Sunday, October 26

Tag: Article

गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा.?
Article

गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा.?

गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा..? सांगणारी एक अप्रतिम कादंबरी ...वचपा.!प्रतिभावंत ज्येष्ठ साहित्यिक एम.आर.राठोड (से. नि. गटशिक्षणाधिकारी ) लिखित वचपा कादंबरी दमाळ प्रकाशन संस्थेमार्फत विकत घेऊन वाचून काढलो.सदर कादंबरी वीस भागात विभालेली असून एकूण 213 पृष्ठात सामावलेली आहे.सात दिवसांत कादंबरी वाचून काढली. कादंबरी संदर्भात दोन शब्द लिहावं अशी माझी इच्छा झाली. एम.आर.राठोड साहेबांना सुध्दा माझ्याकडून हीच अपेक्षा होती.खर तर साहित्य समृद्धीच्या अनुषंगाने साहित्याची समीक्षा होत राहण गरजेचे असते.साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिकांकडून समिक्षा झाली पाहिजे अशी बहुतांश लेखकाची इच्छा असते.माझं तर साहित्य क्षेत्रात आता कुठ पदार्पण आहे; तरी देखिल एम.आर.राठोड सरांनी मला कादंबरीविषयी दोन शब्द लिहशिल असं सांगणं खरोखरच माझ्या छोट्याशा साहित्य प्रवासातला हा एक प्रेरक तसेच आव्हानात्मक अनुभव आहे.आता...
मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरमाणूस जन्माला येतो तेव्हा तो एक पवित्र जीव असतो. त्या पवित्र जीवावर लहान वयात सर्वच जाती धर्माचे प्रेम करतात. जेव्हा सर्व धर्माचे जातीचे त्या पवित्र लहान जीवाचे लाड पुरवतात तेव्हा त्या पवित्र जीवाला हे संपूर्ण विश्व किती चांगले आहे आणि किती चांगले लोकं आहेत हे त्याला वाटू लागतं.  परंतु तो जसा जसा मोठा होतो तस तसे त्यावर समाजाचे संस्कार होत असतात. त्याला लहानपणीचा अनुभव व मोठे होण्याचा अनुभव हा वेगळा जाणवत असतो. अशाच ह्या माणसाच्या जीवन चक्रातून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्मा पासूनच जातीय व्यवस्थेचे चटके सोसावे लागले. वर्गाच्या बाहेर शिक्षण घ्यावे लागले. काय वाटले असेल त्या कोमल जीवाला. एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय. परंतु शिकवण ही झाली होती की सर्व लेकरं देवा समान. सर्व लेकरं दे...
आणि…कविता जिवंत राहिली
Article

आणि…कविता जिवंत राहिली

आणि…कविता जिवंत राहिली तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता.ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता.निर्भय तिच्या पोटात वाढत होता.माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता.मी कंत्राटी कामगार होतो.आणि वेळ अशी आली होती,घरातलं सगळं राशन संपलं होतं.गॅस संपून आठ दिवस झाले होते.स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती.टीव्ही चा रिचार्ज संपला होता.त्यामुळे टीव्ही ही बंद होता.रोजचं येणारं दूध बंद केलं होतं.घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता.तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते.तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता.गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे.तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे.दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही.उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती.आणि माझ्यासोबत लढत होती.परंतु आजची परिस्थि...
शेवट गोड व्हावा…
Article

शेवट गोड व्हावा…

शेवट गोड व्हावा...सान्तावर भादरनार्‍यायन या कलेला किती जगवल ? खरतर अशाच बाजार बुनग्यांनीच ही कला बंद पाडली आणि अखेर संस्कृतीचा नाश केला करत आहेत. वर्षाच्या शेवटी सान्ता ही भेटतो आणि हा भारतीय कलेचा अदभुत कलाविष्कार ही आज भेटला आणि वर्षा अखेरचा दिवस ही गोड झाला.यांना आम्ही जगवायला पाहिजे होतं भरभरून द्यायला पाहिजे होतं...पन दिल नाही. हे इतिहासातली पाने आहे. ही नष्ट करण्यात धन्यता मानणारे नाकाने संस्कृती टिकविण्याच्या बाता झाडतात. ज्या काळात घड्याळाची काटे न्हवती त्या काळात घड्याळाच्या काट्याची कामे ही जीवंत माणसे अत्यंत चोख करायची, सकाळी चार पासून गावं जागवायची, जेने करून गावाचा प्रपंच गाडा व्यवस्थित चालावा.हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ....आधुनिक कारंजा महात्म्यछत्रपतींच्या शिवरायांच्या काळात ह्या जीवंत कला डबरूवाले, पांगूळ, डोंबारी, वासुदेव या आणि अशा अनंत कला अत्यं...
प्रायव्हसी 
Article

