Friday, January 16

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

तोंडाला येणारी दुर्गंधी ही अनेकांची समस्या..!

  अन्नातून शरीरात जाणार्या0 प्रथिनांचे विघटन करणे हे बॅक्टेरियांचे प्रमुख काम. पण, शरीरात बिघाड निर्माण झाल्यास बॅक्टेरियांच्या कामात अडथळे येतात. ते योग्य पद्धतीने प्रथिनांचे विघटन करू शकत नाहीत. यामुळे तोंडाला एक प्रकारचा वास येऊ लागतो. तोंडाला येणारी दुर्गंधी ही अनेकांची समस्या असते. त्यावर उपाय म्हणून आपण एखादी मिंटची गोळी चघळतो किंवा दात घासतो. यामुळे तोंडाची दुर्गंधी तात्पुरती कमी होते. पण, तोंडाच्या दुर्गंधीचा संबंध एखाद्या आरोग्यविषयक समस्येशीही असू शकतो. त्यामुळे तोंडाच्या दुर्गंधीकडे एक साधीशी समस्या म्हणून दुर्लक्ष करता कामा नये.     तोंडाच्या दुर्गंधीचे कारण काही प्रकारच्या बॅक्टेरियांमुळे तोंडाला दुर्गंधी येते. हे बॅक्टेरिया जीभ, घसा आणि टॉन्सिल्सच्या मागच्या भागात असतात. अन्नातून शरीरात जाणार्याब प्रथिनांचे विघटन करणे हे या बॅक्टेरियांचे प्रमुख काम. पण, शरीरात बिघाड निर्माण झ...
Article

सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ शाहू महाराज

  शैक्षणिक, सांस्कृतिक, अर्थिक सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन २६ जुन हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. राजर्षी शाहू महाराज यांचा २ एप्रिल १८९४ रोजी राज्याभिषेक झाला. व छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले. दिनदुबळ्या समाजाचे लोकराजा झाले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे शिक्षण राजकोट व धारवाड येथे झाले.     सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे त्यांना मार्गदर्शक मिळाले. त्यांनी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अधिक भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी कोल्हापुर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. व समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळावे. यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रसार केला. त्यांनी शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले.वि...
Article

डॉक्टरकीच्या स्वप्नातील विद्यार्थ्यांचे पाऊल आयुर्वेद व होमिओपॅथीकडे…

  * आता आयुर्वेदालाच प्रचंड मागणी राज्यातील विद्यार्थ्यांना आयुर्वेदाची भुरळ पडली आहे. एमबीबीएस नंतर आयुर्वेदालाच विद्यार्थ्यांची पसंती, तर होमिओपॅथीकडेही कल वाढत चालला आहे. आतापर्यंत एमबीबीएस नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती. मात्र, आता याची जागा आयुर्वेदाने घेतली आहे. बारावीनंतर निट युजी परीक्षा देऊन मेडिकल क्षेत्रात डॉक्टर होण्याचं स्वप्नं अनेकांचं असतं. म्हणून देशभरातील लाखो विद्यार्थी निट ची तयारी करत असतात. मात्र सर्वांनाच एमबीबीएस ला प्रवेश मिळू शकत नाही. म्हणून काही विद्यार्थी आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा डेंटल क्षेत्रात डॉक्टर होतात. आतापर्यंत एमबीबीएस नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती मात्र आता याची जागा आयुर्वेदाने घेतली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.   गेल्या काही वर्षांमध्ये आयुर्वेद क्षेत्रामध्ये येणा-या कंपन्या आणि या क्षेत्राला...
Gerenal

