Monday, October 27

Tag: Article

म्हणूनच ही जागा जगात सर्वात सुंदर आहे.!
Article

म्हणूनच ही जागा जगात सर्वात सुंदर आहे.!

म्हणूनच ही जागा जगात सर्वात सुंदर आहे.!Article : मी पणा अंगात आल्यानंतर ICU ची रूम बघावी आणि विचार करावा.. जगात सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे आय.सी.यु! दोन व्यक्तींमध्ये भेद निर्माण करणारी कोणतीच रेषा इथे नसते. तुमचा धर्म,जात,वर्ण, श्रीमंत,गरीब...‌एवढंच नाही तर निसर्गाने तयार केलेला स्त्री-पुरुष हा भेदही इथं नसतो! तो काचेचा दरवाजा ओलांडून मध्ये आलात की सगळे भेद जिथे चपला सोडता तिथेच गळून पडतात.मध्ये फक्त मानवी शरीर जातं! आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं, ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरू असतील... पण जो अर्थ ,जे तत्वज्ञान इथं आय.सी.यु.मध्ये मिळतं,ते कुठेच वाचायला मिळत नाही! आयुष्याचा अर्थ कळतो! म्हणूनच ही जागा फार सुंदर आहे.एखाद्या घरात भुताटकी असते,कोणीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं, लोकांना तिथे भीती वाटते. कुठेतरी रस्त्यावर, मोठ्या झाडाखाली अ...
फुकट संस्कृतीच्या…घो..!
Article

फुकट संस्कृतीच्या…घो..!

फुकट संस्कृतीच्या...घो..! १९७२ मध्ये राज्यात मोठा दुष्काळ पडला होता. पाणी होतं, पण लोकांना खायला अन्न नव्हतं. अमेरिकेकडून निकृष्ट गहू व लाल ज्वारी (मिलो) याची. तत्कालिन मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईकांनी प्रथमच कायदा करून तत्कालीन विधानसभा सभापती वि. स. पागे यांनी तयार केलेली रोजगार हमी योजना (रोहयो) विधानसभेत मांडून मागेल त्याला काम यासाठी 'रोजगार हमी योजना' कायदा केला. त्या वेळी रोजगार हमीतून रस्ते, तलाव, बंडींग, नाला बंडींग अशी विकासाची अगणित कामे झाली. लोकांना 'श्रमाच्या' मोबदल्यात कामाच्या हिशोबाने सरकारने धान्य व पैसे दिले. सरकारने त्या वेळी मनात आणलं असतं तर आजच्या राज्यकर्त्यांसारखे धान्य व पैसे लोकांना फुकट वाटू शकले असते. परंतु त्यावेळचे राजकारणी धोरणी व व्यवहारी होते. या संकटाचे त्यांनी संधीत रूपांतर केले. भिषण दुष्काळात लोकांना सरकारने जगवीले आणि त्या बदल्यात त्यांनी लोकांकडून व...
बाप बाप असतो..
Article

बाप बाप असतो..

बाप बाप असतो..बाप गेला त्याला आज 8 वर्षे होतायत. कुठलाच शाश्वत उत्पन्नाचा आधार नसताना चौघा मुलांना शिकवण्याची किमया त्यानं केली.कोराटीच्या फोकापासून कणग्या, डाले, टोपले व ताटवे विणने हा त्याचा 'स्वयंरोजगार' होता. गावापासून दूर जंगलातून बाप कोराटीचा मोठा भारा डोक्यावर आणायचा तेव्हा त्याचा चेहरा आणि कपडे पूर्णपणे घामाने ओले झालेले असायचे. त्यानंतर बाप त्या फोकाना साळायचा, काटे काढायचा. नंतर त्यांना वाकवून, पिरगाळून कणग्या व डाले तयार करायचा. हे साळून वाळलेले शेंडे, कोराटीचे तुकडे माय जळतन म्हणून चुलीत टाकायची. टीनाचं 8 पत्राचं घर होतं आमचं. त्यातही काही फूटलेले. पाऊस सुरु झाला की आमची धांदल उडायची. घरातली भांडीकुंडी आम्ही गळणाऱ्या जागी ठेवायचो.प्रस्थापित कवींना पाऊस सुरु झाल्यावर भले प्रेयसीची आठवण येत असेल, मला मात्र त्या गळणाऱ्या टीनाची आठवण येते. त्या रात्री मायनं ओल्या जळतणावर धूर ...
शिंगंकाड्या पुंजाजी
Story

