Thursday, March 5

News

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन
News

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन

मुंबई : राज्यातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, मका, भात, भाजीपाला आणि फळबागांसह अनेक पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले श्रम वाया गेले आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, सरकारकडून तातडीने मदतीची अपेक्षा आहे.कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच याबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल. राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व हालचाली सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या निकषांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसध्या राज्यभरातून १०० टक्के ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी होत आहे. अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचे नुकसान झालेले नाही, तर शेतकऱ...
दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार
News

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणारमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर तीन टप्प्यांत घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने अंतिम टप्प्यात नेला आहे. यामध्ये मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.दिवाळीनंतर लगेच नोव्हेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात निवडणुकीचा बिगुल वाजणार असून, त्यामुळे राज्यात राजकीय फटाक्यांची आतषबाजी सुरू होणार आहे. मात्र या निवडणुकीमुळे आचारसंहितेचा कालावधी मोठ्या प्रमाणात लांबणार असून, विकासकामांना फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.सर्वोच्च न्यायालयाचा आदेशमहापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दीर्घकाळ रखडलेल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ३१ ज...
नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारा
News

नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारा

नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारामुंबई : नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच आकाशही रंगतदार होणार आहे. २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. घटस्थापनेच्या दिवशी मुंबईत हलक्या सरींची शक्यता असली तरी त्यानंतर मेघगर्जनेसह पावसाळी वातावरण राहणार आहे.हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि विदर्भ-मराठवाड्यासह अनेक भागात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार सरींची शक्यता आहे.महामुंबई परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही भागात हलक्या सरींची नोंद झाली.ढगाळ वातावरण आणि उकाडानवरात्र व दुर्गापूजा दरम्यान ढगाळ वातावरणामुळे उकाड...
जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम पुत्राला केळापूर न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा
News

जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम पुत्राला केळापूर न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा

जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम पुत्राला केळापूर न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षावणी तालुक्यातील घटनेवर केळापूर न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णयगौरव प्रकाशन वणी (प्रतिनिधी) : वणी तालुक्यातील समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेवर केळापूर येथील अतिरिक्त व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. स्वतःच्या जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या 26 वर्षीय नराधम पुत्राला गुरुवार, दि. 18 सप्टेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या कठोर शिक्षेमुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदा किती प्रभावी आहे याचा ठोस संदेश समाजात गेला आहे.घटनेचा आढावाजुलै 2021 मध्ये वणी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. 19 जुलै रोजी पीडिता वणी येथे मुलीकडे गेली होती. याच कारणावरून तिच्या मुलाने दोन-तीन दिवस सतत मारहाण केली. अखेर 23 जुलैच्या रात्री दारूच्या नशेत आरोपीने आईवर लोखंडी पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर ...
‘…असं कार्य समाजाला दिशा दर्शक! आमदार काशिनाथ दाते यांचे गौरवोद्गार’
News

‘…असं कार्य समाजाला दिशा दर्शक! आमदार काशिनाथ दाते यांचे गौरवोद्गार’

गौरव प्रकाशन पारनेर (प्रतिनिधी): पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे उद्योजक संतोष पवार यांनी कै. प्रवीण पवार व कै. सुजित पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने समाजहिताचा उपक्रम राबवत शेतकरी व विद्यार्थी बांधवांना मदतीचा हात दिला. या उपक्रमामध्ये गावातील सर्व शेतकऱ्यांना कृषी फवारणी पंप तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार काशिनाथ दाते उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी समाजहिताच्या या उपक्रमाचे कौतुक करताना भावना व्यक्त केल्या. “मी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच आलो आहे. हजारो रुपये खर्च करून वक्ते बोलावण्यापेक्षा गावातील गरजू शेतकरी व विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे ही खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे. संतोष पवार यांनी दाखवलेला हा मार्ग समाजासाठी दीपस्तंभ ठरेल,” असे दाते यांनी सांगितले.या कार्यक्रमाला तालुका भाजप अध्यक्ष राहुल शिंद...
20 वर्षे जुनी गाडी चालवण्यासाठी नवे नियम : दुप्पट शुल्क, फिटनेस टेस्ट आणि ग्रामीण भागाला दिलासा
News

20 वर्षे जुनी गाडी चालवण्यासाठी नवे नियम : दुप्पट शुल्क, फिटनेस टेस्ट आणि ग्रामीण भागाला दिलासा

