Wednesday, March 4

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Gerenal

मुलाखत द्या बिनधास्त

बरेचदा इंटरव्ह्यू म्हणजे नेमकं काय याबाबत विद्यार्थी आणि नोकरेच्छूक उमेदवार अनभिज्ञ असतात. त्यामुळे मुलाखतीला सामोरं जाताना विनाकारण तणाव येतो. हे टाळायचं असेल तर मुलाखतीला आत्मविश्‍वासाने सामोरं गेलं पाहिजे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर आपण अपात्र ठरतो हा गैरसमज दूर केला पाहिजे. सामान्यत काही पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांची मुलाखत घेतली जाते.एक म्हणजे त्याला आपल्या संस्थेविषयी माहिती आहे की नाही हे मुलाखतीद्वारे तपासता येतं. म्हणून मुलाखत घेताना पॅनलवरील ज्येष्ठ अधिकारी उमेदवाराला कंपनीविषयी माहिती विचारतात. याद्वारे त्यांना उमेदवाराला आपल्या कंपनीत काम करण्याची इच्छा आहे की नाही हे तपासून बघायचं असतं. मुलाखतीद्वारे उमेदवाराची तांत्रिक क्षमताही तपासली जाते.ज्या कामासाठी अर्ज केला त्याचं कौशल्य उमेदवाराकडे आहे की नाही याचा शोध कंपनी घेत असते. त्यामध्ये कामाची आवड आणि आवश्य...
Gerenal

कोमट दुधासोबत चमचाभर तुपाचे फायदे

सध्याच्या जीवनशैलीत लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटासंबंधित समस्या उद्भवणं सहाजिकच आहे. अलीकडे बहुतांश व्यक्ती बद्धकोष्ठता आणि अँसिडीटीच्या समस्येशी झुंजत आहेत. तशी तर ही एक सामान्य समस्या आहे पण जर त्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात अल्सरसारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. पोटाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बरेच लोक डॉक्टरांकडे जातात पण तुम्ही घरगुती उपचारांनी देखील ही समस्या दूर करू शकता.ही एक फूलप्रूफ स्वदेशी रेसिपी आहे ज्याचा आयुर्वेदिक डॉक्टरांनीही दावा केला आहे. याचा वापर केल्याने तुमची बद्धकोष्ठतेची अर्थात पोट साफ न होण्याची समस्या चुटकीसरशी दूर होऊ शकते. या रेसिपीसाठी एक चमचाभर तूप, एक ग्लास कोमट दूध किंवा पाणी इतकंच साहित्य लागतं. याचे इतरही अनेक फायदे आहेत याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टरांनी माहिती दिली आहे. बंगळुरूच्या जीवोत्तम आयुर्वेद केंद्राचे डॉक्टर श...
Gerenal

आरोग्यदायी शेवगा व त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ

शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी वरदान ठरते. शेवग्याचे झाड अतिशय लवकर वाढते. भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आद्र्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते. शेवग्याच्या शेंगा वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व आहेत. शेवग्याच्या पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियामध्ये पोषक घटक असतात.जीवनसत्व अ, ब आणि क, खनिज विशेत: लोह आणि सल्फर, सिस्टेनाइन, अमिनो आम्ले असतात. त्यात भरपूर पोषक घटक आणि रोगप्रतिकार घटक असतात. त्यामुळे शेवग्यचा विविध भागांचा वापर ३00 पेक्षा अधिक आजारांच्या उपचारामध्ये केला जातो. शेवग्याच्या शेंगा, पाने, बियांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.शेवग्याचे आरोग्यदायी फायदे शेवग्याच्या पानाच्या रसाच्या सेवनाचे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शेवग्यचा पानाचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया, जुलाबावर गुणकारी आहे, या...
Gerenal

