Friday, April 24

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

मनाला स्पर्शून जाणारी कविवर्य स्व. दादासाहेब काळमेघ यांची काव्यसंपदा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे लोकप्रिय अध्यक्ष स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या दि. 29/07/2021 ला असलेल्या 24 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचे त्यांच्याच कवितेतून काव्यमय दर्शन घडविणारा ”मनाला स्पर्शून जाणारी कविवर्य स्व. दादासाहेब काळमेघ यांची "काव्यसंपदा” हा प्रा. अरुण बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.- संपादकराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे शैक्षणिक व सामाजिक विचार आचरणात आणणारे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे लोकप्रिय अध्यक्ष, विद्वत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी करणारे लोकमहर्षी, राष्ट्रसंताचे व संत गाडगेबाबांचे तत्त्वज्ञान-विचारसारणी आंमलात आणणारे कीर्तनकार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात डोळसपण...
Article

समाजसुधारक फातिमा शेख

“फातिमा शेख या आधुनिक भारताच्या समाज सुधारक होत्या” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या. त्यांनी सावित्रीबाई बरोबर शिक्षण घेतले होते. त्यांनी पुणे येथे अध्यापकीय शिक्षण घेतले होते.त्यामुळे त्या भारतातील मुस्लीम समाज्याच्या पहिल्या शिक्षिका म्हणून अग्रेसर होत्या. महात्मा जोतीराव फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या भिडे वाडा येथे मुलीसाठी पहिली शाळा सुरु केली त्या शाळेत फातिमा शेख सावित्रीमाई फुले बरोबर शिकविण्याचे कार्य करीत होत्या त्या शाळेत प्रवेश घेतलेल्या ६ मुली होत्या काही लोकांच्या मते फातिमा शेख या त्या पैकी एक होत्या, असा समज आहे असे नसून महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या बरोबरीने काम करणारी धाडसी महिला होती यासाठी फातिमा शेख यांचा भाऊ उस्मान शेख यांनीही सहकार्य केले आहे. खरे तर इंग्रज सरकारच्या काळात आणि सनातनी जातीयवादी ब्राह्मण यांच्या विरो...
Gerenal

प्रदूषणामुळे होते केस गळती..!

आजकाल वाढत्या प्रदूषणाचे अनेक दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. विशेष म्हणजेया प्रदूषणामुळेकेस गळण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. महिलाच नाही तर पुरुषांनाही केस गळण्याच्या समस्येने ग्रासलं आहे. प्रदूषित कणांच्या सततच्या संपर्कामुळे केसांच्या वाढीला कारक ठरणार्‍या प्रथनांचं प्रमाण घटतं आणि केस गळू लागतात. हे वाचा-गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.! दक्षिण कोरियातल्या एका कंपनीने केलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. या अभ्यासातून केस गळणं आणि प्रदूषण यांचा संबंध दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. म्हणूनच शहरी भागातल्या लोकांमध्ये केसगळतीचं प्रमाण वाढल्याचं पहायला मिळतं. हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज...
Gerenal

ओढ आप्तांची

आजोबांचं वय ८५ च्या पुढचं. वयापरत्वे आलेलं आजारपण होतंच. आजोबा खरं तर पुण्याचे. पण पत्नीच्या निधनानंतर त्यांना मुलीसोबत मुंबईला जावं लागलं. आता ते तिथेच राहतात. तिथे जावई, दोन लाघवी नाती त्यांची खूप काळजी घेतात.त्यांनी तिथे मित्रपरिवारही जमवला आहे. सोसायटीतल्या बाकड्यावर बसून गप्पाही होत असतात. मात्र त्यांना पुण्याची, इथल्या मित्रपरिवाराची, नातेवाईकांची आठवण येत असते. पुण्याला यायचं म्हटलं की त्यांच्या अंगात नवा उत्साह संचारतो. मधल्या काळात कोरोनामुळे त्यांना पुण्याला येत आलं नाही. यायची खूप इच्छा! पण वयामुळे कोणी पाठवत नव्हतं. मग कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर कुटुंबासोबत ते पुण्याला आले. हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज नातेवाईकांच्या घरी गेले. पण चांगलेच खंगलेले दिसले. मलूल चेहरा, थकलेली गात्र यामुळे आजोबा खूपच म्हातारे दिसत होते. आजोबांना अशा अवस्थेत बघून धक्काच बसला अशीच प्रत्येकाची भावना हो...
Gerenal

