अण्णाभाऊ साठे; एक थोर व्यक्तीमत्व
अण्णाभाऊ साठे हे एक अलौकिक व्यक्तीमत्वाचे धनी होते. ते कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावीत झाले होते. त्यांनी लालबावटा कलापथक स्थापन केलं होतं.अण्णाभाऊ साठेचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होतं. त्यांचा जन्म १ आगष्ट १९२० रोजी झाला होता. त्यांचा जन्म सांगलीचा. ते समाजसुधारक, लोककवी व लेखकही होते. त्यांनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी आजही जगतात गाजत आहे.अण्णा हे आंबेडकरवादी व मार्क्सवादी विचारसरणीचे होते. सुरुवातीला त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव पडला व नंतर ते आंबेडकरवादी झाले. ते शिक्षण शिकले नाही. अर्थात कोणत्याच शाळेत गेले नाही. तरीही ते शाहिर, कादंबरीकार व कथाकार म्हणून ओळखले जातात.त्यांच्या आईचे नाव वालबाई होतं. तर पत्नीचे नाव जयवंता. त्यांच्या पत्नीला कोंडाबाई देखील म्हणत असत.अण्णा हे मातंग समाजाचे असून त्या काळी होत असलेल्या भेदभावाचे चटके ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांना बसले. तसेच ते अण...