Sunday, December 7

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Gerenal

पर्यावरण पत्र लेखन

प्रिय पर्यावरण, सप्रेम नमस्कार वि.वि. आज रविवार ५ जूनला तुझा जागतिक पर्यावरण दिवस असून धुमधडाक्यात साजरा होत आहे. हो करायलाच हवा म्हणा. आमच्या सर्वांचे जीवन तर तुझ्यावरच अवलंबून आहे. आम्हा साऱ्या सजीवांना आमच्या जीवन संघर्षासाठी आणि आमच्या उत्क्रांतीसाठी तुझ्याशी जुळवून घ्यावे लागते अथवा त्या करता अनुकूल असे बदल घडवून आणावे लागतात. जे तुझ्याशी जुळवून घेत नाहीत ते नष्ट होतात. जो कोणी बदल स्वीकारतो तोच तग धरून राहू शकतो.    तुझे आणि आम्हा मानवाचे परस्पर संबध नेहमी बदलत असतात. तुझे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे आणि ते प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पर्यावरण हा एक प्रकारचा भौगोलिक वाद आहे त्या द्वारे बाह्य परिसरामुळे आम्हा मानवांची जीवन पध्द्ती कशी निश्चीत होईल हे स्पष्ट केले जाते. पण आज मानव स्वतःच्या स्वार्थासाठी तुझ्याशी नीट वागत नाही. त्याच्या वेगवेगळ्या प्रकल्पामुळे तुझी दमछाक होते आणि नैसर्...
Article

दलित पॅंथरचे यश आणि अपयश…!

(29 मे 2022 ला दलित पॅंथर ला स्थापन होऊन पन्नास वर्षे होतात, 29 मे 1972 ला दलित पँथरची स्थापना झाली)   पॅंथर म्हणजे चित्ता किंवा बिबट्या आणि पँथरचा कार्यकर्ता म्हणजे ज्याच्या अंगी चित्त्यासम आक्रमकपणा, लढाऊबाणा, निर्भीडपणा, जशास तसे उत्तर देण्याची धमक, अरे ला कारे म्हणण्याची तयारी, तारुण्य कुर्बान करण्यास सज्ज, बोलण्यात जोश आणि वागण्यात होश, कृतीमधील तळमळ, अन्याया विरोधातील एकजूट, समतेचा नारा, स्वातंत्र्याची पहाट, मानव मुक्तीचा संघर्ष, दबले आणि दाबले गेलेल्या लोकांचा आवाज, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, या त्रिसूत्री नुसार आचरण करणारा, भविष्य घडवण्यासाठी इतिहासापासून धडा घेऊन वर्तमानात लढा देणारा भीमसैनिक म्हणजे दलित पँथर.   डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा नंतर 3 ऑक्टोबर 1957 ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना झाली. बी. सी. कांबळे आणि दादासाहेब गायकवाड यांच्या मतभेदानंतर...
Article

इलेक्ट्रिक ‘शिवाई’ लालपरी नव्या रुपात

लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस ही आता नव्या रुपात सर्वांसमोर येत आहे. वातावरणातील प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवरकच पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी बिरूदावली मिरवणारी 'लालपरी' अर्थात एसटी १ जून २०२२ रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या दिनाचे औचित्य साधत एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणा-या पहिल्या 'शिवाई' या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुणे येथे उद्या होणा-या लोकार्पण सोहोळ्यानंतर ही पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे. या सोहळ्याला सर्व एसटी प्रेमी तसेच सर्वसामान्य नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.   १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची पहिल...
Article

आदर्श प्रेरणादायी व्यक्तीमत्व श्री.श्रीराम चव्हाण साहेब..!

साधी राहणी उच्च विचारसरणी तथा शांत स्वभावी,नागपूरचे विभागीय सहसचिव. आदरणीय श्री.श्रीराम चव्हाण साहेब यांच्या जन्मदिनी मला लिहण्याची संधी मिळाली हे मी माझे अहोभाग्य समजतो,चव्हाण साहेब म्हणजे साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण. हे कोणीही सांगू शकेल यात काही शंकाच नाही.कितीतरी वर्षापासून दिनविशेष, प्रेरणादायी सुविचार सकाळच्या रम्य प्रहरी न चुकता साहेब वॉट्सॲप च्या माध्यमातून आम्हा सर्वापर्यंत पोहोचवतात त्या प्रेरणादायी सुविचार मुळे आम्हाला एकप्रकारची ऊर्जा मिळते आमचा दिवस आनंदात जातो.साहेबांच्या या नित्य उपक्रमामुळे चांगले विचार आत्मसात करण्याची सवय आम्हाला जडली आहे.. जो व्यक्ती साहेबाच्या सानिध्यात आलेला आहे.तो व्यक्ती साहेबांच्या विचार सरणी आत्मसात करून यशो शिखरावर पोहचलेला आहे..त्या पैकी मी एक. साहेबांनी माझ्या अंतरंगातील कलेला ओळखून सृजनात्मक कलेच्या विशाल सागरात मला रममाण करून दिल्यामुळे आज मी...
Article

आता दहावीनंतर पुढे काय?

* पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र निवडावे आता थोड्याच दिवसात दहावीचे निकाल जाहीर होतील. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता असते ती करिअर निवडीची...कोणते करिअर निवडावे? याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था असते. कारण योग्य करिअरची निवड ही विद्यार्थ्याला यशाच्या मार्गावर नेते, तर चुकीच्या करिअर निवडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते. शिवाय आयुष्यातील महत्त्वाची वर्ष वाया जातात.   करिअरची निवड हा विद्यार्थी आणि पालक या दोघांसाठीही अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच काळजीचा विषय आहे. योग्य वयात योग्य करिअरची निवड केली, तर ती लौकिकार्थाने यशस्वी आयुष्याची पहिली पायरी ठरते. करिअरमुळे उत्तमता आणि प्रतिभेची उंची गाठता येते. प्रत्येक व्यक्ती बुद्धिमान असते, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक सुरक्षितता आणि उज्जवल भविष्य या गोष्...
Article

गनीम : शत्रूच्या छावण्या उध्वस्त करणारी कविता…

उत्तम अंभोरे हे एक संवेदनशील कवी आहेत. त्यांच्या सुक्ष्मतासुक्ष्म सेंद्रिय विचार प्रगल्भतेतून काव्याचा सुजन झरा वाहतो आहे. हा झरा फक्त शीतलतेची चांदणे देत नाही. तर क्रांतीचे नवे विद्रोही गीत गात आहे. त्यांची कविता समकालीन वर्तमानाचे आक्रंदन मानणारी आहे . त्यांचा गनीम हा कवितासंग्रह नुकताच वाचण्यात आला. माझे मित्र दीपक कुमार खोब्रागडे यांनी हा ग्रंथ मला भेट दिलेला आहे. गनीम कवितासंग्रहातील भाषा ही अत्यंत साधी , सोपी, सरळ व आंतरिक मनाला छेद देणारी आहे. बनावटीचे सारे क्षेत्र उध्वस्त करून आपला खरा मित्र कोण व खरा शत्रू कोण याची ओळख करून देणारा हा कवितासंग्रह आहे.   गनिम म्हणजे मानवमुक्तीच्या लढायाला खोडा घालणाऱ्या प्रवृत्ती होत. असे मत अर्जुन डांगळे यांनी यांनी मांडले आहे. पण मला गनीम म्हणजे अदृश्यजंताचा विकृत चेहरा होय असे वाटते .तर आपल्या सोबत राहून आपलाच पाडाव करणारा हा गनीम म्हणजेच लोकशाही...
Article

सोशल मिडियावर व्यक्त होताना जरा जपूनच.!

सोशल मीडिया ही आजच्या आधुनिक जगातील सगळ्यांना परिचित असलेली कालानुरूप संकल्पना. आज लहानथोरांपासून प्रत्येकाच्या जीवनाचा सोशल मीडिया हा अपरिहार्य भाग आहे. फेसबुक, ट्विटर वा इन्स्टाग्रामने आज प्रत्येकाचे दैनंदिन आयुष्यच बदलून टाकले आहे. जगाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या लोकांचा संदेश आपल्याला आणि आपल्याकडून त्यांना क्षणात पोचू शकतो.त्यामुळेच या दुधारी शस्त्राचा वापर करताना जरा जपूनच करा अशी म्हणायची वेळ पुन्हा एकदा आली आहे.   सध्याच्या काळात प्रत्येकजण स्मार्ट व हुशारीपणा दाखवण्यासाठी सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. त्यात इकडे-तिकडचे मेसेज फॉरवर्ड करण्यात अनेकांचा हातखंडा आहे. त्यात धार्मिक, राजकीय, जातिय, देशविरोधी विषयांवर तर सेकंदात हे वापरकर्ते व्यक्त होतात. मात्र या मीडियाचा वापर दक्षता बाळगुन न केल्यास, व कोणत्याही पोस्टला लाईक, शेअर आणि फॉरवर्ड केल्यास चांगलेच अंगलट येऊन 'करिअर खराब...
Article

बेरोजगार युवकांच्या हरवलेल्या स्वप्नांचे द्वार खुलणार !