शिंगंकाड्या पुंजाजी

शिंगंकाड्या पुंजाजीपुंज्यानं झाकटीतच तमरेट घेऊन घरामांगचा नाला जोळ केला. दोन मिनीटात तरातरा तमरेट हलवत एका हातात बाभूयची दात घासायसाठी काडी व दुसऱ्या हातात भलामोठा लाकडाचा फाटा वढत वढत तो रस्त्यानं चालला होता. तेवढ्यात त्याले आपल्या घराच्या समोर वाडग्यात बुढीनं वाऊ घातलेल्या पऱ्याटीच्या इंधनाच्या कवट्यावर कुत्रं पाय वर करून मुततांना दिसलं.त्यांन दुरूनच हातात गोटा घेऊन "झऊ लेकाचा लाळ सायाचं तं,तथी आलं सती पळाले " आलेलं कुत्रं त्याच्या अवाजानंच भो-- पयालं. तापावर अंग शेकत बसलेल्या झिंगाजीनं त्याले "जरासक आंगगींग शेकसान की नाही पुंजाजीबुवा" म्हणत हाक मारली."असं म्हणताच दोन मिनिटं तमरेट खाली ठेवत पुंजाजी घडीभर तथीसा थांबला."परसाकडे गेलो होतो दिसलं झोळपं हे,म्हटलं बुढीले सयपाक पाण्याले कामी पळते;कामा- धंद्याच्या गरबळीत बुढीले कायले तरास तीले"असं म्हणताच झिंगाजीनंही मंग न राहवत "लयच गरबळ दिस...
मुन्नाभाई वडेवाले…
Article

मुन्नाभाई वडेवाले…

मुन्नाभाई वडेवाले...सेमाडोह, धारणी जाताना घटांग हे गाव लागते. खरं म्हणजे तो रेस्ट स्टॉपच आहे पर्यटकांचा. प्रत्येकाची गाडी इथे थांबल्या शिवाय राहत नाही. कारण काय तर गरम गरम वडे खायला. या गावात अगदी रस्त्यावर काही छोटी छोटी हॉटेल्स आहेत. यामध्ये मुन्नाभाई चे एक हॉटेल आहे.आजूबाजूला तट्टे बांधलेले.पाऊस आला की उभे राहायची अडचण.मात्र मुन्नाभाई चे हॉटेल दिवसभर हाऊसफुल्ल असते.त्याचे एकमेव कारण म्हणजे इथे मिळणारे गरम गरम वडे. वडे सर्वत्र मिळतात मात्र घटांगचे वडे जिभेला वेड लावणारे. एरवी वडा म्हटल की मुगाचा असतो. त्यातही मुगाच्या डाळीचे वडे तेलात पूर्ण तळले पण जात नाही.गरम असताना ही बाब लक्षात येत नाही. मात्र घटांग येथे तयार होणारे हे वडे मूग डाळ कमी अन् बरबटी डाळ जास्त प्रमाणात वापरून केले जातात. बरबटीचे वडे ही अफलातून रेसिपी आहे. मला वाटते ही येथील लोकांनीच शोधली असेल. अत्यंत चवदार अन् एकाच वे...
Article

स्वातंत्र्य कधी आम्हाला मिळेल काय ?

स्वातंत्र्य कधी आम्हाला मिळेल काय ?१५ ऑगस्ट राष्ट्रीय महोत्सव म्हणजे काय? या दिवसाचे महत्त्व कोणाला माहित नाही असे या भारतात तरी शोधून कोणीच सापडणार नाही.! ते तर सर्वांना माहीतच आहे १९४७ साली आपला भारत देश स्वतंत्र झाला, असे कोणीही नाही ज्या व्यक्तीला हे माहीत नसेल, परंतु तुम्हाला खरंच असे वाटते का, की आपला देश स्वतंत्र झाला आहे, आम्हा मुलींना तरी असे अजून तरी तसे अजिबातच वाटत नाही...!मुलींनी स्वप्न पाहणे वाईट आहे का? व ते स्वप्न अस्तित्वात आणणे हा गुन्हा आहे का ? स्वप्न पाहणे गुन्हा आहे असेच मला तरी वाटते, प्रत्येक मुलगी घराबाहेर पडण्या अगोदर सतरा वेळा विचार करते मग ती बाहेर पडते त्यात पण एखादा माणूस तिच्याकडे पाहत असला तर ती तिचा अवतार नीट आहे का ते पाहते, कपडे छोटे वाटत आहे का ? घातलेले कपडे खूप फिट आहे का? केस नीटनेटके आहेत का? कुठे काही लागलं आहे का? हे ती बघते परंतु तिच्या वेशभूष...
शोले चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रथम प्रदर्शित
Article

