प्रेमविवाहानंतर विभक्त होण्याच्या आकडेवारीत वाढ..!
* एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती म्हणजे सुखी संसाराचे रहस्य पती-पत्नीमध्ये प्रेम आणि आदर असेल तरंच कुटुंबात आनंद नांदतो. कोणत्याही नात्यामध्ये प्रेम आणि आदर अत्यंत महत्त्वाचा असतो. पण कुटुंब सुखी, सुसंस्कृत आणि समृद्ध करण्यात महिलांचा मोठा वाटा असतो. घरातील स्त्रीमध्ये काही विशेष गोष्टी असतील तर घर स्वर्गासारखे बनते, म्हणून पत्नीला लक्ष्मीचे रूप म्हटले जाते. चाणक्य नीतीमध्ये स्त्रीची अशी काही वैशिष्ट्ये सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे पतीचं आयुष्य फुलून जातं. पण यामध्ये पतीची देखील साथ अत्यंत गरजेची असते. स्त्री सुशिक्षित, सुसंस्कृत असेल तर संपूर्ण कुटुंब चांगल्या वातावरणात तयार होतं. अशा कुटुंबातील नवीन पिढी सुसंस्कृत आणि चांगली होते. सुसंस्कृत स्त्रीच आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकते. स्त्री जर धार्मिक असेल, तर अत्यंत उत्तम.
प्रत्येक व्यक्तीने रागावणे आणि भांडणे टाळले पाह...