नाईक साहेबांनी सांविधानिक मूल्यांचे राजकारण केले- डॉ. प्रकाश खरात
नाईक साहेबांनी सांविधानिक मूल्यांचे राजकारण केले - डॉ. प्रकाश खरातगौरव प्रकाशन नागपूर (प्रतिनिधी ) : "नाईक साहेब हे धोरणी राजकारणी होते. लोकशाही मूल्यांवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांच्या राजकारणात सांविधानिक मूल्येच केंद्रस्थानी होती. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या तब्बल एका तपाच्या कार्यकाळात महाराष्ट्रावर अनेक दुर्धर संकटे आली असतानाही त्यांनी महाराष्ट्राची नौका सुखरूपपणे पैलतिरी नेली" असे प्रतिपादन डॉ. प्रकाश खरात यांनी केले. ते अ. भा. तांडा सुधार समिती द्वारा आयोजित महानायक वसंतराव नाईक स्मृतिदिन आणि पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या जयंतिप्रीत्यर्थ 'नाईक साहेबांच्या ध्येयातील महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे वर्तमान' या विषयावरील व्याख्यानात वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश राठोड यांनी "महानायक वसंतराव नाईक आणि पद्मश्री रामसिंगजी भानावत हे पुरोगामी ...