प्रायव्हसी 

प्रायव्हसी  मुळात आपल्या इकडे मुल व्हायची किती घाई . दोन वर्ष तरी वेळ द्यावा एकमेकांना  आणि मुलगी 18 /19  वर्षाची असेल तर पाच वर्ष .जुनी खोडं तशीच ओरडू द्यावी .त्यांना नातवंडांचे तोंड बघायची खूप घाई . मुलं व्हायच्या आधीची प्रायव्हसी मुलं झाल्यावर रहात नाही मग काय करावे ? माझी बहिण कॉलेजला शिकत असताना तिने मला एक किस्सा सांगितला होता .तिच्या मैत्रिणीचे आईवडील त्यांच्या प्रत्येक मॅरेज ऍनिव्हार्सरीला सकाळी सहा वाजता घरातून निघून जातात आणि थेट रात्री 10 /11 ला घरी येतात . त्यांच्या दोन मुली घरीच असतात आणि आई बाबा कुठे गेले हे त्यांना माहीत नसते .त्या दिवशी त्या बहिणी घर सांभाळतात. ही सवय त्यांना लहापणापासूनच लावली गेली. माझ्या एका नात्यातील मावशीकडे मी लहान असताना गेले होते .शहरात घर लहान आणि घरात माणसं भरपूर. स्वतः ची मुलं ,नणंद आणि जावेची मुलं शिकायला घरी आणि सासू. संध्याकाळी सगळे मिळू...
सोशल नेटवर्किंगच्या युगात
Article

सोशल नेटवर्किंगच्या युगात

सोशल नेटवर्किंगच्या युगातसोशल नेटवर्किंगच्या युगातफॅमेली नेटवर्कींग संपत चाललय...नात्याचा अख्खा नेटपॅक संपत्तीच्या हव्यासा पाई महाग होत आहे. भिंतीला भिंत लागून असून सुद्धा संबधाच नेटवर्क हँग मारतय... सर्वच्या सर्व नाते जवळ जवळ असतांना सुद्धा आपण सारे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहो. आठवनींचा डाटा नुसताच साठवून ठेवतोय... आपण पुसटशी नजरही टाकत नाही त्या इमेजवर, कित्तेकदा तर डिलीट मारून मोकळे होतो, एकमेका बद्दलच्या तिरस्काराचा डाटा मोबाईल मध्ये फुल्ल झाला म्हणून... कधी कधी नकोसा वाटतो हा फोरजी फाईवजी आणि एकशे अठ्ठाविस जीबी चा डाटा... अस वाटत मामाच पत्रच बर होत, हारवल तरी ते कुणाला ना कुणाला तरी ते सापडत होतं...!हे वाचा – नाट्यप्रेमी करजगाव- विजय ढाले #बिब्बा सोशल नेटवर्किंग...
घराच्या उंबरठ्यावर सुखाची जत्रा 
Article

घराच्या उंबरठ्यावर सुखाची जत्रा 

घराच्या उंबरठ्यावर सुखाची जत्रा गोष्ट मे महिन्यातील आहे.रविवारचा दिवस होता.सकाळी सकाळी नऊ वाजता बायकोला घेऊन भाजी आणायला गावात चाललो होतो. मोटारसायकलवर आम्ही निघालो होतो. आणि हिने मागून बडबड सुरु केली. “ जरा जीवाला चैन नाही माझ्या.जरा जरा म्हणून काही चव नाही आयुष्यात.नुसतं घर घर करून जीव आंबून चाललाय.” मी गाडी थांबवून म्हणलं “काय झालं सकाळी सकाळी.का चिडली आहेस.?” तर हीचे डोळे भरलेले.मी परत विचारलं, “ बोल काय हवंय तुला..?”  भेळ पाणीपुरी तिला आवडतं.म्हणलं खायची का भेळ..?तर म्हणाली “हितं खाऊन काय करू..?” मी म्हणलं मग कुठ खायची आता..? तर म्हणली, “पुण्याच्या सारस बागेत नवऱ्यासोबत भेळ खायची माझी लै इच्छा होती आयुष्यात.” “पण तुम्ही सतत कार्यक्रमात.सतत चळवळीत.आता पोरं पण मोठी व्हायला लागली.सगळा रंगच गेला माझ्या आयुष्यातला.चला वांगी घेऊ भरलेली वांगी करते.”    मी किक मारली.गाडी सुरू केली.ती माग...
अनिलभाऊ लोहार : जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी
Article