केसांची वैविध्यपूर्ण रचना…

केसांची वैविध्यपूर्ण रचना तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच खुमारी देऊन जाते. लूज वेव्ह्ज ठेवल्या तर क्लासी आणि एलिंगट लूक मिळतो. मुख्य म्हणजे यासाठी पार्लरची वारी करायला हवी असं नाही.घरच्या घरी कर्लिंग आयरनच्या मदतीने तुम्ही हा लूक मिळवू शकता. बीची वेव्ह्ज, लूज कर्ल्स हा चलतीत ट्रेंडही तुम्ही फॉलो करु शकता. हा वेवी लूक केसांच्या निम्म्या भागापासून सुरू होतो. पोनीटेल घालून केसांचा खालचा भाग कर्ल करुन तुम्ही हा लूक मिळवू शकता. यासाठी हेअर ड्रायर, पॅडल ब्रश, थर्मल प्रोटेक्टंग हेअर स्प्रे, कर्लंग आयरन, हेअर पिन्स आणि क्लप्सची गरज भासेल. हा लूक मिळविण्यासाठी सर्वप्रथम ब्लो ड्राय करा. ब्लो ड्राय करताना पॅडल ब्रशचा वापर करा.यामुळे केस मुलायम व चमकदार होण्यास मदत होईल. त्यानंतर कर्लिंग आयरनच्या मदतीने वेव्ह्ज बनवा. आजूबाजूचे केस ब्लो ड्राय करा. यामुळे कर्ली लूक मिळेल. कर्ल्स बराच काळ टिकून रहाव...
Gerenal

तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••

  बायको "गोड बातमी" सांगते ते ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••• नर्सने ओंजळीत ठेवलेला काही पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड ओझ्याची जाणीव करून देतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••• बायकोबरोबर जागवायच्या रात्री डायपर बदलणे आणि पिल्लाला कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात व्यतीत होउ लागतात, तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••   मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके नीरस वाटून संध्याकाळी पावलांना घराची ओढ लागते, तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••• "लाईन कोण लावणार" म्हणत सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून तासंतास इमानदारीत उभा रहतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••• ज्याला उठवताना गजर हात टेकतात तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••• ख...
Article

मायबोली बंजारा भाषा आणि तिचा अभिजात वारसा

  बंजारा बोली ही बंजारा समाजाची मायबोली , मातृभाषा असून भारतभर बोलली जाणारी राजस्थानी प्रभाव असलेली इंडोआर्यन परिवारातील एक समृृद्ध बोली भाषा आहे. डॉ. हिरालाल शुक्ल यांनी बंजारा भाषेला 'इंडोआर्यन' परिवारातील भाषा म्हणून संबोधले आहे. तर डॉ. उदय नारायण तिवारी, डॉ. राहुल सांस्कृत्यायन यांनी बंजारा बोलीला 'राजस्थानी बोली' म्हटल्याचे आढळून येते. इतिहास संशोधक बळीराम पाटील यांच्या 'बंजारा क्षत्रियोका इतिहास' (१९३०) या ग्रंथातही बंजारा भाषेतील दोहे आलेले आहे. भारतीय विविधतेला संपन्न करणाऱ्या विविध मातृभाषा यापैकीच बंजारा ही एक समृद्ध वारसा जपणारी बंजारा समाजाची मातृभाषा होय. बंजारा भाषा संदर्भात प्रख्यात बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार-नायक यांनी "बंजारा भाषा ही ग्लोबल सिटीझनची चौदाखडी शिकवणारी एक सहिष्णूतेची मातृभाषा आहे. ज्यात कोणत्याही प्रकारची द्वेषमूलकता स्पर्शत नाही. ...
Article

कुत्रा पाळायचाय…नियमही पाळा..!

कुत्रा हा इमान राखणारा प्राणी. ग्रामीण भागात कुत्र्याला शेतक-याचा मित्र मानले जाते. मात्र वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरात भटके कुत्रे नाहीत, असा भाग नाही. नागपूर जिल्ह्यातील काटोल मध्ये भटक्या कुत्र्याने पाच वर्षीय बालकावर हल्ला केल्याचे प्रकरण घडल्यानंतर भटक्या कुत्र्यांची दहशत समोर आली.सकाळी सहा वाजताच्या सुमारास पाच वर्षांचा मुलगा आपल्या मोठ्या बहिणीसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेला. त्याच्यावर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केला. कुत्र्यांच्या कळपाने पाच वर्षीय चिमुकल्याचे अक्षरशः लचके तोडले. त्यात त्याचा मृत्यू झाला. हा मुलगा रोज सकाळी मोठ्या बहिणीसोबत फिरायला जायचा. सकाळी तो घरातून बाहेर पडला. रस्त्याने जात असतानाच मुलाला भटक्या कुत्र्यांच्या कळपाने घेरले. कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केल्यानंतर बहीण जोरजोरात आरडाओरडा करत राहिली. लोक येतान...
Article

