Thursday, December 11

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

एक ध्येयवेडा समाजसुधारक- महात्मा फुले

विद्ये विना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना रुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केलेअशी आपल्या काव्यातून बहुजन समाजाची विदारक परिस्थिती मांडणारे, एक उत्कृष्ट लेखक विचारवंत महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन. ज्या व्यक्तीने शेतकरी, शेतमजूर, बहुजन समाज, स्त्री शिक्षणासाठी आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली त्या व्यक्तीला आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. 'सत्यशोधक समाज' नावाची संस्था स्थापन करून समाजाला नवी दिशा देण्याचे काम महात्मा फुलेंनी गेले. आपल्या मुलाचा महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह फुलेंनी आपल्या पत्नीच्या सहकार्याने लावला. कारण दत्तक पुत्र यशवंत हा विधवेचा मुलगा असल्याने समाज त्या मुलाला डावलून मुलगी देत नव्हता, पण फुले दांपत्याने दत्तक मुलाला न्याय मिळवून दिला. व समाजापुढे सर्वधर्मसमानतेचा आदर्श निर्माण केला.ज...
महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
Article

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा विद्येविना मति गेली |मतिविना निती गेली ||नितिविना गति गेली |गतिविना वित्त गेले ||वित्ताविना शुद्र खचले |इतके अनर्थ एका अविद्येने केले || या भुतलावर जन्मलेल्या माणसाजवळ जर शिक्षण नसेल, तर माणसाची काय अवस्था होते. याचं मार्मिक सत्य ज्योतिबांनी सांगितलं आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिकलं पाहिजे.हा ज्योतीबांचा ध्यास होता.आणि यासाठीच महात्मा फुलेंनी शिक्षणाची चळवळ उभी केली.महात्मा फुलेंचा हा परिवर्तनवादी विचार समाजाला शिकण्याची प्रेरणा देऊन जात आहे. भारतीय स्त्रीशिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना संबोधले जाते. त्याकाळामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीकरिता चालविलेल्या शाळा या काळात अस्तित्वात होत्या.पण बहुजन समाजाच्या शिक्षणाची सोय करावी हे ध्येय मात्र त्यांचे नव्ह...
Article

संविधान दिवस म्हणजे लोकशाहीचा उत्सव

2 वर्ष 11 महिने 17 दिवसाच्या अथक परिश्रमाने तयार झालेल्या भारतीय संविधानाच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याच्या सन्मानार्थ व स्मरणार्थ भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी विधी मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना भारतीय राज्यघटना सादर केली व भारताच्या नव्या प्रकाशमय युगाला सुरुवात झाली. भारतातील लोकांच्या भावभावना, आशा, आकांक्षा पल्लवीत झाल्या. हाच तो दिवस म्हणजे संविधान दिवस होय. भारतात लोकशाही पद्धत अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये संविधान सर्वश्रेष्ठ मानले जाते. कारण संविधानातील सर्वमान्य कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. त्यामुळे भारतीय संविधान आपले श्रेष्ठत्व दर्शविते. भारतीय संविधानात नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहे. यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक अधिकार, धार्मिक ...
Article

Satyamev Jayate : सत्यमेव जयते

भारतीय राजकारणात हे फक्त स्वार्थी आणि ढोंगी नेत्यांचं मायाजाल झालं असून त्यांना भारतीय संविधानिक व्यवस्थिचं काही देणं घेणं नाही. आपली खुर्ची सांभाळणे व पक्षांच्या नेत्याचे पाय चाटणे अशीच वृत्ती सध्याच्या राजकारणात दिसून येत आहे महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यमेव जयते नावाचा जयजयकार करून," सत्य सर्वांचे आदी घर,। सर्व धर्माचे माहेर ।।" असे ठणकावून सांगितले असताना आमचे नेते असत्यमेव जयतेचा जयघोष करीत आहेत.काही नेत्यांचे इतके झटके यायला लागले आहेत की, ते काय बोलतात हे त्यांना समजत नाही .तसेच काही मंत्री हे तर उंटावरून शेळ्या हाकलणारे राखणदारच आहेत. कारण त्यांच्या वक्तव्यातून देशातील वातावरण दूषित होत असताना देशाचे चालक काहीच म्हणत नाहीत. त्यांना जाणून-बुजून तसे बोलण्याची ट्रेनिंगच दिलेली आहे काय असं वाटते.आज कोण धोक्यात आहेत हे माहीत आहे. पण बहुसंख्य समाजाला धर्माच्या ,जातीच्या नावाची गो...
एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका…!
Article

एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका…!

एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका...!  एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, अनेक सवलती दिल्या जातात.एसटी महामंडळामार्फत समाजातील अनेक लोकांना विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, अंध-अपंग, महिलांसाठी महामंडळ २९ प्रकारच्या विविध सवलती देण्यात येतात.मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून स्मार्ट कार्ड तयार सवलत घेण्यात येत असल्याने केले जात असून एस टी महामंडळाला लाखो रुपयांचा फ्टका. बसत असल्याचे समोर आले आहे. ● हे वाचा – Rahul Gandhi : राहुल, संतांच्या पवित्र भूमीत तुझे स्वागत करतांना ........ एस टी महामंडळाला सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक योजनेमुळे बसत आहे. बोगस कागदपत्रे सादर करून स्मार्ट कार्ड तयार करण्यात येत आहे. कागदपत्रांची तपासणी न करता महामंडळ अनेकांना या योजनेचा लाभ मिळवून देत आहे. सवलतीचा लाभ मिळत असल्याने ज्येष्ठ नागरिक देखील बिनधास्...
Article

Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य

कारंजा हे आटपाट नगर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्यांच्या ठिकाणापासून ६० ते ७० किलोमीटरच्या “सुरक्षीत” अंतरावर वसलेलं शहर आहे. कुठही उभं राहून ब्रम्हांडाकडे बघीतलं तर ते जसं सारखचं दिसतं (संदर्भासाठी गरजूंनी स्टीफन हॉकींग्ज वैगेरेंची भारी भारी पुस्तक चाळावीत!), तसच कुठूनही बघा कारंजा नगरी सारखीच दिसते. उपरोक्त चारही शहरांशी कारंजा नेहमीच "रोमांस" च्या मुड मध्ये असते पण "सिरीयस अफेअर" कोणाही सोबत ठेवत नाही. आम्ही अमरावतीत शिक्षण घेतो, अकोला शहरावर आमचे सगळे हेल्थ इश्युज सोडतो, वाशिम मध्ये फक्त कार्यालयीन कामासाठी जातो आणि यवतमाळसोबत आमचं नातं काय आहे या बाबतीत आम्ही नेहमीच "कनफ्युजन" मध्ये असतो. बर या चारही मोठ्या शहरांना आपण जर ग्रहांची उपमा दिली तर कारंजावरुन या ग्रहांकडे जातांना अर्ध्या अंतरावर काही उपग्रह सुद्धा लागतात. उदा. अकोला जाताना मुर्तिजापुर नावाचा उपग्रह लागतो,...
Article

ह्रदयाची ह्रदयाशी रेंज ना मिळाली…!

माझ्या प्रियाला माझी प्रीत ना कळाली ह्रदयाची ह्रदयाशी रेंज ना मिळाली पियू उर्फ...कशी आहेस गं तू? मी म्हणणार नाही तू आनंदात असेल म्हणून...कारण मला माहीत आहे तू माझ्याच आठवणीत असते आणि विशेष म्हणजे तुझ्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलुंची जाणीव आहे ना मला...हे मी म्हणत नाही, तर तुच म्हणाली होतीस...आणि तुझं म्हणणं अगदी खरं होतं. मी प्रेमच दिलं आहे ना तसं...अगदी अंत:करणातून...यामुळे एवढी तर जाणीव ठेवावीच लागते. मध्यंतरी तुझा एक आर्टिकल आला होता. वाचून खूप आनंद मिळाला की, माझी पियू तर माझ्यापेक्षाही सरस आहे आणि तिचे विचार पण खूप श्रेष्ठ...आणि तेवढंच दु:ख पण...तुला काय वाटलं गं! मला कळणार नाही. म्हणजेच तू दिलेल्या...बद्दल. तू घेतलेला निर्णय तुझ्या परीने कसा होता? हे तर मला माहीत नाही. पण माझ्या परीने...यासंदर्भात मला सांगता येणं खूप म्हणजे खूपच अवघड आहे. तू हा निर्णय का घेतला होता? याचं स्पष्टीकरण ...
Article

Lord Buddha : तथागतांच्या महापरिनिर्वानानंतर ते आजतागायतपर्यंत रक्षा-अस्थींचा अत्यंत रोचक प्रवास

भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वानानंतर ते आजतागायतपर्यंत त्यांच्या रक्षा-अस्थी पूजनीय राहिल्या असल्या तरी जवळपास २६०० वर्ष या रक्षा-अस्थींचा प्रवास अत्यंत रोचक व अनेकदा गहन असा राहिलेला आहे. तथागतांच्या रक्षा, अस्थी ते त्यांच्या नित्य वापरातील वस्तुंनी जवळपास अर्धे जग पादाक्रांत केलेले आहे.तथागतांच्या रक्षा-अस्थींचे चौर्य ते त्यातील काही अवशेषांचा विनाश करण्याचे प्रयत्नही अनेकदा झालेले आहेत. कंबोडियातही अलीकडेच बुद्ध अस्थींची चोरी झाली होती. अर्थात चोरांना शिताफीने पकडण्यात आले. बुद्धाच्या म्हणून बनावट अस्थी-रक्षाही पुरातत्व वस्तु संग्राहकांत सतत चर्चेत राहिल्या आहेत. सुरक्षित असे भव्य स्तूप बांधण्याची सुरुवात सम्राट अशोकाने सुरु केली असली आणि नंतर ती पद्धत श्रीलंका, ब्रह्मदेश, तिबेट, चीन ते पार कंबोडियापर्यंत पसरली असली तरी अशोकपुर्व काळातील स्तूप नेमके कोठे आणि कसे होते याबाबत विद्वानांत...
Article

खरचं शेतक-याची बरोबरी करणं…देवाला पण शक्य नाही….!

सध्या दिवाळी मुळे माझ्या साड्यांच्या दुकानामध्ये गर्दी सुरूय. परवा अशाच गर्दी मधे एक २७_२८ वर्षाचा तरूण दुकानात आला. सुरवातीला तो दारातच उभा राहून आतमधे उचकून उचकून पाहू लागला. माझ लक्ष होतच. अर्थातच पहरावावरून तो शेतकरी वाटत होता. मी म्हटलं काय म्हणताय दादा. काय हवय. हळूच शब्दात तो ओठातल्या ओठात बोलला साडी हवीय... मी म्हटले थांबा थोडा वेळ. तो म्हटला हो हो आटपून घ्या तुमचं. थोडी शांतता झाल्यावर दुकानात एक दोनच बायका होत्या तेव्हा मी त्या तरूणाकडे वळून म्हटले की हा दादा सांगा कशी साडी हवी तुम्हाला... काय रेंज मधे हवी. तो म्हटला या ताईंच होवून जाऊ द्या...   मी म्हटले त्या अजून पसंत करताय आणि कोणी न कोणी कस्टमर येणे सुरूच राहील. सांगा तुम्हाला काय हवय. थोड बिचकत तो म्हटला की ताई मला माझ्या बायको साठी ५००_६०० पर्यंत जरी काठाची साडी हवीय. त्याचे बोलणे ऐकून दुकानात असलेल्या त्या बायका माझ्याकडे ...
Article

दिवाळी : संस्कृती जपण्याचा सण

दिवाळी म्हटले की लहानापासून तर मोठ्यापर्यंत आनंदाचे ठिकाण राहत नाही.दिवाळी हा आपल्या संस्कृती मधील सर्वात मोठा सण आहे ही भावना थोरा मोठ्यांची असते. आपण आपल्या संस्कृतीसह जन्माला येत नाही. परंतु एका विशिष्ट संस्कृतीत आपण जन्म घेत असतो. मग जन्मल्यापासून आपण ती ‘संस्कृती’ आत्मसात करत असतो. संस्कृती ही एक व्यापक संकल्पना आहे, जी आपण अविरतपणे व जिवंत असे पर्यंत पाहत असतो. ही गोष्ट आपण कधीच विसरू नये की, संस्कृती आपल्याला दिसते,आपण अनुभवतो ,आपण विविध गोष्टीतून शिकतो ती एवढीच नसून ती अधिक व्यापक प्रमाणात आहे. मानवाच्या जीवनाचा शोध घेण्यासाठी,किंवा त्याचे जीवन घडविण्यासाठी ‘संस्कृती’ हे वरदान ठरते. कारण संस्कृती ही एका जागी स्थिर नाही, तर ती एक गतिशील, क्रियाशील व प्रक्रियात्मक संकल्पना आहे. आपण बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत गेलो की संस्कृतीत वाढ होत राहते.याच संस्कृतीला जपण्याचा आपण मानवाने व्य...