Sunday, October 26

Tag: #gauravprakashan

एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!
Article

एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!

एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!या एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.मला आणि माझ्या कवितेला ही एस.टी.आमच्या आयुष्याला फार जवळची झाली आहे. महाराष्ट्रभर याच एस.टी.ने मी हिंडत असतो. प्रवासात सगळी सर्व सामान्य माझ्यासारखी माणसं असतात. थोडंस सोशल मीडियामुळे मला बरीच सामान्य लोकं ओळखू लागल्यामुळे अनेकजण मी एस.टी.मध्ये किंवा स्टँडवर दिसलो की माझ्यासोबत सेल्फी वगैरे काढतात. कुणी चहा पाजतात. तर कुणी काहीतरी खायला हमखास देतात. याच एस.टी. मध्ये सामान्य लोकांची वेदना समजून घेता येते. मला वाटतं सगळ्या जाती धर्माची माणसं या एस.टी मध्ये भेटतात. पण, खरं सांगू का? या डब्यात फक्त आणि फक्त माणुसकीचा सुगंध दरवळत असतो. बसायला जागा भेटावी, भेटली तर खिडकीजवळ भेटावी या हट्टाशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यावर इथं भांडण होत नाही.ज्याला आधी जागा भेटलेली असते नंतर तोच प्रवासी उभ्या ...
यशोगाथा तिच्या संघर्षाची
Story

यशोगाथा तिच्या संघर्षाची

यशोगाथा तिच्या संघर्षाचीपाचवीला असल्यापासून ती कष्टाशी भिडत राहिलेली.तिच्या आजी आजोबांसोबत भाजीपाला विकता विकता एम. कॉम. पर्यंत शिक्षण तिने घेतलं.आयुष्याच्या त्याच वळणावर तिचं लग्न माझ्यासारख्या फाटक्या माणसासोबत झालं.त्यावेळी मी वॉचमन होतो.आमचं लग्न झालं खरं परंतु एकमेकांच्या संघर्षाला सोबत घेऊनच आम्ही बोहल्यावर उभे राहिलो. आमच्या दोघांच्या मध्ये असणारा अंतरपाट आजही आठवतो मला.त्या पांढऱ्या वस्त्रावर त्याक्षणाला कदाचित आमच्या दोघांच्या आयुष्याचं ध्येय एकत्र येऊन नटलेलं असावं.लग्नानंतर तिचं शिक्षण पाहता मी तिला अगदी दुसऱ्या दिवशी म्हणालो सुध्दा, “ दिपाली एम. कॉम.झालेलं आहे. घरात बसून चालणार नाही.पुढं ही शिक आणि नोकरी ही कर.मी सोबत राहीन.” त्यावेळी तिने मला उत्तर दिलेलं. ती म्हणाली होती, “ आयुष्यात नोकरी करायला मला कधीच जमणार नाही.घर, संसार या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मला ते शक्य ही ह...
ताशा, वेश्या आणि कविता
Story

ताशा, वेश्या आणि कविता

ताशा, वेश्या आणि कविता(सत्य कथा.)शेवटची लोकल नुकतीच निघून गेली आणि फ्लॅटफार्म रिकामं झालं.मुसळधार पाऊस कोसळून ओसरता झाला होता.रिमझिम बऱ्यापैकी सुरूच होती.बाकड्यावर पोतं टाकलं आणि अंगावर एक चादर घेऊन मी आडवा झालो.मला आठवतंय त्या दिवशी नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला होता. बाहेर रस्त्यावर विजयी उमेदवारांची मिरवणूक चालू होती.पाऊस थांबल्यामुळे तिला आणखी जोर चढला होता.फटाक्यांचा माळा वाजत होत्या.ढोल ताश्यांचा आवाज आणखीन वाढला होता.तासभर धिंगाणा सुरूच होता.त्या आवाजाच्या गर्दीत बच्चनच्या ताशाचा आवाज मी बरोबर हेरला आणि बच्चनला यायला उशीर होणार याची खात्री झाली.झोप लागत नव्हती.भूक लागली होती.उठून बसलो आणि तंबाखूचा विडा मळायला सुरवात केली.विडा मळत असताना मागून मंगलचा आवाज आला "क्या कालू झोपला नाहीस अजून". “अगं बच्चन अजून आला नाही”... असे म्हणत, मी बाकड्यावर पुन्हा बसकण मारली.ओठावर दोन ब...
गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!
Article

गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!

गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!बाप गेला, आई गेली. तरीही कष्ट करत, असेल त्यात हार न मानता जगत राहिला. सरळमार्गी स्वप्न बघत राहिला.. कधी कुणाच्या शेतात ओझी उचलत राहिला तर कधी स्वतःच स्वतःची पाहिलेली स्वप्न कुचलत राहिला.. जगण्याच्या आरुडात तो शोधत राहिला मनाला विरंगुळा.. कधी अर्धपोटी तर कधी उपाशीपोटी.. कधी निवद नारळ खाऊन तर कधी फाटकं तुटकं लेऊन.. आहे त्या परिस्थितीत काहीतरी बदल होईल या आशेवर एकेक दिवस येत होता, जात होता.. तरीही खचला नाही.. ना कुणाच्या वळचणीला गेला, ना कुणाला काही त्रास दिला.. तो चार भिंतीच्या शाळेत कमी अन् भाकरीच्या शोधात जास्त शिकत राहिला.. बरं.. आई बाप गेल्यानंतर त्याचा आधार होता तो त्याच्या पाच बहिणी व आत्याचा.. त्याही रोज जगण्याची लढाई लढत बिकट परिस्थितीतून वाट काढत चाललेल्या.. फाटक्याला तुटक्याचा आधार असेच म्हणता येईल.. पण त्याचे भाचा व भाची त्याला काहीबाही सांगत होती.. शिक...
नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!
Article

नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!

नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!'बंजारा विरासत वस्तुसंग्रहालया'चे उद्घाटन झाले. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च पदावर असलेल्या बड्या मंडळींच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. या समारंभाला येणाऱ्या पाहुण्यांचे राजकीय वजन आणि वलय पाहता गर्दी जमविणे आवश्यकच होते. त्यासाठी तांड्यांना लक्ष्य केले गेले. तांडे हे गर्दीचे एकमेव स्रोत होते. कार्यकर्ते जिद्दीला पेटले होते. नेत्याच्या प्रतिष्ठेचा आणि राजकीय भवितव्याचा प्रश्न होता. त्याला गर्दीनेच उत्तर देता येणार होते. त्यामुळे कार्यकर्ते गर्दीसाठी आसूसले होते. रात्रंदिवस एक करून तांडे पालथे घालत होते. एकतर सोयाबीन काढण्यासाठी तांड्यात धावधूप सुरू होती आणि त्याचवेळी नगाराभवनचाही धामधूम सुरू होता. तांड्यांकडे वेळ नव्हता. उन्हापावसात राबराब राबून काळेठिक्कर पडलेल्या त्या थकल्याभागल्या लोकांपुढे सुंदर सुंदर स्वप्ने अंथरली गेली. पोह...
फेक कॉलपासून सावधान.!
Article

फेक कॉलपासून सावधान.!

फेक कॉलपासून सावधान.!जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फेक कॉल येत असतील तर तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमचे खूप आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण काही लोक तुम्हाला फेक कॉल करून फसवू शकतात आणि तुमचे बँक डिटेल्स घेऊन तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. सायबर दरोडेखोराचा एक कॉल तुमचे आयुष्य उध्वस्त करू शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला फेक कॉल येतो तेव्हा तुम्ही सावध राहावे. याच्या मदतीने तुम्ही सायबर फसवणूक टाळू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमच्या फोनमध्ये 2G, 3G किंवा 4G सिम अपग्रेड करण्याचा कॉल येत असेल किंवा तुमची मुलगी,मुलगा सेक्स रॅकेट मद्ये फसला गेला आहे.. त्याला सोडायचे असेल तर लाखो रुपयांची मागणी करणारे कॉल आला तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. हा एक बनावट कॉल असू शकतो, ज्यामुळे तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरीला जाऊ शकतात. किंवा एक कॉल च्य...
ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमा
Article

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमा

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमाफार पुर्वीचा काळ.गावातील कुणीतरी एखाद दुसरा माणुस पुण्या- मुंबईला असायचा.आमच्या गावातील बरेच लोक तेव्हा भिवंडी येथे कामधंद्यासाठी होते.काही लोक शेतीची कामे उरकुन भिवंडी येथे कामासाठी जात असत.त्यामुळे त्यांचे गावी येणे जाणे असे.ज्यांचे कुणी मुंबई,भिवंडीला असे त्यांच्यासाठी त्यांचे लोक रानभाज्या आळवडीची पाने,करटुली,चाव्याचा बार,चाव्याची भाजी,हारब-याची भाजी, हरभरा किंवा गव्हाचा हुळा,तांदुळ व खोब-याची वाफोळी,काकडीची पिसोळी तांदुळ वगैरे गावाहुन पाठवत असत.तसेच एखादी चिठ्ठी लिहुन दिलेली असे.त्याच बरोबर मुंबई किंवा भिवंडीहुन एखादा माणुस गावी जाणार आहे असे समजताच तिकडे राहणारे लोक आपापल्या गावी राहणाऱ्या नातेवाईक,आई वडील,भाऊ वगैरे लोकांना थोडेफार पैसे देण्यासाठी आदल्या दिवशी गर्दी करत.सोबत एखादी चिठ्ठीही पाठवत.त्याबरोबर चहापावडर, एखाद डझन कपड्याचे / अंगाचे साबण,...
श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहण
Article

श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहण

श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहणवयाच्या तेविसाव्या वर्षी पहिली गझल लिहिणारे मराठी गझल साहित्यातील प्रख्यात श्रेष्ठ नामवंत गझलकार आदरणीय राऊत सरांची देवप्रिया / कालगंगा अक्षर गण वृत्तातली ही गझल मला खूप आवडल्याने मी ह्या गझलेचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे.गझलओठ माझे चुंबिण्या ओठांवरी आली गझल हात माझा घेत हाती प्रेयसी झाली गझलत्या खळीच्या भोवऱ्याने जीव माझा घेतला बोलताना मोकळे ती हासली गाली गझलतू लिही नशिबात माझ्या संकटांची शृंखला फक्त त्यांच्या सोबतीने तू लिही भाली गझलहिंडतो का जागजागी तू अनाथासारखा भंगलेल्या माणसांची ती खरी वाली गझलजन्म माझा झिंगण्याची दोन होती कारणे एक प्याला अंगुराचा, एक ही साली गझलपोचलो स्वर्गात मी पण खंत आहे अंतरी एक माझ्या आवडीची राहिली खाली गझल - श्रीकृष्ण राऊतआदरणीय राऊत सरांच्या ह्या गझलेचा मतलाच एवढा सुंदर नि नवयुवती समान आकर्षक आहे की ...
पांडुरंगाच्या भक्तिरसात आस तुझी रे लागली.!
Article

पांडुरंगाच्या भक्तिरसात आस तुझी रे लागली.!

पांडुरंगाच्या भक्तिरसात आस तुझी रे लागली.! बारवाड, ता निपाणी जि बेळगाव कर्नाटक येथील मराठी भाषिक कवी रंगराव बन्ने , यांचा “आस तुझी रे लागली” हा पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तिरसात चिंब भिजलेला अभंग संग्रह नुकताच वाचनात आला. विविध अभंगातून त्यांनी भगवंताच्या प्रती आपली भक्ती व्यक्त केली आहे. “आस तुझी रे लागली” या अभंग कलाकृतीचे मुखपृष्ठ अतिशय सुबक आणि अर्थपूर्ण असून या मुखपृष्ठाला एक वैश्विक अर्थ प्राप्त झाला आहे. मानवी जीवनाचा व्यापक अर्थ या मुखपृष्ठावरून आपल्याला दिसून येतो. आज आपण या मुखपृष्ठावरील संदर्भाचा मानवी जीवनाशी कसा संबंध जोडला गेला याचा अभ्यास करणार आहोत.“आस तुझी रे लागली” या अभंग संग्रहाच्या मुखपृष्ठावर गगनाला भिडणारी पांडुरंगाची उंच मूर्ती दाखवली आहे, या पांडुरंगाच्या भेटीसाठी वैष्णवांचा मेळावा रस्त्याने जातांना दाखवला आहे तर एक वयोवृद्ध म्हातारा काठी टेकवत, पाठीवर गाठोडे, का...
साहित्याचा खरा आनंद सन्मानपत्रात की आशयात.!
Article

साहित्याचा खरा आनंद सन्मानपत्रात की आशयात.!

साहित्याचा खरा आनंद सन्मानपत्रात की आशयात.!साहित्य ही बाब प्रत्येक वेळी सहज निर्माण होत नाही. त्यासाठी आपल्या मनातील भावना, वैचारिक पातळी, योगायोग या गोष्टींना फार महत्त्व आहे. आपण एखाद्या गोष्टीला जसे जाणून बुजून घडवून आणू शकत नाही. तसेच, चांगल्या साहित्याची निर्मिती केवळ खेचून ताणून निर्माण होऊ शकत नाही.एखादी कविता आपण लिहित असताना त्या कवितेमध्ये आशय गर्भता, हळुवारपणा, सहजता, चंचलता येण्यासाठी अनुभव, शब्दरचना, शब्दसंपदा, अलंकार यांची सुयोग्य निवड कवितेला मोकळे रान मिळवून देते. पण तरीही हा विचार अचानकपणे समोर आल्यावर तीच रचना अगदी साध्या भाषेत गोड वाटू लागते. साहित्य लिहिण्याची एक नैसर्गिक उर्मी असते. तुम्ही कुणाला घाबरवून, भीती दाखवून साहित्य निर्मिती करू शकत नाही. तसे साहित्य निर्माण होईल पण, ते साहित्य मनाला स्पर्श करणार नाही. त्या साहित्यामध्ये जिवंतपणा नसेल. जसे आपण म्हणतो मूर्त...