Sunday, October 26

Tag: आणि

नोकरी आणि कुटुंबाची जडणघडण
Article

नोकरी आणि कुटुंबाची जडणघडण

नोकरी आणि कुटुंबाची जडणघडणसध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. आज वाढलेली भस्मासूर महागाई पती-पत्नी दोघांनाही संसार सुखाचा करण्यासाठी नोकरी करण्यास प्रवृत्त करते. मानवी गरजा वाढल्या आहेत. जीवन सुखी समाधानी असावे या आशेने नोकरी करणे आज काळाची गरज आहे. नोकरी करणारा पुरुष घर सोडून जाताना त्याच्या जबाबदाऱ्या बऱ्याच अंशी घर सोडल्यानंतर संपतात पण, एका स्त्रीला घरात असताना व घरात नसताना दोन्ही ठिकाणी आपल्या जबाबदाऱ्या अगदी सावधगिरीने पूर्ण कराव्या लागतात.घरात वडीलधारी मंडळी सासू-सासरे असले तर त्यांच्या गरजा काय आहेत?  त्या  पूर्ण केल्याशिवाय, स्वयंपाक केल्याशिवाय तिला घर सोडता येत नाही. त्यावेळी तिच्या संयमाची फार मोठी परीक्षा सुरू असते. तिने कितीही मोठा पगार जरी घरात दिला तरी त्या पगाराबरोबर, तिची त्यागी वृत्ती तिला द्यावी लागते. तिला प्रत्येकाच्या गरजांसाठी थोडा वेळ द्यावा लागतो. तरच कुटुंब आ...
Article

जगातील सर्वात मोठे आणि जास्त प्लॅटफॉर्म असणारं रेल्वे स्टेशन.!

जगातील सर्वात मोठे आणि जास्त प्लॅटफॉर्म असणारं रेल्वे स्टेशन .!   रेल्वेचे जाळे फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. जगातील जास्तीत जास्त देशांच्या आतील राज्य आणि शहरांच्या संपर्कासाठी ट्रेन हा सर्वात चांगला पर्याय मानतात. जगभरात अनेक रेल्वे स्टेशन असे आहेत ज्यांची एक वेगळी ओळख आहे. भारतातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवर आहे. तर देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन हावडा जंक्शन आहे. इथे २६ प्लॅटफॉर्म आहेत.   जगातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असणारं रेल्वे स्टेशन अमेरिकेतील एका शहरात आहे. विशेष म्हणजे या रेल्वे स्टेशनवर सर्वात जास्त प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजेच हे स्टेशन त्याच्या दोन गुणांसाठी प्रसिद्ध आहे. अमेरिकेत असलेले हे स्टेशन १९०३ ते १९१३ या काळात बांधले गेले. या रेल्वे स्टेशनचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे.   ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे जगातील सर...
द्वितीय महायुद्ध  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

द्वितीय महायुद्ध  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

द्वितीय महायुद्ध  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर          जग हे विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पडले आहे. राजकारणाच्या स्वार्थी वृत्तीच्या फायद्यासाठी जगावर फार मोठे अरिष्ट लादल्या जात आहे. तिसरे महायुद्ध लढले जाईल का असा प्रश्न जगातील लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विस्फोटकांनी मानवाचा शाश्वत विकासाला उध्वस्त करण्याचे कुटील डाव जगामध्ये निर्माण होत आहेत. अहंकारी रानटी प्रवृत्ती अनेक नेत्यांच्या अंगात संचारली आहे .युद्ध व त्यांची किती गंभीर परिणाम असतात त्याची प्रचिती ज्यांनी द्वितीय महायुद्ध पाहिले त्यांना नक्कीच आले आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या महायुद्धात घेतलेल्या भूमिकेचा परिणाम जागतिक परीप्रेक्षात पडलेला दिसतो. अनेक नेत्यांना त्यांच्या विचारापर्यंत पोचता आले नाही.       द्वितीय महायुद्धातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या निर्णयातून त्यांच्या भारतीय स्वात...
Article

मायबोली बंजारा भाषा आणि तिचा अभिजात वारसा

  बंजारा बोली ही बंजारा समाजाची मायबोली , मातृभाषा असून भारतभर बोलली जाणारी राजस्थानी प्रभाव असलेली इंडोआर्यन परिवारातील एक समृृद्ध बोली भाषा आहे. डॉ. हिरालाल शुक्ल यांनी बंजारा भाषेला 'इंडोआर्यन' परिवारातील भाषा म्हणून संबोधले आहे. तर डॉ. उदय नारायण तिवारी, डॉ. राहुल सांस्कृत्यायन यांनी बंजारा बोलीला 'राजस्थानी बोली' म्हटल्याचे आढळून येते. इतिहास संशोधक बळीराम पाटील यांच्या 'बंजारा क्षत्रियोका इतिहास' (१९३०) या ग्रंथातही बंजारा भाषेतील दोहे आलेले आहे. भारतीय विविधतेला संपन्न करणाऱ्या विविध मातृभाषा यापैकीच बंजारा ही एक समृद्ध वारसा जपणारी बंजारा समाजाची मातृभाषा होय. बंजारा भाषा संदर्भात प्रख्यात बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार-नायक यांनी "बंजारा भाषा ही ग्लोबल सिटीझनची चौदाखडी शिकवणारी एक सहिष्णूतेची मातृभाषा आहे. ज्यात कोणत्याही प्रकारची द्वेषमूलकता स्पर्शत नाही. ...
बौद्ध संस्कृती आणि संस्कार
Article

बौद्ध संस्कृती आणि संस्कार

बौद्ध संस्कृती आणि संस्कार बौद्ध धर्म उदयास आल्या पासून बौद्ध संस्कृतीचे संस्कार उदयास आले. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत सतत पायी फिरून बुद्धांनी त्यांच्या धम्माचा प्रचार प्रसार केला. बुद्धाच्या जीवन काळामध्ये धम्म वेगाने वाढून पुढे राजाश्रय मिळाल्यामुळे अधिक भरभराटीस आला. अनेक राज्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्यामुळे प्रजाही बौद्ध बनली होती. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ही अनेक राजाद्वारे बुद्धाच्या अस्थींच्या रूपाने स्तुपांची निर्मिती करण्यात आली. बुद्धाची प्रतिमा तयार करण्यात आली. श्रद्धा भाव व्यक्त करण्यासाठी पालि गाथांची निर्मिती करण्यात आली. बुद्धांचा उपदेश ताडपत्र्यावर, झाडांच्या सालीवर, पुढे पाषाणावर कोरण्यात आलेले होता व त्यानुसार बुद्धाचे अनुयायी आचरण करीत असे. सम्राट अशोकाच्या काळात तर बुद्ध धर्माला फारच भरभराटीचे दिवस आले होते. बुद्धाच्या अस्तिवर चौर्‍याऐंशी हजार स्तूप निर्माण करून...