शोले चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रथम प्रदर्शित

शोले चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रथम प्रदर्शितआज ज्यांचं वय ६५-७० च्या घरात आहेत. त्या पिढीला “शोले” या हिंदी चित्रपटाने काय करामत करून दाखवली होती. हे नीट समजेल. हा शोले चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रथम प्रदर्शित झाला. तो पुढे एवढे विक्रम करेल. याची कल्पना कोणालाही नव्हती. निर्माता दिग्दर्शक शिप्पी यांच्यासह अनेकांना बुचकळ्यात टाकणारा हा चित्रपट इतका गाजला की, त्याने अनेक प्रकारचे “निखारे”, फुलविले, जागविले. मराठीत हिंदीत शोले शब्दाचा अर्थ मराठीत “निखारे” असा होतो. हिंदीतील “शोले” चित्रपटाने इतके निखारे विखरून सोडले आहेत की त्याची मोजदात करता येणार नाही. पण त्याची आठवण मात्र काढली पाहिजे .खरे तर उद्या या चित्रपट प्रदर्शित होऊन पन्नासावे वर्षे सुरू होईल. पण पन्नास वर्षाच्या चित्रपटाने जो मैलाचा दगड रोवून ठेवला. त्याला तोड नाही. त्याचे स्मरण व्हावे. आम्ही स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्य...
लोकशाहीर : अण्णाभाऊ साठे
Article

लोकशाहीर : अण्णाभाऊ साठे

लोकशाहीर : अण्णाभाऊ साठे ------------------------------------- आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस. अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर म्हणून जगप्रसिद्ध झाले. ते एक मराठी समाजसुधारक, कवीतेच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी परंपरेवर आघात करणारे कवी आणि लेखक होते.त्यांचे लेखन हे सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या समजपयोगी होते. अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारसरणी आचरण करणारे तत्ववेत्ते होते.सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाज परिवर्तनाला दिशा व चालना देणारे होते. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त...
आम्ही साखर केव्हाच सोडली.!
Article

आम्ही साखर केव्हाच सोडली.!

आम्ही साखर केव्हाच सोडली.!एक काळ होता साखर म्हणजे प्रतिष्ठेचा गोड पदार्थ. अशा आख्यायिका सुद्धा आहेत की, राजाला खूप मोठे यश मिळाले किंवा आनंद झाला की, हे राजे हत्ती वरून मिरवणूक काढून आपल्या राज्यात प्रजेला साखर वाटायचे. आपला आनंद व्यक्त करायचे. राजाने साखर वाटणे म्हणजे एक प्रतिष्ठा होती. एक काळ हा पण होता की, साखरेचा चहा पिणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण होतं. गुळाचा चहा पिणे म्हणजे दुय्यम लक्षण होतं. अगोदर, पाहुणे म्हणून बाहेर गावी गेले की, पाहुण्यांना चहाला बोलवायचे. त्यात साखरेचा चहा म्हणजे ज्याने आमंत्रण दिले तो म्हणजे खुप श्रीमंत किंवा प्रतिष्ठित व्यक्ती समजायचे. गुळाचा चहा ऑफर करणे म्हणजे गरीब असल्याचे समाजात समजायचे.तेव्हा ह्या दोन गोड पदार्थां मध्ये नकळत स्पर्धा आणि वरिष्ठ-कनिष्ठ असा दर्जा समजल्या जायचा. तेव्हा साखर ही गुळा पेक्षा श्रेष्ठ असल्याचे समजले जायचे. साखरेला सुद्धा खूप अभ...
महानायक : वसंतराव नाईक
Article

महानायक : वसंतराव नाईक

महानायक : वसंतराव नाईकज्या समाजाला इंग्रजाच्याच्या काळात एका ठिकाणी फार काळ थांबता येत नव्हतं. ज्या समाजात अंधश्रधा,वाईट रुढी,परंपरा यांचं साम्राज्य होतं.ज्या समाजात काला अक्षर भैंस बराबर होतं.पोटासाठी रानोमाळ भटकणारा समाज. कपाळावर चोर गुन्हेगार म्हणुन ठसा उमटवलेला समाज.ना नावाची ना गावाची ओळख असेलला समाज.नातलगांची एकदा ताटातूट झाली तर पुन्हा भेट होईल की नाही याची खात्री नसलेला समाज.त्यासाठी एकमेकांच्या गळ्यात पडून गाण्यातून रडणारा समाज म्हणजे गोरमाटी (बंजारा) समाज. शांततेच प्रतिक म्हणून पांढरा ध्वज स्विकारुन शांततेच्या काळात ,लढाईच्या काळात राजा महाराजांना धान्यांची रसद पुरविणारा गोरमाटी समाज तेवढाच शूर विर आहे.यांच्याकडे आदरातिथ्य आहे.दुसऱ्यांना सन्माने वागवण्याची वृत्ती आहे.दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती यांच्या नसानसात भिनलेली आहे ;पण समोरचा जर विश्वासघातकी निघाला तर त्याला तोडण्याची ह...