📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

म्हणून कधीच रेल्वेचे इंजिन बंद करत नाहीत..!

On: October 5, 2025 6:39 PM
आम्हाला फॉलो करा:
तुम्हालाहा हा प्रश्न पडला असेल कि रेल्वेचे इंजिन का बंद करत नाहीत, कारण त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होते. तरीही रेल्वे इंजिन बंद करण्यात का येत नसेल? तुम्ही कोणत्याही रेल्वे स्थानकावर जा तिथे कितीही वेळ रेल्वे थांबली तरी त्या रेल्वेचे इंजिन कधीच बंद करण्यात येत नाही. जर काही तांत्रिक बिघाड झाला तरच रेल्वेचे इंजिन बंद करण्यात येते, तर यामागे डिझेलचे इंजिन ही खरी समस्या आहे.
डिझेल इंजिन बंद केल्यास लोको पायलट आणि प्रवाशांना मोठा त्रास होऊ शकतो. डिझेल इंजिनची तांत्रिक बाजू किचकट असते. यामुळे लोको पायलट ते बंद करण्याऐवजी ते सुरुच ठेवतात. त्यामुळे पुन्हा डिझेल इंजिन सुरु करण्याच्या कटकटीतून वाचता येते. ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर थांबते, त्यावेळी रेल्वेचा इंजिन ब्रेक दबाव सहन करु शकत नाही, दबाव तयार करण्यासाठी रेल्वेला मोठा वेळ लागतो. ट्रेन थांबल्यानंतर शिटीसारखा एक आवाज येतो. हा रेल्वेवरील वाढलेला दबाव कमी करण्याचा इशारा आहे. जर लोको पायलटने इंजिन बंद केले तर दबाव तयार करण्यासाठी मोठा वेळ लागेल.
इंजिन बंद करुन केवळ स्टार्ट करण्यासाठी २५ मिनिट लागतात. त्यामुळेच इंजिन बंद करत नाही. रेल्वे इंजिन बंद केल्यास लोकोमोटिव्ह इंजिन बिघडण्याची शक्यता असते. डिझेल इंजिनला एक बॅटरी असते. ती चार्ज झाली तर इंजिन चालू राहते आणि इंजिन चालू राहिले तर बॅटरी चार्ज होते. सातत्याने रेल्वे इंजिन बंद केल्यास त्याचा परिणाम बॅटरीवर होतो. इकडे इंजिनावरही मोठा परिणाम होतो आणि इंजिन बसते. म्हणून कधीच रेल्वेचे इंजिन बंद का करत नाहीत.
संकलन : प्रविण सरवदे,
कराड

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment