील प्रकरणात 24 एप्रिल 2021 रोजी जतीन शाह यांच्या नावेच नोटीस पाठवली.त्या वेळीही नीना शाह यांनी मृ...
कागदी बॉंडचा काळ संपला; महाराष्ट्रात आजपासून ई-बॉंडची धडक सुरुवात!
News

कागदी बॉंडचा काळ संपला; महाराष्ट्रात आजपासून ई-बॉंडची धडक सुरुवात!

कागदी बॉंडचा काळ संपला; महाराष्ट्रात आजपासून ई-बॉंडची धडक सुरुवात!मुंबई : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयात-निर्यात व्यवहारात क्रांती घडवून आणली आहे. आजपासून महाराष्ट्रात कागदी बॉंड बंद करून ई-बॉंडची सुरुवात झाली असून, या नव्या प्रणालीमुळे व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.ई-बॉंड प्रणाली महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग, National E-Governance Services Limited (NeSL) आणि National Informatics Centre (NIC) यांच्या तांत्रिक सहाय्याने सुरू करण्यात आली आहे. आता आयातदार व निर्यातदार वेगवेगळ्या कागदी बॉंडची गरज न करता, एकाच इलेक्ट्रॉनिक बॉंडद्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकतील.या नव्या प्रणालीचे महत्वाचे फायदे:प्रोव्हिजनल असेसमेंट, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स, वेअरहाऊसिंग व मॅन्युफॅक्चरिंग इन बॉन्डेड वेअरहाऊसेससाठी ई-बॉंड वापरता येईल.सर...
ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
Article

ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदेराज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत . घरादारांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली आहेत .विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे . या पार्श्वभूमीवर आज राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.पण ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय ? ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते ? जाणून घेण्याचा हा प्रयत्न…खरंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. मात्र यात प्रामुख्याने दोन शब्द वापरले गेले आहेत.पहिला अवकर्षण काळ. ज्यात सरासरीपेक्षा १०% कमी पाऊस झाला तर अवकर्षण काळ असं म्हटलं जातं. तर दहा टक्क्यांपेक्षा अधिक ...