नर्सिंगच्या क्षेत्रात आहे वाव

नर्सिंग आणि मिडवायफरी हा रोजगाराची उत्तम संधीमिळवून देणारा अभ्यासक्रम असल्याने इच्छुकाने त्याचा विचार करायला हवा. आजकाल मोठय़ा शहरातील संघटित क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये परिचारिका आणि परिचारकांना आकर्षक वेतनाच्या नोकर्‍या मिळत आहेत. या पदांवर काम करण्यासाठी परदेशी जाता यावं या हेतूनेही या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला जातो. प्रवेश घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये महिला नर्स असतात. पण पुरुषांनासुद्धा या क्षेत्रात चांगली संधी आहे. हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज आणखी एक बाब म्हणजे नर्सिंगच्या क्षेत्रात केवळ हॉस्पिलटमध्येच संधी आहेत असं नाही तर अनाथार्शम, वृध्दार्शम, सॅनटोरियम, उद्योग तसंच लष्करातही नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण करणार्‍यांना उत्तम कारकिर्द करता येते. नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍यांसाठी मेडिकल टुरिझमचं क्षेत्रही महत्त्वाचं ठरतं. आपल्याकडे भारती विद्या...
Gerenal

केस सुकवा नैसर्गिकरित्या

पावसाळ्यात केस सुकवणं हे एक जिकरीचं काम असतं. केस सुकविण्यासाठी ड्रायरचा वापर केला जात असला तरी या उपकरणाचा कमीत कमी वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून कायमच दिला जातो. पण काही दिवसांपूर्वी एका संशोधनातून सिद्ध झालं आहे की, हेअर ड्रायरने सुकवलेले केस नैसर्गिकरित्या सुकवलेल्या केसांपेक्षा जास्त निरोगी राहतात. अर्थात असं असलं तरी ड्रायरचा वापर र्मयादित ठेवावा हे देखील त्यांनी अधोरेखित केलं आहे. तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात केस सुकण्यास वेळ लागतो. हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज या दरम्यान केसांमध्ये पाणी राहून स्काल्पला सूज येऊ शकते. म्हणूनच नैसर्गिक पद्धतीने लवकरात लवकर केस सुकविण्यासाठी काही टिप्स अनुसरता येतील. शॉवर घेतल्यानंतर सर्वात आधी टॉवेलने केसांमधील पाणी टिपून घ्यावं. त्यानंतर हलक्या हाताने केस पुसावे. खसखसून पुसल्यास केसांना इजा होण्याचा संभव असतो. केस थोडे दमट असले तरी कंगव्याने विंचरू...
Article

जिद्द व परिश्रमाचे दुसरे नाव उत्तम सोनकांबळे

उभ्या आयुष्याला संघर्षमय खाचखळगे लाभले असतांना अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीतून परिश्रमाच्या जोरावर उत्तम कांबळे ह्यांनी राज्यसेवा परिक्षेत यश मिळविले. आता ते औरंगाबादला सहसंचालक (कोषागार विभाग) पदावर कार्यरत आहेत. आयुष्याला उजेडवाट मिळाली आहे. मात्र ह्या वाटेवर पोहोचण्यासाठी त्यांनी केलेला प्रवास कुणालाही चकित करुण टाकणारा 'आश्वासक' असाच आहे. जाणून घेऊ या त्यांच्या प्रवासाविषयी ...दोन वेळच्या भाकरीच्या शोधात त्यांच्या वडीलांनी मुखेड तालुक्यातील शिकारा हे गांव गाठलं. शिकारा गावची त्यावेळेची वस्ती फारतर एक हजार लोकांची. गावात घर नव्हतं, शेती नव्हती, उत्पन्नाचं साधन नव्हतं. तरीही मुलांना त्यांनी शाळेत घातलं. खेड्यापाड्यातील आंबे, पपई, फळे, भाजीपाला ठोकभावाने विकत घ्यायचा व गावापासून ८, १० किलोमिटर अंतरावर मुखेडला नेवुन, बाजारात दिवसभर विकायचा. अंधार पडण्याच्या आत ज्वारी-बाजरी विकतघ्यायची ती ति...
Article

प्रगल्भ जाणिवेतून साकारलेली डॉ. विशाल इंगोले यांची कविता ; ‘माझा हयातीचा दाखला’