* ३४ विभागातील ९० हजार रिक्त पदांची मेगाभरती देशाचे उद्याचे भविष्य असणारे युवक नैराश्याच्या गर्ततेत ओढवले जात आहे. प्रत्येक युवकाचं एक स्वप्न असतं. त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तो दिवसरात्र एक करून मेहनत करत असतो. परंतु त्याच्या मेहनतीवर आपले उदासिन सरकार पाणी फेरतं. त्यामुळे तो बदललेल्या मानसिकतेमुळे नको ते कार्य करायला लागतो. याला जबाबदार सर्वस्वी आपली शासनप्रणालीच आहे. कारण मागील ६ वर्षापासून मोठ्या पदभरतीला पूर्णत: पूर्णविराम दिला आहे. यामुळे आपला प्रत्येक युवक बेरोजगारीच्या शृंखलेत जखडला आहे.    सद्यस्थितीत शासनाच्या ३४ प्रमुख विभागांमध्ये २ लाखांवर पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के पदांच्या वेतनावरील खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून पदभरतीवरील सर्व निर्बंधही वित्त विभागाने उठविले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपूर्वी किंवा निवडणू...
Article

मसण्याउद आणि माणूस…

मसण्याऊद हा एक जंगली प्राणी आहे. तो रात्रीच्या वेळी स्मशानात जातो आणि गाडलेले मुर्दे उकरून काढून खातो, अशी दंतकथा आहे. पण देशातील सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या सहयोगी संस्थांच्या कारवाया पाहिल्या तर हा देश मसण्याउदांचा आहे की माणसांचा.. याबाबत संशय निर्माण व्हावा, एवढी गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. जिकडे तिकडे नुसती खोदाखोद सुरु आहे. हजारो वर्षांपूर्वीचे गाडलेले मूर्दे खोदून बाहेर काढणे, हाच महत्त्वपूर्ण अजेंडा सरकारच्या लिस्ट मधे दिसत आहे. सध्याच्या राजकारण्यांची त्यावरच भिस्त आहे.   आज आपण २१ व्या शतकात उभे आहोत. विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती, उद्योग, उच्च दर्जाचे शिक्षण, शुद्ध पाणी, चांगले आरोग्य, नवे संशोधन, शेतीच्या नव्या तंत्राचा शोध, वेळीच आणि स्वस्त दरात शेतीला कर्ज मिळण्याची व्यवस्था, शेतीवरील भार कमी करण्याचे उपाय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उपायोजना, त्यांचे ज...
Article

लग्नासाठीच्या अनोख्या प्रपोजलची अनोखी लव्ह स्टोरी..!

हायवेवर 'उत्कर्षा मॅरी मी- सौरभ' असं होर्डिंग लावून लग्नाची मागणी संपूर्ण विश्वाची शक्ती संचारलेल्या अडीच अक्षरी शब्दामुळे प्रत्येकाचं अंग शहारलं जातं. एक हुरुप व नवचैतन्य निर्माण होतं. ती चाहूल न जाणता प्रत्येकाच्या मनाला हवीहवीशी वाटते. ती वेगळी दुनिया आपलीशी वाटायला लागते. त्यामुळे प्रेम या अडीच अक्षरी शब्दाच्या जाळ्यात कळत नकळत का होईना प्रत्येकजण कधी ना कधी गुंतत जातो. या जाळ्यातून सुटका करायची म्हटलं तर तारेवरची कसरतच असते. असंच काहीसं कोल्हापूरातील सौरभ कसबेकर आणि सांगलीमधील उत्कर्षा यांच्या बाबतीत घडलं.  कोल्हापूर येथे सगळेच विषय एकदम हार्ड असतात. मग, त्या शर्यती असो वा मारामारी. मग कोल्हापूरकर प्रेमात कसं मागं राहतील? लग्नासाठी प्रपोज करण्याच्या आजपर्यंत अनेक पद्धती आपण पाहिल्या आहेत. मात्र कोल्हापुरातल्या एका तरुणाने भल्या मोठ्या होर्डिंगद्वारे त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं आ...