खापरखेडातील जादुई एटीएम मशीन ; खुल जा सिम सिमचा प्रकार

  एटीएम ला ऑटोमेटेड टेलर मशीन अर्थात अँटोमँटिक ट्रेनी मशीन असं म्हटल्या जाते. त्याला अशा प्रकारे ट्रेन केल्या जाते म्हणजे त्याची सिस्टम बनवल्या जाते की, तुम्हाला जेवढे पैसे काढायचे असते, तेवढ्याचा आकडा टाकल्यानंतर तो तुम्हाला तेवढेच पैसे देत असतो. पण एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेल्यावर दुप्पट किंवा तिप्पट पैसे मिळाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? आश्चर्य वाटतंय ना? पण असा प्रकार नागपूरातून समोर आला आहे. तिथे एटीएम मधून ५०० रुपये काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला दुप्पट, तिप्पट नाही तर चक्क पाचपट पैसे मिळत असल्याचं समोर आलं आहे. एटीएम मधून ५०० रुपये विड्रॉल केल्यावर २५०० रुपये निघत असल्याचा व्हिडीओ सुद्धा शूट करण्यात आला असून तो व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला.   काय आहे नेमकं प्रकरण? नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील एका एटीएम मधून ५०० रुपये विड्राल टाकल्यावर एटीएम मशीन मधून चक्क २ हजार ५०० रुपये ...
Article

अस्तित्व गमावलेली माणसे : नवी उमेदाची ऊर्जा देणारी कविता

  महेंद्र गायकवाड हे दोन दशकापासून आंबेडकरी कवितेच्या प्रांतात नित्यनेमाने कविता लिहित आहेत. त्यांची राहणी साधी असली तरी कवितेचे शब्द क्रांतीध्वज उंचावणारी आहेत. नुकताच त्यांचा अस्तित्व गमावलेली माणसे हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...! आंबेडकरी कविता ही क्रांतीच्या ठिणग्या निर्माण करणारी आहे. ही कविता शोषणाच्या सार्‍या मुळांना उघडून फेकते.आंबेडकरी कवी आपल्या मर्म चिंतनातून समाजाचा वेध घेत असतो. कविता ही समाजाला नवे वास्तव सांगत असते. आपले हित व अहीत यांची चर्चा करते. आंबेडकरी कवितेत काही कवी सोडले तर बाकीचे कवी हे आपले निरंतरतत्व सोडून बसले आहेत .पण काही कवी अजूनही सूर्यदीपत्वाची नवी ऊर्जा पेरत आहेत. त्यात महेंद्र गायकवाड हे सातत्याने समाजाला सजग करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या दारिद्र्याला ते गोंजारत नाही. आपली समस्याने ते मोडत नाही. तर ते समूह मनाची व्य...
Article

आईपणाला बहाल केलेला आत्मा ! म्हणजे आई म्हणते….

"आई म्हणते ....." आई म्हणजे ईश्वर आणि या ईश्वराचं म्हणणे ज्येष्ठ साहित्यिका डॉ .नयनचंद्र सरस्वते यांनी आपल्या 'आई म्हणते ... 'या काव्यसंग्रहात आपल्या लेखणीने प्रत्यक्षात उतरवले आहे. आईची महती जगतज्ञात आहे . तिच्या भोवतीचं लेकराचं सारं विश्व फिरत असते . प्रत्येकाची आई सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत काही ना काही सारखं म्हणत असते. प्रेम, राग, सूचना, समज, कौतुक, लाड अशा कितीतरी भावना व्यक्त करत राहते. लेकरू ते ऐकत राहते. कधीकधी आई सारखं बोलत राहते म्हणून नेहमी दुर्लक्ष करणारी काही लेकरं असतात ,परंतु आईपासून थोडा वेळ जरी लांब गेली तरी त्यांच्या मनात , डोक्यात सारखं येत राहते आई म्हणते ... ! ही भावना कवयित्रींनी आपल्या कविता कवितासंग्रहात अतिशय सुंदररित्या कवितेतून मांडली आहे.   ओंजळीतले कुंकू तांबडे आई लावते भाळावरती आणि म्हणते माझी अंबिका मांड ठोकते काळावरती   काव्यसंग्रहाच्या पहिल्या रचनेत आ...