Wednesday, March 11

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी
Article

दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी

दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी दोस्ती हा १९६४ सालचा भारतीय कृष्ण-धवल हिंदी चित्रपट असून सत्येन बोस दिग्दर्शित आहे आणि राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ताराचंद बडजात्या निर्मित आहे. ह्यात सुधीर कुमार सावंत आणि सुशील कुमार सोम्या मुख्य भूमिकेत होते आणि ही गोष्ट आहे दोन मुलांमधील मैत्रीची ज्यात एक अंध आणि दुसरा अपंग आहे. दोस्ती १९६४ सालच्या पहिल्या १० सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता आणि बॉक्स ऑफिसवर त्याला "सुपर हिट" म्हणून घोषित करण्यात आले. हा ४ थ्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल झाला. १९७७ साली हा चित्रपट तेलुगू भाषेत स्नेहमच्या रूपात पुन्हा तयार करण्यात आला होता.दोस्ती ही रामू (सुशील कुमार) आणि मोहन (सुधीर कुमार) यांची कहाणी आहे. रामूचे वडिलांचा कारखान्यात काम करताना अपघातात मृत्यू होतो. जेव्हा कारखानदार नुकसान भरपाई देण्यास नकार देत, त्याच्या आईचा मानसि...
कादरीचा पिंपळ
Article

कादरीचा पिंपळ

कादरीचा पिंपळनारळ फोडले, प्रसाद वाटला, दुकानाचे उद्घाटन झाले, उद्घाटक होते परमपूज्य ब्रह्मानंद स्वामीजी महाराज आणि दुकानाचे नावही त्यांचे दिले होते ते म्हणजे " श्री ब्रह्मानंद स्वामी जनरल स्टोअर्स" दुकानाचे मालक होते जगन्नाथ भिवाजी वाघ, पण त्यांना दोडी गावांमध्ये टोपण नावाने जास्त ओळखले जाते ते म्हणजे 'कादरी'.सुरुवातीला त्यांचा टेलरिंग व्यवसाय होता त्यातून त्यांचं जगणं शिवत गेलं कधी उसवतही गेलं, फाटलेल्या आयुष्याला ठिगळं लावणं आणि ठिगळं लावत आयुष्य जगणं हेच तर टेलरचं खरं आयुष्य असतं, त्यातच मंडपाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला, हळूहळू व्यवसाय मोठा होत गेला, गावोगाव मंडप जाऊ लागला, नाव मोठं होत गेले, त्याकाळी मंडप व्यवसायात जिल्ह्यात मोठे नाव होते ते म्हणजे नाशिक येथील कादरी यांचा मंडप, आता दोडी गावात जगन्नाथ वाघ यांना त्यांचे नाव न घेता कादरीचा मंडप असे बोलले जाऊ लागले.बत्तीस वर्षांपूर्...
वनवाश्या ( वनाश्या )
Article

वनवाश्या ( वनाश्या )

वनवाश्या ( वनाश्या ) दरवर्षी बैल पोळा आला की घरातल्या सर्वांना एकच बैल आठवतो तो म्हणजे "वनाश्या". अजूनही बैलपोळ्याला त्याला बांधत असलेली घुंगर माळ तशीच जपून ठेवली आहे. घुंगरमाळीला आता मात्र गळा वेगळा दिसत असतो. जशी वनाश्याच्या गळ्याला ती घुंगरमाळ शोभायची ना तेव्हढी अजून एकही बैलाला ती शोभली नाही. वाट पाहतोय मी त्या गळ्याची अन त्या वनवाश्याची ही. त्याच्या नावाला कारण ही तसच होतं. तो ज्या परिस्थितीत वाढला त्यानुसारच त्याच नाव "वनवाश्या" ठेवलं होतं आजोबांनी. आजोबांच्या काळात आमच्या घरी खूप गावरान गाया असायच्या. मला आठवतंय तेव्हा पासून तरी कमीतकमी आठ ते दहा गावरान गाया हमखास असायच्या घरी. पण वडील गेल्यापासून त्यांना सांभाळायला कोण नव्हतं म्हणून कमी झाल्या. आत्ता फक्त एकच गावरान गाय राहिली आहे गोठ्यातल्या दावणीला. वनाश्या हा घरच्याच गावरान गाईच्या पोटी जन्माला आलेला. पण दुर्दैवाने काही दिवसातच ...
गोपाया शिंपी
Article

गोपाया शिंपी

गोपाया शिंपीप्रत्येक गावात एखादी तरी वल्ली असतेच. माझ्याही गावात एक अशीच वल्ली होती . तिचे नाव गोपाळराव तल्हार . पण गावातील सारेच त्यांना गोपाया शिपी म्हणूनच ओळखायचे. म्हणजे गोपाळा शिंपी. ह्यांच्या विषयी बऱ्याच दंतकथा लोक सांगत. कधी गोपाळराव स्वत:च सांगत असत . एकदा म्हणे ते पेट्रोमॅक्स घेऊन प्रातर्विधीसाठी गेले होते. तर कधी शंभराच्या नोटांच्या जाळावर चहा करुन प्याल्याचेही अनेकजण सांगत . मांसाहारी जेवणात लिंबू नसले तर तटावरून उठून तसेच चारपाच कोसावर ते लिंबू आणायला जात . अशा एक ना अनेक दंतकथा. खरंतर त्यांचे वडील त्याकाळात शिक्षक होते म्हणतात.घरची परिस्थितीही उत्तम. पण गोपाळराव निघाले दिवटे. उधळे आणि बांड. साहजिकच बापासोबत खटके उडू लागले. आणि मग एका काळ्यारात्री त्यांनी सरळ बापाचे तुकडे केले व पोत्यात भरून दूर गावाबाहेर नेऊन टाकले. दुसऱ्या दिवशी गावात हलकल्लोळ. बरं ही सत्यघटना मी स्वत: त...
माझे सिनेमा प्रेम…
Article

माझे सिनेमा प्रेम…

माझे सिनेमा प्रेम...आमच्या लहानपणात चित्रपट पाहणे सुद्धा वाईटच मानल्या जायचं. फक्त धार्मिक चित्रपट ह्याला अपवाद . ‘ संत सखू ’, ‘ सखू आली पंढरपुरा ’ इत्यादी चित्रपट पाहण्यासाठी खेड्यापाड्यातील लोकांची झुंबड उडायची. शिक्षक आणि थोडे शिकलेले लोक ‘ कुंकू ’ सारखे सामाजिक चित्रपट बघायचे. तसेही खेड्यातल्या लोकांना सिनेमा केवळ यात्रेच्या निमित्तानेच पाहायला मिळायचा.मी केंव्हातरी कौंडण्यपूरच्या यात्रेत ‘ गौरी ’ पाहिल्याचं आठवते. ‘ मोर बोले, चकोर बोले , आज राधाकी नयनोंमें शाम डोले ’ हे त्यातलं प्रसिद्ध गाणं अजून एखादया वेळी रेडिओवर वाजतं. मला थोडाफार कळलेला आणि आवडलेला सुद्धा पहिला सिनेमा म्हणजे ‘ हा माझा मार्ग एकला ’ एकोणीसशे चौसष्ट पासष्ट साली कधीतरी धुळीत गोणपाटावर बसून पाहिला. त्यापूर्वीही असेच धुळीत बसून काही मुके सिनेमे पाहिले होते. तेव्हा ग्रामीण भागातून ‘ विकास ’चे सिनेमे दाखविले जायचे. श...
शिकण्या सारख..!
Article

शिकण्या सारख..!

शिकण्या सारख..!   खर तर मैत्री म्हंटल की त्याला जात धर्म, प्रांत ह्या गोष्टी सहजासहजी आडव्या येत नाहीत.कारण ते नातच निर्मळ झऱ्या सारख आहे. वेगवेगळ्या जाती धर्मातील मित्र जेव्हा भागीदारीतून एखादा व्यवसाय सुरू करतात त्या वेळी येणारा अनुभव वेगळा असतो....त्यातील हा एक.....                        राजेश आणि हिमेश दोघे एकदम पक्के मित्र आता हिमेश हा गुजराती कुटूंबातूंन असल्या मुळे घरची परिस्थिती चांगली होतीच त्याच बरोबर मोठा व्यवसाय ही होता. त्याचा मित्र राजेश मात्र नोकरदार कुटुंबातील असल्या मुळे आता त्याच्या समोर नोकरी, करायची की व्यवसाय हा प्रश्न होता. हितेश ने त्याला सल्ला  नोकरी करण्या पेक्ष्या आपण भागीदारीत व्यवसाय करू. हिस्सेदारी कशी काय असेल ते सगळं ठरलं.ते ही कागदोपत्री.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा                          मोठं कपड्याच् दुकान त्यां...
  चुंबळ  
Article

  चुंबळ  

  चुंबळ  शेजारी बांधकाम सुरु आहे. बांधकामाची वाळू आणि कच यांचे ढीग बांधकामाच्या ठिकाणी टाकले आहेत. पाऊस पडल्याने कच आणि वाळू ओली झाली आहे. मुलांना वाळूत खेळायला आवडते. मुले वाळूच्या ढिगावर खेळत होती. मी शेजारी उभे राहून त्यांचा खेळ पाहत होतो. त्यांचा खेळ पाहताना अचानक माझी नजर एका गोलाकृती वस्तूवर गेली. जवळ जाऊन ती वस्तू पाहिली तर ती चुंबळ होती.. बांधकामासाठी वापरलेल्या सिमेंटच्या गोण्याची चांगली चुंबळ तयार केली होती. भक्कम व जाड दोऱ्याच्या मदतीने ती चुंबळ तयार केली होती.. बांधकाम मजूर महिला वरच्या मजल्यावर विटांची वाहतूक डोक्यावर विटा घेऊन करत होत्या. एका लाकडी फळीवर जवळपास दहा बारा विटा ठेऊन त्या डोक्यावर घेऊन वरच्या मजल्यावर जात होत्या..विटाची फळी घेऊन वर जाताना त्या फळीच्या खाली ती चुंबळ त्या ठेवत होत्या..त्यांची ती चुंबळ होती. काम झाल्यावर त्यांनी ती बांधकामाच्या ठिकाणी ठेवली होत...
हरतालिका व्रत ; स्रीयांवरच बंधन ठेवू नये.!
Article

