Sunday, February 15

Article

Article

तरूणाईचा पाऊस..!

आज आकाश गर्द मेघांनी भरुन आलं होतं.आकाशाचा राखडी रंग जाऊन काळाकुट्ट रंग प्राप्त झाला होता.चरावयास गेलेले सारे खग घरट्याच्या ओढीने रॉकेटसमान धावत होते.किलबिलाट करत होते.झाडावर नाचत होते.झाडांच्या रांगेमध्ये नव संगीताचे स्वर छेडत होते . पावसाची चाहूल हे प्रथम पक्षांना व प्राण्यांना कळते म्हणतात ते असू शकते.मी माझ्या बाईकने प्रवास करीत होतो.मेघ दाटून आलेल्या नभातून भूतलावर केव्हा पाऊस पडेल याचा नेम नव्हता ,तसा पाऊस पूर्व सुचना देऊन येत नसतो, पण त्यांची गंधवार्ता सृष्टीतून जाणवू शकते.पाऊस कधीही,केव्हाही,कसाही येते."होत्याचं नव्हतं करतो,नव्हत्याचं होतं करतो."हा पाऊस कवीचा खूप आवडता असतो.पाऊस आणि कविता हे गणित खूप चांगलं जमतं.या पाण्यासाठी बाबासाहेबांनी मोठा संघर्ष केला ."विद्रोहाचे महाड संगर घडून माणवमुक्तीचे महा आंदोलन केले ". पाणी हा जीवनाचा मूल्यवान नैसर्गिक घटक पण यावर  सनातनी मानवाची मक्ते...
Article

अस्वस्थ मनाची घालमेलं….!

"काही व्यक्तींच्या आक्रमणातून राष्ट्र घडत असेल तर ते राष्ट्र हे राष्ट्रीय आदर्शाचे गुलाम ठरते.त्या माणसाच्या स्वप्नात आणि जीवन धारणात बंदिस्त होते.त्याच्या चिरकाल आशा आणि धर्म संकल्पनाच त्यांना देश वाटतात तेव्हा ते स्वतःच्या विश्वासालाच अप्रमाणिक असतात.शब्द आणि कृतीद्वाराही ते एका आत्मसंतुष्ट आणि परिग्रही प्रवृत्तीला पाठींबा देत असतात त्याचा पाठपुरावा करतात."         वॉल्टर लिपमन   मृग नक्षत्राचे काळे काळे मेघ नभात अवतरले होते.मोसमी वाऱ्याची चाहूल खगाना आली होती.नव्या जीवनाला नवे ऊर्जाबल देण्याचे काम मृग करत असतो.सारा प्रदेश गंधवाहानी मोहरून आला होता.पक्ष्यांची मंजूळ रव कर्णाला सुखावणारी वाटत होती .सारे खग स्वच्छंद गगनात विहार करत होते.काळे मेघ दिसताच त्यांनी आपला थव्याला घरट्याकडे वळवले होते.झाडाच्या पानातून नवं संगीताची धून ऐकू येत होती.निसर्गातील बदलत्या काळातील चक्र अविरत चालू आहे.पण म...
Article

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक.…

०६जून १६७४ रोजीचा दिन हा हिंदवी स्वराज्यासाठी सुवर्ण दिन म्हणून ओळखल्या जातो कारण याच दिवशी आपल्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करून "शिवराज्याभिषेक सोहळा" आयोजित केला होता.शिवराय हे परमपराक्रमी तर होतेच शिवाय त्यांची दूरदृष्टी सुद्धा अतिशय तिक्ष्ण होती.त्यांना माहीत होते की,आपण आपल्या स्वराज्यनिष्ठ असणाऱ्या मावळ्यांच्या मोलाच्या योगदानामुळे आपले हिंदवी स्वराज्य जरी निर्माण केले असले तरीपण आपण आजही मोघलांचे मांडलिक म्हणूनच राहणार आहोत.आपल्याला स्वतःचे चलन,राज्यकारभार,न्यायव्यवस्था,करप्रणाली ई.धोरणे ठरविण्याचा स्वतंत्र अधिकार प्राप्त होणार नाही स्वराज्य असून सुद्धा जर आपण प्रजाहित धोरण ठरवू शकत नसलो तर आपल्या हिंदवी स्वराज्याचा काहीच उपयोग होणार नाही.म्हणूनच त्यांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून आपल्या हिंदवी स्वराज्याची स्वतःची एक ओळख निर्माण होईल आणि आपल्या प्रजेला...
Article

निसर्गाच्या परोपकाराची परतफेड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करूया.!