सोशल मीडिया आणि महिला

आपण बघतोच आहोत आधुनिक काळात सोशल मीडियाला जास्त महत्त्व दिल्या जाते.पत्येक जण छोटीशी गोष्ट असली तरी प्रसिध्दी साठी सोशल मीडिया नेटवर्कची मदत घेत असतात. नाव कमावतात काही दिवस तीच ती चर्चा सुरू असते. नंतर अचानक शांत होते. त्याला ना बुड ना शेंडा , ना रंग ना ढंग असतो. बरेच दा पुरुष सुध्दा सोशल मिडीयावर यायला कचरतात. पण महिला मात्र बेधडकपणे आपली मते मांडत असतात.मोकळेपणाने चर्चा करत असतात.वादविवाद चर्चेत सहभागी होतांना अभ्यास पुर्ण माहिती देत असतात.आपल्या आयुष्यातील एखादा प्रसंग शेअर करण्या सोबतच वर्ज्य समजल्या जाणाऱ्या विषयांत सुध्दा त्या सढळ मनाने लक्ष देतात. त्याच प्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला देखील कौटुंबिक जवाबदारी सांभाळून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करणा-या महिला आपल्या अवतीभवती आढळतात.शिक्षणच नव्हे तर त्यांच्यातला आत्मविश्वास, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम...
Article

वसतिगृहाचे जनक छत्रपती शाहु महाराज

       आज कित्येक गरजू आणि हुशार विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षण घेतांना आपण बघत असतो. मी सुद्धा पाच वर्षे समाजकल्याण वसतिगृहात राहून शिक्षण घेतले आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून वसतिगृहात नंबर न लागल्यामुळे काय त्रास सहन करावा लागतो याची जाणीव झाली आहे. कारण मनात शिक्षण घेण्याची तर तीव्र इच्छा असते पण कुठंतरी परिस्थिती आडवी येते. जे विद्यार्थी वसतीगृहात नंबर लागल्यावर आपले शिक्षण होईल या आशेवर शहरात येतात पण त्यांचा नंबर वसतिगृहात लागला नसेल आणि शिक्षण घेण्याची खुप आवड आहे अश्या विद्यार्थ्यांनी काय करावे हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. अशीच काही परिस्थिती शाहू महाराजांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर आली होती.कॉलेज, शाळा काढल्या पण काही विद्यार्थ्यांना राहायची सोय नव्हती. त्यामुळे शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून १८९६ मध्ये सर्व जातीजमातीसाठी एक वसतिग...
Gerenal

लवंग सेवनाचे फायदे

आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी लवंग केवळ आपल्या अन्नाची चवच वाढवत नाही, तर शरीराला पौष्टिक घटक देखील मिळवून देते. प्राचीन काळापासून याचा उपयोग आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून केला जात आहे. चला तर, याचे फायदे जाणून घेऊयात.हे वाचा-गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!रात्री लवंगाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता, अतिसार, आंबटपणा यासारख्या पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.लवंगामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे मुरुम रोखण्यास उपयुक्त आहे.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजकोमट पाण्यासह लवंगाचे सेवन केल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. हात पाय थरथरण्याच्या आजाराने ग्रस्त लोक यापासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपायच्या आधी १ ते २ लवंगा घेऊ शकतात.दररोज लवंगाचे सेवन केल्यास आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. लवंग आपल्याला खोकला, सर्दी, विषाणूजन्य संसर्ग, ब्राँकायटिस, सायन...
Article

मर्यादा आणि बंधने

भारतीय संस्कृती मधे मर्यादा या शब्दाशी माणसाचे खूप जवळचे नाते आहे. जगतांना प्रत्येकाला काही विशिष्ट गोष्टीच्या मर्यादा पाळाव्या लागतात. त्या कौटूंबिक मर्यादा असो, सामाजिक मर्यादा असो किंवा नैसर्गिक मर्यादा असो! त्या मर्यादा जगण्याचा एक भाग असतो.. मर्यादेत नीतिमूल्ये जोपासली जातात. व्यभिचार, अनिती, स्वैराचार या गोष्टी मर्यादेत राहून च टाळल्या जातात..हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजआपल्या दिनचर्येत संस्कार म्हणून घातलेल्या मर्यादा या निश्चितच बंधन नसतात. बंधने ही लादली जातात तर मर्यादा ही पाळली जाते.. एखाद्या "पक्षाला" जेव्हा आपण पिंजऱ्यात ठेवतो; तेव्हा आपण न उडण्याचे त्याच्या वर बंधन घालतो, पण रात्री अपरात्री मुलांनी घराबाहेर पडू नये हे मुलांना आईवडिलांनी घातलेले बंधन नसून एक काळजी पोटी घातलेली मर्यादायुक्त बंधने असतात..प्रत्येकाला स्वतःचे मत स्वतःची एक स्वतंत्र विचारसरणी असते, पण याचा अर्...
Article

गावकुसाबाहेरचा ‘जीवन संघर्ष’ चावडीवर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न

मानवी उत्क्रांतीचा इतिहास अभ्यास करायचं ठरवलं तर असे लक्षात येईल की, एकेकाळी मानवाच्या दोनंच जाती होत्या. त्या दोन जाती म्हणजे नर आणि मादी. याच दोन जातीचे विस्तारीकरण, वर्गीकरण आणि रुढीकरण झाले आणि बहुजन वंचित अशी एक जात आणि अभिजन संचितांची दुसरी जात निर्माण झाली. या वंचितांना मिळणारी वागणूक आणि करावा लागलेला ‘जीवन संघर्ष’ मोगलांच्या राज्यातही होता. शिवशाहीत कमी होतो आहे असे वाटताना पेशवाईत त्याला उभारी मिळाली. इंग्रजांच्या गुलामगिरीतही वंचितांना हाल-आपेष्टाच भोगाव्या लागल्या. अभिजनांनी इंग्रजी पोषाखासह इंग्रजी खाण्या-पिण्याच्या सवयी आत्मसात केल्या. पण स्वकीयांच्यावर होणारे जातीय अत्याचार बंद केले नाहीत. या गुलामगिरीतून भारत देश 1947 साली मुक्त झाला असे इतिहासकार जरी लिहीत आणि सांगत असले तरी परीस्थिती आज एकविसाव्या शतकातही संपूर्ण बदलली आहे असे म्हणणे आणि मानणे धाडसाचे होईल.गावकुसात राहण...
Gerenal

सामना ब्रेन ट्युमरचा

ब्रेन म्हणजे मेंदू व ट्यूमर म्हणजे अनैसर्गिक वाढ होऊन निर्माण झालेली गाठ. मेंदूच्या पेशींच्या अनियंत्रित अनैसर्गिक अशा वाढीला ब्रेन ट्युमर असे म्हणतात. ही गाठ साधी अथवा कर्करोगाची असू शकते. मेंदूत शरीरातील सर्व जाणवांचे संदेश येत असतात व त्यावर आदेशही दिले जातात.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजश्‍वसन, रक्ताभिसरण, शरीराचा तोल राखणे, हालचाली करणे अशा सर्वच महत्त्वाच्या क्रियांचे नियंत्रण मेंदूतील केंद्रामार्फतच होत असते. या बाबींमुळे मेंदूत येणारी गाठ वा ट्यूमर हा खूप गंभीर विकार समजला जातो. मेंदूचे काही ट्युमर हे शस्त्रक्रिया करून मुळापासून काढून टाकता येतात. त्यांचा कोणताही परिणाम नंतर दिसत नाही.ब्रेन ट्यूमर मध्ये शरीरातील एखाद्या भागातील संवेदना नष्ट होणे, स्नायू शिथिल होणे, नष्क्रय होणे, झटके येणे, चक्कर येणे, डोके दुखणो अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे अशी लक्षणे असलेल्या मेंदूची सिटीस्कॅन ...
Gerenal

प्रतिष्ठित प्रशासकीय सेवा

प्रशासकीय अधिकार्‍यांना मिळणारा मान, सन्मान, सोयी-सुविधा आणि संधी यामुळे विद्यार्थी या सेवांच्या परीक्षेसाठी जोमाने तयारी करतात. यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार विविध सेवांमध्ये रूजू होतात. आयएएस, आयपीएस, आयईएस, आयएफएस यासारखे प्रशासकीय सेवांचे विविध विभाग आहे.म्हणूनच यातला नेमका फरक काय, अशा सेवांमध्ये जाण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी जाणून घ्यायला हवं.गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!अनेकांचं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न असतं. आयएएस म्हणजे इंडियन अँडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (भारतीय प्रशासकीय सेवा). प्रशासकीय परीक्षा आणि मुलाखतींमध्ये उत्तीर्ण होऊन चांगली रँक मिळवणारे उमेदवार आयएएस बनतात.कायद्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी या अधिकार्‍यांवर असते. यासह नवी धोरणं आखण्याच्या तसंच कायदे बनवण्याच्या कामातही त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. विविध सरकारी खात्यांच...