हरतालिका व्रत ; स्रीयांवरच बंधन ठेवू नये.!

हरतालिका व्रत ; स्रीयांवरच बंधन ठेवू नये.!         दरवर्षी हरतालिका येते व सौभाग्यवती स्रीया तसेच कुमारिका मुलीही हा व्रत करतात. कशासाठी? तर इच्छित पती मिळावा. हा इच्छित पती मिळावा म्हणून कुमारीका, तर सौभाग्य अखंड टिकावं म्हणून सौभाग्य वती स्रीया हा व्रत करीत असतात. या दिवशी दिवसभर स्रीया उपवास करतात. रात्रीही त्यांना उपवास असतो. मग शरीरातील पोषकतत्वे कमी झाल्याने चक्कर येतात. यातच जीवही जावू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही.           सध्या वातावरणाचा कहर सुरु आहे. घरोघरी रुग्ण आहेत. तसं पाहता हा कालच तसा आहे. कधी पाऊस येतो तर कधी नाही. त्यामुळंच आजार. अशावेळी शरीराची प्रतिकारशक्ती तेवत ठेवण्याची आवश्यकता आहे. पण याच काळात उपवास केल्यानं शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास येणा-या संभाव्य धोक्याला कोणताच व्यक्ती वाचविणार नाही नव्हे तर वाचवायला येणार नाही. मग ज्या देवासाठी उपवास केला. तो ...
सिम्बॉल ऑफ Unity
Article

सिम्बॉल ऑफ Unity

सिम्बॉल ऑफ Unityजपानमध्ये  युद्घाच्या काळात हा मुलगा पाठीवर त्याच्या नुकत्याच मरण पावलेल्या भावाला पाठीशी बांधून पायी चालत होता. आपल्या मेलेल्या भावाला निट दफन करता यावं या भावनेने तो दूरवर चालत आला होता. त्याला पाहताच एक सैनिक पुढे आला आणि म्हणाला... प्राण गेलेल्या भावाला पाठीवर घेऊन एवढ्या लांब चालत आहेस...ते ओझे खाली टाकून दे..म्हणजे तुला हलके वाटेल.... त्यावर तो मुलगा म्हणाला की, "हे ओझे नाहीये सर,  हा माझा भाऊ आहे.." हे ऐकून त्या सैनिकाच्या डोळ्यांत पाणी तरळले...तेव्हा पासून हा फोटो जपानमधे "सिम्बॉल ऑफ unity" म्हणून प्रसिद्ध झाला...   "हे ओझे नाहीये सर... हा माझा भाऊ आहे..." हा बोध किती सुंदर आहे...हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाआपले (लहान/मोठे)भाऊ बहीण आपल्यावर ओझे नाहीत... आयुष्याच्या वाटेवर चालताना ते पडले तर त्यांना उचला, दमले तर आधार द्या, ते चुका...
निरागस विद्यार्थी अन् हैवान शिक्षक !
Article

निरागस विद्यार्थी अन् हैवान शिक्षक !

निरागस विद्यार्थी अन् हैवान शिक्षक !शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असून त्यांचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो. सध्याच्या माहितीच्या विस्फोटाच्या युगात शिक्षकांवरील जबाबदारी फार मोठी आहे. विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे कारण उद्याचा समाज हा सतत शिकत राहणार आहे. यासाठी शिक्षकांची कार्यत्परता खूप महत्वाची आहे. शिक्षकांच्या छोट्य़ा-मोठ्या कृतीतून हे संस्कार जोपासण्यासाठी शिक्षक मातृहृदयी हवा. यामुळे मुलांचे दडपण कमी होते व आनंददायी शिक्षण होते. वर्गातील वातावरण प्रेरक होते.मात्र आज शिक्षकांच्या वाढत्या अश्लील हरकतीमुळे शिक्षण क्षेत्र बदनाम होत आहे. शिक्षकांच्या वाढत्या लैंगिक विकृतीमुळे शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न समोर आला आहे.कोणतीही शाळा असो आपल्याकडे गुरुंना सर्वात मोठे स्थान दिले गेले आहे. यामु...