कारंजा घा : नागपूर-अमरावती महामार्गावर मुंबईकडून भंडाराकडे जाणार्या पोलिस वाहनाचा टायर फुटल्याने अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दुसर्या बाजूने पलटी झाले. यात वाहनातील आरोपीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर चार पोलिस किरकोळ जखमी झाले आहे.
सदर अपघात कारंजा नजीकच्या राजनी फाटयाजवळ दुपारी ३.१५ च्या दरम्यान घडला असल्याची माहिती कारंजा पोलिसांनी दिली आहे. अपघातातील मृतक हा गेल्या काही वर्षात झालेल्या अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या ३५८ कोटी रुपयाच्या घोटाळयातील आरोपी असल्याची माहिती हाती आली आहे. चालकाचे पोलिस वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन क्रमांक एम. एच. ३६/ २२७३ या वाहनाने रस्ता ओलांडून जवळपास तीन-चार पलटया घेतल्या. यात वाहन रस्त्याच्या कडेला जावून उभे राहिले. यातील आरोपी र्शावण कृष्णा बावणे याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्या सर्वांवर कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अपघातात मृत्यू झालेला आरोपी हा अण्णाभाऊ साठे महामंडळ मध्ये काही वर्षापूर्वी ३५८ कोटीचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यामधील सहआरोपी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पुढील तपास कारंजा पोलिस करीत आहे.
Related Stories
April 26, 2024