निसर्गाने मानवाला भरभरून खूप दिले. एवढेच नाही तर हे सर्व पवित्र व गुणवत्तापूर्वक सुद्धा होते. ह्यामध्ये मानवाला आवश्यक असलेला प्राणवायू, सूर्यप्रकाश, पाणी, खनिज संपत्ती, पक्षी, प्राणी  व वनस्पती आहे. ते सुद्धा विनामूल्य व कुठलेही अपेक्षा न ठेवता जणू मानवावर निसर्गाने परोपकाराचं केले. जणू काही निसर्गाचा जन्मो जन्मीचा  दृढसंबंध असलेले नाते होते. जणू काही निसर्ग मानवावर अतोनात प्रेम करतो. जसे काही निसर्गाने मानवाचे पालकत्व घेतले व त्याप्रमाणे तो मानवाचे पालन पोषण करतो आहे.मानवाची निसर्गही हा खूप काळजी घेतो. त्याची तहान भागली पाहिजे, त्याला प्राणवायू मिळाला पाहिजे. त्याला सूर्यप्रकाशातुन डी जीवनसत्व मिळाले पाहिजे. वनस्पती पासून औषधी मिळाल्या पाहिजे. खाणींमधून खनिजे व समुद्रातून नैसर्गिक साठा मिळाला पाहिजे.मानवाने निसर्गा पासून आता पर्यंत घेण्याचेच काम केले आहे व ही प्रक्रिया अजूनही सुरूच...
Article

बुद्ध लेणींचे नामकरण…!

महाराष्ट्रातील जवळपास 400 बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले आहे.! काहींचे "नामकरण" ही झाले आहे..! भारतीय लोककथेमध्ये 'पांडव' व त्यांच्याशी जोडलेल्या अनेक लोकप्रिय कथा आहेत.! अनेक बुद्ध लेणींचे नामकरण ही याच नावाने झालेले आहे याचा आढावा घेणारा अतुल मुरलीधर भोसेकर यांचा लेख खास वाचकांकरीता देत आहोत.....इतिहासाचा शोध आणि त्याचे पुनर्लेखन का गरजेचे आहे हे लक्षात येईल..!- संपादकज्ञान हे प्रवाही असले पाहिजे, नव्हे तसे ते असतेच. तसेच ते परिवर्तनीय देखील असते. नवनवे संशोधन जसे पुढे येत जाते, तसे जुने ज्ञान किंवा विचार बदलणे अपेक्षित असते. प्रत्येक ज्ञानशाखेत असे प्रवाह निर्माण होत असतात. इतिहास किंवा पुरातत्त्वशास्त्र या शाखेत अविरत संशोधन चालू आहे. मात्र तरीही काही इतिहासप्रेमी, तज्ञ अथवा पुरातत्वविद हे जुन्या शब्दांना किंवा कंसेप्ट्स यांना बदलायला तयार नसतात. मग भले तुमचे संशोधन कितीही ताकदीचे, ...
Article

महात्मा बसवेश्वर दलित व शोषितांचे मसीहा

संत हरळ्याच्या एकाकीपणामुळे त्यांचे मन गावात रमत नव्हते.त्याचे वडील ज्यांच्याकडे काम करीत असत,त्यांच्याकडून त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन मिळत असे. माहीत नसतांनाही वडीलांच्या कामाकडे लक्ष दिल्यामुळे पादत्राणे बनविण्याचा धंदा हरळ्या करु लागला. एक दया म्हणून लोकं हरळ्याची पादत्राणे घेत असत. अशाच अनुभवातून हरळ्याची  पादत्राणे कलाकुसर पद्धतीने तयार होवू लागली. आज त्यांच्यात कौशल्य निर्माण झाले होते. एकटेपणामुळे लवकरच लवकरच त्यानं आपला विवाह कल्याणी नावाच्या मुलींशी केला होता. लहानाचा हरळ्या संसार सांभाळता सांभाळता मोठा होवू लागला. कल्याणीपासून त्याला एक मुलगा झाला. त्याचं नाव शिलवंत ठेवण्यात आलं होतं.          बसवेश्वराने याच काळात जन्म घेतला होता. आपल्या लहानपणापासूनच बसवेश्वराने दलित आणि स्रियांवरील अत्याचार अगदी जवळून पाहिले होते. जन्माच्या वेळीच या बसवेश्वराने मुंज नाकारुन प्रथेला सुरुंग ...
Article

अक्षय तृतीया;केवळ पुजापाठ नको,कर्तृत्वही हवं..!