अनिलभाऊ लोहार : जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी

अनिलभाऊ लोहार : जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणीधरणगावच्या एका साध्या, परंतु अत्यंत मेहनती कुटुंबात जन्मलेले अनिलभाऊ लोहार, हे एक असं व्यक्तिमत्त्व आहे ज्यांच्या जीवनाची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. साधेपणातही मोठं स्वप्न पाहण्याचं धाडस असलेल्या अनिलभाऊंची जिद्द आणि कष्ट यांच्यामुळे त्यांनी आपलं भविष्य स्वतः घडवलं.अनिलभाऊंच्या घरात आर्थिक चणचण होती. त्यांचे वडील बैलांना पत्र्या मारण्याचे काम करत, मात्र हे काम तितकं समाधानकारक नव्हतं. कुटुंबाला आधार देण्यासाठी अनिलभाऊंनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि आपल्या घरच्या परिस्थितीचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण थांबल्यामुळे भविष्यात काय करायचं याचं मंथन त्यांचं मन सतत करत होतं, पण त्यांच्या डोळ्यांतून कधीच स्वप्नं हरपली नाहीत. त्यांनी कधीच परिस्थितीसमोर नांगी टाकली नाही, कारण त्यांचं मन नेहमी मोठं काहीतरी करण्यासाठी आसुसल...
शेराचे झाड
Article

शेराचे झाड

शेराचे झाडEuphorbia tirucalli. अत्यंत दुर्लक्षित झालेले झाड! पूर्वी शेतबांधावर आपले पुर्वज आवर्जून हे झाड लावायचे,किंवा अख्ख्या शेताला ह्याचे कुंपण असायचे. कारण पिकांवर पडणारे अनेक रोग हे झाड अडवून धरायचे!तसं बघीतले तर अत्यंत जहाल झाड, पण विनाकारण डिवचले तर! आमचे अख्खे बालपण शेराखाली खेळण्यात गेले, आमची आई फक्त शेराच्या झाडाला हात लावू देत नव्हती. याचा चिक डोळ्यात वगैरे गेला तर अत्यंत घातक म्हणून. पण शेराची सावली अत्यंत आरोग्यदायी असते हे आता कळतंय, कारण शेर नामशेष होऊ लागलेत. शेराचे झाड पिकावरील किडींचा प्रादुर्भाव रोखते हे वाचून मी ह्यावर्षी आमच्या मक्यावर एक प्रयोग केला. मक्यावर पडणाऱ्या लष्करी आळीसाठी मी शेराच्या पाचसहा नांग्या खलबत्त्यात चेचून दोन दिवस एक लिटर पाण्यात भिजत ठेवल्या आणि तिसऱ्या दिवशी दोनशे मिली पंधरा लिटर पाण्यातून फवारल्या!रिझल्ट म्हणाल तर मी दुकानातून आणलेले औषध परत...
सुपरफास्ट..!
Article

सुपरफास्ट..!

सुपरफास्ट..!भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर मधु केव्हाचा उभा होता. सारख्या इकडून तिकडं रेल्वे गाड्या सुटायच्या त्याला तिथून जळगावला जायचं होतं. आज तो काहीतरी वेगळ्याच तंद्रीत होता. एक्सप्रेस गाडीनं गेलं म्हणजे वेळ वाचेल असं त्याच्या डोक्यात होतं. असंच मागच्या आठवड्यात तो इथूनच पॅसेंजरने बसला होता पण अर्ध्या तासाचा प्रवास त्याला एक सव्वा तास गेला. मागून येणारी एक्सप्रेस किंवा सुपरफास्टगाडी पुढं जाऊन द्यायची तोपर्यंत पॅसेंजरला असंच साईट पटरीवर ताटकळत थांबावं लागायचं! मागची गाडी जेव्हा पुढे निघून जायची तेव्हा गाडीतला प्रत्येक जण मनात स्वतःशीच खिन्न होऊन गाडीच्या खिडकीतून बघत बसायचा. आज म्हणूनच मधुनं एक्सप्रेसमध्ये बसायचं निर्णय घेतला होता.सुट्टीचा दिवस असल्यानं स्टेशनवर येणारा जाणाऱ्यांची आज खूपच गर्दी होती. गाडी आली म्हणजे लगेच उतरणाऱ्या प्रवाशांचा लोंढाच्या लोंढा दादरवरून खाली यायचा. तिथून प...