नवी दिल्ली : वीस वर्षे जुनी गाडी रस्त्यावर ठेवण्यासाठी आता वाहनमालकांना काही महत्त्वाच्या अटी पाळाव्या लागणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने ठरवलेल्या नव्या नियमांनुसार 20 वर्षे पूर्ण केलेल्या वाहनांसाठी नोंदणी नूतनीकरण आणि फिटनेस टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.यासाठी वाहनमालकांना नेहमीपेक्षा दुप्पट शुल्क भरावे लागणार असून स्वतंत्र फिटनेस तपासणीही होणार आहे. इंजिन, ब्रेक, टायर, लाईट यासह वाहनाच्या प्रत्येक भागाची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. तसेच प्रदूषण उत्सर्जन (PUC) निर्धारित निकषांनुसार आहे का हे तपासले जाणार आहे. फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच वाहन रस्त्यावर धावू शकेल.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!खासगी वाहनांसाठी नोंदणी नूतनीकरणाचे शुल्क जास्त असणार आहे, तर व्यावसायिक वाहनांसाठी आणखी कडक अटी लागू होणार आहेत. शहरी भागात वाढत्या प्रदूषणामुळे हे नियम कडकपणे राबवल...
अखेर शकुंतला रेल ब्रॉडगेजला डीपीआर मंजूरी – शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा ऐतिहासिक विजय
News

अखेर शकुंतला रेल ब्रॉडगेजला डीपीआर मंजूरी – शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा ऐतिहासिक विजय

अखेर शकुंतला रेल ब्रॉडगेजला डीपीआर मंजूरी – शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा ऐतिहासिक विजयअखेर शकुंतला रेल ब्रॉडगेज प्रकल्प मार्गी | अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वे प्रवासाची नवी दिशागौरव प्रकाशनAmravati News अमरावती (प्रतिनिधी) : गेल्या सात वर्षांपासून आंदोलनाच्या ज्वाळांवर उभी असलेली शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अखेर यशाच्या मार्गावर पोहोचली आहे. शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे डीपीआर (Detailed Project Report) मंजूर झाला असून अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेच्या भवितव्याला आता नवी दिशा मिळाली आहे.सात वर्षांचा सत्याग्रह अखेर फळाला2018 साली सुरु झालेल्या या लढ्याने आज ऐतिहासिक यश मिळवले. सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर समितीने सरकारचे लक्ष वेधून घेतले. या काळात रेल्वे विभागाला सातत्याने पत्रव्यवहार, मोर्चे, उपवास व विविध अहिंसक मार्गांनी आं...
लातूर जिल्हा आरक्षण विवादाने पेटला; चार दिवसांत दोन आत्महत्या, समाजात तणाव!
News

लातूर जिल्हा आरक्षण विवादाने पेटला; चार दिवसांत दोन आत्महत्या, समाजात तणाव!

लातूर जिल्हा आरक्षण विवादाने पेटला; चार दिवसांत दोन आत्महत्या, समाजात तणाव!लातूर : लातूर जिल्ह्यातील आरक्षणाच्या संघर्षाने जिल्हा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाजाच्या ‘कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समाविष्ट करा’ या मागणीवर ओबीसी समाजाने तीव्र विरोध व्यक्त केल्याने दोन्ही समाजात तणावाची परिसीमा गाठली आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत कराड या युवकाने ‘ओबीसी आरक्षण संपणार’ या भीतीतून आत्महत्या केली. गावात ओबीसी समाजातील नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केल्याने वातावरण हादरले आहे.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदासुरुवातीला भरत कराड यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये ‘मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे आरक्षण हिरावले जाण्याची भीती’ व्यक्त केली. तणाव शमत नाही तोच निलंगा तालुक्याच्या दादगी गावात शिवाजी वाल्मिक मेळ्ळे...
वैष्णोदेवी मंदिर यात्रा 7 दिवसांपासून बंद, पावसामुळे भक्त निराश
News

वैष्णोदेवी मंदिर यात्रा 7 दिवसांपासून बंद, पावसामुळे भक्त निराश

वैष्णोदेवी मंदिर यात्रा 7 दिवसांपासून बंद, पावसामुळे भक्त निराशकटरा (जम्मू काश्मीर): श्री माता वैष्णोदेवी मंदिराची यात्रा सलग सातव्या दिवशीही स्थगित राहिली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली आहे.जम्मू काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भूस्खलन व पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात्रेचा मार्ग धोकादायक झाल्याने प्रशासनाने तात्पुरती यात्रा थांबवली.● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!हजारो भक्त कटरा, त्रिकुटा डोंगर परिसरात अडकलेले आहेत. हॉटेल्स, धर्मशाळा येथे गर्दी वाढली आहे.रोपवे, हेलिकॉप्टर, बैटरी कार यांसह सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रद्धालूंच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.हवामान सामान्य झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल....
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवा
News

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवा

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवामुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, आझाद मैदानाव्यतिरिक्त मुंबईतील अन्य ठिकाणी जमलेल्या आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटविण्यात यावे. तसेच मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना मुंबई वेशीबाहेरच रोखून परत पाठवावे, असेही आदेश खंडपीठाने दिले आहेत.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!न्या. रविंद्र घुगे आणि न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात न्यायालयाने निदर्शनास आणून दिले की आंदोलकांनी दिलेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन केले आहे. केवळ आझाद मैदानापुरती मर्यादित राहणारी परवानगी असूनही मोठी गर्दी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, हुतात्मा चौक परिसरात जम...