कवी व्यासंगाच्या उद्यानात विचारांची फुले वेचून मौनाच्या गुंफेत बसून त्याचे गजरे करीत असतो. अगदी याचप्रमाणे कवीची कविता कागदावर उतरत असते. कविता हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नाही, तर वास्तवाला स्पर्श करुन मानवी भावभावनांचा कल्लोळ आपल्या काळजापर्यंत पोहोचवण्याचे एक सकस आणि सशक्त माध्यम असते. कविता समाजदृष्ट्या प्रभावी तेव्हाच होते जेव्हा तिला वैचारिकतिचे तात्त्विक अधिष्ठान लाभते. कवीच्या वाट्याला आलेले संघर्षमय आयुष्य जेव्हा एखादा कवी नेमक्या, मार्मिक, भाषाशैली द्वारे मांडतो तेव्हा ती कविता सामाजिक उद्रेक घेऊन जन्माला येते. सामाजिक विषमतेविरुद्ध बंड पुकारते. याच प्रगल्भ जाणिवेतून डॉ विशाल इंगोले यांचा *माझा हयातीचा दाखला* हा कवितासंग्रह आकारास आला आहे.प्रस्तुत काव्यसंग्रहाच्या समीक्षा लेखनास विलंबच झाला कारण शब्दसृष्टीतील नेमकी कोणती शब्दफुले संग्रहास अर्पण करावीत या प्रश्नाच्या आवर्तात माझी सा...
Story

कुंकवाचा धनी…!

पेढी नदीच्या काठावर वसलेलं एक गाव होतं, डोंगर-दऱ्याच्या माथ्यावरुन सूर्यनारायण डोकावत होता, कोंबड्याची बाग ऐकून शेवंता उठली, डोळे पुशीत तिनं चुलीत लाकडं लावली अर्धा कप चहा घेतला, तोवर  कमलाचा आवाज आला "शेवंते कुठे आहेस वं! झालं  नाही का बाप्पा"... शेवंतानं झपाट्यानं आपलं कामं उरकवलं. "हो तुम्ही व्हा समोर, मी येतोच मागूनं" असं म्हणत शेवंतानं आपली शिदोरी बांधली, अन निंघाली कमलासोबत कामाले. कमला तिच्या सोबत बोलत होती, पण शेवंताच्या डोक्यात ईचाराचं कावूर माजलं होतं. "काय वं शेवंते, दोन दिवसांच्या भांड्याचा होका आहे, चालशीन काय वं ? शेवंताची तंद्री तुटली हो हो ,माय चालू नाही तं सांगू कोणाले मले थोडं  राणीवाणी घरात बसता येते, रातंदिस काम केल्या बिगर तीन-तीन पोरी थोड्याच उजयाच्या राहिल्या. "बालीच्या बापाले कायी कराले लाव नं, तो काय निरा पसरलाच रायते काय ?" जाऊ देनं माय!, काय करतं कर्माचे भोग हाये...
Article

यशवंत अन् स्मशानातलं जेवण..!

नेहमीच हसत राहणारा यशवंत माझा फारच जवळचा नातेवाईक होता. त्याची आई आणि माझे बाबा सख्खे मावस-बहीण भाऊ होते. नातेवाईक, शेजारी, आणि समवयस्क असल्याने आमचं बालपण सोबतच गेलं.तसं पाहिलं तर १९५६ च्या दरम्यान तुळसाबाईचे लग्न धानोरा ताथोड तालुका कारंजा येथील किसन गडलिंग यांच्याशी झाले होते. किसन सुद्धा मूळचा धानोर्याचा नव्हताच, कारण त्याचे सर्व नातलग अमरावती जिल्ह्यातील होते. त्यांचे मामा धानोर्याचे होते. मामाच्या आधाराने ते धानोर्याला आले होते. आणि लग्नानंतर किसन गडलिंग आपली सासू शेवंताबाई धवणेकडे राहायला आले होते. शेवंताबाई म्हणजे किसन वानखडेची सख्खी आत्या व माझ्या वडिलांची मावशी होती. सुरुवातीला माझ्या घराला लागूनच त्यांचं झोपडं होतं. परंतु १९७० च्या दरम्यान ते चौधरीच्या निंबावाल्या आवारात राहायला गेले, नंतर चिंचेखालच्या चौधरी यांच्या आवारात राहायला आला. (हनुमान मंदिरासमोरच्या) तेथेच शेवंताबुडी आण...