अक्षय तृतीया भारतात मोठ्या उत्साहानं साजरा होणारा सण आहे.हा सण हिंदूंचाच नाही तर जैन लोकही या सणाला मोठ्या उत्साहानं साजरा करतात.नव्हे तर या पाठीमागे एक पुरातन परंपरा आहे.       या दिवसाला साजरा करण्यामागे काही पुरातन परंपरा खालीलप्रमाणे         या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला.तोच विष्णुचा सहावा अवतार मानला जातो.या दिवशी परशुराम जयंती साजरी करण्याच्या दृष्टीने या दिवसाचे महत्व आहे.गंगा नदीही याच दिवशी भगीरथाने पृथ्वीवर आणली.तसेच या दिवशी गंगेत स्नानाचे महत्व आहे.हिंदू पुराणानुसार याच दिवशी अन्नपूर्णा मातेचाही जन्मदिवस मानला जातो.त्यामुळे या देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ या दिवशी बनवून ते अन्नपूर्णा देवीला चढवले जातात.याच दिवशी कुबेराने जास्त धन प्राप्ती व्हावी म्हणून शिवपुरम येथे भगवान शिवाची पुजा केली.याच दिवशी महर्षी वेद व्यास यांनी महाभारत कथा लिहिण्यास  प्रारंभ केली....
Article

वऱ्हाडाचा कुबेर राघोजी महार

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसाहत करून असणारा आजचा *बौद्ध  व पूर्वीचा महार* गेली कित्येक हजार वर्षापासून दारिद्र्यात जीवन जगत होता. आधुनिक भारताच्या इतिहासात महारांच्या कहाण्या आपण ऐकले आहेत.पण विदर्भातील वाशिम जवळून १५ किलोमीटरच्या अंतरावर असणारे तोरणाळा गावचा* काही वेगळाच इतिहास आहे.या गावी  राघोजी नावाचा सावकार होऊन गेला ज्याच्या गोष्टी आजही लोकांच्या तोंडी एकाला मिळतात राघो महार यांचा जन्म 1839 मध्ये झाला राघो स्वभावाने जिद्दी आणि मेहनती होता. असे सांगतात की एकदा काम करत असताना त्याला सोन्याने भरलेला हंडा सापडला. त्यातून त्याने मोह विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आपल्या मेहनतीने व चिकाटीने तो मोहविक्रेता म्हणून प्रसिद्ध झाला.  ज्याच्या हजारो पिढया गरीबीच्या अंधारात खितपत पडल्या होत्या त्या समाजात सावकार म्हणून त्याची ख्याती व्हायला वेळ लागला नव्हता. लोकांना आलेल्या छोट्या छोट्या आर्थिक ...
Article

कुटे गुरुजी…एक निरपेक्षवृत्तीचा -उपक्रमशील शिक्षक

नारायणराव गोविंदराव कुटे गुरुजी यांचा जन्म २६ जुलै १९४१ साली वरुडखेड येथे झाला. कुटे गुरूजी म्हटले की, चांगले साडे पाच फुटांपेक्षा उंच तसेच अंगापिंडाने भरलेले गौरवर्णी, थोडा लांब चेहरा, पांढरा शुभ्र पायजमा, त्यावर प्रेसचे शर्ट असे अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व त्यांचॆ होते. ते स्वभावाने जरी कडक असले तरी तितकेच मनमिळावू होते. तसेच सद्वर्तनी आणि निष्कलंक चारित्र्याचे होते.मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डीएड केले आणि १७ जुलै १९६३ ला ते यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये माळेगाव येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. सेवारत असताना अचलपूर येथे इंग्रजी विषयाचा कोर्स पूर्ण केला, नंतर पांढुर्णा आणि करजगाव येथे १९६७ ला रूजू होऊन १९९७ पर्यंत करजगांवला ३० वर्ष कार्यरत होते, असा त्यांच्या सेवेचा प्रवास झाला.करजगावी असताना त्यांना सदाशिव गोविंदराव भोयर, सालपे गुरूजी, भालेराव गुरूजी, गायकवाड गुरूजी इत्याद...
नाट्यप्रेमी करजगाव…!
Article

नाट्यप्रेमी करजगाव…!

नाट्यप्रेमी करजगाव...! करजगावातील नागरिकांना आपली रोजची कामे आणि जबाबदाऱ्या पार पाडून आलेला थकवा शिनभाग घालवण्यासाठी आणि आपले जीवन सुखी समाधानाने घालविण्यासाठी मनोरंजनाची अनेक साधने होती. भजन , किर्तन, प्रवचन, रामलीला, कटपुतली , लोकगीते, लोकनृत्य, दंढार, कलापथक, जलसे, तमाशे याद्वारे गावातील प्रत्येक जण आपले मनोरंजन करून घेत असे त्याच प्रमाणे नाटक सुद्धा करजगावकरांचे मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन होते. नाटकाद्वारे समाजातील वाईट प्रथा, परंपरा ,सामाजिक प्रश्न याबाबत जनजागृती होऊन सामाजिक परिवर्तनाला मोलाची मदत झाली. मागील आठ दशकापासून करजगावला नाटकाची परंपरा लाभली. या काळात वेगवेगळ्या नाट्य मंडळाद्वारे प्र .के. अत्रे ,बाळ कोल्हटकर , मधुसूदन कालेलकर या सारख्या प्रसिद्ध नाटककारांच्या सामाजिक विषयावरील अनेक नाटकांचे प्रयोग येथे करण्यात आले.करजगावात नाटकाची सुरुवात 1950 पूर्वीचं झाल्याचे दिसून येत...